Wednesday, January 14, 2015

स्विकाराचं श्रद्धेय अध्यात्म..

स्विकाराचं श्रध्देय आध्यात्म....
(परमेश्वरावर श्रध्दा असलेल्या प्रत्येकाने वाचावं असं काहीतरी...)
...व्यवहारात अनेकदा आपण इतरांच्या तोंडुन किंवा आपणही कित्येक वेळा, "माझी अमुकतमुक देवावर श्रध्दा आहे" किंवा "अमुकतमुक गुरुंना मी मानतो" वगैरे वक्तव्ये आपण ऐकत असतो, करत असतो....श्रध्दा असणे, किंवा मानणे गैर आहे असं अजिबात नाही. प्रत्येकाची श्रध्दास्थाने ही निरनिराळी असतात (त्यावर कुणीही टिका करण्याचीही गरज नसते, तो प्रत्येकाच्या आत्मानुभूतीचा विषय आहे) काही लोकं गणपतीची उपासना करतात, काहींचा श्रीशंकरांवर निस्सीम विश्वास असतो, कुणी शिर्डीसाईंचे भक्त तर कुणी श्रीगजानन महाराजांचे भक्त...व्यक्ति तितक्या प्रकृती...पण मुळात आपण भक्ती का करतो? किंवा एखाद्या विशिष्ट दैवतावर-गुरुंवर विश्वास का ठेवतो? याची कारणमिमांसा मुळात आपलीच आपण करायला हवीये.....त्याला "श्रध्दा जोखणं" असं मी म्हणतो...
....माझ्या मते बरेचदा आपल्या श्रध्देचा संबंध हा आपल्या व्यवहारीक सुखाशी किंवा यशापयशाची आपण जोडतो आणि तिथेच चुकतो. "मी गणपतीची उपासना केली आणि मला धंद्द्यात यश मिळालं" किंवा "मी विष्णुसहस्त्रनामाची पारायणे केली आणि माझा आजार बरा झाला" किंवा "मी दरवर्षी गुरुचरित्राचे सप्ताह करतो म्हणुन माझं नीट चाललंय"...ही अशी वक्तव्ये आपल्याला श्रध्दावान बनवतायत असं वरवर वाटलं तरी वास्तविक पहाता ही वक्तव्ये म्हणजे तुमच्या कमकुवत भक्तीचेच लक्षण आहे असं मी मानतो. याचं कारण म्हणजे तुम्ही तुमच्या उपासनेचं त्रैराशिक हे तुमच्या व्यवहारीक घटनांशी जोडुन चुक करत आहात. व्यवहारात घटना घडत असतात, त्या काहीवेळा तुमच्या "फेव्हर" मध्ये तर काहीवेळा तुमच्या विरोधात घडत असतात, घडणार असतात (त्याचा पुर्वकर्मार्जित कर्मांशी संबंध असतो किंवा नसतो तो भाग वेगळा विषय आहे) पण जेव्हा तुम्ही व्यवहारात तुमच्या बाजुने घडणाऱ्या घट्नांचे "क्रेडीट" परमेश्वरी उपासनेला देता तेव्हाच तुम्ही विरोधात घडणाऱ्या घटनांनाही त्यालाच जबाबदार धरु लागता...आणि श्रध्दा डळमळीत व्हायला लागते...
..."आयुष्यभर त्या गुरुचरित्राची पारायणे केली पण माझं काही चांगलं झालं नाही", "दरवर्षी मी मार्गशीर्षातले गुरुवार न चुकता करते पण काही केल्या माझी आर्थिक परिस्थिती सुधारत नाही" "शंकरावर नेमाने दर सोमवारी बेल वहातो पण माझी कामे काही होत नाहीत" अशी विधाने मग केली जातात. वास्तविक पहाता भक्ती म्हणजे आनंद असतो, तिथे निरपेक्षता असते, परिस्थितीचा स्विकार असतो, परमेश्वर आहे आणि त्याचं नामस्मरण केल्याने मला आनंद मिळतो म्हणुन मी ते करतो असा भाव अपेक्षित असतो. श्रीमंत व्हावं म्हणुन तुकारामांनी विठ्ठलभक्ती केली नव्हती, कोट्याधिश व्हावं म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही...तो त्यांचा आनंद होता. व्यवहारिक अपयशाने किंवा संकटांनी जर आपण देवाचा त्याग करणार असु तर तिला भक्ति म्हणता येणार नाही, तो शुध्द व्यवहार झाला. नाही का?
