tag:blogger.com,1999:blog-3265806293555881282024-02-07T14:05:41.766-08:00aanand tarang (आनंदतरंग)माझ्या ह्रदयाचे स्पंदन...राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.comBlogger79125tag:blogger.com,1999:blog-326580629355588128.post-35487551972080058642020-02-29T02:10:00.002-08:002020-02-29T02:10:43.371-08:00<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px;">
श्रीमहालक्ष्मी (+)</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
लेखक- <a class="profileLink" data-hovercard-prefer-more-content-show="1" data-hovercard="/ajax/hovercard/user.php?id=702871185&extragetparams=%7B%22__tn__%22%3A%22%2CdK-R-R%22%2C%22eid%22%3A%22ARAx2GqfQ9zhLv5b-i0Cb4O9H6RiR4A0MUWWxIE_CBBjm9gamIhv-_JJN0FA6XbmkaL0hqHnoDAhn8a-%22%2C%22fref%22%3A%22mentions%22%7D" href="https://www.facebook.com/astroguru.sachin?__tn__=%2CdK-R-R&eid=ARAx2GqfQ9zhLv5b-i0Cb4O9H6RiR4A0MUWWxIE_CBBjm9gamIhv-_JJN0FA6XbmkaL0hqHnoDAhn8a-&fref=mentions" style="color: #385898; cursor: pointer; font-family: inherit; text-decoration-line: none;" title="सचिन मधुकर परांजपे">सचिन मधुकर परांजपे</a></div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
धन किंवा ज्याला पैसा म्हणतात त्याची अधिष्ठात्री देवि म्हणजे महालक्ष्मी हे आपण मागच्या लेखात बघितलं आहे. धन म्हणजे रोख रक्कम किंवा बोलीभाषेतला पैसा इतकी मर्यादीत व्याख्या माणसाने केलेली असली तरीही पूर्वासुरींनी महालक्ष्मी ही देवता ऐश्वर्यसंपन्नतेशी जोडलेली आहे. त्यामुळे धन (रोख रक्कम), सोनंनाणं, संपत्ती, चलअचल प्रॉपर्टी, समाजातील मानमरातब, सुप्रतिष्ठा, ताकद, सत्ता, मांगल्य, उत्तम आरोग्य आणि मुख्य म्हणजे संपत्तीचा सर्वांगिण उपभोग घेण्याची मानसिक व शारिरीक सुसंपन्नता ही या एकाच देवतेच अन्युस्युत आहे. तिला <a class="_58cn" data-ft="{"type":104,"tn":"*N"}" href="https://www.facebook.com/hashtag/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80?source=feed_text&epa=HASHTAG" style="color: #385898; cursor: pointer; font-family: inherit; text-decoration-line: none;"><span class="_5afx" style="direction: ltr; font-family: inherit; unicode-bidi: isolate;"><span aria-label="hashtag" class="_58cl _5afz" style="color: #365899; font-family: inherit; unicode-bidi: isolate;">#</span><span class="_58cm" style="font-family: inherit;">श्री</span></span></a> अशी संज्ञा आहे. श्रीसूक्ताची फलश्रुती असलेल्या लक्ष्मीसूक्ताचा शेवटही</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
श्री॒वर्च॑स्य॒मायु॑ष्य॒मारो᳚ग्य॒मावि॑धा॒त् शोभमानं मही॒यते᳚ ।<br />ध॒नं धा॒न्यं प॒शुं ब॒हुपु॑त्रला॒भं श॒तसं॑वत्स॒रं दी॒र्घमायुः॑ ॥असा आहे</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
म्हणजे या एकाच ऋचेत ऐश्वर्यापासून सत्ता, धनधान्य, पशुधन, बहुत पुत्रांचा लाभ, संतती आणि शंभर वर्षाचे दीर्घायुष्य असा उल्लेख केलेला आहे हे लक्षात घ्या. आपण पुढच्या काही लेखांमध्ये श्रीलक्ष्मीदेवीच्या अनेक स्तोत्रांचा उल्लेख करणार आहोतच. पण त्या अगोदर श्रीलक्ष्मीच्या गुणधर्माचा परिचय आपण हळूहळू करुन घेणार आहोत...</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
१) धन किंवा पैसा हे प्रामुख्याने सुखाची साधने व विनिमयाची साधने खरेदी करण्याचे एक प्रयोजन आहे. एक माध्यम आहे हे ध्यानात घ्यावे. म्हणजे साध्य हे सुखाची साधने, गाड्याबंगले, वस्तु हे असून ते मिळविण्याचे साधन म्हणजे पैसा आहे. गोंधळ हा होतो की आपल्यापैकी बरेचजण पैशालाच साध्य समजून पैशामागे जीव तोडून लागतात आणि तिथे गोष्टी फिस्कटतात. पैसा हा अत्यावश्यक आहेच पण ते साध्य नाही...ते फक्त साधन आहे. ज्याप्रमाणे एखादा आवडीचा मिल्कशेक प्यायला काचेचा ग्लास लागतो, तो अतिशय महत्वाचा असतो हे मान्य पण त्यापेक्षाही महत्वाचा आहे तो त्यातून प्यायला जाणारा मिल्कशेक...मिल्कशेककडे दुर्लक्ष करुन तुम्ही फक्त काचेचा ग्लासच कवटाळून बसाल तर चालणार नाही. तेव्हा साध्य आणि साधन यातला फरक लक्षात घ्या...आपल्याला साध्य बरीच गाठायची आहेत. साधन फक्त वापरायचे आहे...साधनाला बंदिस्त करुन ठेवाल तर ते चालणार नाही...</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
२) <a class="_58cn" data-ft="{"type":104,"tn":"*N"}" href="https://www.facebook.com/hashtag/%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87_%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AF_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80?source=feed_text&epa=HASHTAG" style="color: #385898; cursor: pointer; font-family: inherit; text-decoration-line: none;"><span class="_5afx" style="direction: ltr; font-family: inherit; unicode-bidi: isolate;"><span aria-label="hashtag" class="_58cl _5afz" style="color: #365899; font-family: inherit; unicode-bidi: isolate;">#</span><span class="_58cm" style="font-family: inherit;">न_मागे_तयाची_रमा_होय_दासी</span></span></a> हे एक गंमतीशीर सुभाषित आहे आणि ते शब्दश: खरं आहे बघा...कोणत्याही गर्भश्रीमंत माणसाकडे बघा. तो श्रीमंत असतो पण तो उद्योगी असतो. तो निरनिराळ्या प्रोजेक्टविषयी गप्पा मारेल, तो निरनिराळ्या विषयांचा उहापोह घेईल पण तो कधीच पैसा या गोष्टीविषयी बोलताना दिसत नाही. त्यालाही पैसा हवाच असतो हो पण त्याचा उल्लेख तो कटाक्षाने टाळतो...त्याच्या विचारानुसार, उद्योग हा महत्वाचा असून पैसा हे त्या उद्योगाचे Byproduct आहे. उद्योग केल्यावर, तो यशस्वीपणे आणि मेहनतीने चालविल्यानंतर पैसा हा मिळणारच,जाईल कुठे? फक्त पैशाची हाव किंवा पैशामागे हात धुवून लागाल तर पैसा अजिबात मिळत नाही. तेव्हा आजपासून बोलताना, चर्चेत पैशाचा उल्लेख टाळा...सुखाच्या साधनांविषयी बोला, उद्योगाविषयी बोला, नव्या प्रोजेक्टविषयी गप्पा मारा, नोकरीत असाल तर नोकरी बदलण्याविषयी चर्चा करा, नव्या ऑपोर्च्युनिटीज बघा...पैसा सोडून बाकी विषयांवर गप्पा करा....पैसा हा येईलच, श्रीलक्ष्मी येईलच फक्त जो तिच्या मागे धावत नाही त्याच्या मागे ती येते हे विसरु नका...</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
३) कायम रॉयल व्यक्तिमत्वांचे आदर्श समोर ठेवा. जे खऱ्या अर्थाने श्रीमंत आयुष्य जगतात अशांकडे बघा..जमिनी विकून गाड्या उडविण्याऱ्या गुंठामंत्र्यांचे आदर्श ठेवू नका, आणि करोडॊ रुपये ढुंगणाखाली ठेवून भुकेकंगलासारखं फालतू आयुष्य जगणाऱ्या कवडीचुंबकांचेही आदर्श ठेवू नका...गर्भश्रीमंत, उद्योगी, बुध्दीमान, उत्कृष्टपणे पैशाची गुंतवणूक करणारे, रॉयल लाईफस्टाईल जगणारे, मितभाषी, व्यसनांना स्वत:वर हावी होऊ न देणारे, चारित्र्यसंपन्न, देखणे, उत्तम ड्रेसिंग सेन्स असणारे, पैशाचा उत्तम विनियोग करणारे, सिलेक्टीव्ह गोष्टींची आवड असणारे, पैशाचा बडेजाव न मिरवणारे, मृदू, ऐश्वर्यसंपन्न, आधुनिक लाईफस्टाईल जगणारे, रसिक वृत्तीचे असे जे कोणी आहेत त्यांचे आदर्श समोर ठेवा...चंदनाचे संगे तरुवर चंदन या उक्तीप्रमाणे हे वर उल्लेख केलेले गुण स्वत:मध्ये कसे येतील ते बघा...ऐश्वर्यसंपन्न आयुष्य आपोआप जगायला सुरुवात कराल तुम्ही....</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
(क्रमश:)</div>
</div>
राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-326580629355588128.post-28859475296330447812020-02-28T02:19:00.002-08:002020-02-28T02:19:39.870-08:00<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
ऐकावे संगीत करावे वाचन <br />
जावे फिरायला कधी कधी ...<br />
ध्यानस्थ बसावे करावे चिंतन<br />
राहावे वर्तमानी सदाकाळी...<br />
छंद एक हवा ठेवा समाधान<br />
औषध नामस्मरण सर्वांवरी ...<br />
करावा व्यायाम राहावे प्रसन्न<br />
तुलना स्वतःची स्वत:शी बरी ..<br />
ताण जाईल क्षणात पळून<br />
कराल ही उपाय थोडेजरी ..<br />
<br />
<br />
<br />
<br />
सूचना -- ही कविता कुणाची आहे हे माहित नाही ..आवडली म्हणून share केली .कवीचे आभार .</div>
राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-326580629355588128.post-73761920080097638142020-02-28T02:07:00.003-08:002020-02-28T02:07:55.060-08:00<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj5YWbcWRf9joKOnaLqu227vZ0NRR620EtrTHCoYWascjDsfcOi7tNcRgI5Sgt8dg2_JwsvsKcNCWeYCbVOSzNGKCCZYydlpiWqtv8jpjsqvdF8-I47MCJBecxd2hQXv47Tk1sdd1PYhuqk/s1600/IMG_20200214_093045.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="1169" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj5YWbcWRf9joKOnaLqu227vZ0NRR620EtrTHCoYWascjDsfcOi7tNcRgI5Sgt8dg2_JwsvsKcNCWeYCbVOSzNGKCCZYydlpiWqtv8jpjsqvdF8-I47MCJBecxd2hQXv47Tk1sdd1PYhuqk/s640/IMG_20200214_093045.jpg" width="466" /></a></div>
<br /></div>
राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-326580629355588128.post-67374408461142156032020-02-28T02:03:00.001-08:002020-02-28T02:04:59.093-08:00मराठी राजभाषा दिन ..२७ फेब्रुवारी२०२०<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiyjvgqWL2pOlkxznPaOWWnNmXevYwwdJu0qD8mgbYthRyP_H4-w6LFpF75XInENzk_DRZ9NFXiHF8m3xGOehDbYLT_jKO49RUAIe8rt8NwEmdM4BPePkqBFwIL_X3qZTQyAhjhztoQa-1M/s1600/IMG_20200227_110045.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="900" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiyjvgqWL2pOlkxznPaOWWnNmXevYwwdJu0qD8mgbYthRyP_H4-w6LFpF75XInENzk_DRZ9NFXiHF8m3xGOehDbYLT_jKO49RUAIe8rt8NwEmdM4BPePkqBFwIL_X3qZTQyAhjhztoQa-1M/s640/IMG_20200227_110045.jpg" width="360" /></a></div>
<br /></div>
राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-326580629355588128.post-42118112355936771162018-09-26T08:11:00.000-07:002018-09-26T08:11:51.190-07:00मनाची प्रार्थना<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: left;">
ही माझी प्रार्थना आहे.. माझी स्वतःची.प्रार्थना प्रार्थनेत कीती सामर्थ्य असतं हे मी जाणतो आणि म्हणूनच मी मनापासून ही प्रार्थना रोज करतो. या पृथ्वीवर माझे आगमन अकस्मात झालेले नाही काही निश्चित उद्देशाने माझी निर्मिती झालेली आहे माझ्यात माझी स्वतःची काही वैशिष्ट्ये आहेत जी मला पूर्णपणे माहिती आहेत माझ्या जीवनात मी माझ्या वैशिष्ट्यांचा पुरेपूर उपयोग करीत आहे काही विशिष्ट कार्य करण्यासाठी माझे ध्येय निश्चित आहे मी काय मिळवू इच्छितो आणि काय देऊ इच्छितो याची मला पूर्ण कल्पना आहे मला हेही माहीत आहे की यशामुळे सुख लाभते आणि सुखामुळे मनशांती मी रोज कुठल्या ना कुठल्या बाबतीत यशस्वी होत आहे मला रोज अनेक प्रकारे सुख मिळत आहे मला रोजच मनःशांती लाभते मला प्रसन्नतेचे वरदान असल्यामुळे मी नेहमी प्रसन्न राहतो आणि प्रसन्नता पसरवितो</div>
</div>
राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-326580629355588128.post-16643909622202780092015-08-27T23:32:00.000-07:002015-08-27T23:37:10.767-07:00पु.ल. च एक सुंदर पत्र<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; color: #666666; font-family: helvetica, arial, sans-serif; font-size: 12px; line-height: 16.0799999237061px; margin-bottom: 1em; margin-top: 1em;">
या पत्रात पु लं सगळ्या आयुष्याचं सार सांगून जातात. आपण जगायला का आलो इथपासून ते आयुष्याचा सर्वोत्कष्ट बिंदू इथवर ते सारं सांगतात.या पत्राचं निमित्त ही तसं वेगळं<span class="text_exposed_show" style="display: inline;"> आहे. पुलंचे नातेवाईक, चंदू ठाकूर हे लष्करात – हवाई दलात होते. त्यांच्या जवळच्या मित्राचं विमान अपघातात निधन झालेलं होतं. अशा प्रसंगी आयुष्याबद्दलच निराशा वाटून त्यांनी पुलंना एक पत्र लिहिलं. त्याचंच हे उत्तर.<br />--------------------------------------------------------------------------------------<br />> १० जुलै १९५७, -</span></div>
<div class="text_exposed_show" style="background-color: white; color: #666666; display: inline; font-family: helvetica, arial, sans-serif; font-size: 12px; line-height: 16.0799999237061px;">
<div style="margin-bottom: 1em; margin-top: 1em;">
> प्रिय चंदू</div>
<div style="margin-bottom: 1em; margin-top: 1em;">
> रात्रीचे पावणे अकरा वाजले आहेत आणि मी रेडिओतून एक संगीतिकेचा कार्यक्रम प्रोड्यूस करून आताच घरी आलो आहे. तुझे पत्र वाचले. सुनीता सातार्याला बाबांकडे गेली आहे. वास्तविक पत्र तिला आहे पण तुझ्या पत्राला उत्तर लिहावेसे वाटले म्हणून उत्तर लिहायला लगेच बसलो. मला गेल्या कित्येक दिवसांत शांतपणे स्वस्थ बसायला फुरसदच मिळाली नाही. हा ऑपेराच घे. गेले आठ दिवस मी राबतो आहे. आज ९ ३० ते १० हा कार्यक्रम झाला. स्वर हवेत विरून गेले. मला फक्त थकवा उरला आहे. मी विचार केला – फक्त थकवा च उरला आहे का? वास्तविक विचार केलाही नसता. लाथ मारून वळकटी उघडली असती आणि घोरायलाही लागलो असतो. पण तुझ्या पत्राने थकलेल्या अवस्थेतही विचार करायला लावले. आणि जसजसा विचार येईल तसतसा मी लिहिणार आहे. किंवा पेन आणि कागदाच्या सहाय्याने विचार करणार आहे.</div>
<div style="margin-bottom: 1em; margin-top: 1em;">
> तुझ्या सर्व पत्राचा सारांश हाच आहे की हे सारे आहे तरी काय? जुन्या लोकांनीही हा प्रश्न विचारून घेतला आहे. कस्त्वम? कुत: आयात:? तू कोण आहेस? कुठून आला आहेस? पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं हा नाही. तू कशासाठी आला आहेस हा प्रश्न महत्वाचा आणि काण्ट पासून विनोबांपर्यंत सर्वजण त्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. त्या थोरांच्या मानानं आपण अल्पमतीच. पण तू कशासाठी आला आहेस? हा प्रश्न सुचण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं; ते तुझ्या पत्रामुळं तुलाही लाभलं आहे, असं मला वाटलं; ते धन्य आहेत. हा महान प्रश्न आहे. मनाच्या महान अवस्थेत हा प्रश्न सुचतो. तुझं विमान ज्याप्रमाणे जमिनीवर स्वत:चा पंखा नुसताच फिरवीत राहिलं तर त्याला अर्थ नाही त्याचप्रमाणे मन देखील जागच्या जागी नुसतं घुमत राहिलं तर त्याला किंमत नाही. जमिनीवरचे पायच सोडून एक उड्डाण घ्यावं लागतं आणि अलिप्तपणाने भूगोल पाहिल्यासारखा जीवनाचा विचार करावा लागतो. पण हा विचार करताना आपल्याला त्याचे उत्तर देण्याची ताकद आहे, अशा अहंकारानं जर विचार सुरू झाला तर उत्तर कधीच सापडत नाही. त्याला संपूर्ण निर्मम व्हावं लागतं आणि घोडे पेंड खाते ते इथेच.</div>
<div style="margin-bottom: 1em; margin-top: 1em;">
> तू तुझ्या पत्रात अखिल स्त्री जातीला अत्यंत हीन लेखून मोकळा झाला आहेस. बायका मूर्ख! का – तर तुला त्यांच्यात अजिबात अर्थ आढळत नाही. पण अशाच तुला मूर्ख वाटलेल्या बाईचं छोटं पोर पाहिलं आहेस न तू? त्याचं ती सर्वस्व आहे कारण त्याच्या सुखदु:खाशी तिच्या इतकं कोणी रममाण झालं नाही. आणि माणसाला काय हवं असतं ठावूक आहे? स्वत: शी एकरूप होणारं दुसरं कोणीतरी! काय भयंकर अहंकार आहे नाही? तुझ्याशी स्वत:चं ‘स्व’त्व विसरून आपलं सर्वस्व अर्पण करणारी व्यक्ती हवी आहे. पण तू असा विचार केला आहेस का? तू कुणाच्यात तुझा ‘स्व’ अर्पण करायला तयार आहेस का? निर्मम होऊ शकतोस का? नाही! तू होऊ शकत नाहीस. मी होऊ शकत नाही. होऊ शकतात फक्त स्त्रिया. ज्यांची तुला अजून ओळख पटली नाही.</div>
<div style="margin-bottom: 1em; margin-top: 1em;">
> तुझी आई पहा. ती आप्पांसाठी जगते. तिला वैयक्तिक महत्वाकांक्षा नाही. सुनीता स्वतंत्रपणे खूप गोष्टी करु शकली असती. तिच्यात असामान्य बुध्दीमत्ता आहे. पण तिने आपले सर्वस्व माझ्यासाठी ठेवले. माझ्याशिवाय तिला विचार नसतो. इतके आपण पुरुष समर्पणाच्या वरच्या अवस्थेला नाही जाऊन पोहोचत. दु:खे निर्माण होतात ती इथे! तू सदैव मृत्यूच्या छायेत वावरत असतोस. मी देखील ऑफिसमध्ये रोज सोनापुरावरून जातो. अनेकांची अंतिमयात्रा मला दिसते. विचार येतो सारा अट्टाहास यासाठीच का करायचा? लिहायचं – नाटकं लिहायची – विनोदी साहित्य लिहायचं-गायचं – गाणी करायची – कशासाठी? शेवट तर ठरलेलाच आहे. पण हे सारे विचार कुठून उत्पन्न होतात. त्याची गंगोत्री कोणती? त्याची गंगोत्री आपल्या अहंकारात आहे. मी आहे तर जग आहे. किंबहुना सारं मला आवडेल असं असलं तरच त्या अस्तित्वाला किंमत आहे. या विचारातून नक्की काही संभवत असेल तर दु:ख! निराशा!. तुला असल्या निराशेने घेरले आहे.</div>
<div style="margin-bottom: 1em; margin-top: 1em;">
> तुला वाटतं मी फ्लाईंग का करावं? चंदू – कारकुनांनी तरी मानेचा काटा मोडेपर्यंत का झिजावं? भंग्यांनी संडास साफ का करावे? स्त्रियांनी बाळंतपणाच्या यातना का भोगाव्या? इतकंच काय गाणाऱ्यांनी का गावं? चित्रकारांनी चित्रं का काढावी? जगात कुणी कुणाला दु:ख का द्यावं या प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे. शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये. कारण हे सारं काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर कुणालाही सापडलं नाही. हे आहे हे असं आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे. नाही तरी फूल म्हणजे काय असतं? काही स्त्रीकेसर काही पुंकेसर एक मऊमऊ तुकड्यांचा पुंजका एवढंच ना? पण आपण त्याला अर्थ दिला. कुणी ते प्रेयसीला दिलं. कुणी देवाला दिलं. कुणी स्वत:च्या कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला. जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो. आणि तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो. जीवनाला आपण काहीतरी द्यावे लागते. अगदी निरपेक्ष बुध्दीने द्यावे लागते. आणि मग जीवनाला अर्थ येतो.</div>
<div style="margin-bottom: 1em; margin-top: 1em;">
> हवेत विरणाऱ्या अल्पजीवी स्वरांची संगीतिका आज नदीत दीपदान करतात तशी मी सोडली. कुणाला आवडेल कुणाला नावडेल. कुणी माना डोलावतील कुणी नाकं मुरडतील. मला त्याचं दु:ख वा आनंद होता कामा नये. दु:ख झाले पाहिजे ते देताना झालेल्या चुकांचे, अपूर्णत्वाच्या जाणीवेचे. आनंद झाला पाहिजे ते करताना झालेल्या तन्मयतेचा! बस्स. एवढेच करण्यासाठी आपण इथे आलो आहे. तुकोबा म्हणतात याचिसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा. मी म्हणतो रोजचा दीस गोड व्हावा हा अट्टाहास हवा. कारण रोजच्यातला कोणता दिवस शेवटचा आहे हे कधी कुणाला आधी कळलं आहे? आईला पोरापासून काही घेण्याचा आनंद कुठे असतो? पोराला जन्मल्यापासून ती देत येते. तू कधी वासरू पीत असताना गाईचे समाधानी ध्यान पाहिले आहेस का?</div>
<div style="margin-bottom: 1em; margin-top: 1em;">
> जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं मग कुठल्याही क्षत्रात तू ऐस. वैमानिक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे. तो आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या. वैताग कंटाळा मलाही येतो. क्षुद्रपणा दिसतो. स्वार्थ दिसतो. पण तसा आपल्यातही कुणाला आढळणार नाही ना याची चिंता असावी. म्हणजे मग जगण्याला धार येते. मनाचा आम्ल झडतो. तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोस्टोवस्की – गोर्की – डिकन्स – शेक्सपियर वाच. जीवनाला रंग देणारी माणसे ही. तत्वद्न्यांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापे्क्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल!</div>
<div style="margin-bottom: 1em; margin-top: 1em;">
> लग्न जरूर कर पण गरिबाच्या रसिक सालस पोरीशी कर. तिला चित्रकला येत असावी. तिला ते नाहीतर संगीत यावं. पण केवळ दिखाऊ ऍकम्प्लिशमेंट्स नव्हेत हं. अगदी खऱ्या तिला आपल्या कलांची जोपासना करता येईल अशा स्वास्थ्यात ठेव. ती तुला जीवनाचं नवं दर्शन घडवील आणि चंदोबा ही शक्ती फक्त स्त्रीत असते. परमेश्वराची ही अगाध कृती आहे. साऱ्या जिवीताची जी प्रेरणा आहे, ती स्वत:ही हे पुष्कळदा विसरते आणि वेड्यासारखे वागते. हे दुर्दैव आहे. तुझे सोबती अचानक गेले आणि तुला दु:ख झाले. साहजिक आहे. अंतर्मुख होणंही साहजिक आहे. तू म्हणतोस की their deaths were not justified. My dear boy, whose deaths are justifiable?</div>
<div style="margin-bottom: 1em; margin-top: 1em;">
> माझा एक भाऊ औषधांच्या अभावी वयाच्या अकराव्या वर्षी वारला. माझे वडील अत्यंत निर्व्यसनी होते, निष्पाप होते, प्रामाणिक होते. ते पन्नाशीच्या आधी हृदयविकाराने वारले. परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली. आणि हिरोशिमा? त्याबद्दल लिहायला हवं का? ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे. जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोनं होतं नाहीतर शुध्द माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करीत नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात. तुझं पत्र मी सुनीताला पाठवीन. तिचं उत्तर तुला येईलच. १२ वाजत आले. आता थांबतो.</div>
<div style="margin-bottom: 1em; margin-top: 1em;">
कळावे,</div>
<div style="margin-bottom: 1em; margin-top: 1em;">
><br />
> भाई</div>
</div>
</div>
राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-326580629355588128.post-28636572598012139832015-06-29T04:28:00.001-07:002015-06-29T04:28:05.474-07:00किशोर पवार यांचा लेख..<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; color: #666666; font-family: helvetica, arial, sans-serif; font-size: 12px; line-height: 16.0799999237061px; margin-bottom: 1em; margin-top: 1em;">
कोकण युवा साहित्य परिषदेच्या अधिकृत पेज वर हा पहिला लेख प्रसिद्ध होतोय तोहि थेट दुबईतून पाठवलाय आपले युवा लेखक किशोर पवार यांनी<br />त्यांचे कार्यकारी मंडळा कडून म<span class="text_exposed_show" style="display: inline;">न:पुर्वक आभार.</span></div>
<div class="text_exposed_show" style="background-color: white; color: #666666; display: inline; font-family: helvetica, arial, sans-serif; font-size: 12px; line-height: 16.0799999237061px;">
<div style="margin-bottom: 1em; margin-top: 1em;">
