Monday, February 16, 2015

अनघा काकी तशा नेहमीच छान राहणार्या आणि स्वभावही खूप मस्त आणि आनंदी. थोड्याशा वयस्कर असल्या तरी उत्साही आणि अतिशय अनघा काकी तशा नेहमीच छान राहणार्या आणि स्वभावही खूप मस्त आणि आनंदी. थोड्याशा वयस्कर असल्या तरी उत्साही आणि अतिशय सकारत्मक. त्या नेहमीच संतुलित विचार करतात त्यामुळे स्त्रियांचं जास्त कौतुक किवा पुरुषांना उगाचच नाव ठेवलेली त्यांना कधी आवडत नाहीत. त्यांच्या शब्दात सांगायचं तर " खर सांगू तुम्ही माझ्यावर टीका कराल पण माझ स्पष्ट मत आहे की अर्ध्या पेक्षा जास्त संसार हे पुरुषांमुळे टिकले जातात. आपण सतत बडबड करत असतो. आपल्या मधेही मीच सगळ करते असा अहं भाव असतो. आपले नवरे जास्त वेळा बहिऱ्या लोकांसारखे वागतात त्यामुळेच हा संसाराचा गाडा सुरळीत चालू असतो. पुरुष काही बोलू शकत नाही अस नसत तर आपण काही बोललो तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात ह्याची त्यांना कल्पना असते म्हणून त्यांची शांती हा त्यांचा कमकुवतपणा समजायची चूक अनेक स्त्रिया करतात. मित्र म्हणून आपल्याला तो हवाही असतो पण त्याच वेळी आपणही त्याची छानशी मैत्रीण होण गरजेच आहे हे आपण विसरतो.आपण विवाहबाह्य संबंधाविषयी चर्चा करतो तेव्हा एक दुर्लक्षित झालेली गोष्ट हीच असते की आपल्याला मित्राची गरज असते तशीच त्यानाही मैत्रिणीची गरज असते. दर वेळेस त्या नात्याला शारीरिक पातळीवर उतरवायची गरज नसते. त्यांचीही बौद्धिक आणि भावनिक अशी गरज असू शकते .आपण स्त्रिया आपल्या नवर्याच्या चांगल्या मैत्रिणी होण्याचा प्रयत्न कधी करतो का ? सगळ्यात इतक्या गुरफटून जातो की छान राहील पाहिजे , दिसलं पाहिजे , वैचारिक पातळीवरही नवर्याशी सुसंवाद साधला पाहिजे हे लक्षातच घेत नाही . विरंगुळ्याचे क्षण नवरा म्हणून त्यांच्याही गरजेचे असतात ह्याचाच विसर आपल्याला पडतो. अनेकदा नवर्याला त्याची बायको मैत्रीण म्हणून अधिक हवी असते. आजकाल तिथेच खूप जणी कमी पडतात. मी पुरुषांची बाजू घेते अस समजू नका. पूर्वी स्त्रिया ह्या घरात असायच्या त्यामुळे ह्याचा विचार कधी झाला नाही पण आता स्त्रियांनी आपल्यातील ही आपल्या "नवर्याची मैत्रीण" जपली पाहिजे. संसार सुरळीत चालण्यासाठी ह्याची फार गरज असते. त्याचं मैत्रीपुर्वक नात त्यांच्यातील नवरा बायकोच्या नात्यालाही उत्साही ठेवत आणि प्रेमही छान अबाधित रहात. ज्या स्त्रियांना हे जमत त्या पत्नी म्हणून अधिक यशस्वी होतात." थोडक्या शब्दात त्यांनी यशस्वी वैवाहिक जीवनाची एक महत्वाची गरज अधोरेखित केली.ज्याचं लग्न झाल आहे आणि ज्याचं व्हायचं आहे त्यांनी ह्याचा नक्कीच विचार करायला हवा. मला तरी त्यांचे विचार मनापासून पटले.तुम्ही तुमच मत नक्की द्या ……… मिनल सबनीस.