....प्राप्त परिस्थितीचा आनंदाने स्विकार करुन, आलेल्या संकटांविरुध्द लढण्याचे बळ तुम्ही परमेश्वराकडे नक्की मागु शकता पण "अमुक झालं तर तमुक" असा भाव भक्तीत अपेक्षित नाही. जोपर्यंत नीट चाललंय तोपर्यंत परमेश्वरी उपासना, पुजाअर्चा करणारी आणि एक गोष्ट जरी मनाविरुध्द झाली तरी एका क्षणात नास्तिक बनणारी मंडळी मी पाहिली आहेत, त्यांना मी "भक्तिमार्गातले व्यापारी" म्हणतो. "स्विकाराचं श्रध्देय आध्यात्म" जोपर्यंत तुम्ही आत्मसात करणार नाही तोपर्यंत ईश्वरी उपासनेतलं मर्म तुम्हाला कळणार नाही, आनंद काय असतो? ते समजणार नाही. अर्धपोटी उपाशी राहूनही आमच्या तुकोबारायांनी "आनंदाचे डोही आनंद तरंग..." हा अभंग कसा काय लिहिला? ते रहस्य समजायचं नाही. भक्ती ही कायम सघन, बळकट, निर्लेप, शुध्द, अव्याभिचारी आणि ’अ’व्यवहारी(इथे अर्थ निराळा घ्यावा) हवी हे विसरु नये
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

Tuesday, January 13, 2015

एकदा वाचाच...

दिन दिन दिवाळी...dead body ओवाळी!!
दिवाळीला नरकासुराचा वध झाला. पण आता नरकासुराची जागा घेतली आहे सामान्य भारतीयांनी.. दिवाळी असो किंवा आणखी कोणताही सण अथवा खास प्रसंग. सामान्य भारतीयाला जिवंतपणी dead body बनवलं जातं. होय, आपल्यापैकी अनेकजण dead body आहेत... जिवंत असतानाच!! आणि दिवाळीत तर ह्या dead body ला लुटायचा plan तयार आहे.
दिवाळीच नाही तर दर सणाला, दररोज आम्हाला जिवंत असताना मारल जातं..मेलेल्यांच्या खिशातून पैसे काढायला सोपं असतं ना...आणि मारणारे स्वत आनंदाने मरण्यासाठी पैसे मोजतात. कोण बनवतं आम्हाला नरकासुर?
Department of Health and Human Services (DHHS) ने संपूर्ण जगातील आरोग्यसेवकांना कळवल आहे कि Formaldehyde हे रसायन cancer ला आमंत्रण देतं. Formaldehyde जीव जंतू ठार करतं. जर एखादं प्रेत जास्त वेळ ठेवायचं असेल, ते लवकर कुजू द्यायचं नसेल तर त्यावर Formaldehyde लावतात. जेणेकरून प्रेत लवकर सडत नाहीत. आता हे स्पष्ट आहे की, जिवंत असताना हे रसायन आपण लावणार नाही. पण आपण हे रसायन चेहऱ्यावर थोपतो. अंगावर फासतो. FDA (Food and Drug Administration) ने आणखी एका रसायनावर बंदी आणली आहे...त्याच नाव आहे...benzene. ह्या रसायनाची खासियत म्हणजे हे एकदा प्यायलं की पुन्हापुन्हा प्यायची इच्छा होते. आपण soft drink पुन्हा पुन्हा का पितो. कारण अनेक soft ड्रिंक मध्ये हे रसायन मिसळतात. आम्ही लहान मुलांना ते देतो, पाहुण्यांना देतो....सगळे addict बनतात. soft drink बनवणार्या कंपनीला कायमचे ग्राहक मिळत राहतात. आता तर दिवाळीच आहे. पिझ्झा-burger ची जोरात खरेदी होईल..दिवाळी साजरी करत नाहीत celebrate करतात. पिझ्झा, buger आणि soft ड्रिंक्स पिवून. पिझ्झा base सडू नये, त्यावरील मांस कुजू नये म्हणून त्यात काय मिसळतात?....ऑस्ट्रेलिया येथे KFC मध्ये chicken Twister wrap खाललेल्या मोनिका सामन ह्या तरुणीला salmonella encephalopathy ह्या मेंदू दुखापतीचा सामना करावा लागला. Justice Stephen Rothman ह्यांनी ह्यासाठी KFC ला जबाबदार धरलं. (ref : KFC guilty in Australia salmonella brain damage case ).