विषय - निरीक्षण.<br />लिखाणाच माध्यम - मुक्त लेखन.<br />विशेष - पात्र आणि त्याचं हुबेहूब वर्णन</div>
<div style="margin-bottom: 1em; margin-top: 1em;">
तो मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात डोक्यावर रुमाल टाकून किती तरी वेळ ताटकळत एस टी ची वाट पाहत थांबलाय पोरा बाळाना शाळेला सुट्टी लागलेय ...गावाकड मेहुनीच बहिणीच नात्यातल कुणा कुणाच लग्न निघालय म्हणून चिक्कार लोक रस्त्यावरच्या उजाड मोकळ्या ढाकळ्या बस थांब्यावर बायको पोर आणि ब्यागा सांभाळीत नेमका लाल डब्बा कधी येईल त्याची वाट पाहतात ..लांबून एस टी येताना दिसली कि घर धनी जरा पुढ होऊन बोर्ड काय डोकावतो ते पाहत परत मोबाईल काढीत टाईम पाहतो ...लहान लेकर बाळ मात्र शेट्ट उन्हाला भेत नसत्यात गावला जायचं म्हणाल्या वर एक तर रात्रभर ती झोपतच नाहीत ..सकाळी सगळ्या अगोदर उठून बस्त्यात ..त्या मूळ उन बिन त्यांना काय लागत नसत ..गावाला जायची हौस कडक रखरखीत उन्हा वर हि मात करते ...समोरून ऐटीत जाणारे कार वाले पाहून बाया बापड्या उगाचच मनात चरफडत आमची जिंदगानी एस टी ट्रक नि काळ्या पिल्या जीपड्या झालच तर सहा सीटर च्या डुगडुगीतच चाललेय म्हणून मनात बापाला शिव्या देत कुणाच्या गळ्यात बांधलेय म्हणत साडीत जास्तच उकडतंय म्हणून चरफडतेय ...तो शांत पणे तिथल्या प्रत्येक प्रवशाला न्याहाळतोय ...तितक्यात त्याला हावी ती एस टी आली एकदाशी ..आपली स्याक सांभाळीत तो एस टी त प्रवेश करता झाला ...हातातील पंच दांडी वर ठोकीत कंडक्टर पुढे चला पुढे चला चा सवई प्रमाणे जय घोष करीत होता ...तो मात्र तिथेच थांबला ...लाहान पणी तो जाळीतून ड्रायव्हरला न्याहाळत आसे ...तो जसा स्टेअरिंग फिरवेल तसा मनातून हा हि फिरवे अगदी हात फिरवत असे ...समोरून भरदाव येणारी गाडी जणू आता येऊन कोपर्याला ठोकेल असे वाटत असतनाच भुर्कन ती बाजूने निघून गेली कि ह्याच्या पोटात आलेला गोळा शांत होई ..<br />आता जरा जाणता झालाय पण एस टी तली वेग वेगळी माणस खेटून बसणारी जोडपी ...एखाद्या पर पुरुषाच्या बाजूला एखादी स्त्री किंवा मुलगी बसली कि असल्या जळजळीत उन्हात हि गरावा अनुभवणारी पुरुष मंडळी.. त्यात गाडी चालू असताना हि आपली चामडी पिशवी सांभाळीत तिकीट देणारा मास्तर त्याचा तो टाक टाक वाजणारा पंच ..तिकीट देऊन झाल्यावर जागेवर बसल्यावर स्क्रू फिरवून गोल खाच्यात अडकून राहिलेलं काउंटर तिकीट घडी झालेले कोपर्यात दुमडलेल्या नोटा सरळ करीत सफाईदार पणे त्या नेमक्या रीतीने लावून ५०० १०० नंतर पन्नास आसे गट्टा करून वरच्या खिश्यात लीलया कोंबण्याची पद्धत ...सगळ्यात कुतुहूल त्याला त्याच्या किलोमीटर शिट च नेहमीच मास्तर किती सुवाच्छ अक्षरात बारीक रकान्यात आकडे मोड लिहीतात त्या पेपरची घडी हि किती सुंदर असते नाही ..आयुष्याच्या पटलावर वर हि त्याची बेरीज वजाबाकी तो अशीच सुबक पणे मांडीत असेल काय जगण अधिक सोप करीत अशीच त्याची छान घडी करून संसाराचा हिशोब मांडीत असेल काय ...<br />तसाच तो खांबा जवळ उभा राहिला काही अंतराने मास्तर च्या बाजूचा माणूस उतरणार हे त्याच्या चुळबुळी वरून ह्यांन ताडल होत ..आणि ह्याला मास्तर जवळची सीट मिळाली<br />त्यान मास्तर ला उगाचच छेडायला सुरवात केली मास्तर जेवायला कुठ थांबणार मास्तर ने हि ठरल्या ठिकाणचे हॉटेल सांगितले ..मास्तर आणि ड्रायव्हर ला तिथे फुकट जेवण मिळत हि खंत त्याला नेहमी असायचीच पुन्हा ती आज जागी झाली ...तो काय मास्तर तिथे नको ह्या हॉटेल ला गाडी थांबवा तिथे मस्त भेटत ...मास्तर म्हणाला नाही आम्ही इथेच नेहमी जेवतो ....बरय ब्वा तुम्हाला फुकट मिळत ..आणि हा थट्टा करीत मिश्कील हसला<br />मास्तर मात्र खजील झाला राग आलाय आसा एक हि भाव त्याच्या चेहर्यावर न्हवता पण दुक्ख होत<br />आहो फुकट काय ते एक प्लेट मसूर ची डाळ आणि कडक रोटी ..कित्येक वर्ष हेच खातोय आणि सतत प्रवास करतोय ...<br />ती होती तोवर घरून डबा यायचा मला पुरण पोळी आवडते म्हणून प्रत्येक सणाला ती पुरणपोळीच बनवायची ...आता घरची साधी पोळी हि नाही भेटत हो ...मास्तर दीनवाणी पणे बोलता झाला<br />म्हणजे .............<br />वावंशा चा दिवा म्हणून एकाच मुली वर थांबायचं ठरवलं ती जास्त शिकलेली न्हवती तरी माझा निर्णय तिला मान्य होता आईन न पाठीला पाठ असावी म्हणून थोडा त्रागा केला पण मला एकाच मुलीला चांगल शिकवायचं होत ..मुलगी शिकली हि नाकी डोळी हि सरस ..पण हुंड्या शिवाय कुठे जमत न्हवत स्थळ सांगून यायची पण भरमसाठ मागणी ..मी ह्या हुंडा प्रथेच्या बिलकुल विरुद्ध पण मुलीच वय वाढत होत अश्या परिस्थितीत समाज तुम्हाला गुढगे टेकायला लावतोच प्रत्येक वेळी तुम्ही प्रवहाच्या विरोधात पोहालच असे नाही होत ना ...होती न्हवती ती मिळकत मुलीच्या लग्नात लावली कुठलीच कसर नाही ..त्या नंतर एका वर्ष्यातच बायकोला कर्करोगान पछाडल ..पैसे संपले होतेच मग राहिलेला फंड गावची जमीन तिचे काही दागिने विकून तिच्या आजारपणाची कसरत करू लागलो मी तिच्या वर खूप प्रेम करायचो खूप म्हणजे खूप तिला किमो लागला सगळे केस उडून गेले ऐन पंचेचाळीशित ती जक्ख म्हातारी वाटू लागली मला मात्र ती त्या आवस्थेत हि एखाद्या आप्सरे सरखीच दिसायची ...कर्करोगाशी झुंजत तिने अखेर प्राण सोडला...आणि मी ह्या जगात एकटा झालो पोरका ...<br />खूप दिवस झाले घरची पोळी भाजी नाही मुली कडे जातो कधी तरी ....पण तिच्या हातची चव कुठेच नाही ...ह्या फुकटच्या जेवणात तर ती अजिबात नाही फक्त पोट भरण ...बस्स<br />हा सुन्न झाला नि मास्तर बोलत होता तिकीटाची गणित लीलया मांडणारा पेपरची घडी सुरळीत पणे करणारा मास्तर खर्या जगण्यात किती विस्कटलाय ...तिकिटाचा एक रुपया जरी बाकी राहिला तरी मास्तर एक रुपया ढापू पहातोय अशी भावना जपणारा हा आज त्या मास्तर कडे नुसतच शून्यात पाहत होता ...... _/\_</div>
<div style="margin-bottom: 1em; margin-top: 1em;">
- किशोर पवार<br />Kishor Pawar<br />लेखक - वक्ते<br />Abu Dhabi United Arab Emirates.</div>
</div>
</div>
राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-326580629355588128.post-71265463571258059422015-05-07T03:14:00.002-07:002015-05-07T03:14:09.378-07:00समीर गायकवाड यांचा एक सुंदर लेख..<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<div style="-webkit-text-stroke-width: 0px; background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; font-size: 12px; font-style: normal; font-variant: normal; font-weight: normal; letter-spacing: normal; line-height: 16.0799999237061px; orphans: auto; text-align: left; text-indent: 0px; text-transform: none; white-space: normal; widows: 1; word-spacing: 0px;">
<div data-ft="{"tn":"H"}">
<div class="mtm" style="margin-top: 10px;">
<div class="_5cq3" data-ft="{"tn":"E"}" style="position: relative;">
<a ajaxify="https://www.facebook.com/photo.php?fbid=833675673352505&set=a.137020316351381.43840.100001302405622&type=1&src=https%3A%2F%2Ffbcdn-sphotos-f-a.akamaihd.net%2Fhphotos-ak-xap1%2Ft31.0-8%2F10339529_833675673352505_4990407996708960464_o.jpg&smallsrc=https%3A%2F%2Ffbcdn-sphotos-f-a.akamaihd.net%2Fhphotos-ak-xap1%2Fv%2Ft1.0-9%2F11202849_833675673352505_4990407996708960464_n.jpg%3Foh%3D387876c6fca54b9073cfed02c3ce7664%26oe%3D55C26332%26__gda__%3D1438802926_ceb5950b41f9c1b08239b4c79f51243b&size=1013%2C611&player_origin=story_view" class="_4-eo _2t9n" href="https://www.facebook.com/photo.php?fbid=833675673352505&set=a.137020316351381.43840.100001302405622&type=1" rel="theater" style="-webkit-box-shadow: rgba(0, 0, 0, 0.0470588) 0px 1px 1px; color: #3b5998; cursor: pointer; display: block; position: relative; text-decoration: none; width: 470px;"></a></div>
</div>
</div>
</div>
<br />
<div class="_5pbx userContent" data-ft="{"tn":"K"}" style="-webkit-text-stroke-width: 0px; background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; font-size: 14px; font-style: normal; font-variant: normal; font-weight: normal; letter-spacing: normal; line-height: 1.38; orphans: auto; overflow: hidden; text-align: left; text-indent: 0px; text-transform: none; white-space: normal; widows: 1; word-spacing: 0px;">
<div style="margin: 0px 0px 6px;">
गावाकडे एक बरे असते, माणसांच्या चेहरयाला कल्हई केलेली नसते. माणसे जशी असतात तशीच राहतात अन तशीच दिसतात. कपाळाला अष्टगंध लावून सकाळी घराबाहेर पडणारी ही माणसे घरी येतील की नाही म्हणून घरचे लोक त्यांचा घोर करत नाहीत. मुळात गाव ते केव्हढे असते ? शे दोनशे ते पाचशे उंबरा इतकी त्याची व्याप्ती. गावात किती भाग म्हणाल तर एक वेशीबाहेरचे जग अन वेशीच्या आतले जग. म्हणूनच गावात हाक मारताना प्रत्येकाला एकमेकाचा बाप माहिती असतो.जसे की गणा भोसलेचा किसन महणजे किसन गणपत भोसले, महादू भोसल्याचा इष्णू म्हणजे विष्णू महादेव भोसले. तेथे औपचारिकता ही औषधालाही सापडणार नाही. फॉर्मेलिटीचे आपल्याला भारी कौतुक, तर त्याना त्याचे वावडे. हाका मारताना देखील ते हात अन आवाज राखून मारणार नाहीत, जोरात आवाज असणारच. रानात ओरडायची सवय असल्याने हळुवारपणा ते जपणार नाहीत, पण मुक्या प्राण्याची माया असो व घरातल्या म्हतारया माणसाची हेकेखोरमागणी असो ते तेथे हळुवार होतील. जेंव्हा ते हाका मारतील, जवळ येतील. बसतील, आधी इकडचे तिकडचे चार शब्द बोलतील. अर्थातच त्यात पिक पाणी अन पाऊसवारा हा असणारच. सुखदुःखाची देवाण घेवाण करतील. नडलेल्या गोष्टी सांगतील.....<br />पण कधी कधी हे देखील बिथरतात, भावकी अन गावकीचा विषय सोडून बोल म्हणतील. कुठेतरी कधीतरी कोणी दुखावलेले असते त्याचा राग वर्षानुवर्षे मनात धरून ठेवलेला असतो त्याचा वचपा यांनाही काढायचा असतो. शेवटी ही देखील हाडा मासाचीच माणसे, फक्त फरक इतकाच की आपणदेखील हाडामासाचेच असतो पण ते मातीचेही असतात. त्यांची मातीशी नाळ घट्ट असते. आपल्यापैकी काहींची तर आपल्या जन्मदात्या मायबापाशीदेखील नाळ घट्ट राहत नाही. आपला राग पोटात ठेवून माया लोभ मात्र ते खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त करतील. “अरे त्याने माझी गाय कापली म्हणून का मी त्याचे वासरू मारू ? देव अक्कल वाटत असताना तो शेण खायला गेला असेल म्हणून का मी त्याच्या गतीला येऊ ? त्याने त्याचा जिम्मा निभावला नाही म्हणून काय झाले ? देवाने मला मोप दिलया, मी समाधानी आहे. त्याचे कर्म त्याचे त्याच्यापाशी. त्येला पांडुरंग बघून घेईल.” असे म्हणत म्हणत त्यांची प्रत्येकाची गाडी विठू चरणी येऊन विसावते. राग कितीही असला तरी ते कोणाचे वाटोळे व्हावे म्हणून प्रार्थना करणार नाहीत, मात्र एखाद्या वेळेस अडचणीत सापडलेल्याला अशा माणसाला चार गोष्टी ऐकवूनच मदत करतील, पण त्याच्या डोक्यावर पाय देऊन पुढे जाणार नाहीत.....</div>
<div style="margin: 6px 0px;">
डोक्याला वेगवगळया रंगाचे फेटे घालून इथे तिथे बसलेली म्हातारी माणसे हे यांचे खरे हाकारे असतात. गावातला सर्वात जेष्ठ म्हतारा जे काही सांगेल त्याच्या शब्दाविरुद्ध शक्यतो कोणी जात नाही. गावात विशेष मान असतो अशा वठलेल्या माणसाला. गावातली टाळकरी अन भजनी मंडळी ही सर्वांच्या आदरस्थानी असतात. त्यानंतर असतो तो गुरव अन बामण. त्यांच्यावर यांची अपार श्रद्धा. अबीर, गुलाल, बुक्का हाच यांचा ब्रम्हदेव, विष्णू अन शंकर. चिरमुरे, लाह्या,बत्ताशे हाच इथला महाप्रसाद. आत्ताच्या घडीला देखील घरी टीव्ही फ्रीज नसणारी अनेक घरे गावात सापडतील पण गुलाल बुक्का नसणारे घर गावात सापडणार नाही. आषाढीला उपवास अन नवरात्रात व्रत वैकल्ये, शिवाय ज्याचे त्याचे कुलदैवत अन कुलाचार हा त्यांचा श्रद्धेचा धार्मिक विषय. याशिवाय गावातली दर सालची जत्रा अन त्यातले याना येणारे उफाण हे देखील अनुभवण्यासारखे.<br />याचा अर्थ गावात सर्व माणसे अशीच असतात असे नाही काही माणसे इब्लीस अन बेरकी देखील असतात. प्रत्येक गावात अशी काही माणसे असतातच. बांधाच्या कोरभर तुकड्यासाठी नरडीचा घोटघेण्यापर्यंत कधीकधी इथला माणूस घसरतो तेंव्हा सारा गाव हळहळतो, आयुष्याच्या पारंब्या तुटतील असं कोणतेही नाते ताणू नये हे इथले मुळामुळातले तत्वज्ञान, आईबहिणीला कडला जाईपर्यंत बघावे अन भावकीला थुकावे असेही इथले रक्तात भिनलेले भाव..<br />आपआपली सुखदुखे अन स्वप्ने काळजातल्या कपारीत ठेवून आपल्याच ढंगात चालणारी ही माणसे. कोणी धोतर तर कोणी पायजमा घालून असतो आजकाल क्वचित कोणी जीन्सवाला तरणा पोरही येथेहटकून दिसतो..नऊ वारीचा डोक्यावरून पदर घेऊन वेस चुकवून बारीक कुजबुज करत लगबगीनेचालत जाणारया बायका पाहताना लाल,हिरवे,पिवळे.तांबडे ठिपके थवा करून चालल्यासारखे वाटते.पायात फुफुटा उडवत जाणारा रस्ता अन त्यावर तळपायाला चिरा पडलेली काळपट चपला घालून चालणारी चालणारी माणसे. सावलीचे ज्ञान याना अधिक उत्तम ठावूक, पर्यावरण पर्यावरण म्हणून छाती बडवत बसण्याऐवजी हे झाडाझुडपातच देव शोधतात अन पानाफुलात आयुष्य घालवतात. इथल्या मळकटलेल्या रस्त्यांच्या कडेने घराघरातून वाहणारे मोरीचे पाणी उघड्या गटाराला मिळते जिथे माशा अन डास चिलटांचे स्वतंत्र विश्व असते. फिरत फिरत हे गटार गावातल्या ओढ्यापाशी जाते. दरसाली ओढ्याला वरुणदेवाच्या कृपेनुसार वेगवेगळे रुपडे मिळते. ओढ्याजवळच्या पानवेली म्हणजे गावातल्या मेलेल्या माणसाचेच झाडातले जल्म असे लहानपणापासून ऐकलेले. त्यामुळे त्या पानवेलींची पाने कोणी तोडत नसे. या दृढ समजाला कारणही तसेच असते, सर्रास बहुतेक गावात स्मशानभूमी नावाची वेगळी रुक्ष जागा नसते. गावातली घाण अन पावसाचे दान पोटात घेऊन नदीला मिळणारा ओढा गावातली माणसे देखील आधी त्याच्या मातीतल्या कणा कणात कालवतो अन मगआपल्या पोटाशी धरून नदीला घेऊन जातो. मग ती चंद्रभागा असते नाही तर गोदावरी,कृष्णा, पंचगंगा. पण तिचे पाणी आपल्याला समिंदराला नेते अशी धारणा. म्हणून गावात कोणाची मयत झाली की गावाबाहेरच्या ओढ्यावर त्याचे क्रियाकर्म ठरलेले असायचे. पुढे हीच माणसे तिथल्या पानवेलीत जन्म घेतात अन गावातल्या माणसाना भेटतात असे सगळे म्हणायचे.</div>
<div style="margin: 6px 0px;">
गावात असते वेशीजवळचे मारुतीचे मंदिर, एखाद्या उभ्या आडव्या आळीला विठोबाचे मंदिर. क्वचित नमाजासाठी मातीचे मिनार. ही सर्व धार्मिक प्रवृत्तीच्या गावकरयांची श्रद्धास्थाने. इथले उत्सव अन उरूस हा त्यांचा घरचाच जलसा असतो. तर गावतली चावडी ही मुळातच बोलभांड असते. अनेक घटनांची ती मूक साक्षिदार असते, गावातले अनेक निवाडे अन वाद, संकटे अन त्यांचे निवारण याचे ती दार्शनिक असते. चावडीच्या भिंतीला कान लावले तरी अनेक श्वास अन निश्वास यांचे उसासे ऐकू येतील, गावातला खरा इतिहास चावडीच्या कणाकणात मिसळून गेलेला असतो. इथला पार म्हणजे तर आपल्या हजारो बाहूंनी जगाला आपल्या बाहूत सामावूनघेणारा विश्वनिहंताच जणू. जसा गाव तसा पार असतो. वडाचे झाड असणारा पार म्हणजेस्वर्गच जणू. क्षणभराच्या उसंतीत विचारलेली ख्याली खुशाली ते निवांत आपल्या सासूरवाशीण बहिणीबाळीच्या अडचणी ते आईवडिलांचे आजारपण या सर्वांवरच्या गावगप्पा येथे होतात.कोणाच्या घरी पाहुणे आलेत इथपासून ते कोणाच्या घरी देवदेव आहे इथपर्यंतची पहिली खबर पारावरून गावात पसरते. पाराने गावातली पंचांची पंचायत बघितलेली असते अन त्यातआलेले आसू आणि हसुचे हजारो भावानुभव आपल्यात साठवलेले असतात. लहान मुलांच्या अनेक विट्या पाराने अलगद झेललेल्या असतात तर कधी कटून आलेला एखादा पतंग वडाच्या शहाजोग फांद्यांनी आपल्या गळ्यात अडकवून ठेवलेला असतो. पारावरचा कट्टा हा गावाच्या सांस्कृतिककार्यक्रमांचे मंच म्हणून जेंव्हा जगत असतो तो तेंव्हा अभिजात प्रतिभेचे नवनवोन्मेषाचे अगणित हुंकार बनतो. कधी एखाद्या सभेचे तर एखाद्या बैठकीचे दमदार बोल ऐकण्यासाठी गावकरी त्या पाराभोवती गोळा झालेले असतात तर कधी पावसाळी दिवसात तिथ साठलेल्या पाण्यात खेळणारी पोरे पाराने आपल्या कुशीत घेऊन त्यांच्याशी मस्ती केलेली असते. गावातला पार गावाची कळा सांगतो. पार स्वच्छ अन प्रसन्न असेल तर गावगाडा खुशीत अन शिस्तीत चाललेला आहे याचे ते प्रतिक असते. तर पाराभोवती कचरा साठलेला असेल अन पार उदास भासला तर गावात काहीतरी अप्रिय घडल्येय कुणीतरी गेलेय याची ती चाहूल असते. पार हा गावातल्या रग अन रंगेलपणाचाही अंदाज बांधत असतो.मिशीवर पीळ देत दिली घेतलेली आव्हाने अन जीवावर उदार होऊन लावलेल्या पैजा याचे अनेक स्पर्श तिथल्या पारंब्या शिवता क्षणीच मस्तकातून भिनतात. पारात कैद असतात अनेक अपेक्षा अन उपेक्षाची जीवघेणी गाऱ्हाणी ती मात्र पार फक्त आपल्या एकट्याच्या अंतःकरणात ठेवून असतो त्याचे शेअरिंग नसते. पाराचे ते असहाय दुःख असते, त्याच्या अबोलव्यथांचे प्रकटन कधी करत नाही.</div>
<div style="margin: 6px 0px;">
गावाबाहेरचे तळे म्हणजे अनेक आख्यायिकांचे आगार असते. पावसाचे तांडव आपल्या पोटात साठवून तळ्याचेपाणी कधी तळाला जावून विचारमग्न होते तर कधी पाळी फोडून गावदेवाच्या पायरया शिवून आपलाही रामराम घालते. तळ्याच्या हालणारया पाण्यात अनेक प्रतिबिंबे दिसतात. तर तिथल्या प्रत्येक तरंगात तळ्याकाठच्या जीर्ण झाडांची हिरवी पिवळी पाने पानगळीतला आपला मरण सोहळा साजरा करत फिरकी घेत नाचत नाचत पाण्याशी अनुष्टुभीत होऊन आपली झाडाची गाणी गात असतात. तळ्याकाठची झाडे म्हणजे गावातल्या पोरांचा जीव की प्राण ! सूर पारंब्या पासून ते लंगडी पर्यंत अनेक खेळांचे अनेक डाव इथे मांडलेले. उंबराच्या झाडाची लालसर मऊ गोड उंबरे खात झाडावरचा डिंक अन लाख गोळा करताना चावणारे लालकाळे तिखट मुंगळे, अन त्यांचा कडक डंख वर याला पोरांच्या गलक्याची जोड असायची. या सर्वांच्या कोलाहलात आपला सुर मिसळणारे सकळ विहंगगण ! एक जादुई माहौल असायचा तिथे. तळे कोरडे पडले की मग मात्र गावच उदास भासे, मेलेल्या माणसाची आतडी कातडी बाहेर यावी तसा तळ्यातला गाळ कोरडा झाल्यावर पोटातले मोठाले दगड धोंडे वर घेऊन यायचा. सलग दोन तीन वर्षे जर तळे आटले की देवाला भाग बांधला जायचा, सारा गाव अनवाणी राहून उपास तपास करायचा. पुढल्या पावसाळ्यात बक्कळ पाऊस पडला की आधी देवळाला काव आणि पिवडीच्या रंगाचे दोन हात ठरलेले असायचे. तळ्यातल्या पाण्यावरून जुनी माणसे वेगवेगळ्या दंतकथा रंगवत बसत. तळ्याचे पाणी कोणा एकाच्या घरचे नसूनही ते सर्वांच्या डोळ्यात असायचे, चरायला गेलेली अख्ख्या गावाची गुरे गावात परतताना तिथे आळीपाळीने पाणी प्यायची तेंव्हा त्यांच्या जिभेचा लप्लाप आवाज अन त्याच वेळेस त्यांच्या हलणारया गळ्यातल्या घंटांचा मंजुळ आवाज ऐकताना मावळतीचा लालपिवळा सूर्य तळ्यातल्या पाण्यात कधी बुडून जायचा काही कळायचे नाही...</div>
<div style="margin: 6px 0px;">
गाव म्हणजे मातीतल्या माणसांचा जथ्था जो दुःखाचे अवडंबर करत नाही अन सुखाचे उत्श्रुंखल बाजार भरवत नाही. देवळातल्या मुक्या खांबातही गावाची कहाणी ऐकायला येते, ओढ्यातल्या पाण्यातही गावाचे अश्रू ओळखायला येतात. गाव असतो एक चिरंतन आनंदाचा चैतन्यमय सोहळा, मक्याच्या सोनेरी कणसासारखा अस्सल सोनेरी बीज वाढवणारा ! गाव असतो माणुसपणाचा उरूस, देणारया हातांचे हात घेणारा अन त्या हातांना आपल्या मस्तकी धारण करणारा ! गाव म्हणजे जन्मापासून ते मरणापर्यंत साथ देणारी अखंड उर्जा देणारी सावली ! गाव म्हणजे मातीतल्या माणसांची मायेची सावली ! गाव म्हणजे काही वस्ती,वाडी वा घरे नव्हे गाव म्हणजे मातीच्या काळजाचे अनंत तुकडे जे भूमीपुत्रांच्या ठायी विसावलेले !! गाव म्हणजे आई, गाव म्हणजे बाप, गाव म्हणजेच विठ्ठल रुखमाई, गाव म्हणजे आकाशाची निळाई अन निसर्गाची हिरवाई, गाव म्हणजे डोळ्यात पाझरणारा खारट झरा.<br />सरते शेवटी गाव म्हणजे फाटक्या कपड्यात दुख लपवून, जमीन गहाण टाकून जीवाला जीव देऊन आईबापाची सेवा करणारया अन मातीच्या ऋणात राहून कोरभर भाकर पोटाला खाऊन तिथल्याच मातीत जगून आपला स्वाभिमान धरीत्रीच्या चरणी अर्पण करणारया शेकडो माणसांचा एकसंध देह असतो !!</div>
<div style="display: inline; margin: 6px 0px 0px;">
- समीरबापू गायकवाड.</div>
</div>
</div>
राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-326580629355588128.post-42658708787853525512015-04-21T22:01:00.001-07:002015-04-21T22:01:10.803-07:00स्मिता गानु जोगळेकर यांचा सुंदर लेख.<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="clearfix" style="background-color: white; color: #141823; font-family: 'helvetica neue', helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; font-size: 12px; line-height: 16.0799999237061px; zoom: 1;">
<h2 class="_5clb" style="font-size: 24px; line-height: 28px; margin: 0px; padding: 0px;">
थोडे तरी वेडे व्हायलाच हवे</h2>
</div>
<div class="mts _50f8" style="background-color: white; color: #9197a3; font-family: 'helvetica neue', helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; font-size: 12px; line-height: 16.0799999237061px; margin-top: 5px;">
<a class="uiLinkSubtle" href="https://www.facebook.com/notes/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%82-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0/%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%87/143787885699298" style="color: #9197a3; cursor: pointer; text-decoration: none;">July 10, 2011 at 2:32pm</a><span class="timelineUnitContainer" style="position: relative;"><a aria-label="Public" class="passiveImg fbAudienceHover timelineAudienceSelector" data-hover="tooltip" href="https://www.facebook.com/notes/143787885699298/#" role="button" style="color: #3b5998; cursor: pointer; font-family: helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; margin-left: 5px; margin-top: -3px; position: relative; text-decoration: none; top: 2px;"><i class="img sp_FntIbSQqqLh sx_a0aec7" style="background-image: url(https://fbcdn-static-b-a.akamaihd.net/rsrc.php/v2/yq/r/_bS-_OOZFK6.png); background-position: -115px -49px; background-repeat: no-repeat; background-size: auto; display: inline-block; height: 12px; width: 12px;"></i></a></span></div>
<div class="_5k3v _5k3w clearfix" style="background-color: white; color: #141823; font-family: 'helvetica neue', helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; font-size: 14px; line-height: 20px; margin-top: 16px; overflow: hidden; word-wrap: break-word; zoom: 1;">