... आणि Formaldehyde तर रोजच्या जीवनाचा भाग झाला आहे...खासपणे महिला ह्याचा भरपूर वापर करतात. दिवाळी मध्ये तर दुप्पट वापर होणार आहे. हे रसायन पुढील product मध्ये असत:
Lotions
Shampoos
Sunblock
Soap Bars
Cosmetics
Body Wash
Toothpaste
Baby Wipes
Bubble Bath
वरील product तुमचा चेहरा, तुमचं शरीर फ्रेश ठेवतात. अगदी खरोखर फ्रेश ठेवतात. कारण त्यातील Formaldehyde तुमच्या त्वचेवर जंतू बसू देत नाही. बसले तर त्यांचा नाश करतात. सोबत तुमच्या पेशींचाही नाश करतात. तुम्ही सुंदर दिसता की नाही हे माहित नाही. पण dead body बनता. स्वताच्या पैशाने.
ह्याच कारणामुळे स्वीडन आणि जपान देशांनी अश्या products वर बंदी आणली आहे. कारण आपल्या नागरिकांना nasopharyngeal cancer आणि myeloid leukemia होऊ नये हा त्यामागचा हेतू आहे. आपले नागरिक गंभीर आजारी झाले, cancer ग्रस्त झाले तर देशाचं नुकसान आहे हे जपान आणि स्वीडन ला कळत. पण भारतात ह्या कंपन्या राजरोस धंदा करतात. कारण त्या globalization च्या नावाखाली भारतात घुसल्या आणि इथल्या लोकांचं आरोग्य बिघडलं तर त्यांना फायदा होणार आहे...कारण आरोग्य देणाऱ्या सेवा सुध्धा तेच चालवतात. म्हणजे जिवंत राहिला तरी ग्राहक आणि मारायला टेकलात तरी ग्राहक. भारत फार मोठी बाजारपेठ आहे...जगताना मारणाऱ्यांची, मरत-मरत जगणार्यांची.
noodles meats मधेही अशीच रसायन वापरली जातात. भारत फार मोठा आहे, आपल्या हवामानात खाद्य पदार्थ सामान्य तापमानात फार तर 48 तास टिकतात. त्यामुळे जे product भारताच्या कानाकोपर्यात न्यायचे त्यांना ताज्या स्वरुपात टिकवण्यासाठी रसायने लावतात. शिवाय ह्या product चं शेल्फ life वाढतं...रसायनांमुळे सहा महिने टिकून राहतात. लहान मुले चिप्स, वाफेर्स आणि असे आकर्षक दिसणारे पदार्थ खातात. आपण घरी मुलाला ६ दिवस आधीच दूध पाजत नाही. पण chocolate ....ते तर वाढदिवसाला असतंच. सणाला मिठाई बाजूला झाली, chocolate देतात-घेतात. त्यात दुध असल्याच सांगतात. कोणत्याही रस्त्यावरील दुकानात ४ ते ६ महिने दूध टिकवण्यासाठी त्यात काय मिसळतात?
साधारण २० वर्षांपूर्वी dentist शोधावा लागायचा. कारण तेव्हा chocalate फार मिळत नसत. कोणी खात नसत. आता एका गल्लीत चार dentist मिळतात आणि बाजूला chocolate विकणारी दहा दुकानं असतात. आणि soft ड्रिंक, पिझ्झाचा पाउस पडतो. एका दुकानात खा-प्या आणि बाजूच्या दवाखान्यात जा. पुन्हा त्या दवाखान्यात विदेशी कंपन्या बसल्याच आहेत...आरोग्य सेवक बनून. त्यांच्या गोळ्या महाग असतात. तरीही त्याच मिळतात. कारण त्या विकणार्याला चांगला मर्जीन मिळतो. शिवाय toothpaste जर खरच मजबूत दात देतात तर त्या भारतात आल्यापासून दातांचे रुग्ण वाढणे हा फक्त योगायोग आहे का?
असे product वापरून एक तर आपण dead body बनतो..आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायला भाग पाडतो. कारण नारळ पाणी, लिंबाचा रस, ताक, लस्सी, नीरा हे पेय न पिता विदेशी कंपन्यांचे ड्रिंक्स पितो. फायदा जातो विदेशी कंपनीच्या खिशात आणि आपले शेतकरी भरपूर पिक काढूनही कंगाल होतात. स्व-हस्ते मरण स्वीकारतात. जर साखर सम्राट होऊ शकतो तर लिंबू सम्राट, नारळ सम्राट का होऊ शकत नाही. साखरे इतकीच नारळ-लिंबाची गरज असते. पण लिंबू, नारळाचं पाणी, उसाचा रस hygenic नसतो असा प्रचार केला जातो. कोण करतं हा प्रचार? ज्यांना हे पदार्थ अडचण ठरतात ते. cola कंपन्या भारतात आल्या तेव्हा त्यांनी strategy आखली...लिंबू, नारळ, लस्सी ह्यांना बाजारातून हाकलायच. तरच भारतीय लोक आपले ड्रिंक्स पितील.... आणि अस भाषण jeorgia मध्ये झालं, गांधीजींच्या पुतळ्याखाली.
साधारण ११९५ साली cola कंपन्यांनी मोहीम सुरु केली आणि आज २०१४ मध्ये ते यशस्वी झाले. शत प्रतिशत विजयी ठरले. आता ड्रिंक्स वर प्रचंड उलाढाल होते. विदेशी कंपन्या अमाप नफा कमवतात आणि शेतकरी मात्र आत्महत्या करतात. पाणी विकणारे तेजीत आहेत आणि अन्न पिकवणारे कर्जबाजारी. अन्न तयार करणाऱ्याच product कोणी घेत नाही. शेतकरी मेले. आता पाळी आहे दूध उत्पादकांची. कारण मिठाई मध्ये sugar , calories असतात म्हणे....पण chocolate , noodles आरोग्याला चांगले असतात. त्यामुळे सण, खास प्रसंग chocolate ने साजरा करतात. म्हणून मिठाईची दुकानं संपत चालली, लोक संख्या वाढली आणि मिठाई, किराणा दुकाने कमी झाली..कारण mall आले आहेत . मिठाई विकणारे भारतीय आहेत. त्यांची मिठाई पद्धतशीर पाने बदनाम केली जाते. mall मधील brands ला खपवण्यासाठी सिने-क्रिकेट स्टार तयार आहेत. त्यात काय मिसळतात ते नंतर उघडकीला येत. तोवर सदर कंपन्या रग्गड नफा कमावून मोकळ्या होतात. कित्येकांना रुग्ण बनवतात. इकडे मालाला मागणी न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो. सध्या केळ्यांची अशीच बदनामी चालू आहे. केळं खाल्ल्यामुळे १०० % cancer होतो. आणि पिझ्झा, बर्गर, noodle , snack आरोग्य देतात. म्हणजे तुम्ही केळी खावू नका. शेंगदाणे, फुटाणे, कुरमुरे, डाळी, काकडी, गाजर असे अनेक पदार्थ खावू नका. ते healthy नाहीत. शिवाय कुरमुरे खातो तो गरीब, backward समजला जातो. पिझ्झा खातो तो updated असतो. त्यामुळे पिझ्झा कंपन्या updated होत जातात आणि भारतीय शेतकरी out ऑफ date .