<strong>थोडे तरी वेडे व्हायलाच हवे</strong><strong> </strong><br />
<strong></strong><br />
मी आणलेले असते नीलकंठ पक्ष्याचे छानसे पीस. एक गोलच गोल शंख , सूर्यफुलाच्या वाळलेल्या शेंगांच्या अर्धगोल पुंगळ्या आणि खूप अधिरतेने मला त्या दाखवायच्या असतात कोणाला तरी.मी ऑफिस मध्ये येते, सारा माहोल ठावूक असूनही आशाळभूतपणे बघते इथे तिथे.आसपासची माणसं बघून मला पुनः पुनः आश्चर्य वाटत राहते,काही किरकोळ अपवाद वगळता, यांच्यातील कोणीच का कधी बोलत नाही पाउस-वारा, फुलं-पाखरं , सुगंध-झुळूक , डोंगर-झरे वगेरे वगरे बद्दल . हे सतत कोणाला प्रमोशन , कोणाची बदली , कोण कोणाचा चमचा आहे,या महिन्यात डी.ए. किती वाढला वरच बोलत असतात, कपाळावर चिंतेचं जाळं आणि चेहऱ्यावर त्रस्त भावांसकट.वाटतं पावसाची सर पाहून कधीतरी हर्षित व्हावे,दाराबाहेर एखाद्या फुलपाखराकडे निरखून पाहावे, रानाची पाखरांची समुद्राची ओढ दाखवावी, किमान गप्पा तरी,किमानात किमान विचार तरी व्यक्त व्हावा .पण छट,हे लोक पावसाबद्दल बोलले तरी आता चिखल होणार हे सांगण्यासाठी, ढग आल्याच्या आनंदापेक्षा झाकोळल्याचा अंधार पांघरण्यासाठी,आणि हा झाकोळ दुसऱ्यावर लादण्यासाठी.<br />
<br />
पण नाही हे असे मळभ येत आहे असे वाटतच मी मान झटकून टाकते आणि झटकून टाकते त्यासोबत सगळे नकाराचे विचार ही आणि मनात म्हणते आपण घेतलेला फुलांचा गंध द्यावा खुशाल शिडकून यांच्या अंगावर,आपण ऐकलेलं रानाचं निसर्ग संगीत हळूच सोडून द्यावं त्यांच्या कानात आणि जो अपवादात्मक असा असतो तो आपल्यासारखा एखादा वेडा जीव भेटतोच कि या सर्व कोरड्या पसाऱ्यात ,तोच एखादा रानवेडा,पाउसवेडा,डोंगर किंवा कविता वेडा,बस आणखी काय करावे लागते माणसाला रिते होण्यासाठी आणि पुन्हा इतरांना वेडं करण्याचा आपला प्रयत्न चालू ठेवावाच कि<br />
नुकत्याच केलेल्या नागझिरा नवेगावच्या धुंद मोहिनीमधून मी अजून बाहेर आलेली नसते . किंचीतसे ही रिकामे क्षण मिळताच नजरेसमोरून सरकू लागतो सारा चलतचित्रपट आणि ट्रान्समध्ये गेल्यासारखं पुन्हा निघते मन त्या वाटांवरून स्वैर सफरीला,मग त्याला कोणताही एवढासा संदर्भ सुद्धा पुरतो. मधेच वाचलेलं मारुती चितमपल्ली यांचं 'शब्दाचं धन' किंवा कृष्णमेघ कुंटेचं 'रानवेड्याची शोधयात्रा' आठवून जातं . आठवते शब्दाचं धन या शब्दावरच केलेली पानाफुलांची, पाखरांची, झाडांची, वणव्याची, वाघाची चित्रावळ किंवा खुणावतो रानवेड्याच्या पुस्तकावरचा तसाच वेडा प्रचंड मोठा बायसन,तोंडात गवताचा झुबका ठरलेला अजस्त्र सुळ्यांचा टस्कर, स्वतः च्या डोक्यावर गवत उडवत असलेला. त्या मागचे थंडगार तळे आणि त्याही मागे खडक आणि हिरवळीचा मिलाफ .असं सारं .श्वासातलं जगणं असतं. आणि हे सारे हळूच हात धरून मला अलगद बाहेर नेतात आणि बघता बघता मी थेट रानात पोहोचते.तिथे मला भेटते चैतन्याच्या शोधात हिंडणारी जोय एडमसन, सतत निसर्गाचा विचार करणारी , निसर्ग जगणारी , निसर्ग रेखाटणारी अभ्यासणारी , एकटीच भटकणारी , पियानो वाजवणारी संगीताचा इतिहास व रचना शिकणारी , नक्षीकाम करणारी , भांडी घडवणारी शिवणकाम , गायन , शवपेट्या बनवणे , मानववंशशास्त्राचा अभ्यास करणे एवढ्या ढीगभर गोष्टी येत असलेली जोय मला इथेतिथे खरीखुरी वावरताना दिसते.मनाला ओढ लागते आपण ही सारी आकडेमोड सोडून निघून जावे रानेवने तुडवायला.<br />
खरंतर मी ऑफिसमध्ये असते.आता निघायला हवे,पण रानाच्या धुंदीत मला सभोवतालच्या प्रिंटर्सची करकर,कोम्प्युटर्स ची टकटक,सेलफोन्सचे रिंगटोन्स,स्पीकरवरचं संगीत आपसातले संवाद, डेबिट क्रेडीटचे हिशेब, ट्रान्स्फर प्रमोशनच्या गप्पा काहीकाही ऐकू येत नसतं. माझ्या संवेदनांच्या सीमारेषा विस्तारलेल्या असतात कैक पुढे, पलीकडे, दूरदूरवर.मी या इथल्या पसाऱ्यातली एक नसतेच मुळी. माझ्या मनात असते वेगळीच उधळण,माझी नजर शोधत असते काचेतून दिसणारा आभाळाचा तुकडा .<br />
ऑफिस मध्ये जिथे तिथे काचा आणि आरसे आहेत , माझ्या उजवीकडे असलेल्या काचेतला नजारा जेव्हा डावीकडच्या आरशात प्रतीबिंबाच्या रुपात दिसतो तेव्हा त्यात एक वेगळीच मजा मिसळते.प्रत्यक्षापेक्षाही या प्रतीबिम्बात खूप जास्त कवडसे उमटलेले असतात.एक नवेच डायमेन्शन,एक वेगळीच खोली त्या आभाळाच्या तुकड्याला प्राप्त होते. आणि त्या आभाळाच्या छायेखालची वाट अगदी स्पष्ट हाकारे करू लागते.व्यंकटेश माडगूळकरांनी उल्लेख केलेली हीच का ती वाट?,ते म्हणतात सकाळच्या ताज्या वृत्तपत्राप्रमाणे वाचता येणारी ही वाट दिवसभराच्या फरांट्यान्मुळे संध्याकाळपर्यंत भेळ खाऊन चूरगळून टाकलेल्या कागदासारखी दिसू लागते, पण माझ्या मनात लख्खपणे असते ती फक्त सकाळची स्वच्छ ताजी, सुगंधित वाट. माझ्या डोळ्यात असतं एक खूप खरंखुरं सात्विक जग,ज्यात मी बुडवून टाकते स्वतःला. रंगाच्या, गंधाच्या, स्वप्नांच्या निरभ्र जगात चिंब करून टाकते स्वतःला , आणि मी रानातून येताना आणलेलं ते नीलकंठ पक्ष्याचं पीस अलवारपणे काढून बघत राहते त्याकडे ,स्पर्श करते त्याला आणि मी स्वतःच एक पीस होऊन तरंगत राहते,वेडेपणाच्या वेगळ्याच विश्वात, जगण्याला वेगळेपणाचे आयाम देणाऱ्यां त्या विश्वात ...तरलपणे ...!!!!!<br />
स्मिता<br />
<br />
<br />
<span class="photo " style="padding: 0px;"><img alt="" class="photo_img img" src="https://fbcdn-sphotos-b-a.akamaihd.net/hphotos-ak-xfa1/v/t1.0-9/270789_254206821262296_667490_n.jpg?oh=a089132b8703cb4cd89e18d9ab7203ac&oe=559BAD43&__gda__=1436660024_85248d0830aa962d99d671d7ac728ea7" style="border: 0px; margin: 0px; max-width: 100%; padding: 0px;" title="" /></span><br />
<span class="photo " style="padding: 0px;"><img alt="" class="photo_img img" src="https://fbcdn-sphotos-b-a.akamaihd.net/hphotos-ak-xfa1/v/t1.0-9/270789_254206821262296_667490_n.jpg?oh=a089132b8703cb4cd89e18d9ab7203ac&oe=559BAD43&__gda__=1436660024_85248d0830aa962d99d671d7ac728ea7" style="border: 0px; margin: 0px; max-width: 100%; padding: 0px;" title="" /></span><br />
<span class="photo " style="padding: 0px;"><img alt="" class="photo_img img" src="https://fbcdn-sphotos-b-a.akamaihd.net/hphotos-ak-xfa1/v/t1.0-9/270789_254206821262296_667490_n.jpg?oh=a089132b8703cb4cd89e18d9ab7203ac&oe=559BAD43&__gda__=1436660024_85248d0830aa962d99d671d7ac728ea7" style="border: 0px; margin: 0px; max-width: 100%; padding: 0px;" title="" /></span></div>
</div>
राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-326580629355588128.post-77619440476048721402015-02-16T02:19:00.002-08:002015-02-16T02:19:52.192-08:00<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<span style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px;">अनघा काकी तशा नेहमीच छान राहणार्या आणि स्वभावही खूप मस्त आणि आनंदी. थोड्याशा वयस्कर असल्या तरी उत्साही आणि अतिशय अनघा काकी तशा नेहमीच छान राहणार्या आणि स्वभावही खूप मस्त आणि आनंदी. थोड्याशा वयस्कर असल्या तरी उत्साही आणि अतिशय सकारत्मक. त्या नेहमीच संतुलित विचार करतात त्यामुळे स्त्रियांचं जास्त कौतुक किवा पुरुषांना उगाचच नाव ठेवलेली त्यांना कधी आवडत नाहीत. त्यांच्या शब्दात सांगायचं तर " खर सांगू तुम्ही माझ्यावर टीका कराल पण माझ स्पष्ट मत आहे की अर्ध्या पेक्षा जास्त संसार हे पु</span><span class="text_exposed_show" style="background-color: white; color: #141823; display: inline; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px;">रुषांमुळे टिकले जातात. आपण सतत बडबड करत असतो. आपल्या मधेही मीच सगळ करते असा अहं भाव असतो. आपले नवरे जास्त वेळा बहिऱ्या लोकांसारखे वागतात त्यामुळेच हा संसाराचा गाडा सुरळीत चालू असतो. पुरुष काही बोलू शकत नाही अस नसत तर आपण काही बोललो तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात ह्याची त्यांना कल्पना असते म्हणून त्यांची शांती हा त्यांचा कमकुवतपणा समजायची चूक अनेक स्त्रिया करतात. मित्र म्हणून आपल्याला तो हवाही असतो पण त्याच वेळी आपणही त्याची छानशी मैत्रीण होण गरजेच आहे हे आपण विसरतो.आपण विवाहबाह्य संबंधाविषयी चर्चा करतो तेव्हा एक दुर्लक्षित झालेली गोष्ट हीच असते की आपल्याला मित्राची गरज असते तशीच त्यानाही मैत्रिणीची गरज असते. दर वेळेस त्या नात्याला शारीरिक पातळीवर उतरवायची गरज नसते. त्यांचीही बौद्धिक आणि भावनिक अशी गरज असू शकते .आपण स्त्रिया आपल्या नवर्याच्या चांगल्या मैत्रिणी होण्याचा प्रयत्न कधी करतो का ? सगळ्यात इतक्या गुरफटून जातो की छान राहील पाहिजे , दिसलं पाहिजे , वैचारिक पातळीवरही नवर्याशी सुसंवाद साधला पाहिजे हे लक्षातच घेत नाही . विरंगुळ्याचे क्षण नवरा म्हणून त्यांच्याही गरजेचे असतात ह्याचाच विसर आपल्याला पडतो. अनेकदा नवर्याला त्याची बायको मैत्रीण म्हणून अधिक हवी असते. आजकाल तिथेच खूप जणी कमी पडतात. मी पुरुषांची बाजू घेते अस समजू नका. पूर्वी स्त्रिया ह्या घरात असायच्या त्यामुळे ह्याचा विचार कधी झाला नाही पण आता स्त्रियांनी आपल्यातील ही आपल्या "नवर्याची मैत्रीण" जपली पाहिजे. संसार सुरळीत चालण्यासाठी ह्याची फार गरज असते. त्याचं मैत्रीपुर्वक नात त्यांच्यातील नवरा बायकोच्या नात्यालाही उत्साही ठेवत आणि प्रेमही छान अबाधित रहात. ज्या स्त्रियांना हे जमत त्या पत्नी म्हणून अधिक यशस्वी होतात." थोडक्या शब्दात त्यांनी यशस्वी वैवाहिक जीवनाची एक महत्वाची गरज अधोरेखित केली.ज्याचं लग्न झाल आहे आणि ज्याचं व्हायचं आहे त्यांनी ह्याचा नक्कीच विचार करायला हवा. मला तरी त्यांचे विचार मनापासून पटले.तुम्ही तुमच मत नक्की द्या ……… मिनल सबनीस.</span></div>
राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-326580629355588128.post-35650642676630937482015-01-14T03:14:00.001-08:002015-01-14T03:14:36.551-08:00स्विकाराचं श्रद्धेय अध्यात्म..<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px;">
स्विकाराचं श्रध्देय आध्यात्म....<br />(परमेश्वरावर श्रध्दा असलेल्या प्रत्येकाने वाचावं असं काहीतरी...)</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
...व्यवहारात अनेकदा आपण इतरांच्या तोंडुन किंवा आपणही कित्येक वेळा, "माझी अमुकतमुक देवावर श्रध्दा आहे" किंवा "अमुकतमुक गुरुंना मी मानतो" वगैरे वक्तव्ये आपण ऐकत असतो, करत असतो....श्रध्दा असणे, किंवा मानणे गैर आहे असं अजिबात नाही. प्रत्येकाची श्रध्दास्थाने ही निरनिराळी असतात (त्यावर कुणीही टिका करण्याचीही गरज नसते, तो प्रत्येकाच्या आत्मानुभूतीचा विषय आहे) काही लोकं गणपतीची उपासना करतात, काहींचा श्रीशंकरांवर निस्सीम विश्वास असतो, कुणी शिर्डीसाईंचे भक्त तर कुणी श्रीगजानन महाराजांचे भक्त...व्यक्ति तितक्या प्रकृती...पण मुळात आपण भक्ती का करतो? किंवा एखाद्या विशिष्ट दैवतावर-गुरुंवर विश्वास का ठेवतो? याची कारणमिमांसा मुळात आपलीच आपण करायला हवीये.....त्याला "श्रध्दा जोखणं" असं मी म्हणतो...</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
....माझ्या मते बरेचदा आपल्या श्रध्देचा संबंध हा आपल्या व्यवहारीक सुखाशी किंवा यशापयशाची आपण जोडतो आणि तिथेच चुकतो. "मी गणपतीची उपासना केली आणि मला धंद्द्यात यश मिळालं" किंवा "मी विष्णुसहस्त्रनामाची पारायणे केली आणि माझा आजार बरा झाला" किंवा "मी दरवर्षी गुरुचरित्राचे सप्ताह करतो म्हणुन माझं नीट चाललंय"...ही अशी वक्तव्ये आपल्याला श्रध्दावान बनवतायत असं वरवर वाटलं तरी वास्तविक पहाता ही वक्तव्ये म्हणजे तुमच्या कमकुवत भक्तीचेच लक्षण आहे असं मी मानतो. याचं कारण म्हणजे तुम्ही तुमच्या उपासनेचं त्रैराशिक हे तुमच्या व्यवहारीक घटनांशी जोडुन चुक करत आहात. व्यवहारात घटना घडत असतात, त्या काहीवेळा तुमच्या "फेव्हर" मध्ये तर काहीवेळा तुमच्या विरोधात घडत असतात, घडणार असतात (त्याचा पुर्वकर्मार्जित कर्मांशी संबंध असतो किंवा नसतो तो भाग वेगळा विषय आहे) पण जेव्हा तुम्ही व्यवहारात तुमच्या बाजुने घडणाऱ्या घट्नांचे "क्रेडीट" परमेश्वरी उपासनेला देता तेव्हाच तुम्ही विरोधात घडणाऱ्या घटनांनाही त्यालाच जबाबदार धरु लागता...आणि श्रध्दा डळमळीत व्हायला लागते...</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
..."आयुष्यभर त्या गुरुचरित्राची पारायणे केली पण माझं काही चांगलं झालं नाही", "दरवर्षी मी मार्गशीर्षातले गुरुवार न चुकता करते पण काही केल्या माझी आर्थिक परिस्थिती सुधारत नाही" "शंकरावर नेमाने दर सोमवारी बेल वहातो पण माझी कामे काही होत नाहीत" अशी विधाने मग केली जातात. वास्तविक पहाता भक्ती म्हणजे आनंद असतो, तिथे निरपेक्षता असते, परिस्थितीचा स्विकार असतो, परमेश्वर आहे आणि त्याचं नामस्मरण केल्याने मला आनंद मिळतो म्हणुन मी ते करतो असा भाव अपेक्षित असतो. श्रीमंत व्हावं म्हणुन तुकारामांनी विठ्ठलभक्ती केली नव्हती, कोट्याधिश व्हावं म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही...तो त्यांचा आनंद होता. व्यवहारिक अपयशाने किंवा संकटांनी जर आपण देवाचा त्याग करणार असु तर तिला भक्ति म्हणता येणार नाही, तो शुध्द व्यवहार झाला. नाही का?</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
....प्राप्त परिस्थितीचा आनंदाने स्विकार करुन, आलेल्या संकटांविरुध्द लढण्याचे बळ तुम्ही परमेश्वराकडे नक्की मागु शकता पण "अमुक झालं तर तमुक" असा भाव भक्तीत अपेक्षित नाही. जोपर्यंत नीट चाललंय तोपर्यंत परमेश्वरी उपासना, पुजाअर्चा करणारी आणि एक गोष्ट जरी मनाविरुध्द झाली तरी एका क्षणात नास्तिक बनणारी मंडळी मी पाहिली आहेत, त्यांना मी "भक्तिमार्गातले व्यापारी" म्हणतो. "स्विकाराचं श्रध्देय आध्यात्म" जोपर्यंत तुम्ही आत्मसात करणार नाही तोपर्यंत ईश्वरी उपासनेतलं मर्म तुम्हाला कळणार नाही, आनंद काय असतो? ते समजणार नाही. अर्धपोटी उपाशी राहूनही आमच्या तुकोबारायांनी "आनंदाचे डोही आनंद तरंग..." हा अभंग कसा काय लिहिला? ते रहस्य समजायचं नाही. भक्ती ही कायम सघन, बळकट, निर्लेप, शुध्द, अव्याभिचारी आणि ’अ’व्यवहारी(इथे अर्थ निराळा घ्यावा) हवी हे विसरु नये</div>
<div style="background-color: white; color: #141823; display: inline; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-top: 6px;">
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)</div>
</div>
राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-326580629355588128.post-30327180295561825772015-01-13T22:50:00.002-08:002015-01-13T22:50:21.250-08:00एकदा वाचाच...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px;">
दिन दिन दिवाळी...dead body ओवाळी!!</div>
<div style="background-color: white; color: #141823; display: inline; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-top: 6px;">
दिवाळीला नरकासुराचा वध झाला. पण आता नरकासुराची जागा घेतली आहे सामान्य भारतीयांनी.. दिवाळी असो किंवा आणखी कोणताही सण अथवा खास प्रसंग. सामान्य भारतीयाला जिवंतपणी dead body बनवलं जातं. होय, आपल्यापैकी अनेकजण dead body आहेत... जिवंत असतानाच!! आणि दिवाळीत तर ह्या dead body ला लुटायचा plan तयार आहे.<br />दिवाळीच नाही तर दर सणाला, दररोज आम्हाला जिवंत असताना मारल जातं..मेलेल्यांच्या खिशातून पैसे काढायला सोपं असतं ना...आणि मारणारे स्वत आनंदाने मरण्यासाठी पैसे मोजतात. कोण बनवतं आम्हाला नरकासुर?<br />Department of Health and Human Services (DHHS) ने संपूर्ण जगातील आरोग्यसेवकांना कळवल आहे कि Formaldehyde हे रसायन cancer ला आमंत्रण देतं. Formaldehyde जीव जंतू ठार करतं. जर एखादं प्रेत जास्त वेळ ठेवायचं असेल, ते लवकर कुजू द्यायचं नसेल तर त्यावर Formaldehyde लावतात. जेणेकरून प्रेत लवकर सडत नाहीत. आता हे स्पष्ट आहे की, जिवंत असताना हे रसायन आपण लावणार नाही. पण आपण हे रसायन चेहऱ्यावर थोपतो. अंगावर फासतो. FDA (Food and Drug Administration) ने आणखी एका रसायनावर बंदी आणली आहे...त्याच नाव आहे...benzene. ह्या रसायनाची खासियत म्हणजे हे एकदा प्यायलं की पुन्हापुन्हा प्यायची इच्छा होते. आपण soft drink पुन्हा पुन्हा का पितो. कारण अनेक soft ड्रिंक मध्ये हे रसायन मिसळतात. आम्ही लहान मुलांना ते देतो, पाहुण्यांना देतो....सगळे addict बनतात. soft drink बनवणार्या कंपनीला कायमचे ग्राहक मिळत राहतात. आता तर दिवाळीच आहे. पिझ्झा-burger ची जोरात खरेदी होईल..दिवाळी साजरी करत नाहीत celebrate करतात. पिझ्झा, buger आणि soft ड्रिंक्स पिवून. पिझ्झा base सडू नये, त्यावरील मांस कुजू नये म्हणून त्यात काय मिसळतात?....ऑस्ट्रेलिया येथे KFC मध्ये chicken Twister wrap खाललेल्या मोनिका सामन ह्या तरुणीला salmonella encephalopathy ह्या मेंदू दुखापतीचा सामना करावा लागला. Justice Stephen Rothman ह्यांनी ह्यासाठी KFC ला जबाबदार धरलं. (ref : KFC guilty in Australia salmonella brain damage case ).<br />... आणि Formaldehyde तर रोजच्या जीवनाचा भाग झाला आहे...खासपणे महिला ह्याचा भरपूर वापर करतात. दिवाळी मध्ये तर दुप्पट वापर होणार आहे. हे रसायन पुढील product मध्ये असत:<br />Lotions<br />Shampoos<br />Sunblock<br />Soap Bars<br />Cosmetics<br />Body Wash<br />Toothpaste<br />Baby Wipes<br />Bubble Bath<br />वरील product तुमचा चेहरा, तुमचं शरीर फ्रेश ठेवतात. अगदी खरोखर फ्रेश ठेवतात. कारण त्यातील Formaldehyde तुमच्या त्वचेवर जंतू बसू देत नाही. बसले तर त्यांचा नाश करतात. सोबत तुमच्या पेशींचाही नाश करतात. तुम्ही सुंदर दिसता की नाही हे माहित नाही. पण dead body बनता. स्वताच्या पैशाने.<br />ह्याच कारणामुळे स्वीडन आणि जपान देशांनी अश्या products वर बंदी आणली आहे. कारण आपल्या नागरिकांना nasopharyngeal cancer आणि myeloid leukemia होऊ नये हा त्यामागचा हेतू आहे. आपले नागरिक गंभीर आजारी झाले, cancer ग्रस्त झाले तर देशाचं नुकसान आहे हे जपान आणि स्वीडन ला कळत. पण भारतात ह्या कंपन्या राजरोस धंदा करतात. कारण त्या globalization च्या नावाखाली भारतात घुसल्या आणि इथल्या लोकांचं आरोग्य बिघडलं तर त्यांना फायदा होणार आहे...कारण आरोग्य देणाऱ्या सेवा सुध्धा तेच चालवतात. म्हणजे जिवंत राहिला तरी ग्राहक आणि मारायला टेकलात तरी ग्राहक. भारत फार मोठी बाजारपेठ आहे...जगताना मारणाऱ्यांची, मरत-मरत जगणार्यांची.<br />noodles meats मधेही अशीच रसायन वापरली जातात. भारत फार मोठा आहे, आपल्या हवामानात खाद्य पदार्थ सामान्य तापमानात फार तर 48 तास टिकतात. त्यामुळे जे product भारताच्या कानाकोपर्यात न्यायचे त्यांना ताज्या स्वरुपात टिकवण्यासाठी रसायने लावतात. शिवाय ह्या product चं शेल्फ life वाढतं...रसायनांमुळे सहा महिने टिकून राहतात. लहान मुले चिप्स, वाफेर्स आणि असे आकर्षक दिसणारे पदार्थ खातात. आपण घरी मुलाला ६ दिवस आधीच दूध पाजत नाही. पण chocolate ....ते तर वाढदिवसाला असतंच. सणाला मिठाई बाजूला झाली, chocolate देतात-घेतात. त्यात दुध असल्याच सांगतात. कोणत्याही रस्त्यावरील दुकानात ४ ते ६ महिने दूध टिकवण्यासाठी त्यात काय मिसळतात?<br />साधारण २० वर्षांपूर्वी dentist शोधावा लागायचा. कारण तेव्हा chocalate फार मिळत नसत. कोणी खात नसत. आता एका गल्लीत चार dentist मिळतात आणि बाजूला chocolate विकणारी दहा दुकानं असतात. आणि soft ड्रिंक, पिझ्झाचा पाउस पडतो. एका दुकानात खा-प्या आणि बाजूच्या दवाखान्यात जा. पुन्हा त्या दवाखान्यात विदेशी कंपन्या बसल्याच आहेत...आरोग्य सेवक बनून. त्यांच्या गोळ्या महाग असतात. तरीही त्याच मिळतात. कारण त्या विकणार्याला चांगला मर्जीन मिळतो. शिवाय toothpaste जर खरच मजबूत दात देतात तर त्या भारतात आल्यापासून दातांचे रुग्ण वाढणे हा फक्त योगायोग आहे का?<br />असे product वापरून एक तर आपण dead body बनतो..आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायला भाग पाडतो. कारण नारळ पाणी, लिंबाचा रस, ताक, लस्सी, नीरा हे पेय न पिता विदेशी कंपन्यांचे ड्रिंक्स पितो. फायदा जातो विदेशी कंपनीच्या खिशात आणि आपले शेतकरी भरपूर पिक काढूनही कंगाल होतात. स्व-हस्ते मरण स्वीकारतात. जर साखर सम्राट होऊ शकतो तर लिंबू सम्राट, नारळ सम्राट का होऊ शकत नाही. साखरे इतकीच नारळ-लिंबाची गरज असते. पण लिंबू, नारळाचं पाणी, उसाचा रस hygenic नसतो असा प्रचार केला जातो. कोण करतं हा प्रचार? ज्यांना हे पदार्थ अडचण ठरतात ते. cola कंपन्या भारतात आल्या तेव्हा त्यांनी strategy आखली...लिंबू, नारळ, लस्सी ह्यांना बाजारातून हाकलायच. तरच भारतीय लोक आपले ड्रिंक्स पितील.... आणि अस भाषण jeorgia मध्ये झालं, गांधीजींच्या पुतळ्याखाली.<br />साधारण ११९५ साली cola कंपन्यांनी मोहीम सुरु केली आणि आज २०१४ मध्ये ते यशस्वी झाले. शत प्रतिशत विजयी ठरले. आता ड्रिंक्स वर प्रचंड उलाढाल होते. विदेशी कंपन्या अमाप नफा कमवतात आणि शेतकरी मात्र आत्महत्या करतात. पाणी विकणारे तेजीत आहेत आणि अन्न पिकवणारे कर्जबाजारी. अन्न तयार करणाऱ्याच product कोणी घेत नाही. शेतकरी मेले. आता पाळी आहे दूध उत्पादकांची. कारण मिठाई मध्ये sugar , calories असतात म्हणे....पण chocolate , noodles आरोग्याला चांगले असतात. त्यामुळे सण, खास प्रसंग chocolate ने साजरा करतात. म्हणून मिठाईची दुकानं संपत चालली, लोक संख्या वाढली आणि मिठाई, किराणा दुकाने कमी झाली..कारण mall आले आहेत . मिठाई विकणारे भारतीय आहेत. त्यांची मिठाई पद्धतशीर पाने बदनाम केली जाते. mall मधील brands ला खपवण्यासाठी सिने-क्रिकेट स्टार तयार आहेत. त्यात काय मिसळतात ते नंतर उघडकीला येत. तोवर सदर कंपन्या रग्गड नफा कमावून मोकळ्या होतात. कित्येकांना रुग्ण बनवतात. इकडे मालाला मागणी न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो. सध्या केळ्यांची अशीच बदनामी चालू आहे. केळं खाल्ल्यामुळे १०० % cancer होतो. आणि पिझ्झा, बर्गर, noodle , snack आरोग्य देतात. म्हणजे तुम्ही केळी खावू नका. शेंगदाणे, फुटाणे, कुरमुरे, डाळी, काकडी, गाजर असे अनेक पदार्थ खावू नका. ते healthy नाहीत. शिवाय कुरमुरे खातो तो गरीब, backward समजला जातो. पिझ्झा खातो तो updated असतो. त्यामुळे पिझ्झा कंपन्या updated होत जातात आणि भारतीय शेतकरी out ऑफ date .<br />पिझ्झा कंपन्यांना AC दुकाने आणी रस्त्यावर भाजी विकणाऱ्या भारतीय महिलेला उन-पावसाचा मारा सहन करावा लागतो. शहरातील भरगच्च रस्त्यावर लघवी करायला जागा नसते, म्हणून ह्या महिला चहा-पाणी पीत नाहीत. किंवा चार-पाच तासात भाजी उचलून घरी जाव लागत.<br />जर भारतीयांनी ठरवल की मी फक्त माझ्या शेतकर्याने बनवलेलं product घेईन तर शेतकरी cola कंपन्या इतकी भरभराट पाहू शकतील. ते तुम्हाला dead body बनवणार नाहीत. घातक रसायन थोपणार नाहीत.<br />चला दिवाळी साजरी करू, जिवंत माणसांची...आनंदाने जगू शकणार्या भारतीय शेतकऱ्यांची...आणि त्या नरकासुराला दूर करूया जो भारतात घुसला आणि आम्हालाच मारायला निघाला आहे.<br />आमचा देश आधी सापांचा, गुलामांचा देश म्हणून ओळखला जायचा...आता तो dead body चा देश बनवायचा नाही!!<br />-निरेन आपटे</div>