पिझ्झा कंपन्यांना AC दुकाने आणी रस्त्यावर भाजी विकणाऱ्या भारतीय महिलेला उन-पावसाचा मारा सहन करावा लागतो. शहरातील भरगच्च रस्त्यावर लघवी करायला जागा नसते, म्हणून ह्या महिला चहा-पाणी पीत नाहीत. किंवा चार-पाच तासात भाजी उचलून घरी जाव लागत.
जर भारतीयांनी ठरवल की मी फक्त माझ्या शेतकर्याने बनवलेलं product घेईन तर शेतकरी cola कंपन्या इतकी भरभराट पाहू शकतील. ते तुम्हाला dead body बनवणार नाहीत. घातक रसायन थोपणार नाहीत.
चला दिवाळी साजरी करू, जिवंत माणसांची...आनंदाने जगू शकणार्या भारतीय शेतकऱ्यांची...आणि त्या नरकासुराला दूर करूया जो भारतात घुसला आणि आम्हालाच मारायला निघाला आहे.
आमचा देश आधी सापांचा, गुलामांचा देश म्हणून ओळखला जायचा...आता तो dead body चा देश बनवायचा नाही!!
-निरेन आपटे

एक छान लेख...

तुम्हाला काय आहे... मुलगी-मुलगा? की रेसचा घोडा?
एक तरुण interview रूम मध्ये बसला होता. समोर तीन professionals चष्मा आणि tie लावून बसले होते.
Executive engineer ने तरुणाकडे पाहून विचारले, " tell me , जिथे खूप पाउस पडतो, तिथे जास्त प्रमाणात काय निर्माण होतं?"
तरुणाने उत्तर दिलं- "छत्र्या!"
दुसर्या tie वाल्या लठ्ठ CEO ने विचारलं- " यावर्षी पद्मश्री कोणाला मिळाली?"
तरुणाने उत्तर दिलं- " मला... कारण माझं नुकतंच लग्न झालं असून बायकोच नाव आहे पद्मश्री !!"
तिसरा Regional manager वैतागून म्हणाला-" काही डोक आहे का तुला?"
तरुणाने शांतपणे उत्तर दिलं-" हो, खूप डोक आहे. शाळेत भरती झाल्यापासून ह्या interview पर्यंत सगळे जण तेच खात आहेत."
Executive engineer ने विचारलं, " तुझ्या bio - data मध्ये M A , B f t डिग्री लिहिली आहे, काय आहे ही पदवी?"
तरुणाने पुन्हा शांतपणे उत्तर दिलं-" Matric appeared but failed thrice "
त्यावर CEO ने चिडून फाइल आपटली आणि ओरडला-" फार मोठा गाढव आहेस तू !!"
तरुण तितक्याच शांतपणे म्हणाला- "साहेब, मोठे तर तुम्ही आहात, मी तर फार लहान आहे"
एक पिढी शिक्षण घेवून गाढव बनली आणि आता नवी पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे.
परीक्षेत १००% पाहिजेत, कराटे क्लासमध्ये black बेल्ट मिळवायचा आहे. त्यानंतर dance क्लास attend करायचा. भगवतगीता स्पर्धेत जायचं आहे. श्लोकांचा अर्थ कळला नाही तरी ते तोंडपाठ करायचेच. कारण first prize मिळालंच पाहिजे !! मग drawing competition असते. तिथून बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला...संगीत विशारद बनायला.
Albert Einstein बनवून देणाऱ्या Multi -national school आल्या. पण Albert हा Einstein बनण्यासाठी शाळेत गेला नव्हता. एक अमिताभ बनला तर हजारो acting school उभ्या राहिल्या. पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही school मध्ये गेला नव्हता. आता लवकरच मोदी तयार करणाऱ्या शाळा उभ्या राहतील. आणि पालक लाखो रुपये फी भरून त्यात मुलांना पाठवतील. आज मुलाच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च एका वर्षाला होतो, तितके रुपये त्याच्या पालकांना संपूर्ण शिक्षण घेण्यासाठी सुध्दा लागले नाहीत.