</div>
राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-326580629355588128.post-72819304659338394162015-01-13T22:07:00.004-08:002015-01-13T22:07:32.832-08:00एक छान लेख...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px;">
तुम्हाला काय आहे... मुलगी-मुलगा? की रेसचा घोडा?</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
एक तरुण interview रूम मध्ये बसला होता. समोर तीन professionals चष्मा आणि tie लावून बसले होते.<br />Executive engineer ने तरुणाकडे पाहून विचारले, " tell me , जिथे खूप पाउस पडतो, तिथे जास्त प्रमाणात काय निर्माण होतं?"<br />तरुणाने उत्तर दिलं- "छत्र्या!"<br />दुसर्या tie वाल्या लठ्ठ CEO ने विचारलं- " यावर्षी पद्मश्री कोणाला मिळाली?"<br />तरुणाने उत्तर दिलं- " मला... कारण माझं नुकतंच लग्न झालं असून बायकोच नाव आहे पद्मश्री !!"<br />तिसरा Regional manager वैतागून म्हणाला-" काही डोक आहे का तुला?"<br />तरुणाने शांतपणे उत्तर दिलं-" हो, खूप डोक आहे. शाळेत भरती झाल्यापासून ह्या interview पर्यंत सगळे जण तेच खात आहेत."</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
Executive engineer ने विचारलं, " तुझ्या bio - data मध्ये M A , B f t डिग्री लिहिली आहे, काय आहे ही पदवी?"<br />तरुणाने पुन्हा शांतपणे उत्तर दिलं-" Matric appeared but failed thrice "<br />त्यावर CEO ने चिडून फाइल आपटली आणि ओरडला-" फार मोठा गाढव आहेस तू !!"</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
तरुण तितक्याच शांतपणे म्हणाला- "साहेब, मोठे तर तुम्ही आहात, मी तर फार लहान आहे"</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
एक पिढी शिक्षण घेवून गाढव बनली आणि आता नवी पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
परीक्षेत १००% पाहिजेत, कराटे क्लासमध्ये black बेल्ट मिळवायचा आहे. त्यानंतर dance क्लास attend करायचा. भगवतगीता स्पर्धेत जायचं आहे. श्लोकांचा अर्थ कळला नाही तरी ते तोंडपाठ करायचेच. कारण first prize मिळालंच पाहिजे !! मग drawing competition असते. तिथून बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला...संगीत विशारद बनायला.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
Albert Einstein बनवून देणाऱ्या Multi -national school आल्या. पण Albert हा Einstein बनण्यासाठी शाळेत गेला नव्हता. एक अमिताभ बनला तर हजारो acting school उभ्या राहिल्या. पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही school मध्ये गेला नव्हता. आता लवकरच मोदी तयार करणाऱ्या शाळा उभ्या राहतील. आणि पालक लाखो रुपये फी भरून त्यात मुलांना पाठवतील. आज मुलाच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च एका वर्षाला होतो, तितके रुपये त्याच्या पालकांना संपूर्ण शिक्षण घेण्यासाठी सुध्दा लागले नाहीत.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
आता शाळा सुरु केल्या आहेत investors नी. मागणी तसा पुरवठा ह्या तत्वावर. पालकांना आपल्या मुला-मुलीला रेसचा घोडा बनवायचं आहे ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली. दप्तराचं आणि पालक-शिक्षकांचं अपेक्षांचं ओझं वाहणारी मुले म्हणजे चालती बोलती प्रेते बनत चालली आहेत. जरा शुद्धीवर आली की " what is square of 12 ? " असं विचारून त्यांचं बालपण चिरडून टाकतात.<br />श्री मोदी ह्यांनी मुलांना एक प्रश्न विचारला होता-" तुमच्यापैकी किती जण घाम गळेपर्यंत खेळतात?"<br />तेव्हा एकाही मुलाने हात वर केला नाही. कारण आता मुले AC मध्ये जन्म घेतात, AC मध्ये वाढतात. चिप्स खातात, soft ड्रिंक पितात आणि mobile वर game खेळत बसतात. उन, पाऊस, वारा ह्याच्याशी संबंध येत नाही. पडणं-लागणं, खेळात हरणे माहीतच नाही. school bus आली नाही तर शाळेपर्यंत चालत जाण्याची ताकद मुलांमध्ये नाही. वय वर्ष ६ पार होत नाही तर डोळ्याला चष्मा लागतो. हात पायांच्या एकतर काड्या होतात नाहीतर लठ्ठपणा वाढतो. कारण शारीरिक कष्ट संपले आणि Modified food starch, maltodextrin, hydrolyzed corn gluten, disodium inosinate/ guanylate, yeast extrac, hydrolyzed soy protein मिसळलेले पदार्थ खाणे सुरु झाले. ह्या ingredients ची खासियत म्हणजे ते मुलांच्या पोटात शिरून जास्त काळ टिकतात आणि पोटातील पोषके शोषून घेतात. मुलांची hormonal आणि जैविक वाढ रोखतात. ज्यामुळे मुले दुबळी होत जातात. हे घटक पिझ्झा-बर्गर मध्ये असतात. म्हणून भारत लवकरच diabetes चे सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनणार आहे. सोबत इतरही विकार येत आहेत.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
शेंगदाणे, चणे, रवा, तांदूळ, बाजरी, सुका मेवा आणि फळे ह्यात घातक ingredients नसतात. लापशी, सातू, शिरा, पोहे किंवा अंड्याचे घरी बनवलेले पदार्थ मुलांना उत्तम पोषण पुरवतात. ते मिळत नसल्यामुळे मुलांची शारीरिक वाढ नीट होत नाही. प्रतिकार क्षमता संपते. मग vitamins , DHA , minerals देणारे product विकत आणून ते खायला देतात. वास्तविक, शरीर हा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे. ह्याच शरीराला योग्य आहार, कष्ट मिळाले तर कुठेही तयार न होऊ शकणारं रक्त तयार होतं. साध्या भाज्या, अस्सल भारतीय जेवण मिळालं की शरीराची यंत्रणा स्वत काम करते. म्हणून ताज्या भाज्या, भाकरी खाणारी आणि मिनरल्स, calcium , proteins माहित नसलेली माणसे १०० वर्षे जगली आणि हे माहित झालेली माणसे फक्त ६० वर्षे जगतात…तेही अनेक रोग सोसत, औषधे घेवून !!</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन न केल्यामुळे मुलांना मानसिक कमतरता जाणवते. संघर्ष माहित नसतो आणि team work कळत नाही. मित्र फक्त whats app , face बुक वर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही. सुख-दुखाची देवाणघेवाण नाही आणि मित्राचा-मैत्रिणीचा मानसिक आधार नाही. दिलखुलास हसणे आणि ओक्साबोक्शी रडणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. ह्या दोन्ही क्रिया मुलांना करता येत नाहीत. आपोआपच, जरा मनाविरुद्ध घडलं की लहान मुले-मुली आत्महत्या करतात. बरीच एकुलती एक मुले दुसर्याशी जमवून घेण्याची सवय नसल्यामुळे पुढे लग्न झाल्यावर वर्षभरात घटस्फोट घेतात. ज्या मुलांना बहिण नसते, चांगली मैत्रीण नसते त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन संकुचित बनतो. ह्या उणीवांचा शिक्षणात विचार केलेलाच नाही.<br />भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षण तज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरु झाला. मोठे उद्योजग, पुढार्यांनी शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली. एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या admission ची तयारी सुरु होते. कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने केली होती. आता मुल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवायची तयारी सुरु होते. आता मुलाने बोलायला सुरुवात केली की थेट E =Mc square म्हणायचं बाकी राहिलं आहे.<br />अशी मुले सर्व formula पटापट म्हणून दाखवतील पण स्वताचा formula कधीही शोधू शकणार नाहीत.<br />guitar शिकतील पण स्वताची संगीत रचना करू शकणार नाहीत.<br />लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर, मेरी कोम ह्यांचं अनुकरण अचूक करतील. पण स्वताची ओळख निर्माण करणार नाहीत.<br />कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं.<br />जगायची कला, गीत-संगीतातील आनंद, निसर्गासंपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार, साहित्य ह्याला बाजारू किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय, त्यात ते पारंगत होत आहेत. काही जणांना campus मध्ये दर महिना ४ लाखांपेक्षा जास्त पगार असणारी नोकरी मिळतेय....पण त्यात देशाचं नाही, भांडवलदारांच हित साधला जातंय. पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल पण न स्वत जगण्याचा आनंद लुटू शकतील, न दुसर्याला जगण्याची मजा मिळू देतील...</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये शाळेत AC लावत नाहीत. तिथे मुलांना घोकंपट्टी पेक्षा practical वर भर देतात. वृक्ष-वेली स्वताच अन्न स्वत तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात?...असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात. त्या रोपांची-वेलींची जोपासना करायला लावतात. "निप्पोन technology " ने केलेल्या तपासणीत म्हटलं आहे की शाळेच्या आवारातील वेलींमुळे तापमान चार अंश कमी झाल आहे. आणि मुले पाना-फुलांसोबत भावनिक नात जोडू लागली आहेत. जर्मनी मुलांना Transference शिक्षण देते. तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेवून दुसरी पर्यंत लेखन करू देत नाहीत. पाचवीपर्यंत practical चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका, प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल ह्याची सतत तपासणी होते. दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्रांच प्रशिक्षण देतात. सगळे एकदम science मध्ये भरत नाहीत. अनावश्यक विषय शिकवत नाहीत. चीन हा cycle प्रेमी देश ४ वर्षाच्या मुलांना cycle चालवण्याच शिक्षण देतो. त्यानंतर theory कमी आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात.<br />प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार ह्याचा विचार Netherlands सारखा देशही करतो. एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषय आणि क्लासचा मारा सोसण्याच काम भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते.</div>
<div style="background-color: white; color: #141823; display: inline; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-top: 6px;">
शिक्षण काय असतं?<br />रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पहा.<br />टागोरांची "शांतीनिकेतन" शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई. एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्या समोर पुस्तकात डोक खुपसून बसली होती. आणि उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती. कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध घेत फिरत होता. तेवड्यात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय...गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त चार मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले हसण्यात-नाचण्यात रमली होती. सुटा-बुटातील पालक महाशय टागोरांना म्हणाले- “या नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का?”<br />टागोर म्हणाले- “चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलांची. ही मुले खेळण्या-बागडण्याच्या वयात मोठ्या माणसासारखी वागत आहेत. ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर मीसुद्धा अजून झालो नाही. खरं तर मलाही झाडावर चढाव असं वाटतं. पक्ष्यांशी बोलावसं वाटत. भरपूर खेळावस वाटतं. पण माझ शरीर आता साथ देत नाही. “<br />टागोर जगण्यासाठी शिकवत होते. आता शिकण्यासाठी जगावे लागते.<br />जास्त ज्ञान, जास्त कला घेवून मुले धावत असतात.<br />आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात !<br />मग एक रेस सुरु होते आणि जगायचं राहून जातं !!<br />-निरेन आपटे</div>
</div>
राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-326580629355588128.post-79968038425234091852014-10-16T21:48:00.000-07:002014-10-16T21:48:00.969-07:00<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="_5pbx userContent" data-ft="{"tn":"K"}" id="u_0_q" style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 1.38; overflow: hidden;">
<div style="margin-bottom: 6px;">
दिनांक- १६/१०/२०१४</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
ही घ्या मित्रांनो अजून एका सुंदर पोस्टची भेट ........... नक्की वाचा, संग्रही ठेवा आणि शेअर करा ....... अतिशय महत्वाची पोस्ट आहे मित्रांनो ............</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
नमस्कार मित्रांनो...................दुसरे कुठले घड्याळ लक्षात ठेवण्यापेक्षा हे हे तुमच्या शरीराचे घड्याळ लक्षात ठेवा ..............</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
हा सोबत दिलेला तक्ता [चार्ट] बघा. त्या मधे दिल्या प्रमाणे आपल्या शरीरातील ऑर्गनस म्हणजे इंद्रिये काम करत असतात. या सर्व इंद्रियांच्या, अवयवांच्या जास्तीतजास्त शक्ती ओतून काम करण्याच्या वेळा ठरलेल्या असतात. म्हणजे तुम्ही जेवल्यावर एका क्षणात अन्न पोटाच्या तळाशी जात नाही. त्यावर अक्षरश: हजारो क्रिया होतात. प्रचंड उलाढाल होते आपल्या शरीरात आणि आपल्याला पत्ता सुद्धा नसतो. पण आपले शरीर बिघडले की मग आपल्याला कफ होणे, पित्त होणे, वाताचा त्रास होणे ...... [ हा वायू फार डेंजर बाबा ............ बाहेर पडताना दिशा कोणतीही असो वरची अथवा खालची जिथून बाहेर पडतो त्याला आनंद आणि दुसऱ्याला भयंकर त्रास देतो. आणि शिवाय अर्धांगवायू वायू वगैरे ८० प्रकारचे वाताचे रोग आहेत. असो.] मळमळणे, उलट्या, सुलट्या [ जुलाब हो जुलाब], किडनी म्हणजे मूत्रपिंड विकार, हृदय विकार असे एक ना दोन शेकडो-हजारो तक्रारी सुरु होतात. कारण कळत नाही. कफ झाला लाव विकस, पित्त झाले पी दुध किंवा काढ ओकाऱ्या असे सुरु होते. म्हणजे “आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी” असा प्रकार होऊन बसतो. पण मूळ कारणावर कोणीच लक्ष देत नाही.</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
जर आपण दिवसातील [ आणि रात्रीची सुद्धा] सर्व कामे निहित वेळेत म्हणजे ठरलेल्या योग्य वेळी केली तर शक्यतो आजारपण येणार नाही किंवा येत नाही. भारत, चीन आणि जगभर या शरीरात चालणाऱ्या घडामोडींवर अभ्यास चालू आहे. निसर्गात प्रत्येक गोष्टीचे एक चक्र आहे. त्याला सिर्काडीयन सायकल असे म्हणतात. आपल्या शरीरात जे काही चालू असते ते सुधा खरे तर अतिशय शिस्तबद्ध असते. आपण त्याची वाट लावत असतो. चला तर आपण बघू या शरीराचे घड्याळ काम कसे करते ते ........</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
रात्री- १ ते ३ वाजेपर्यंत- लिव्हर म्हणजे यकृताची वेळ- यकृत आत्ता दिवसभर आलेल्या अन्नावर जोराने प्रक्रिया सुरु करते. आणि विषांचा निचरा करते. खूप खोल विश्रांतीचा हा काळ आहे. स्वप्ने जास्त पडतात. या वेळेला शरीराला ताण दिल्यास भयंकर राग येतो, वाढतो. लहान आतडे या वेळेत अतिशय कमी कार्यक्षम असल्याने आत्ता काहीही खाल्ले तर अतिशय त्रास होतो.</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
रात्री ३ ते पहाटे ५ वाजेपर्यंत फुफ्फुसांची वेळ- फुफ्फुसे आणि श्वसनसंबंधित सारे अवयव, नाक्पुड्यान मधल्या पोकळ्या हे आत्ता उत्तम कार्य करते. साफ केले जाते. श्वसन उत्तम चालते. आणि पहाटे झोपेतून उठण्यासाठी शरीराची हळूहळू तयारी केली जाते. जडपणा आणि थोडे दु:खी वाटण्याचा हा कालवधी आहे.</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
पहाटे ५ ते सकाळी ७ वाजेपर्यंत लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठ्या आतड्याची वेळ- मोठे आतडे कार्यक्षम होऊन शरीरातील मल बाहेर टाकण्यासाठी या आतड्याची जोरदार हालचाल सुरु होते. अकार्यक्षम आणि अपराधीपणा वाटण्याचा हा कालावधी आहे.</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत स्टमक म्हणजे जठराची वेळ- पचनाची सर्वोत्तम वेळ. प्रोटीन्स वगैरे भरपूर असलेला आहार याचे वेळेत घ्यावा. निराश, उद्विग्न वाटण्याचा हा काळ आहे.</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत स्प्लीन म्हणजे प्लीहेची वेळ- शरीरातील उर्जा प्रवाह कार्यान्वित होतात. अन्न रक्तात आणि उर्जेत वेगाने बदलले जाऊ लागते. या वेळेत Allergy चा त्रास जाणवू शकतो. पण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम प्लीहा करत असते. विचार करायला आणि काम करायला ही वेळ सर्वोत्तम होय. स्वत:चा अभिमान किंवा अहंकार, स्वाभिमान, भीती, असूया वाटण्याचा हाच कालावधी होय.</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत हार्ट म्हणजे हृदयाची वेळ- हृदयाची धडधड या काळात वाढते. आणि असे बघितले गेलेले आहे की हार्ट Attacks या वेळेतच जास्त प्रमाणात येतात. जास्त उन्हात जाऊ नये. किंवा जास्त जोराचा व्यायाम या काळात करू नये. खानपान, भेटणे, बोलणे यासाठी उत्तम काळ आहे हा. या काळात मन आनंदित रहाते तसेच दु:ख सुद्धा वाटू शकते.</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतड्याची वेळ- या वेळेत लहान आतड्याचे काम जोरात चालते. याच वेळेत अपचन, पोटात दुखणे, उलटीची भावना हे त्रास जास्त जाणवतात. या काळत विश्लेषण आणि एखाद्या कामाचे नियोजन करणे ही कामे करावीत. या काळात आपल्याला थोडे असुरक्षित वाटू शकते.</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत Bladder म्हणजे मूत्राशयाची वेळ- ही वेळ आहे मूत्राशयाची. म्हणजे जिथे लाघवी गाळून आल्यावर साठते ती जागा किंवा पिशवी. या वेळेत त्वचा विकार, खाज, खरुज हे जास्त जाणवते. या वेळेत ग्लानी म्हणजे थकव्यामुळे थोडी झोप आल्या सारखे वाटते. एक वामकुक्षी घेतल्याने बरे वाटते. या वेळेत थोडे क्षारयुक्त पदार्थ खाल्ले तर फायदा होतो. संग्रह आणि साठवणुकीची कामे यासाठी उत्तम वेळ. पण भयंकर आळस हा या वेळेचा दोष आहे.</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
संध्याकाळी ५ ते ७ किडनी म्हणजे मुत्रपिंडांची वेळ- जर Adrenal ग्रंथी नीट काम करत नसल्या तर हा मगाचा जो आळस आहे ना तो या काळात सुद्धा पुढे चालूच रहातो. या ग्रंथी चांगल्या असल्या तर पुन्हा एकदा कामाचा जोश येतो. कामाचे एकत्रीकरण आणि गाडी चालवणे यासाठी ही वेळ छान. याच वेळेत भीती वाटते, वाढते आणि गुन्हे सुद्धा घडतात.</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
रात्री ७ ते ९ पेरी कार्डीयमची वेळ- लैंगिक ग्रंथी या वेळेत जास्त कार्यक्षम होतात. इच्छा वाढतात. या खराब, दबलेल्या असल्या तर या वेळेत पाठीत दुखणे जाणवते. प्रेम करणे, प्रणय, लोकांमध्ये मिसळणे यासाठी हा समय मस्त. पलीकडून प्रतिसाद येत नाही असे वाटणे किंवा स्वत:कडून दिला न जाणे, आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत असे वाटणे, आपण दुखावले गेलो आहोत असे वाटणे किंवा खूप खूप आनंद वाटते, खूप मज्जा मज्जा येणे हे असे सारे या वेळेत वाटू शकते.</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
रात्री ९ ते ११ ट्रिपल वॉरमरची वेळ- शरीरातील सर्व आंतरस्त्रावी ग्रंथी या वेळेत उत्तमपणे कार्यान्वित झालेल्या असतात. तसेच रक्त वाहिन्या सुद्धा जोरोशोरोपे असतात. दमल्यासारखे वाटणे [स्वाभाविक आहे म्हणा], अशक्तपणा वाटणे, डोके दुखणे हे त्रास या वेळेत होतात. आराम करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. गोंधळल्यासारखे वाटणे, कशातच काही अर्थ नाही असे वाटणे हे भाव या वेळेस मनात येऊ शकतात.</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
रात्री ११ ते १ गॉल Bladder म्हणजे पित्ताशयाची वेळ- झालेली झीज भरून काढण्याचा हा काळ आहे. या वेळेत जर त्रास होत असेल, झोप येत नसेल, झोप लागत नसेल, जाग येत असेल तर अशी शक्यता आहे की पित्ताशय आणि यकृतावर ताण येतो आहे. आणि पाचानातून निर्माण होणारी ही विषे नाकाम करायला यकृताला त्रास होतो आहे. त्यामुळे मेंदूच्या कामात अडथळे येत आहेत. एखाद्याच्या बद्दल कडवटपणा या काळात वाढतो, वाटतो.</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
मला माहित आहे मित्रांनो की आजच्या या धकाधकीच्या जीवनात यातील एकही गोष्ट या सांगितलेल्या वेळेत होणार नाही. पण आपल्याला जे आणि जसे जमेल तसे आपण प्रयत्न करत रहायचे आहेत. पुन्हा भेटू नवीन माहितीसह ...........</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
आपला मित्र,</div>
<div style="display: inline; margin-top: 6px;">
Dr. हेमंत उर्फ कलादास ................</div>
<div class="_5yn1" id="u_0_x" style="direction: ltr; margin-top: 10px;">
<a href="https://www.facebook.com/hemant.sahasrabuddhe1/posts/712695928799450:0#" role="button" style="color: #3b5998; cursor: pointer; text-decoration: none;">See Translation</a></div>
</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 12px; line-height: 15.3599996566772px;">
<div data-ft="{"tn":"H"}">
<div class="mtm" style="margin-top: 10px;">
<a ajaxify="https://www.facebook.com/photo.php?fbid=712695865466123&set=a.244212908981090.55763.100001771475620&type=1&src=https%3A%2F%2Ffbcdn-sphotos-h-a.akamaihd.net%2Fhphotos-ak-xpa1%2Fv%2Ft1.0-9%2F10509652_712695865466123_7937957976459348062_n.jpg%3Foh%3D89b68669345edfd3a12fc52c9718a680%26oe%3D54AD9D66%26__gda__%3D1422001630_8f2e29bd7de44cb0cc5aad6e936bbd90&size=900%2C900&player_origin=story_view" class="_4-eo _2t9n _50z9" data-ft="{"tn":"E"}" href="https://www.facebook.com/photo.php?fbid=712695865466123&set=a.244212908981090.55763.100001771475620&type=1" rel="theater" style="-webkit-box-shadow: rgba(0, 0, 0, 0.0470588) 0px 1px 1px; color: #3b5998; cursor: pointer; display: block; position: relative; width: 470px;"><div class="_46-h _517g" style="height: 470px; overflow: hidden; position: relative; width: 470px;">
<img alt="दिनांक- १६/१०/२०१४
ही घ्या मित्रांनो अजून एका सुंदर पोस्टची भेट ........... नक्की वाचा, संग्रही ठेवा आणि शेअर करा ....... अतिशय महत्वाची पोस्ट आहे मित्रांनो ............