आता शाळा सुरु केल्या आहेत investors नी. मागणी तसा पुरवठा ह्या तत्वावर. पालकांना आपल्या मुला-मुलीला रेसचा घोडा बनवायचं आहे ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली. दप्तराचं आणि पालक-शिक्षकांचं अपेक्षांचं ओझं वाहणारी मुले म्हणजे चालती बोलती प्रेते बनत चालली आहेत. जरा शुद्धीवर आली की " what is square of 12 ? " असं विचारून त्यांचं बालपण चिरडून टाकतात.
श्री मोदी ह्यांनी मुलांना एक प्रश्न विचारला होता-" तुमच्यापैकी किती जण घाम गळेपर्यंत खेळतात?"
तेव्हा एकाही मुलाने हात वर केला नाही. कारण आता मुले AC मध्ये जन्म घेतात, AC मध्ये वाढतात. चिप्स खातात, soft ड्रिंक पितात आणि mobile वर game खेळत बसतात. उन, पाऊस, वारा ह्याच्याशी संबंध येत नाही. पडणं-लागणं, खेळात हरणे माहीतच नाही. school bus आली नाही तर शाळेपर्यंत चालत जाण्याची ताकद मुलांमध्ये नाही. वय वर्ष ६ पार होत नाही तर डोळ्याला चष्मा लागतो. हात पायांच्या एकतर काड्या होतात नाहीतर लठ्ठपणा वाढतो. कारण शारीरिक कष्ट संपले आणि Modified food starch, maltodextrin, hydrolyzed corn gluten, disodium inosinate/ guanylate, yeast extrac, hydrolyzed soy protein मिसळलेले पदार्थ खाणे सुरु झाले. ह्या ingredients ची खासियत म्हणजे ते मुलांच्या पोटात शिरून जास्त काळ टिकतात आणि पोटातील पोषके शोषून घेतात. मुलांची hormonal आणि जैविक वाढ रोखतात. ज्यामुळे मुले दुबळी होत जातात. हे घटक पिझ्झा-बर्गर मध्ये असतात. म्हणून भारत लवकरच diabetes चे सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनणार आहे. सोबत इतरही विकार येत आहेत.
शेंगदाणे, चणे, रवा, तांदूळ, बाजरी, सुका मेवा आणि फळे ह्यात घातक ingredients नसतात. लापशी, सातू, शिरा, पोहे किंवा अंड्याचे घरी बनवलेले पदार्थ मुलांना उत्तम पोषण पुरवतात. ते मिळत नसल्यामुळे मुलांची शारीरिक वाढ नीट होत नाही. प्रतिकार क्षमता संपते. मग vitamins , DHA , minerals देणारे product विकत आणून ते खायला देतात. वास्तविक, शरीर हा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे. ह्याच शरीराला योग्य आहार, कष्ट मिळाले तर कुठेही तयार न होऊ शकणारं रक्त तयार होतं. साध्या भाज्या, अस्सल भारतीय जेवण मिळालं की शरीराची यंत्रणा स्वत काम करते. म्हणून ताज्या भाज्या, भाकरी खाणारी आणि मिनरल्स, calcium , proteins माहित नसलेली माणसे १०० वर्षे जगली आणि हे माहित झालेली माणसे फक्त ६० वर्षे जगतात…तेही अनेक रोग सोसत, औषधे घेवून !!
खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन न केल्यामुळे मुलांना मानसिक कमतरता जाणवते. संघर्ष माहित नसतो आणि team work कळत नाही. मित्र फक्त whats app , face बुक वर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही. सुख-दुखाची देवाणघेवाण नाही आणि मित्राचा-मैत्रिणीचा मानसिक आधार नाही. दिलखुलास हसणे आणि ओक्साबोक्शी रडणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. ह्या दोन्ही क्रिया मुलांना करता येत नाहीत. आपोआपच, जरा मनाविरुद्ध घडलं की लहान मुले-मुली आत्महत्या करतात. बरीच एकुलती एक मुले दुसर्याशी जमवून घेण्याची सवय नसल्यामुळे पुढे लग्न झाल्यावर वर्षभरात घटस्फोट घेतात. ज्या मुलांना बहिण नसते, चांगली मैत्रीण नसते त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन संकुचित बनतो. ह्या उणीवांचा शिक्षणात विचार केलेलाच नाही.
भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षण तज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरु झाला. मोठे उद्योजग, पुढार्यांनी शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली. एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या admission ची तयारी सुरु होते. कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने केली होती. आता मुल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवायची तयारी सुरु होते. आता मुलाने बोलायला सुरुवात केली की थेट E =Mc square म्हणायचं बाकी राहिलं आहे.
अशी मुले सर्व formula पटापट म्हणून दाखवतील पण स्वताचा formula कधीही शोधू शकणार नाहीत.
guitar शिकतील पण स्वताची संगीत रचना करू शकणार नाहीत.
लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर, मेरी कोम ह्यांचं अनुकरण अचूक करतील. पण स्वताची ओळख निर्माण करणार नाहीत.
कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं.
जगायची कला, गीत-संगीतातील आनंद, निसर्गासंपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार, साहित्य ह्याला बाजारू किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय, त्यात ते पारंगत होत आहेत. काही जणांना campus मध्ये दर महिना ४ लाखांपेक्षा जास्त पगार असणारी नोकरी मिळतेय....पण त्यात देशाचं नाही, भांडवलदारांच हित साधला जातंय. पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल पण न स्वत जगण्याचा आनंद लुटू शकतील, न दुसर्याला जगण्याची मजा मिळू देतील...
अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये शाळेत AC लावत नाहीत. तिथे मुलांना घोकंपट्टी पेक्षा practical वर भर देतात. वृक्ष-वेली स्वताच अन्न स्वत तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात?...असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात. त्या रोपांची-वेलींची जोपासना करायला लावतात. "निप्पोन technology " ने केलेल्या तपासणीत म्हटलं आहे की शाळेच्या आवारातील वेलींमुळे तापमान चार अंश कमी झाल आहे. आणि मुले पाना-फुलांसोबत भावनिक नात जोडू लागली आहेत. जर्मनी मुलांना Transference शिक्षण देते. तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेवून दुसरी पर्यंत लेखन करू देत नाहीत. पाचवीपर्यंत practical चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका, प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल ह्याची सतत तपासणी होते. दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्रांच प्रशिक्षण देतात. सगळे एकदम science मध्ये भरत नाहीत. अनावश्यक विषय शिकवत नाहीत. चीन हा cycle प्रेमी देश ४ वर्षाच्या मुलांना cycle चालवण्याच शिक्षण देतो. त्यानंतर theory कमी आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात.
प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार ह्याचा विचार Netherlands सारखा देशही करतो. एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषय आणि क्लासचा मारा सोसण्याच काम भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते.
शिक्षण काय असतं?
रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पहा.
टागोरांची "शांतीनिकेतन" शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई. एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्या समोर पुस्तकात डोक खुपसून बसली होती. आणि उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती. कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध घेत फिरत होता. तेवड्यात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय...गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त चार मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले हसण्यात-नाचण्यात रमली होती. सुटा-बुटातील पालक महाशय टागोरांना म्हणाले- “या नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का?”
टागोर म्हणाले- “चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलांची. ही मुले खेळण्या-बागडण्याच्या वयात मोठ्या माणसासारखी वागत आहेत. ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर मीसुद्धा अजून झालो नाही. खरं तर मलाही झाडावर चढाव असं वाटतं. पक्ष्यांशी बोलावसं वाटत. भरपूर खेळावस वाटतं. पण माझ शरीर आता साथ देत नाही. “
टागोर जगण्यासाठी शिकवत होते. आता शिकण्यासाठी जगावे लागते.
जास्त ज्ञान, जास्त कला घेवून मुले धावत असतात.
आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात !
मग एक रेस सुरु होते आणि जगायचं राहून जातं !!
-निरेन आपटे