नमस्कार मित्रांनो...................दुसरे कुठले घड्याळ लक्षात ठेवण्यापेक्षा हे हे तुमच्या शरीराचे घड्याळ लक्षात ठेवा ..............
हा सोबत दिलेला तक्ता [चार्ट] बघा. त्या मधे दिल्या प्रमाणे आपल्या शरीरातील ऑर्गनस म्हणजे इंद्रिये काम करत असतात. या सर्व इंद्रियांच्या, अवयवांच्या जास्तीतजास्त शक्ती ओतून काम करण्याच्या वेळा ठरलेल्या असतात. म्हणजे तुम्ही जेवल्यावर एका क्षणात अन्न पोटाच्या तळाशी जात नाही. त्यावर अक्षरश: हजारो क्रिया होतात. प्रचंड उलाढाल होते आपल्या शरीरात आणि आपल्याला पत्ता सुद्धा नसतो. पण आपले शरीर बिघडले की मग आपल्याला कफ होणे, पित्त होणे, वाताचा त्रास होणे ...... [ हा वायू फार डेंजर बाबा ............ बाहेर पडताना दिशा कोणतीही असो वरची अथवा खालची जिथून बाहेर पडतो त्याला आनंद आणि दुसऱ्याला भयंकर त्रास देतो. आणि शिवाय अर्धांगवायू वायू वगैरे ८० प्रकारचे वाताचे रोग आहेत. असो.] मळमळणे, उलट्या, सुलट्या [ जुलाब हो जुलाब], किडनी म्हणजे मूत्रपिंड विकार, हृदय विकार असे एक ना दोन शेकडो-हजारो तक्रारी सुरु होतात. कारण कळत नाही. कफ झाला लाव विकस, पित्त झाले पी दुध किंवा काढ ओकाऱ्या असे सुरु होते. म्हणजे “आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी” असा प्रकार होऊन बसतो. पण मूळ कारणावर कोणीच लक्ष देत नाही.
जर आपण दिवसातील [ आणि रात्रीची सुद्धा] सर्व कामे निहित वेळेत म्हणजे ठरलेल्या योग्य वेळी केली तर शक्यतो आजारपण येणार नाही किंवा येत नाही. भारत, चीन आणि जगभर या शरीरात चालणाऱ्या घडामोडींवर अभ्यास चालू आहे. निसर्गात प्रत्येक गोष्टीचे एक चक्र आहे. त्याला सिर्काडीयन सायकल असे म्हणतात. आपल्या शरीरात जे काही चालू असते ते सुधा खरे तर अतिशय शिस्तबद्ध असते. आपण त्याची वाट लावत असतो. चला तर आपण बघू या शरीराचे घड्याळ काम कसे करते ते ........
रात्री- १ ते ३ वाजेपर्यंत- लिव्हर म्हणजे यकृताची वेळ- यकृत आत्ता दिवसभर आलेल्या अन्नावर जोराने प्रक्रिया सुरु करते. आणि विषांचा निचरा करते. खूप खोल विश्रांतीचा हा काळ आहे. स्वप्ने जास्त पडतात. या वेळेला शरीराला ताण दिल्यास भयंकर राग येतो, वाढतो. लहान आतडे या वेळेत अतिशय कमी कार्यक्षम असल्याने आत्ता काहीही खाल्ले तर अतिशय त्रास होतो.
रात्री ३ ते पहाटे ५ वाजेपर्यंत फुफ्फुसांची वेळ- फुफ्फुसे आणि श्वसनसंबंधित सारे अवयव, नाक्पुड्यान मधल्या पोकळ्या हे आत्ता उत्तम कार्य करते. साफ केले जाते. श्वसन उत्तम चालते. आणि पहाटे झोपेतून उठण्यासाठी शरीराची हळूहळू तयारी केली जाते. जडपणा आणि थोडे दु:खी वाटण्याचा हा कालवधी आहे.
पहाटे ५ ते सकाळी ७ वाजेपर्यंत लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठ्या आतड्याची वेळ- मोठे आतडे कार्यक्षम होऊन शरीरातील मल बाहेर टाकण्यासाठी या आतड्याची जोरदार हालचाल सुरु होते. अकार्यक्षम आणि अपराधीपणा वाटण्याचा हा कालावधी आहे.
सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत स्टमक म्हणजे जठराची वेळ- पचनाची सर्वोत्तम वेळ. प्रोटीन्स वगैरे भरपूर असलेला आहार याचे वेळेत घ्यावा. निराश, उद्विग्न वाटण्याचा हा काळ आहे.
सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत स्प्लीन म्हणजे प्लीहेची वेळ- शरीरातील उर्जा प्रवाह कार्यान्वित होतात. अन्न रक्तात आणि उर्जेत वेगाने बदलले जाऊ लागते. या वेळेत Allergy चा त्रास जाणवू शकतो. पण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम प्लीहा करत असते. विचार करायला आणि काम करायला ही वेळ सर्वोत्तम होय. स्वत:चा अभिमान किंवा अहंकार, स्वाभिमान, भीती, असूया वाटण्याचा हाच कालावधी होय.
सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत हार्ट म्हणजे हृदयाची वेळ- हृदयाची धडधड या काळात वाढते. आणि असे बघितले गेलेले आहे की हार्ट Attacks या वेळेतच जास्त प्रमाणात येतात. जास्त उन्हात जाऊ नये. किंवा जास्त जोराचा व्यायाम या काळात करू नये. खानपान, भेटणे, बोलणे यासाठी उत्तम काळ आहे हा. या काळात मन आनंदित रहाते तसेच दु:ख सुद्धा वाटू शकते.
दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतड्याची वेळ- या वेळेत लहान आतड्याचे काम जोरात चालते. याच वेळेत अपचन, पोटात दुखणे, उलटीची भावना हे त्रास जास्त जाणवतात. या काळत विश्लेषण आणि एखाद्या कामाचे नियोजन करणे ही कामे करावीत. या काळात आपल्याला थोडे असुरक्षित वाटू शकते.
दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत Bladder म्हणजे मूत्राशयाची वेळ- ही वेळ आहे मूत्राशयाची. म्हणजे जिथे लाघवी गाळून आल्यावर साठते ती जागा किंवा पिशवी. या वेळेत त्वचा विकार, खाज, खरुज हे जास्त जाणवते. या वेळेत ग्लानी म्हणजे थकव्यामुळे थोडी झोप आल्या सारखे वाटते. एक वामकुक्षी घेतल्याने बरे वाटते. या वेळेत थोडे क्षारयुक्त पदार्थ खाल्ले तर फायदा होतो. संग्रह आणि साठवणुकीची कामे यासाठी उत्तम वेळ. पण भयंकर आळस हा या वेळेचा दोष आहे.
संध्याकाळी ५ ते ७ किडनी म्हणजे मुत्रपिंडांची वेळ- जर Adrenal ग्रंथी नीट काम करत नसल्या तर हा मगाचा जो आळस आहे ना तो या काळात सुद्धा पुढे चालूच रहातो. या ग्रंथी चांगल्या असल्या तर पुन्हा एकदा कामाचा जोश येतो. कामाचे एकत्रीकरण आणि गाडी चालवणे यासाठी ही वेळ छान. याच वेळेत भीती वाटते, वाढते आणि गुन्हे सुद्धा घडतात.
रात्री ७ ते ९ पेरी कार्डीयमची वेळ- लैंगिक ग्रंथी या वेळेत जास्त कार्यक्षम होतात. इच्छा वाढतात. या खराब, दबलेल्या असल्या तर या वेळेत पाठीत दुखणे जाणवते. प्रेम करणे, प्रणय, लोकांमध्ये मिसळणे यासाठी हा समय मस्त. पलीकडून प्रतिसाद येत नाही असे वाटणे किंवा स्वत:कडून दिला न जाणे, आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत असे वाटणे, आपण दुखावले गेलो आहोत असे वाटणे किंवा खूप खूप आनंद वाटते, खूप मज्जा मज्जा येणे हे असे सारे या वेळेत वाटू शकते.
रात्री ९ ते ११ ट्रिपल वॉरमरची वेळ- शरीरातील सर्व आंतरस्त्रावी ग्रंथी या वेळेत उत्तमपणे कार्यान्वित झालेल्या असतात. तसेच रक्त वाहिन्या सुद्धा जोरोशोरोपे असतात. दमल्यासारखे वाटणे [स्वाभाविक आहे म्हणा], अशक्तपणा वाटणे, डोके दुखणे हे त्रास या वेळेत होतात. आराम करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. गोंधळल्यासारखे वाटणे, कशातच काही अर्थ नाही असे वाटणे हे भाव या वेळेस मनात येऊ शकतात.
रात्री ११ ते १ गॉल Bladder म्हणजे पित्ताशयाची वेळ- झालेली झीज भरून काढण्याचा हा काळ आहे. या वेळेत जर त्रास होत असेल, झोप येत नसेल, झोप लागत नसेल, जाग येत असेल तर अशी शक्यता आहे की पित्ताशय आणि यकृतावर ताण येतो आहे. आणि पाचानातून निर्माण होणारी ही विषे नाकाम करायला यकृताला त्रास होतो आहे. त्यामुळे मेंदूच्या कामात अडथळे येत आहेत. एखाद्याच्या बद्दल कडवटपणा या काळात वाढतो, वाटतो.
मला माहित आहे मित्रांनो की आजच्या या धकाधकीच्या जीवनात यातील एकही गोष्ट या सांगितलेल्या वेळेत होणार नाही. पण आपल्याला जे आणि जसे जमेल तसे आपण प्रयत्न करत रहायचे आहेत. पुन्हा भेटू नवीन माहितीसह ...........
आपला मित्र,
Dr. हेमंत उर्फ कलादास ................" class="_46-i img" height="480" src="https://fbcdn-sphotos-h-a.akamaihd.net/hphotos-ak-xpa1/v/t1.0-9/p480x480/10509652_712695865466123_7937957976459348062_n.jpg?oh=fbdc4a336fa4a26e779c84d70658477e&oe=54BD2E98&__gda__=1425462910_cbffde04372efbfdd6ec8157d755bbc2" style="border: 0px; left: -5px; position: absolute; top: 0px;" width="480" /></div>
</a></div>
</div>
</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 12px; line-height: 15.3599996566772px;">
<form action="https://www.facebook.com/ajax/ufi/modify.php" class="live_712695865466123_316526391751760 commentable_item autoexpand_mode" data-ft="{"tn":"]"}" data-live="{"seq":"712695865466123_712924815443228"}" id="u_0_t" method="post" rel="async" style="margin: 0px; padding: 0px;">
<div class="_5pcp _5vsi" style="color: #9197a3; margin-top: 10px;">
<span data-reactid=".0"><a aria-live="polite" class="UFILikeLink accessible_elem" data-reactid=".0.0" href="https://www.facebook.com/hemant.sahasrabuddhe1/posts/712695928799450:0#" role="button" style="clip: rect(1px 1px 1px 1px); color: #6d84b4; cursor: pointer; height: 1px; overflow: hidden; position: absolute; text-decoration: none; width: 1px;" title="Like this">Like</a><a aria-live="polite" class="UFILikeLink" data-ft="{"tn":">"}" data-reactid=".0.1" href="https://www.facebook.com/hemant.sahasrabuddhe1/posts/712695928799450:0#" role="button" style="color: #6d84b4; cursor: pointer; text-decoration: none;" title="Like this">Like</a></span> · <label class="uiLinkButton comment_link" style="color: #666666; cursor: pointer; font-weight: bold; vertical-align: top;" title="Leave a comment"><input class="uiLinkButtonInput" data-ft="{"type":24,"tn":"S"}" style="background-attachment: initial; background-clip: initial; background-image: none; background-origin: initial; background-position: initial; background-repeat: initial; background-size: initial; border: none; color: #6d84b4; cursor: pointer; font-weight: normal; margin: 0px; padding: 0px; vertical-align: baseline;" type="button" value="Comment" /></label> · <a class="share_action_link" data-ft="{ "tn": "J", "type": 25 }" data-reactid=".1" href="https://www.facebook.com/ajax/sharer/?s=2&appid=2305272732&p%5B0%5D=100001771475620&p%5B1%5D=1073742744&share_source_type=unknown" rel="dialog" style="color: #6d84b4; cursor: pointer; text-decoration: none;" title="Send this to friends or post it on your timeline.">Share</a></div>
</form>
</div>
</div>
राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-326580629355588128.post-48394002863495432802014-09-21T20:57:00.003-07:002014-09-21T20:57:48.647-07:00ज्योतिषशास्त्र..भाग1<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px;">
दिनांक – २१/०९/२०१४</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
ज्योतिषशास्त्र – भाग १</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
मित्रांनो अवश्य वाचा हा लेख आणि लाभ करून घ्या ....लेख मोठा आहे, वाचायचा कंटाळा करू नका.....नक्की आवडेल .... संग्रही ठेवाच ....माझे फोन नंबर्स आहेत – 9158510598 / 9890369845 .</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
आज पर्यंत अनेक विद्वान आणि सामान्य माणसांना ज्योतिष हे खरे की खोटे, ते शास्त्र की अशास्त्र या विषयाने भंडावून सोडले आहे. तरीही जगात अनेक लोकांनी याचा सकारात्मक उपयोग करून घेतला आहे. विदेशात यावर प्रचंड काम झाले आहे. मी काही ज्योतिषातील किंवा विज्ञानातील [ या दोन्ही गोष्टी शिकलो असलो तरीही] कोणी अधिकारी व्यक्ती नाही. किंवा माझा शब्द म्हणजे यातील अंतिम शब्द नव्हे. पण एका नव्या दृष्टीने अभ्यास करायला काय हरकत आहे. मी माझा विचार मांडतो आहे.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
प्रेम हे सुद्धा शास्त्राच्या कसोटी वर उतरणार नाही कदाचित म्हणून ते त्याज्य कसे ठरू शकेल? ज्योतिष या विषयाचे असेच आहे. अभ्यास कमी पडत असेल.....संबंध मानवी मनाशी आणि आपल्या हातात नसलेल्या घटनांशी आहे ....त्यामुळे ज्योतिष खोटे ठरू शकते????...हवामान खाते रोज खोटे ठरतेय शास्त्र असून, इलेक्ट्रोन अजून कोणी पाहिला नाहीये कारण त्याला पहायला गेले की तो जागाच सोडतो त्यामुळे त्याचा अभ्यासच करता येत नाही ....एका क्वार्कने उजवा स्पिन घेतला की त्याचा समसंबंधी दुसरा क्वार्क प्रचंड दूर असला तरी उलटी फिरकी घेतो हे केवळ गणिता वरून शास्त्रज्ञ म्हणतात....प्रकाश कण आहे की लहर आहे हे अजून कळले नाहीये....अशा अनंत गोष्टी कळल्या नाहीत तरी आख्ख्या विज्ञानाला कोणी खोटे ठरवत नाही ना? मुळात हा अभ्यास खूप कठीण, गहन आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या मनाचा आहे.....आणि अशा किचकट मानवी घटनांचा आहे ..आणि आपल्या ज्या ऋषींनी आपल्या या महान धर्माची उभारणी केली, सण, उत्सव, परंपरा, अतिशय प्रगत असे आहार शास्त्र, आयुर्वेद ज्या ऋषीमुनींनी दिला त्यांनीच हे शास्त्र सांगितले आहे. आणि हे धर्मशास्त्र आहे हेच मुळी चूक आहे....फक्त धर्माने सांगितले की माणूस ऐकतो म्हणून केवळ धर्माशी ते जोडले आहे.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
आकाशात जसे ९ ग्रह आहेत – सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू तशा आपल्या शरीरात थालामास. हायपोथालामास, पिच्युटरी, पिनिअल, थायरॉइड थायमस, Adrenal , सेक्स गोनाड्स, यकृत, स्वादुपिंडे अशा ग्रंथी आहेत.....सूर्य म्हणजे थालामास, चंद्र म्हणजे हायपोथालामास, गुरु म्हणजे पिच्युटरी, बुध म्हणजे पिनिअल ग्रंथी तसेच थायमस या बालपणातच कार्यरत असणाऱ्या ग्रंथीवर आणि मज्जातंतूंवर देखील बुधाचा प्रभाव, मंगळ म्हणजे थायरॉइड, Adrenal वर मंगळ आणि शनी दोन्हीचा प्रभाव, शुक्र ग्रहाचा लैंगिक ग्रंथी अथवा सेक्स गोनाड्स आणि मूत्रपिंडानवर प्रभाव असतो, स्वादुपिंडानवर सूर्याचा प्रभाव तर यकृतावर गुरुचा आणि शनिचा प्रभाव, शनिचा प्लीहेवर [स्प्लीन] प्रभाव असतो आणि एकूणच पचनावर नियंत्रण असते...... राहू आणि केतू हे शरीरातील ग्रंथींच्या कामात विघ्न, वितुष्ट आणणारे असेंडिंग आणि डीसेन्डींग नोड्स आहेत. उत्तर आणि दक्षिण ध्रुव असावे तसेच.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
आकाशस्थ ग्रहांकडून येणारया किरणांचा यावर नक्की प्रभाव पडतो. आईच्या पोटातून बाळ जन्माला येण्यापूर्वी ते नाळेने आईशी जोडले गेलेले असते आणि पूर्णपणे आईवर अवलंबून असते. ज्या क्षणी ते पृथ्वीवर पहिले पाउल ठेवते त्या क्षणाला त्याच्या शरीरातील या सगळ्या ग्रंथी काम करणे सुरु करतात. आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध दाखवणारा तक्ता म्हणजे आपली कुंडली किंवा पत्रिका .... आईच्या पोटातून बाळ जन्माला येण्यापूर्वी ते नाळेने आईशी जोडले गेलेले असते आणि पूर्णपणे आईवर अवलंबून असते. ज्या क्षणी ते पृथ्वीवर पहिले पाउल ठेवते त्या क्षणाला त्याच्या शरीरातील या सगळ्या ग्रंथी काम करणे सुरु करतात. आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध दाखवणारा तक्ता म्हणजे आपली कुंडली किंवा पत्रिका ....या ग्रंथींमधून पाझरणारे हार्मोन्स किंवा संप्रेरके एकमेकांशी कसे, कुठे, किती, का, केव्हा व्यक्त होतात किंवा React होतात त्यावर आपले वागणे अवलंबून असते. आपली मानसिक स्थिती बदलेल तसे हे प्रत्येक निमिषार्धात बदलत असते. [ एक निमिष – पापणी लावण्याचा काल]. मग याचे प्रेडिक्शन किंवा भाकीत करणे किती अवघड असेल याचा तुम्हीच विचार करा. तुम्ही पत्रिकेचा तटस्थ राहून [ पत्रिका खरी नाहीच अशी ठाम समजूत काही काळ बाजूला ठेऊन] अभ्यास केलात तर तुमच्या लक्षात येईल की ....होय बर्याच गोष्टी जुळताहेत.....पुढचा त्रास वाचवायला त्याचा नक्की उपयोग होतोय.....पण काय आहे ना .....आपले एकदा मत झाले की झाले....मग त्याच दृष्टीने विचार करायचा....हे ठीक नाही .......आजच्या खगोल विज्ञानाची सगळी मांडणी ऋषींनी जे खगोल शास्त्र मांडले होते ना त्यावरूनच झाली आहे. प्रकाशाच्या वेगाने गेले तर आपले वस्तुमान नष्ट होते. त्यामुळे अनेक प्रकाश वर्षे दूर असलेल्या तारयांचा यंत्राने, याने वापरून कोणीही अभ्यास करू शकत नाही हे ऋषींनी जाणले होते म्हणून त्यांनी हे ध्यान प्रक्रियेतून हे सारे जाऊन घेतले....आजच्या खगोल विज्ञानाची सगळी मांडणी ऋषींनी जे खगोल शास्त्र मांडले होते ना त्यावरूनच झाली आहे. प्रकाशाच्या वेगाने गेले तर आपले वस्तुमान नष्ट होते. त्यामुळे अनेक प्रकाश वर्षे दूर असलेल्या तारयांचा यंत्राने, याने वापरून कोणीही अभ्यास करू शकत नाही हे ऋषींनी जाणले होते म्हणून त्यांनी हे ध्यान प्रक्रियेतून खगोल, अंतराळ जाणून घेतले....पाश्च्यात्यांनी या नक्षत्रे, ग्रहांना ठेवलेली नावेही बरीचशी आपल्या नावांशी साधर्म्य दाखवणारी आहेत. शनैश्चर म्हणजे शनीचा अपभ्रंश Satturn ...सूनु हा सूर्यासाठी असलेला संस्कृत शब्द आहे त्यावरून सन आले आहे. आपल्या ऋषींनी सांगून ठेवलेय की चंद्र हा पृथ्वीचा पुत्र नसून मंगल म्हणजे भौम [भूमीचा पुत्र, भूमी पासून निघालेला ] हा भूमीचा पुत्र आहे. आणि प्रशांत महासागर अर्थात Pacific महासागराचे जेव्हढे क्षेत्रफळ आहे तेव्हढेच मंगळाचे आहे. मंगळावर आता पाणी सापडल्याच्या बातम्या आणि फोटो आलेत.....चंद्र शुष्क आहे....त्याचे वय पृथ्वी पेक्षा जास्त आहे आणि चंद्र बाहेरून पृथ्वीच्या वातावरणात नंतर पकडला गेला आहे..... आपले धर्मशास्त्र हे “ओम ब्रुम फट” आणि भगवे कपडे घालून हरी हरी करा असे काहीतरी नुसते करायला शिकवते हे आधी डोक्यातून काढून टाका.....आणि त्याला ऋषींनी "शास्त्र" म्हंटले आहे इतकेच लक्षात घ्या म्हणजे पुरेल .....<br />ग्रहांच्या जाती म्हणजे ते कुठल्या वेळेस कसे वागतील हे सोपेपणाने कळावे म्हणून त्यावेळेस, त्या कालानुसार दिलेली उपमा.....आजही झाडांच्या प्रकारांना जाती आहेतच ... ज्योतिषशास्त्र चातुर्वर्ण्याचा पुरस्कार नाही करत ....ती त्या कालानुसार त्या त्या ग्रहांची वागण्याची पद्धत सांगण्याची संकल्पना होती. आणि राहू केतु हे ग्रह नाहीत. सूर्य चंद्र फिरत असताना जे संपात बिंदू तयार होतात ते म्हणजे राहू केतू आहेत हेही तिथे स्पष्ट सांगितले आहे. आपण त्याची उकल करायला कमी पडलो म्हणून ते खोटे ठरवणे हा अहंकार नाही का? एखादी गोष्ट खोटे ठरवायला फार अभ्यास नाही लागत....तुलनेने ते सोपे असते....खरे ठरवणेच अवघड असते.....आणि नेमके होते हे आहे की विज्ञान आणि ज्योतिष हे दोन्ही शिकलेले हे सांगायला पुढे येत नाहीयेत .....कारण खोटे ठरवणारे हे झाले की ते, ते झाले की ते ....असे कुठलेतरी सिद्ध न झालेले संदर्भच देऊन बोलत रहातात.....मग हा संवाद न होता वाद होतो.....त्यामुळे अभ्यासु व्यक्ती अशा ठिकाणी फिरकत नाहीत.....सारया जगात ज्योतिषाचा प्रचार, प्रसार आहे. ते देश त्याचा उपयोग करून घेत आहेत. किरोने सांगितलेली भविष्ये जागतिक स्तरावर खरी ठरली आहेत.....आपण ६० - ७० वर्षे आयुष्य असलेले काही वर्षांचे क्षणिक पथिक हा हजारो वर्षांचा ठेवा ४ बुके शिकलो म्हणून पुसू शकतो काय? आणि त्याही पेक्षा तो पुसावा काय?</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
आपण थोडक्यात या ग्रंथींचे कार्य कसे चालते हे पाहू. आणि आपले शरीर केवळ या ग्रंथींवर चालत नसून या ग्रंथी पाठीच्या कण्यात किंवा कण्याजवळ असलेल्या मज्जातंतूंच्या जुडग्याला Ganglion असे म्हणतात. [Anatomy - a concentrated mass of interconnected nerve cells. / Pathology - a cystic tumor formed on the sheath of a tendon. In neurological contexts, ganglia are composed mainly of somata and dendritic structures which are bundled or connected. Ganglia often interconnect with other ganglia to form a complex system of ganglia known as a plexus. Ganglia provide relay points and intermediary connections between different neurological structures in the body, such as the peripheral and central nervous systems. ]. चक्रांविषयी अधिक माहिती मी माझ्या चक्रे या लेखात देईन.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
आलं लक्षात? हे गांग्लिया म्हणजेच Plexuses होत. भारतीय ऋषींनी यांना चक्रे, दले किंवा कमळे म्हंटले आहे. यांची रचना सुद्धा कमळांच्या दळांसारखीच म्हणजे पाकळ्यांसारखीच असते. या चक्रांमधून म्हणजे Ganglion च्या जुडग्यांच्या मधून त्या त्या अवयवात मज्जातंतू गेलेले असतात. तर या चक्रांच्या द्वारा मेंदू मणक्यातून शरीराशी संपर्क ठेवत असतो. आणि यातून जे संदेश येत जात असतात त्याला प्रतिसाद देत शरीरातील Glands म्हणजे ग्रंथी काम करत असतात. यांना बाहेर घडणारया गोष्टींचे ज्ञान डोळे, कान, स्पर्शेंद्रीये, कान हे देत असतात. जिभेला चव कळते. तर मग बघा हे काम किती गुंतागुंतीचे आहे. एखाद्या मुलीला तिच्या प्रियकराचे नाव घेऊन चिडवले तर तिचे गाल लाल होतात, सभेत भाषण करायची वेळ आली की पाय थरथरायला लागतात, सारखी लघवीला लागते. हे सारे व्यापार ग्रंथी आणि चक्रे यांनी घडवून आणलेले असतात.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
Thamamus [ आपल्या भाषेत सूर्य] मेंदूत ही सर्वात वर असणारी ग्रंथी आहे. हा या सर्व ग्रंथींच्या कामावर दृष्टी ठेऊन असतो. सूर्य म्हणजे आत्मा.....आत्मविश्वास....तिचा खालचा भाग म्हणजे Hypo-Thalamus [ आपल्या भाषेत चंद्र]. “चंद्रमा मनसो जात:” चंद्र म्हणजे माणसाचे मन होय. या सारया ग्रंथींचा व्यवस्थापक म्हणजे ही हायपोथालामस ग्रंथी होय. आपले मनच सुख आणि दु:ख भोगत असते आणि जे आहे त्यापेक्षा ते मोठे करून बघत असते. उष्णता आणि थंडी याला दिला जाणारा प्रतिसाद, पाणी, इलेक्ट्रोलाईट्स, साखर, स्निग्ध पदार्थ यांची चयापचय क्रिया, भूक वाढ, पचन, झोप, घाम अशी बरीच कार्ये अवस्थली म्हणजे हायपोथालामस म्हणजे चंद्र या ग्रंथी कडून पोष ग्रंथी म्हणजे पिच्युटरी म्हणजे गुरु ग्रंथीला दिल्या गेलेल्या सुचनेनुसार होत असतात. पिच्युटरी म्हणजे पोष ग्रंथी किंवा गुरु ग्रंथीचे “Antiriar आणि postiriar म्हणजे पुढचा आणि मागचा असे २ भाग असतात. ही ग्रंथी पोषण देण्यास मदत करते. इतर ग्रंथींना स्त्रवण्यास उद्युक्त करते. म्हणून पोष ग्रंथी आणि हिच्या हार्मोन्सना Trophic हार्मोन्स किंवा पौष्टिक संप्रेरके म्हणतात. बुध म्हणजे पिनिअल ही ग्रंथी प्रकाश संवेदी ग्रंथी आहे. म्हणजे प्रकाशात ती कार्यरत होते. तिच्यातून Melatonin नावाचे हार्मोन स्त्रवते. या ग्रंथीतून जे सिराटोनीन नावाचे हार्मोन स्त्रवते त्यामुळे शांत झोप लागते. मनाची अवस्था चांगली रहाते. शरीरातील केसांच्या वाढीवर या ग्रंथीचे नियंत्रण असते. जास्त उन्हात हिंडल्यास ही ग्रंथी जास्त कार्यरत होऊन शरीरावर केस वाढतात. किंवा ते पिकतात. म्हणून स्त्रियांनी डोक्यावर पदर घेण्याची प्रथा आली असावी. म्हण आहे ना की “आत्याबाईला मिशा असत्या तर?” स्त्रियांना दाढी, मिशा चांगल्या दिसणार नाहीत. सध्याच्या मानवात त्याच्या चुकीच्या वागण्याने या ग्रंथीचे कार्य जवळपास लोप पावले आहे. शंकरांचा ३ रा डोळा दुसरा तिसरा कोणताही नसून ही ग्रंथीच होय. कारण ही फोटो-सेन्सेटिव्ह म्हणजे प्रकाशाने उत्तेजित, उद्दीपित होऊन कार्य करणारी आहे. पण अजूनही शास्त्रज्ञांना या ग्रंथीचे कार्य पूर्णपणे समजलेले नाहीये. मन शांत ठेऊन डोळ्यांद्वारा बाहेरचे ज्ञान करून देणे हे या ग्रंथीचे काम म्हणता येईल....ज्याला आपण Jet Lag म्हणतो ते झाले म्हणजे विमानाने प्रवास करून आपण वेगळ्या देशात जिथे दिवस रात्र वेगळ्या वेळेस आहेत तिथे आपला दिवसाचा दिनक्रम बदलून आपल्याला शारीरिक त्रास जाणवतो, आपले रोजचे चक्र ज्याला “Circadian Cycle” असे म्हणतात ते बिघडते. याला कारण हा बुध बिघडतो..... मंगळ जसा शक्ती, उर्जा, धाडस देणारा ग्रह आहे त्याप्रमाणेच Thyroid [ अवटू आणि परा- अवटू हे तिचे दोन भाग- गणपतीच्या भाषेत या त्याच्या २ कार्यकारी शक्ती ऋद्धी- सिद्धी होत. मंगळ ग्रहाच्या भाषेत हे त्याचे २ उपग्रह Dymo आणि Fobos होत.] किंवा ही ग्रंथी शरीराला उर्जा, शक्ती पुरवते. तसेच पराअवटू ही ग्रंथी शरीरातील Calcium चे संतुलन राखते. स्वादुपिंडातील अल्फा आणि बीटा या दोन प्रकारच्या पेशी वेगवेगळी कामे करतात. अल्फा Glucagon, तर बीटा इंश्युलीन निर्माण करून शरीरातील साखरेचे पचन करतात. मूत्रपिंडे म्हणजे किडनीज किंवा किडन्या या रक्त गाळून लघवीवाटे शरीरातील न पचलेली, दुषित द्रव्ये बाहेर काढतात. पण या किडन्यांवर असलेल्या अधिवृक्क ग्रंथी म्हणजे Adrenal Glands या आपण घाबरतो तेव्हा आपल्याला मदत करतात. जे म्हंटले जाते की आपण संकटात असताना आपण ३ पैकी १ कृती करतो.... Flee, Fright ओर Fight म्हणजे जर एखाद्या जंगलात आपल्या समोर सिंह आला तर आपण काय करू? पळून जाऊ, घाबरून तिथेच मटकन खाली बसू किंवा सिंहाशी लढू....हे सारे या Adrenal ग्रंथीतून जो हार्मोन स्त्रवेल त्यावर अवलंबून असते.... यकृत हा शरीरातील कामाचा एक कारखाना आहे. तिथे अनंत घडामोडी, अनंत कामे सतत चालू असतात. हृदय हे केवळ रक्त शुद्ध करून शरीराला पुरवणारा एक पंप नसून त्याचे वरचे कप्पे Atria मधून Atrial Natriuretic Factor नावाचे एक संप्रेरक स्त्रवते. हे संप्रेरक इतर स्त्रावांशी हातमिळवणी करून रक्तदाब आणि रक्ताचे आकारमान यांचे मियंत्रण अचूक होण्यास मदत करते. “हृदय” या शब्दाचा अर्थ आपण पाहू. “हर” म्हणजे हरणे, काढून घेणे [जसे रावणाने सीतेचे हरण केले. हरीण नव्हे.]. “द” म्हणजे देणे आणि “य” म्हणजे नियमन करणे. [ बघा यम आणि नियम यात य आहे.]. याचाच अर्थ हृदय हे रक्त आधी शरीरातून काढून घेते, ते परत देणे शरीराला आणि त्याचे शरीरात उत्तम नियमन करते. म्हणजे रक्तदाब योग्य ठेवते.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
पुढे ज्या वेळा देतो आहे त्या वारा नुसार त्या त्या वेळा टाळून शुभ कार्य करावे. या काळाला राहू काल म्हणतात. या काळात अपयश येण्याची शक्यता असते. विश्वास असेल त्यांनी करावे, नसल्यास सोडून द्यावे. प्रयोग करून बघण्यास हरकत नाही. घरच्या कॅलेंडरवर या वारांना या वेळा लिहून ठेवा.<br />सोमवार- सकाळी साडेसात ते नऊ.<br />मंगळवार – दुपारी तीन ते साडेचार.<br />बुधवार – सकाळी बारा ते दीड.<br />गुरुवार – दुपारी दीड ते तीन.<br />शुक्रवार – सकाळी साडेदहा ते बारा.<br />शनिवार – सकाळी नऊ ते साडेदहा.<br />रविवार – संध्याकाळी साडेचार ते सहा.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
आज इथेच थांबतो. पुन्हा अधिक माहिती सहित भेटू या ....</div>
<div style="background-color: white; color: #141823; display: inline; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-top: 6px;">
आपला राशिचक्रम मित्र,<br />Dr. हेमंत उर्फ कलादास “कर्क”मकर.....<br />आश्लेषा नक्षत्राच्या आतील बाजूस,<br />आकाशगंगा वसाहत, चंद्रलोक पार्क,</div>
</div>
राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-326580629355588128.post-33077191675908022382014-09-19T21:08:00.001-07:002014-09-19T21:08:44.998-07:00प्राणायाम..<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
नमस्कार मित्रांनो,</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
आज थोडेसे प्राणायामाबद्दल....आज श्वास आणि प्राणायामाबद्दल जास्तीत जास्त [परिपूर्ण नव्हे] माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अवश्य अवश्य वाचा...कृपया कंटाळा करू नका...आवडले का ते अवश्य सांगा....केवळ "Like" मारून पुढे जाऊ नका. तुम्ही हा लेख तुमच्या संग्रही ठेवलात तरी चालेल.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
मित्रांनो प्राण हाच जीवनाचा आधार आहे. प्राण हेच जीवन आहे. प्राण हेच सर्वस्व आहे...पंचप्राणांनी प्रिय व्यक्तीला ओवाळणारी भारतीय नारी हेच तर सांगत असते. प्राण या नटाबद्दल आपल्याला जेव्हढी माहिती असते त्याच्या एक सहस्रांश सुद्धा माहिती २ नाकपुड्यांतून वाहणारया या "प्राण" म्हणजेच श्वासाबद्दल नसते. प्राण म्हणजे प्र + आन = विशिष्ट गतीने पुढे आणणे/ नेणे. जसे प्रकाश म्हणजे प्र + काश = पुढे + पोकळीला आवरण करीत जाणे,प्रगती म्हणजे पुढे + गती अर्थात पुढे नेणारी गती होय.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
प्राण या सृष्टीत "ओतप्रोत" [ओत= ओतान अर्थात इलेक्ट्रोनस तर प्रोत म्हणजे प्रोटोनस होय....याचाच अर्थ हे जग इलेक्ट्रोन आणि प्रोटोन्स यांनी बनलेले आहे हे आपल्या धोतर नेसणारया, जटा वाढवणारया आणि जंगलात राहणारया ऋषींना माहित होते तर.......!!!!!] भरून राहिला आहे. जेव्हा तो मानव प्राणी अथवा प्राणी यांच्या नाकपुडीतून संचार करतो तेव्हा त्याला श्वास असे म्हणतात.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
हा श्वास एका वेळी डाव्या किंवा उजव्या नाकपुडीतून वाहत असतो. डाव्या नाकपुडीला चंद्र नाडी अथवा इडा असे म्हणतात. आणि उजव्या नाकपुडीला पिडा अथवा पिंगला असे म्हणतात. डाव्या नाकपुडीतून श्वास वाहात असताना तो कमी उष्ण असतो तर उजव्या नाकपुडीतून वाहताना श्वास तुलनेने थोडा जास्त उष्ण असतो. दिवसातील काही क्षण असे असतात की ज्या वेळेला श्वास दोन्ही नाकपुड्यानमधून वाहात असतो. या प्रकाराला "सुषुम्ना" नाडी असे म्हंटले जाते. सुषुम्ना नाडी अतिशय क्रूर समजली गेलेली असून या नाडीवर म्हणजे सुषुम्ना चालू असताना कोणतेही शुभ कार्य, मंगल कार्य अजिबात करू नये. अपयश येण्याची शक्यता जास्त असते. फक्त देवाची उपासना, ध्यान या वेळेस करावे. घराच्या बाहेर पडू नये. सर्वसाधारणपणे सकाळी ६, दुपारी १२, संध्याकाळी ६ आणि रात्री १२ वाजता सुषुम्ना नाडी विशेष करून चालू असते. म्हणूनच पूर्वी संध्याकाळी मुलांची दृष्ट काढताना "इडा पीडा टळो" असे म्हंटले जात असे. म्हणजे "इडा आणि पिडा" म्हणजे चंद्र आणि सूर्य नाकपुडी एकाच वेळेस चालू असणारी सुषुम्ना नाकपुडी जी या वेळेस चालू असते तिच्यामुळे होणारे त्रास दूर होवोत....शास्त्रीय भाषेत सांगायचे तर चंद्र नाकपुडी चालू असताना उजवा मेंदू आणि सूर्य नाकपुडी चालू असताना डावा मेंदू चालू असतो. आधुनिक विज्ञान सुद्धा हेच सांगते की एका वेळेस मेंदूचा एकच अर्धा भाग काम करत असतो असतो. मूर्ती शास्त्र - डाव्या सोंडेचा गणपती, उजव्या सोंडेचा गणपती यावरच आधारलेले आहे. सुषुम्ना नाडी चालू असताना दोन्ही मेंदू एकाच वेळेस काम करून एकमेकांशी जुळवणूक करून घेत असतात. दुसरया भाषेत सांगायचे तर मेंदूचा प्रत्येक एक भाग दुसर्या भागाच्या कार्यकालात शरीरात काय घडामोडी झाल्या आहेत हे समजून घेण्यात व्यस्त असतो. भारतीय अध्यात्म शास्त्रानुसार मन हे आत्म्यात विलीन झालेले असते. आणि आपले बाहेरच्या घडामोडींकडे थोडे दुर्लक्ष झालेले असते. त्यामुळे एखादी वाईट घटना घडू शकते......आता एखाद्या अडाणी मातेने इडा पिडा टळो असे म्हंटल्यावर "तथाकथित/सो called विज्ञानवादी हसणार नाहीत असा विश्वास आहे. ह्याच नाड्यांचे संयमान करण्यासाठी "रामदास स्वामी" आणि इतर योग्यांकडे "योगदंड किंवा कुबडी" असे. तसेच रामदास स्वामींच्या या कुबडी मध्ये गुप्ती सारखे शस्त्रही होते. ज्याचा उपयोग शत्रूशी वेळप्रसंगी लढण्यासाठी होत असे. जी नाकपुडी वाहणे चालू करायचे असते तिच्या उलट बाजूच्या काखेत हा दंड, आपला हात किंवा इतर एखादी वस्तू दाबून धरल्यास विरुद्ध बाजूची नाकपुडी वाहणे सुरु होते.]</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
चंद्र स्वरावर आकुंचन होते तर सुर्यस्वरावर प्रसरण होते. चंद्र स्वरावर अर्थात चंद्र/इडा नदीवर म्हणजेच डावी नाकपुडी चालू असताना शुभ कार्ये, पाणी पिणे वगैरे कामे करावी. तर उजवी नाकपुडी चालू असताना क्रूर कामे, जिथे शक्ती जास्त आवश्यक अशी कामे, भोजन वगैरे करावे. उन्हात जाताना उजवी नाकपुडी चालू असताना गेले तर त्रास कमी होतो आणि याच्या उलट डावी नाकपुडी चालू असताना उन्हात हिंडले तर त्रास जास्त होतो. जेवताना आणि जेवल्या नंतर उजवी नाकपुडी चालू असेल तर पचन चांगले होते. म्हणूनच दुपारी जेवल्यावर वामकुक्षी घ्यावी असे जे म्हंटले जाते ते याचसाठी. "वाम" म्हणजे डावी बाजू. कुक्षी म्हणजे कूस. कुशी. डाव्या कुशीवर झोपल्याने उजवी नाकपुडी अर्थात सुर्यस्वर चालू होतो. सूर्य स्वर चालू झाल्याने शरीरातील ग्रंथी, आतडी प्रसारित होतात. पोटात पचनासाठी आवश्यक असलेली उष्णता वाढते. अन्न पुढे ढकलले जाते. याच्या उलट चंद्र स्वरावर होऊन पचन बिघडते. मलबद्धता म्हणजेच बद्धकोष्ठ अथवा पोट साफ न होण्याचा त्रास होऊ लागतो. चंद्र नाकपुडी जास्त काल वाहिल्यास थंडी, सर्दी आणि अपचनाचे विकार, सूर्य नाकपुडी जास्त वाहिल्याने उष्णता, पित्त विकार, ताप, शरीर शिथिल होणे असे त्रास होतात. सुषुम्ना खरे तर दिवसातून अतिशय अल्प वेळ वाहते. पण ती जास्त काल वाहिल्यास अंतर्स्त्रावी ग्रंथींचे विकार, Cancer असे विकार होण्याची शक्यता बळावते.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
या प्राणाचे ५ प्रमुख आणि ५ उपप्रकार आहेत.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
१] प्राण- हृदयात रहातो. हाच आपला मुख्य प्राण होय.<br />२] अपान- गुदस्थानी रहातो. अन्न पुढे ढकलून मालाचे उत्सर्जन करणे हे याचे काम.<br />३] व्यान- सर्व शरीरभर व्यापून रहातो. सर्व शरीराचे संतुलन राखणे हे याचे काम.<br />४] उदान- कंठामध्ये रहातो. याच्याच योगाने आपण बोलू शकतो.<br />५] समान- नाभी स्थानी रहातो. हा पचन घडवून आणतो.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
प्राणांचे ५ उपप्रकार असे-<br />१] नाग- ढेकर आणतो.<br />२] कूर्म- नेत्रोन्मीलनकर्ता अर्थात डोळ्यांची उघडझाप करतो.<br />३] कृकल- शिंक आणतो.<br />४] देवदत्त-जांभई आणणारा.<br />५] धनंजय- सर्व शरीरभर व्यापून रहातो आणि मृत्युनंतर सुद्धा शरीर सोडत नाही.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
वर उल्लेख केलेल्या सूर्य नाडी, चंद्र नाडी आणि सुषुम्ना नाडी व्यतिरिक्त अजून ७ नाड्या आहेत. नाडी स्ट्रीम किंवा प्रवाह असा अर्थ घ्या. इडा डावीकडे, पिंगला उजवीकडे, सुषुम्ना मध्यात, गांधारी डाव्या डोळ्या जवळ, हस्तिजिव्हा उजव्या डोळ्याजवळ, पूषा उजव्या कानाजवळ, यशस्विनी डाव्या कानाजवळ, अलम्बुषा मुखात, कुहू लिंगाच्या ठायी [जननेनद्रीया जवळ] आणि शंखिनी मूलस्थानी अर्थात गुदस्थानी रहाते.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
श्वासोच्छ्वास करत असताना श्वास आत जाताना "स" कार करत म्हणजे "स्स्स" असा आवाज करत आत जातो तर बाहेर येताना "हम्म्म्म" असा "ह कार " युक्त आवाज करत श्वास बाहेर येतो. "ह" कार हे शिवाचे तर "स" कार हे शक्तीचे रूप रूप होय. हाच तो "सोहम्" जप होय. असा जप आपण दिवसभर २१६०० वेळा करतो. आपल्याला त्याचे अजिबात ज्ञान नसते. त्याकडे लक्ष देऊन साधना केली की मग तो "ईश्वर" प्राप्त होतो. या श्वास गतीवर जे नियंत्रण मिळवतात ते योगी "हंस" आणि "परमहंस" म्हणवले जातात. उदा. बंगालचे श्री. रामकृष्ण परमहंस वगैरे....</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
आता पुढे जाऊ या...</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
इडा, पिंगला आणि सुषुम्ना या तीन नाड्यानमधून आळीपाळीने आकाश तत्व [बीज मंत्र हं उच्चार हम्म], वायू तत्व [ बीज मंत्र यं उच्चार यम्म ], अग्नी तत्व [ बीज मंत्र रं उच्चार यम्म ], जल तत्व [ बीज मंत्र वं उच्चार वमम ] आणि भूमी तत्व अथवा पृथ्वी तत्व [ बीज मंत्र लं उच्चार लम्म ] ही तत्वे वाहात असतात. आणि यांच्या मिश्रणाने विविध ग्रह बनतात. म्हणजेच श्वासातून ग्रह वाहतात. उदा. उजव्या/सूर्य नाकपुडीतून अग्नी तत्व वाहिल्यास "मंगल" ग्रह ...वगैरे ....अर्थात ग्रह हे केवळ आकाशात नसून आपल्या नाकपुडीतूनही खेळत असतात ते असे.... म्हणजे तुम्ही सामान्य आहात का? हे वहन लक्षात ठेवण्यासाठी मी एक छोटीशी कविता करण्याचा प्रयत्न खूप वर्षांपूर्वी केला होता....</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
हीच ती कविता आणि ही उपयोगी आहे कोणते तत्व कोणत्या नाकपुडीतून वाहिल्यावर कोणता ग्रह वाहतो ते लक्षात ठेवायला....आपली पत्रिका किंवा कुंडली हेच दाखवत असते. पण तिचे "वाचन" करणे किती कठीण आहे हे आपल्या आता नक्कीच लक्षात आले असेल खरं की नाही? हाच ग्रहांचा खेळ आपल्या मानसिक स्थितीवर, आपल्या आर्थिक, सामाजिक, भावनिक, लैंगिक, ऐहिक, भौतिक, अध्यात्मिक स्थितीवर परिणाम करत असतो आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणात कारणीभूत असतो खुद्द आपणच.....कारण चांगले वाईट कर्म तर सोडाच पण आपण नुसते कुशीवर वळलो, हातात वजन उचलले तरी सुद्धा हा श्वास प्रवाह डावी उजवीकडे बदलत असतो......</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
दक्षिणेत अग्नी भौम पृथ्वी सूर्य वाहतो, आप होय शनी आणि वायू राहू भासतो - दक्षरंध्र किंवा सूर्यनाडी<br />उत्तरेत आप चंद्र पृथ्वी सूर्य चालतो, वायू होत गुरु आणि अग्नी शुक्र चमकतो- इडा/चंद्रनाडी<br />सुषुम्नेत भूमी बुध, आप चंद्र शुक्र तो, अग्नी रवी भौम, वात राहू शनी बनवतो.....<br />आणि सुषुम्नेत नभी, गुरु ग्रह विलसतो, प्राणशक्तीचा प्रवाह, जीवनास फुलवतो.-सुषुम्ना नाडी.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
भौम- मंगल/ नभी- आकाश तत्वात</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
वायू ८ अंगुळे, अग्नी ४ अंगुळे, पृथ्वी १२ अंगुळे आणि आप तत्व १६ अंगुळे वाहाते. आकाश तत्व तिथल्या तिथेच मोकळे वाहाते. आकाश तत्वात सगळ्या तत्वांचे गुण मिश्रित अवस्थेत असतात. पृथ्वी तत्व रंगाने पिवळे, आकृतीने चतुष्कोनी, चवीने मधुर, नाकपुडीच्या मध्य भागातून वाहणारे आणि सर्व उपभोग प्राप्त करून देणारे असते. जलतत्व हे श्वेत वर्ण, अर्ध्या चंद्राच्या आकाराचे, तूरट, ओले, प्रवाही, नाकपुडीच्या खालच्या बाजूस चिकटून वाहणारे असते. हे अतिशय लाभप्रद असे तत्व आहे. अग्नीतत्व हे आरक्तवर्ण, त्रिकोणी, कडवट, देदीप्यमान आणि नाकाच्या वरच्या भागास स्पर्श करत वाहणारे असे असते. वायुतत्व हे रंगाने निळे, वर्तुळाकृती, आंबट अथवा आम्ल स्वादाचे, चपळ आणि नाकातून वाकडे वाहणारे असे असते. आकाश तत्व, वायू तत्व आणि अग्नी तत्व वाहत असताना कोणतीही शुभ कार्ये करू नयेत. भूमी तत्व आणि जल तत्व वाहत असताना सर्व मंगल कार्ये, सांसारिक कामे, मुलाखत वगैरे यशस्वी होतात. ही तत्वे ओळखणे कठीण नक्कीच आहे. त्यामुळे आपण जर उलट केले म्हणजे त्या त्या तत्वांच्या हस्तमुद्रा आणि बीज मंत्रांचा जप केला तर आपल्याला हवे असलेले तत्व आपण सुरु करू शकतो. वर बीज मंत्र दिले आहेत. मुद्रांबद्दल मी पुन्हा कधीतरी लिहीन.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
मित्रांनो आता लक्षात आले का की आपला हा प्राण किंवा श्वासोच्छ्वास किती महत्वाचा आहे ते? आणि या श्वासोच्छ्वास क्रियेवर काही अंशी किंवा संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी प्राणायाम म्हणजे प्राणाचा अर्थात श्वासाचा "आयाम" म्हणजे व्यायाम केला जातो आणि त्या नवा "आयाम" म्हणजे नवे रूप, रंग, दिशा, शक्ती दिली जाते.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
आता प्रत्यक्ष प्राणायामाकडे वळू या....</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
काही शब्दांचे अर्थ आधी पाहू...</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
पूरक- श्वास घेणे/ श्वास पुरवणे.<br />रेचक- श्वास सोडणे किंवा बाहेर टाकणे.<br />कुंभक- श्वास आत किंवा बाहेर रोखून धरणे. श्वास आत रोखून धरल्यास अंतर्कुम्भक आणि बाहेर रोखून धरल्यास त्याला बाह्य कुंभक असे म्हंटले जाते. अंतर्कुम्भक आणि बाह्यकुंभक एकाच प्राणायामात कधीही करू नयेत. मुळातच श्वास रोखून धरण्याचे प्राणायाम गुरुंच्या मार्गदर्शनाखालीच करावेत.<br />अधो श्वसन- पोटाने/पोट फुगवून श्वास घेणे.<br />मध्य श्वसन- छातीने/फुफ्फुसांनी श्वास घेणे.<br />आद्य शवसन - खांदे उचलून श्वास घेणे.<br />आता प्राणायामाचे काही प्रकार बघू या....</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
१] अनुलोम विलोम- डाव्या नाकपुडीने श्वास आत घेऊन न थांबता पण तरीही अतिशय सावकाशपणे श्वास उजव्या नाकपुडीने बाहेर सोडावा. आणि केवळ क्षणभर थांबून परत याच उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन डाव्या नाकपुडीने सोडावा. हे १ आवर्तन झाले. माणसाला आयुष्य हे वर्षात दिलेले नसून श्वासात मोजून दिलेले असते. भोजन, व्यायाम, निद्रा आणि मैथुन या चार प्रसंगी माणसाचे श्वास जास्त खर्ची पडतात म्हणजेच श्वासोच्छ्वास अतिशय जलद होतो. अतिशय आनंदी झाल्यावर [हर्षवायुने माणसे मृत्य पावतात], दु:खी राहिल्याने, क्रोधीत झाल्यानेही श्वास जलद चालतो. हेच ते प्रसंग ज्यामुळे माणसाचे आयुष्य क्षीण होते.... आणि अनुलोम विलोम या प्राणायामामुळे आपण वर पाहिल्याप्रमाणे इडा, पिंगला आणि सुषुम्ना या नाड्यांचे संयमन तर होतेच पण पंचतत्वांचे वहन सुद्धा सुधारल्याने माणसाच्या आयुष्यात आमुलाग्र बदल होतो. तसेच अतिशय सावकाश प्राणायाम केल्याने श्वास संथ वाहून आयुष्य वाढण्यास मदत होते. आणि श्वासाच्या गतीवर आणि फुफ्फुसांवर सुद्धा संयम येतो. छाती दृढ होते. मेंदूतील श्वसन केंद्रावर नियंत्रण येऊ लागते. अनुलोम विलोम प्राणायाम ६ महिने सलग केल्यावरच कुम्भकासहीत करायचे प्राणायाम करावेत असा नियम आहे.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
२] भस्रिका- भस्रिका म्हणजे लोहाराचा भाता. ज्या प्रमाणे लोहार भाता फुलवून भरपूर प्राणवायू पुरवून आगीतील कोळसे, निखारे फुलवतो त्या प्रमाणे आपण आद्य श्वसन करून म्हणजे खांदे उचलून फुफ्फुसांना पुरेपूर मोकळी जागा करून देऊन भरपूर प्राणवायू आत घेणे आणि रक्तातील हिमोग्लोबिनचे निखारे पेटवून लालेलाल करणे म्हणजे भस्रिका... खांदे खाली नेताना श्वास आपोआप सुटला पाहिजे. श्वास सोडताना जोर लावू नये. या प्राणायामामुळे एकूणच तब्येत सुधारते. छाती दृढ होते. पचन सुधारते. आत्मविश्वास वाढतो. उत्साह वाढतो. आपापल्या शक्ती व कुवतीप्रमाणे २५ ते १०० आवर्तनांचा १ सेट आणि असे ३-४ सेट करावेत.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
३] कपालभाती- काहीजण याचा उच्चार कपाल"भारती" असा करतात. जो अतिशय चुकीचा आहे. या प्राणायामामध्ये पोट हिसका देऊन, आत ओढून श्वास जोरात बाहेर सोडला जातो. श्वास आत मात्र आपोआप आला पाहिजे. जोर लावू नये. भस्रिकाच्या बरोबर उलट हा प्राणायाम आहे. याने मेंदूचे कार्य सुधारते. श्वास बाहेर जोरात टाकला गेल्याने शरीरातील वाईट पदार्थांचे निष्कासन झटकन होते. शरीराची उष्णता वाढते. फुफुसांना आराम मिळतो. हृदयाला आराम मिळतो. आपापल्या शक्ती व कुवतीप्रमाणे २५ ते १०० आवर्तनांचा १ सेट आणि असे ३-४ सेट करावेत.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
४] उत्जायी- लहान मुले खेळताना जसा आवाज घशाने काढतात तसा आवाज काढत [ऊउम्म्म्म] श्वास आत घ्यावा. ३-४ वेळाच ही क्रिया करावी. कंठाचे काम सुधारते. थायरोइड ग्रंथींचे काम सुधारते.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
५] उद्गीथ- भरपूर श्वास भरून घेऊन सावकाश उद्गीथ, प्रणव म्हणजेच ओमकाराचा "म" हा नाद घुमवत श्वास सोडावा.... [हा उच्चार करताना तो आपोआपच सुटतो. संपतो.]. मेंदूचे कार्य सुधारते.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
६] भ्रामरी- श्वास सोडताना भुंग्या सारखा hmmmmmmmmmmmm असा नाद घुमवत श्वास सोडावा. मन शांत होते. मनाची लय लागते. जीवनाची लय सापडते. मेंदूचे काम सुधारते.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
७] शितली- हा प्राणायाम विशेषत्वाने उन्हाळ्यात उपयुक्त आहे. शरीरातील उष्णता कमी होते. तहान कमी होते. जीभ बाहेर काढून जिभेला मध्ये पन्हाळी प्रमाणे खोलगट आकार देऊन तोंडाने श्वास घ्यावा आणि नाकाने सोडावा. ७-८ वेळा करावे.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
८] सित्कारी- हा देखील शितली प्रमाणे उष्णता कमी करणारा प्राणायाम आहे. तोंड हसल्या सारखे करून, उघडून दातांमधून "स्स्स" असा आवाज करत श्वास आत घ्यावा. ७-८ वेळा करावे.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
९] बाह्य प्राणायाम- भरपूर श्वास आत घेऊन श्वास सावकाश बाहेर सोडावा आणि श्वास बाहेर सोडलेला असताना आपल्या कुवती प्रमाणे [पण विशिष्ट आकडे मोजून] श्वास बाहेरच रोखून धरावा. जास्त ताण देऊ नये. हानिकारक ठरू शकते. या प्राणायामाने फुफुसांची शक्ती तर वाढतेच पण श्वास जास्त वेळ बाहेर राहिल्याने फुफुसांना एरव्ही जो आराम मिळत नाही तो मिळतो. मेंदूतील श्वास केंद्रावर ताबा येतो.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
१०] अंतर्कुम्भक प्राणायाम- हाच खरा प्राणायाम होय. या प्राणायामात श्वास सावकाश आत घेऊन आत काही काल रोखून ठेवायचा असतो. नंतर सावकाश श्वास बाहेर सोडावा. हा जो कालावधी आहे त्याचे १:४:२ असे प्रमाण आहे. म्हणजे सामान्यत: जे जमू शकते ते प्रमाण म्हणजे श्वास आत घेताना १६ आकडे मोजत श्वास आत घेतला तर ६४ आकडे मोजत श्वास आत रोखून, रोधून धरावा. आणि ३२ आकडे मोजत श्वास सावकाश बाहेर सोडावा. योगी लोक किंवा प्राणायामात अग्रेसर होऊ इच्छिणार्यांनी १:४:२ हे प्रमाण १:६:२ नंतर १:८:२ असे १:३६:२ इथपर्यंत वाढवत न्यायचे असते. सर्वसाधारणपणे सामान्य माणसाने ३ वेळा हा प्राणायाम सुरवातीला [ प्रमाण १:४:२ हेच] ३-३ महिन्यांनी २-२ वेळा म्हणजे ३ महिन्यांनी ५ वेळा, ६ महिन्यांनी ७ वेळा असे प्रमाण वाढवत न्यावे. हा प्राणायाम गुरूंच्याच मार्गदर्शनाखाली करणे आवश्यक आहे. अन्यथा नुकसान अटळ आहे.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
जप [ जप नेहमी मनात करावा, स्तोत्रे मोठ्याने म्हणावीत असा नियम आहे.] , ध्यान, पूजा करताना मन शांत होऊन श्वासोच्छ्वास आपोआप संथ, एका लयीत होऊ लागतो. आणि यात प्रगती झाल्यावर मनाचे चित्तात रुपांतर होऊन हळूहळू सारे संस्कार लोप पावत जातात. मन शांत होते. समाधानी, आनंदी बनते. मन आणि प्राण एकमेकांच्या वर परिणाम करत असतात श्वास जलद तर मनही उत्तेजित आणि मन दु:खी, उत्तेजित, क्रोधीत किंवा अति आनंदित असेल तर श्वासोच्छ्वास सुद्धा जलद होतो. जोराने स्तोत्रे म्हंटल्या मुळे भस्रिका, कपालभाती आपोआप होते.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
शंका असल्यास मला ९१५८५१०५९८/९८९०३६९८४५ या क्रमांकावर अवश्य फोन करा....</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
पुन्हा भेटू मित्रांनो,</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
नेहमीच आपला मित्र,</div>
<div style="background-color: white; color: #141823; display: inline; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.3199996948242px; margin-top: 6px;">
Dr. हेमंत उर्फ कलादास .................</div>
</div>
राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-326580629355588128.post-9208573443665276732014-08-20T04:15:00.000-07:002014-08-20T04:15:09.343-07:00ताओ तत्वज्ञान..सुंदर लेख.<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="_5pbx userContent" data-ft="{"tn":"K"}" id="u_jsonp_13_1s" style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 1.38; overflow: hidden;">
<div style="margin-bottom: 6px;">
निसर्गाचे प्रतिरूप म्हणजे ताओ</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
आपल्या ज्ञानाच्या, सौंदर्याच्या, आनंदाच्या कल्पना किती तकलादू असतात. कारण आपल्या भिरू मनानेच त्या निर्माण केलेल्या असतात. निसर्ग आपल्याला सर्व दिशांनी पुकारत असला तरी आपल्या 'सुरक्षित' आणि सुखी कोषातून आपण बाहेर जाऊ शकत नाही. ज्ञानाच्या, सौंदर्याच्या, खर्या आनंदाच्या आपल्या कल्पना या आत्मकोषाशी निगडित आहेत. म्हणून तर जीवनाचे आव्हान आपण स्वीकारू शकत नाहीत. आपण आपल्या घराच्या खिडक्या बंद करू लागतो. दरवाजे आधीच बंद असतात. जीवन सर्व दिशांनी आपल्याला पुकारत असले तरी त्याला प्रतिसाद देण्याचे धाडस आपल्यात नसते. आपण अशा सुखाच्या शोधात असतो की जे आपल्याला वस्तूंच्या रूपात दिसते. आपण त्या बलाढय़ सागराला आलिंगन देऊ शकत नाही. त्याचे पेंटिंग्ज करून दिवाणखान्यात लावून ठेवतो. आपल्याला खरे ज्ञान नको असते, हवा असतो त्याचा आभास. खरे ज्ञान आपल्याला स्वतंत्र करते आणि स्वातंत्र्याचे आपल्याला भय वाटते. आपल्याला तेच ज्ञान हवे जे आपल्याला संपत्ती देईल. ते सौंदर्य, सत्य, शील काय कामाचे जे आपल्याला संपत्ती देत नाही किंवा सत्ता देत नाही. माणसाचे अशातर्हेने बाजारीकरण आणि वस्तूकरण होणे हा या आधुनिक जगाच्या यशाचा मूलमंत्र आहे.</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
माणसाच्या सुखाच्या कल्पना जेव्हा वस्तूंमध्ये परावर्तित होतात तेव्हा त्याच निळंभोर आभाळ दुरावत सागराचा आवाज त्याला ऐकू येत नाही. दारातली पाखरं त्याला परकी झालेली असतात. आपला आनंद निसर्गातून येत असेल तर तो शरीराला, मनाला, आत्म्याला निश्चितच पुलकित करणारा असेल. कारण त्याचा संबंध माणसाच्या शोषणाशी, संघर्षाशी, रक्त, घाम, अश्रूंशी नसतो. त्याचा संबंध असतो माणसाच्या हृदयाशी. म्हणूनच तर आपले सर्व धर्म, श्रद्धा, संकल्पना निसर्गातूनच आल्या आहेत. धर्म आणि विज्ञान हे निसर्गाला पाहणारे दोन डोळेच आहेत. विज्ञान बाहेरून पाहते, धर्म निसर्गाला आतून मनातून पाहण्याचा प्रय<i class="_4-k1 img sp_EEtFn_ubaA6 sx_441ea8" style="background-image: url(https://fbstatic-a.akamaihd.net/rsrc.php/v2/yi/r/ln7mZgK583Q.png); background-position: 0px -6635px; background-repeat: no-repeat; background-size: auto; display: inline-block; height: 16px; vertical-align: -3px; width: 16px;"></i>करतो. धर्माचा संबंध म्हणून आत्मजाणिवांशी, अंत:प्रेरणाशी आपल्या मनाशी असतो. तो अस्तित्वाला समग्रतेने पाहतो. त्यावर श्रद्धा ठेवतो. खरा धर्म कधीही हिंसक असू शकत नाही. तो स्पर्धाशील, संघर्षशील किंवा विभाजनवादी नसतो. धर्माच्या नावाने संघर्ष करणारे लोक अंध असतात. कारण धर्माचा अर्थच आहे समग्रतेने जाणा. विज्ञानही तेच काम करत असते. अर्थात त्याचा संबंध श्रद्धेशी नसून तर्कशुद्ध विचारांशी, वस्तुनिष्ठतेशी असतो. विज्ञानाच्या पुष्कळ कल्पनादेखील धर्मातूनच आल्या आहेत. या जगात काहीही स्थिर नाही हे भगवान बुद्धाने सांगितले. विज्ञानाने ते नंतर सिद्ध केले. न्यूटनने म्हटले होते की, 'हे जग ईश्वराने निर्माण केले आहे. त्यामुळे ईश्वरनिर्मित नियमांना जाणणे म्हणजेच विज्ञान.' शेवटी ईश्वर म्हणजे निसर्गच आहे. त्याच्यावर प्रेम करणे म्हणजे ईश्वरावर प्रेम करणेच आहे. भ. बुद्धांनी ईश्वराचे अस्तित्व मानले नाही, पण सत्याचे स्वरूप निसर्गातच पाहिले. म्हणूनच निसर्गातील बदल जाणणे म्हणजे बुद्धस्वरूप जाणणे असे म्हटले जाते. आपले ज्ञान, विज्ञान, शहाणपण आपल्याला निसर्ग चिंतनातूनच प्राप्त होते. ताओ तत्त्वज्ञानात ताओचे प्रतिरूप म्हणजे निसर्ग म्हटले आहे. निसर्गाचे प्रतिरूप म्हणजेच ताओ. ताओचा अर्थ आहे विश्वव्यवस्था. ती ज्या नियमाने चालते ते नियम जाणणे म्हणजे ताओ जाणणे होय. म्हणून सौंदर्य आहे ते ताओचे. वसुंधरेचे, विश्वाचे. निसर्ग आहे आकारांनी बद्ध.आपल्याला डोळ्यांनी दिसते ते आकारांचे सौंदर्य आहे, म्हणून त्याचे सौंदर्यही अनंत आहे. म्हणून खरं सौंदर्य वा सुख जाणायचे असेल तर आपल्याला निसर्गाकडे वळावे लागते. त्यातून अद्भुत असा आनंद आपल्याला मिळतो. म्हणून म्हटले आहे की, ताओचे (निसर्गाचे) सौंदर्य एखाद्या गूढ रमणीसारखे आहे. तिच्या नुसत्या नजरेने ती अनंत आशयांचं महाल उभे करू शकते. ती जेव्हा पश्चिमेकडे पाहाते तेव्हा तिला पूर्वेकडे जायचे असते. तिच्या साध्या स्पर्शाने अनंत गोष्टी घडतात. सूर्य उगवतो आणि मावळतो. झाडांना असंख्य फुले येतात. समुद्र खवळतो आणि शांत होतो. विकास आणि विनाश याचे अखंड चक्र फिरते आणि त्याची तिला जाणीवही नसते. परस्परविरोधी शक्ती एकमेकांच्या जागा घेत असतात. विसंवादातून सुसंवादाकडे, विविधतेतून ऐक्याकडे, विनाशातून विकासाकडे, अंधारातून प्रकाशाकडे अशी जीवनाची वाटचाल सुरू होते. निसर्ग आहे आनंददायी शक्तींचा संमेळ. उत्साहाचा महास्रोत, सर्जनशीलतेचा उत्सव, पण आपण किती करंटे आहोत.</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
आपण वस्तू आणि सुखाची साधनं जमवण्यात मग्न आहोत. त्यालाच आपण सुख म्हणतो. सामान्यांचं आयुष्य रडत रखडत चालणार्या बैलगाडीसारखे असते. तिला वेग नसतो. ती कायम बिघडत असते. कधी बैल थकतात, बसतात, कधी गाडीचं चाक निखळत रस्ता नादुरुस्त असतो. कधी नद्या भेटतात अरुंद पायाच्या आणि वेगवान. कधी त्या विशाल पात्राच्या असतात; परंतु त्यांची खोली कळत नाही. म्हणून आपण अडकून पडतो. खरं म्हणजे आपण कशासाठी जगतो हे कळत नसल्यामुळे धावत असतो. जीवनातील गंभीर समस्यांपासून सुटका करून घेण्याचा मार्ग माहिती नसल्यामुळेदेखील धावतो. ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती, साधने असतात तेही धावतात आणि ज्यांच्याकडे काहीच नसते तेही धावत राहतात. प्रत्येकाला पाहिजे असते सुख, समाधान, शांतता आणि ते सारे कुठेच मिळत नसते. एरिक फ्रॉम नावाच्या एका विचारवंताने आपल्या 'एक्सेप फ्रॉम फ्रीडम' म्हणजेच 'स्वातंत्र्यापासून सुटका' या पुस्तकात माणसाच्या मनोवस्थेचं चांगलं वर्णन केलं आहे. माणूस सुखी नसण्याचं कारण भौतिकवाद किंवा चंगळवाद आहे; परंतु भारतासारख्या गरीब देशात चंगळवाद आहे तो उच्च मध्यमवर्गीयात, नवश्रीमंतात किंवा काळाबाजार करणार्या धनदांडग्यात. सिनेमा, क्रिकेट, राजकारण यातही तो खुळखुळत असतो. जे काळा पैसा निर्माण करतात तेच याचे सूत्रधार असतात.</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
भारतात जणू दोन देश राहतात. जुनाट बैलगाडीत रडत रखडत जाणार्या आणि राहणार्या ग्रामीण शेतकर्यांचा, शेतमजुरांचा, कारागिरांचा देश आणि दुसरा चकचकीत मॉलमध्ये फिरणारा, पॉश वस्तीत राहणारा. इंग्लंड, अमेरिकेकडे डोळे लावून बसलेला देश. एरिक फ्रॉमचे मत आहे की, 'माणसे दु:खी आहेत कारण त्यांचे सुख ते वस्तूमध्ये शोधतात.' आपल्या घरात अधिकाधिक वस्तू असाव्यात, त्या आपल्या मालकीच्या असाव्यात, त्या इतरांना दिसाव्यात यासाठी ते अहोरात्र कष्ट करीत असतात. नवनव्या वस्तूंच्या, संधीच्या मागे ते पळत राहतात आणि जीवनाचा मुख्य हेतूच विसरून जातात. माणूस स्वत:च अमूल्य आहे, पण त्याचे मॉल ठरते बाजारात तेथील स्पर्धेवर. माणसाच्या सुखाच्या संकल्पनाच बदलल्या आहेत. बाह्य दिसणे बाह्य असणे याला जास्त महत्त्व आले आहे. तुमचे ज्ञान, संस्कार, नीतिमत्ता, विद्वत्ता याला काहीही महत्त्व राहिले नाही. महत्त्व आहे ते कोणत्याही मार्गाने संपत्ती मिळवण्याला. त्यासाठी तुम्ही आपला आत्मा विकला तरी चालेल. त्यातून निर्माण होते आंधळी स्पर्धा, एकाकीपणा, सर्व जगाविषयी संशय आणि दुरावा. त्यातून येते खिन्नता, उदासीनता, मानसिक दुभंगलेपण. जिथे स्पर्धा असेल तिथे तुम्ही एकाकीच असता. माणसाचं एकाकीपण घालवण्याचे अनेक प्रकार आहेत. आहे ते जीवन स्वीकारणे, ते उत्कटपणे जगणे, त्यात आनंद मानणे किंवा बधिर होऊन जाणे, जगापासून दूर पळणे, सुखदु:खाच्या पलीकडे जाऊन कुठल्या तरी कोषात स्वत:ला अडकवून घेणे. काही लोक दारूच्या एकेक घोटाप्रमाणे स्वत:ला संपवत जातात. माणसे व्यसनाधीन होतात कारण ती आनंदी नसतात. व्यसनाधीनतेवर विजय तेव्हाच मिळेल जेव्हा माणसाला आनंदाचे व्यसन लागेल. 'आनंद हाच सद्गुण आहे. सद्गुणाचे फळ आनंद नव्हे' असे प्रख्यात विचारवंत कांट यांनी म्हटले आहे. माणसाला आनंदी राहण्याचा जन्मजात अधिकार आहे, पण खरा आनंद केव्हा मिळेल? जेव्हा आपण जीवनाचे मूल्य जाणू, आपल्याला छळ, पिळवणूक यांचा प्रतिकार करण्याचे व त्यातून मुक्त होण्याचे जन्मजात स्वातंत्र्य आहे. मग आपण कशामुळे दु:ख भोगतो? कारण आपण कुणाच्या तरी इच्छेचे बळी ठरतो. आपण आपले स्वायत्तमूल्य जाणले पाहिजे. जे निसर्गाने आपल्याला दिले आहे. आपण निसर्गाकडे वळू या. त्यासाठी जंगलात जाण्याची गरज नाही. निसर्गाकडे वळणं म्हणजे आपण आयुष्य अधिक सुंदर, सरळ सहज करणे. स्पर्धेतून द्वेष, मत्सर, संघर्ष निर्माण होतो. मुख्य म्हणजे हे जाणलं पाहिजे की, जग स्पर्धेवर नाही तर सहकार्यावर चालत.ं स्पर्धा तुम्हाला भौतिक यशाच्या, संपत्ती, सत्तेच्या नावाने एका दलदलीत घेऊन जाते. जिथे यश म्हणजे एक मृगजळच असते. खरे यश येते ते सहकार्यातून, सहसंवेदनेतून, सुसंवादातून. म्हणून लाओत्सेने म्हटले आहे, 'जो जगाशी स्पर्धा करीत नाही त्याच्याशी जगही स्पर्धा करीत नसते.' त्यातूनच माणसाला निर्विवाद यश मिळते. अमेरिकेत संशोधन करण्यात आलं तेव्हा लक्षात आलं की, तथाकथित यशस्वी आणि श्रीमंत लोक मुळीच सुखी नव्हते. दारूचं व्यसन, उद्ध्वस्त कौटुंबिक जीवन, नैराश्य, एकाकीपण, स्किझोफ्रेनिया, डिप्रेशन आदी रोगांनी ते मस्त होते. नैराश्य हा २0२0 साली अत्यंत मोठा मनोविकार असेल आणि लोकसंख्येच्या पंचवीस टक्के लोक त्यांनी बाधित असतील, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. याचे कारण आपले तथाकथित यश आपले मानसिक, शारीरिक, कौटुंबिक आरोग्य उद्ध्वस्त करीत असते. आपल्या यशाचा पाया नैतिक नसतो हेच त्याचे कारण आहे. आपली जीवनव्यवस्था सदोष आहे. ती स्पर्धा, संघर्ष, अशांततेवर उभी आहे. म्हणून समजून घ्यायचं आहे की, 'माणूस म्हणजेच खूप काही आहे, ज्याच्याकडे खूप काही आहे तो नव्हे,' असे एरिक फ्रॉमने आपल्या सेन सोसायटीत म्हटले आहे. म्हणून आपण शहाणं असू तर जीवनाचं महत्त्व ओळखू. आलिशान गाडीतून प्रवास करण्यापेक्षा आपण कधी तरी पायी चालू. निसर्ग आपल्याबरोबर चालू लागेल. हजारो रुपयांचे ड्रेस, साडी, दागदागिने अंगावर मिरवण्यापेक्षा आपण कधी तरी मुक्त होऊ या सार्या हव्यासातून. आपल्या गरजा कमी केल्या तर स्वातंत्र्य मिळेल. सर्वांच्या सुखात आपण आपलं सुख शोधलं तर माणूस मानसिकदृष्ट्या जास्त सक्षम, निरोगी आणि जास्त वरच्या पातळीवर जातो, असे अँडलर, एरिक्सन, कोहलबर्ग गिलीगन अशा जागतिक दर्जाच्या मानसशास्त्रज्ञांनी लिहून ठेवलं आहे. आपल्याला जीवनात संगीत हवं आहे की महागडी म्युझिक सिस्टीम? संगीत हवं असेल तर ते आपल्या मनातच जन्मतं, आपल्याला ते ऐकता आलं पाहिजे इतकंच.</div>
<div style="display: inline; margin-top: 6px;">
(लेखक हे ताओ तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत)</div>
<div class="_5yn1" id="u_jsonp_13_24" style="direction: ltr; margin-top: 5px;">
<a href="https://www.facebook.com/groups/pratishthan.damodargurujee/803567302996988/?notif_t=group_activity#" role="button" style="color: #3b5998; cursor: pointer; text-decoration: none;">See Translation</a></div>
</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 12px; line-height: 15.359999656677246px;">
<div data-ft="{"tn":"H"}">
<div class="_5cq3 mtm" data-ft="{"tn":"E"}" style="margin-top: 10px; position: relative;">
<a ajaxify="https://www.facebook.com/photo.php?fbid=558362787624526&set=gm.803567302996988&type=1&src=https%3A%2F%2Ffbcdn-sphotos-h-a.akamaihd.net%2Fhphotos-ak-xpf1%2Ft1.0-9%2F10626774_558362787624526_5735823946445896674_n.jpg&size=213%2C102&player_origin=groups" class="_4-eo" href="https://www.facebook.com/photo.php?fbid=558362787624526&set=gm.803567302996988&type=1" rel="theater" style="-webkit-box-shadow: rgba(0, 0, 0, 0.0470588) 0px 1px 1px; color: #3b5998; cursor: pointer; display: block; position: relative; text-decoration: none; width: 213px;"><div class="uiScaledImageContainer _4-ep" id="u_jsonp_13_1p" style="height: 102px; overflow: hidden; position: relative; width: 213px;">
<img alt="निसर्गाचे प्रतिरूप म्हणजे ताओ
आपल्या ज्ञानाच्या, सौंदर्याच्या, आनंदाच्या कल्पना किती तकलादू असतात. कारण आपल्या भिरू मनानेच त्या निर्माण केलेल्या असतात. निसर्ग आपल्याला सर्व दिशांनी पुकारत असला तरी आपल्या 'सुरक्षित' आणि सुखी कोषातून आपण बाहेर जाऊ शकत नाही. ज्ञानाच्या, सौंदर्याच्या, खर्या आनंदाच्या आपल्या कल्पना या आत्मकोषाशी निगडित आहेत. म्हणून तर जीवनाचे आव्हान आपण स्वीकारू शकत नाहीत. आपण आपल्या घराच्या खिडक्या बंद करू लागतो. दरवाजे आधीच बंद असतात. जीवन सर्व दिशांनी आपल्याला पुकारत असले तरी त्याला प्रतिसाद देण्याचे धाडस आपल्यात नसते. आपण अशा सुखाच्या शोधात असतो की जे आपल्याला वस्तूंच्या रूपात दिसते. आपण त्या बलाढय़ सागराला आलिंगन देऊ शकत नाही. त्याचे पेंटिंग्ज करून दिवाणखान्यात लावून ठेवतो. आपल्याला खरे ज्ञान नको असते, हवा असतो त्याचा आभास. खरे ज्ञान आपल्याला स्वतंत्र करते आणि स्वातंत्र्याचे आपल्याला भय वाटते. आपल्याला तेच ज्ञान हवे जे आपल्याला संपत्ती देईल. ते सौंदर्य, सत्य, शील काय कामाचे जे आपल्याला संपत्ती देत नाही किंवा सत्ता देत नाही. माणसाचे अशातर्हेने बाजारीकरण आणि वस्तूकरण होणे हा या आधुनिक जगाच्या यशाचा मूलमंत्र आहे.
माणसाच्या सुखाच्या कल्पना जेव्हा वस्तूंमध्ये परावर्तित होतात तेव्हा त्याच निळंभोर आभाळ दुरावत सागराचा आवाज त्याला ऐकू येत नाही. दारातली पाखरं त्याला परकी झालेली असतात. आपला आनंद निसर्गातून येत असेल तर तो शरीराला, मनाला, आत्म्याला निश्चितच पुलकित करणारा असेल. कारण त्याचा संबंध माणसाच्या शोषणाशी, संघर्षाशी, रक्त, घाम, अश्रूंशी नसतो. त्याचा संबंध असतो माणसाच्या हृदयाशी. म्हणूनच तर आपले सर्व धर्म, श्रद्धा, संकल्पना निसर्गातूनच आल्या आहेत. धर्म आणि विज्ञान हे निसर्गाला पाहणारे दोन डोळेच आहेत. विज्ञान बाहेरून पाहते, धर्म निसर्गाला आतून मनातून पाहण्याचा प्रय▪करतो. धर्माचा संबंध म्हणून आत्मजाणिवांशी, अंत:प्रेरणाशी आपल्या मनाशी असतो. तो अस्तित्वाला समग्रतेने पाहतो. त्यावर श्रद्धा ठेवतो. खरा धर्म कधीही हिंसक असू शकत नाही. तो स्पर्धाशील, संघर्षशील किंवा विभाजनवादी नसतो. धर्माच्या नावाने संघर्ष करणारे लोक अंध असतात. कारण धर्माचा अर्थच आहे समग्रतेने जाणा. विज्ञानही तेच काम करत असते. अर्थात त्याचा संबंध श्रद्धेशी नसून तर्कशुद्ध विचारांशी, वस्तुनिष्ठतेशी असतो. विज्ञानाच्या पुष्कळ कल्पनादेखील धर्मातूनच आल्या आहेत. या जगात काहीही स्थिर नाही हे भगवान बुद्धाने सांगितले. विज्ञानाने ते नंतर सिद्ध केले. न्यूटनने म्हटले होते की, 'हे जग ईश्वराने निर्माण केले आहे. त्यामुळे ईश्वरनिर्मित नियमांना जाणणे म्हणजेच विज्ञान.' शेवटी ईश्वर म्हणजे निसर्गच आहे. त्याच्यावर प्रेम करणे म्हणजे ईश्वरावर प्रेम करणेच आहे. भ. बुद्धांनी ईश्वराचे अस्तित्व मानले नाही, पण सत्याचे स्वरूप निसर्गातच पाहिले. म्हणूनच निसर्गातील बदल जाणणे म्हणजे बुद्धस्वरूप जाणणे असे म्हटले जाते. आपले ज्ञान, विज्ञान, शहाणपण आपल्याला निसर्ग चिंतनातूनच प्राप्त होते. ताओ तत्त्वज्ञानात ताओचे प्रतिरूप म्हणजे निसर्ग म्हटले आहे. निसर्गाचे प्रतिरूप म्हणजेच ताओ. ताओचा अर्थ आहे विश्वव्यवस्था. ती ज्या नियमाने चालते ते नियम जाणणे म्हणजे ताओ जाणणे होय. म्हणून सौंदर्य आहे ते ताओचे. वसुंधरेचे, विश्वाचे. निसर्ग आहे आकारांनी बद्ध.आपल्याला डोळ्यांनी दिसते ते आकारांचे सौंदर्य आहे, म्हणून त्याचे सौंदर्यही अनंत आहे. म्हणून खरं सौंदर्य वा सुख जाणायचे असेल तर आपल्याला निसर्गाकडे वळावे लागते. त्यातून अद्भुत असा आनंद आपल्याला मिळतो. म्हणून म्हटले आहे की, ताओचे (निसर्गाचे) सौंदर्य एखाद्या गूढ रमणीसारखे आहे. तिच्या नुसत्या नजरेने ती अनंत आशयांचं महाल उभे करू शकते. ती जेव्हा पश्चिमेकडे पाहाते तेव्हा तिला पूर्वेकडे जायचे असते. तिच्या साध्या स्पर्शाने अनंत गोष्टी घडतात. सूर्य उगवतो आणि मावळतो. झाडांना असंख्य फुले येतात. समुद्र खवळतो आणि शांत होतो. विकास आणि विनाश याचे अखंड चक्र फिरते आणि त्याची तिला जाणीवही नसते. परस्परविरोधी शक्ती एकमेकांच्या जागा घेत असतात. विसंवादातून सुसंवादाकडे, विविधतेतून ऐक्याकडे, विनाशातून विकासाकडे, अंधारातून प्रकाशाकडे अशी जीवनाची वाटचाल सुरू होते. निसर्ग आहे आनंददायी शक्तींचा संमेळ. उत्साहाचा महास्रोत, सर्जनशीलतेचा उत्सव, पण आपण किती करंटे आहोत.
आपण वस्तू आणि सुखाची साधनं जमवण्यात मग्न आहोत. त्यालाच आपण सुख म्हणतो. सामान्यांचं आयुष्य रडत रखडत चालणार्या बैलगाडीसारखे असते. तिला वेग नसतो. ती कायम बिघडत असते. कधी बैल थकतात, बसतात, कधी गाडीचं चाक निखळत रस्ता नादुरुस्त असतो. कधी नद्या भेटतात अरुंद पायाच्या आणि वेगवान. कधी त्या विशाल पात्राच्या असतात; परंतु त्यांची खोली कळत नाही. म्हणून आपण अडकून पडतो. खरं म्हणजे आपण कशासाठी जगतो हे कळत नसल्यामुळे धावत असतो. जीवनातील गंभीर समस्यांपासून सुटका करून घेण्याचा मार्ग माहिती नसल्यामुळेदेखील धावतो. ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती, साधने असतात तेही धावतात आणि ज्यांच्याकडे काहीच नसते तेही धावत राहतात. प्रत्येकाला पाहिजे असते सुख, समाधान, शांतता आणि ते सारे कुठेच मिळत नसते. एरिक फ्रॉम नावाच्या एका विचारवंताने आपल्या 'एक्सेप फ्रॉम फ्रीडम' म्हणजेच 'स्वातंत्र्यापासून सुटका' या पुस्तकात माणसाच्या मनोवस्थेचं चांगलं वर्णन केलं आहे. माणूस सुखी नसण्याचं कारण भौतिकवाद किंवा चंगळवाद आहे; परंतु भारतासारख्या गरीब देशात चंगळवाद आहे तो उच्च मध्यमवर्गीयात, नवश्रीमंतात किंवा काळाबाजार करणार्या धनदांडग्यात. सिनेमा, क्रिकेट, राजकारण यातही तो खुळखुळत असतो. जे काळा पैसा निर्माण करतात तेच याचे सूत्रधार असतात.
भारतात जणू दोन देश राहतात. जुनाट बैलगाडीत रडत रखडत जाणार्या आणि राहणार्या ग्रामीण शेतकर्यांचा, शेतमजुरांचा, कारागिरांचा देश आणि दुसरा चकचकीत मॉलमध्ये फिरणारा, पॉश वस्तीत राहणारा. इंग्लंड, अमेरिकेकडे डोळे लावून बसलेला देश. एरिक फ्रॉमचे मत आहे की, 'माणसे दु:खी आहेत कारण त्यांचे सुख ते वस्तूमध्ये शोधतात.' आपल्या घरात अधिकाधिक वस्तू असाव्यात, त्या आपल्या मालकीच्या असाव्यात, त्या इतरांना दिसाव्यात यासाठी ते अहोरात्र कष्ट करीत असतात. नवनव्या वस्तूंच्या, संधीच्या मागे ते पळत राहतात आणि जीवनाचा मुख्य हेतूच विसरून जातात. माणूस स्वत:च अमूल्य आहे, पण त्याचे मॉल ठरते बाजारात तेथील स्पर्धेवर. माणसाच्या सुखाच्या संकल्पनाच बदलल्या आहेत. बाह्य दिसणे बाह्य असणे याला जास्त महत्त्व आले आहे. तुमचे ज्ञान, संस्कार, नीतिमत्ता, विद्वत्ता याला काहीही महत्त्व राहिले नाही. महत्त्व आहे ते कोणत्याही मार्गाने संपत्ती मिळवण्याला. त्यासाठी तुम्ही आपला आत्मा विकला तरी चालेल. त्यातून निर्माण होते आंधळी स्पर्धा, एकाकीपणा, सर्व जगाविषयी संशय आणि दुरावा. त्यातून येते खिन्नता, उदासीनता, मानसिक दुभंगलेपण. जिथे स्पर्धा असेल तिथे तुम्ही एकाकीच असता. माणसाचं एकाकीपण घालवण्याचे अनेक प्रकार आहेत. आहे ते जीवन स्वीकारणे, ते उत्कटपणे जगणे, त्यात आनंद मानणे किंवा बधिर होऊन जाणे, जगापासून दूर पळणे, सुखदु:खाच्या पलीकडे जाऊन कुठल्या तरी कोषात स्वत:ला अडकवून घेणे. काही लोक दारूच्या एकेक घोटाप्रमाणे स्वत:ला संपवत जातात. माणसे व्यसनाधीन होतात कारण ती आनंदी नसतात. व्यसनाधीनतेवर विजय तेव्हाच मिळेल जेव्हा माणसाला आनंदाचे व्यसन लागेल. 'आनंद हाच सद्गुण आहे. सद्गुणाचे फळ आनंद नव्हे' असे प्रख्यात विचारवंत कांट यांनी म्हटले आहे. माणसाला आनंदी राहण्याचा जन्मजात अधिकार आहे, पण खरा आनंद केव्हा मिळेल? जेव्हा आपण जीवनाचे मूल्य जाणू, आपल्याला छळ, पिळवणूक यांचा प्रतिकार करण्याचे व त्यातून मुक्त होण्याचे जन्मजात स्वातंत्र्य आहे. मग आपण कशामुळे दु:ख भोगतो? कारण आपण कुणाच्या तरी इच्छेचे बळी ठरतो. आपण आपले स्वायत्तमूल्य जाणले पाहिजे. जे निसर्गाने आपल्याला दिले आहे. आपण निसर्गाकडे वळू या. त्यासाठी जंगलात जाण्याची गरज नाही. निसर्गाकडे वळणं म्हणजे आपण आयुष्य अधिक सुंदर, सरळ सहज करणे. स्पर्धेतून द्वेष, मत्सर, संघर्ष निर्माण होतो. मुख्य म्हणजे हे जाणलं पाहिजे की, जग स्पर्धेवर नाही तर सहकार्यावर चालत.ं स्पर्धा तुम्हाला भौतिक यशाच्या, संपत्ती, सत्तेच्या नावाने एका दलदलीत घेऊन जाते. जिथे यश म्हणजे एक मृगजळच असते. खरे यश येते ते सहकार्यातून, सहसंवेदनेतून, सुसंवादातून. म्हणून लाओत्सेने म्हटले आहे, 'जो जगाशी स्पर्धा करीत नाही त्याच्याशी जगही स्पर्धा करीत नसते.' त्यातूनच माणसाला निर्विवाद यश मिळते. अमेरिकेत संशोधन करण्यात आलं तेव्हा लक्षात आलं की, तथाकथित यशस्वी आणि श्रीमंत लोक मुळीच सुखी नव्हते. दारूचं व्यसन, उद्ध्वस्त कौटुंबिक जीवन, नैराश्य, एकाकीपण, स्किझोफ्रेनिया, डिप्रेशन आदी रोगांनी ते मस्त होते. नैराश्य हा २0२0 साली अत्यंत मोठा मनोविकार असेल आणि लोकसंख्येच्या पंचवीस टक्के लोक त्यांनी बाधित असतील, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. याचे कारण आपले तथाकथित यश आपले मानसिक, शारीरिक, कौटुंबिक आरोग्य उद्ध्वस्त करीत असते. आपल्या यशाचा पाया नैतिक नसतो हेच त्याचे कारण आहे. आपली जीवनव्यवस्था सदोष आहे. ती स्पर्धा, संघर्ष, अशांततेवर उभी आहे. म्हणून समजून घ्यायचं आहे की, 'माणूस म्हणजेच खूप काही आहे, ज्याच्याकडे खूप काही आहे तो नव्हे,' असे एरिक फ्रॉमने आपल्या सेन सोसायटीत म्हटले आहे. म्हणून आपण शहाणं असू तर जीवनाचं महत्त्व ओळखू. आलिशान गाडीतून प्रवास करण्यापेक्षा आपण कधी तरी पायी चालू. निसर्ग आपल्याबरोबर चालू लागेल. हजारो रुपयांचे ड्रेस, साडी, दागदागिने अंगावर मिरवण्यापेक्षा आपण कधी तरी मुक्त होऊ या सार्या हव्यासातून. आपल्या गरजा कमी केल्या तर स्वातंत्र्य मिळेल. सर्वांच्या सुखात आपण आपलं सुख शोधलं तर माणूस मानसिकदृष्ट्या जास्त सक्षम, निरोगी आणि जास्त वरच्या पातळीवर जातो, असे अँडलर, एरिक्सन, कोहलबर्ग गिलीगन अशा जागतिक दर्जाच्या मानसशास्त्रज्ञांनी लिहून ठेवलं आहे. आपल्याला जीवनात संगीत हवं आहे की महागडी म्युझिक सिस्टीम? संगीत हवं असेल तर ते आपल्या मनातच जन्मतं, आपल्याला ते ऐकता आलं पाहिजे इतकंच.
(लेखक हे ताओ तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत)" class="scaledImageFitWidth img" height="102" src="https://fbcdn-sphotos-h-a.akamaihd.net/hphotos-ak-xpf1/t1.0-9/10626774_558362787624526_5735823946445896674_n.jpg" style="border: 0px; height: auto; min-height: 100%; position: relative; width: 213px;" width="213" /></div>
</a></div>
</div>
</div>
</div>
राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-326580629355588128.post-48938287480160042832014-08-19T21:44:00.002-07:002014-08-19T21:44:49.688-07:00खरच,आपण असच असलं पाहिजे..<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.31999969482422px; margin-bottom: 6px;">
एका पोस्ट वरून</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.31999969482422px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
हे परमेश्वरा...<br />मला माझ्या वाढत्या वयाची जाणिव दे.<br />बडबडण्याची माझी सवय कमी कर.<span class="text_exposed_show" style="display: inline;"><br />आणि प्रत्येक प्रसंगी मी बोललच पाहिजे ही माझ्यातली अनिवार्य ईच्छा कमी कर.<br />दुसर्यांना सरळ करण्याची जबाबदारी फक्त माझीच व त्यांच्या खाजगी प्रश्नांची दखल घेउन ते मीच सोडवले पाहिजेत अशी प्रामाणिक समजूत माझी होऊन देऊ नकोस.<br />टाळता येणारा फाफटपसारा व जरुर नसलेल्या तपशिलाचा पाल्हाळ न लावता<br />शक्य तितक्या लवकर मूळ मुद्यावर येण्याची माझ्यात सवय कर.<br />इतरांची दुःख व वेदना शांतपणे ऐकण्यास मला मदत करच पण त्यावेळी माझ तोंड शिवल्यासारखे बंद राहुंदे. अशा प्रसंगी माझ्याच निराशा, वैफल्यांचे रडगाणे ऐकवण्याची माझी सवय कमी कर.<br />केंव्हा तरी माझीही चूक होउ शकते, कधीतरी माझाही घोटाळा होऊ शकतो, गैरसमजुत होऊ शकते ह्याची जाणीव माझ्यात ठेव.<br />परमेश्वरा,<br />अगदी शेवटपर्यंत माझ्यात प्रेमाचा ओलावा, गोडवा, लाघवीपणा राहू दे.<br />मी संतमहात्मा नाही हे मला माहीत आहेच, पण एक बिलंदर बेरकी खडूस माणूस म्हणून मी मरू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.<br />विचारवंत होण्यास माझी ना नाही पण मला लहरी करू नकोस. दुसर्याला मदत करण्याची इच्छा आणि बुद्धी जरूर मला दे पण गरजवंतांवर हुकूमत गाजवण्याची इच्छा मला देऊ नकोस.<br />शहाणपणाचा महान ठेवा फक्त माझ्याकडेच आहे अशी माझी पक्की खात्री असूनसुद्धा, परमेश्वरा, ज्यांच्याकडे खरा सल्ला मागता येइल आणि ज्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडता येइल असे मोजके का होईना पण<br />चार मित्र मला दे.<br />एवढीच माझी प्रार्थना.<br />पु. ल.</span></div>
</div>
राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-326580629355588128.post-25624905915811553462014-08-12T01:39:00.003-07:002014-08-12T01:39:25.220-07:00वडीलांस पत्र.<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<span style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;">" वडीलांस पत्र ..........."</span><br style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;" /><span style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;">प्रिय " बाबा " यांस ,</span><br style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;" /><br style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;" /><span style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;">आज थोडं एकट एकट वाटलं,</span><br style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;" /><span style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;">बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……</span><br style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;" /><br style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;" /><span style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;">चालायला लागल्यावर तुम्हीच पहिला हात दिला होतात,</span><br style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;" /><span style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;">पण मी पुढे गेल्यावर नकळतच कधी दूर गेला होतात,</span><br style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;" /><span style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;">आज, स्वतःच्या पायावर उभा असलो तरी धडपडल्यासारखं वाटलं.</span><br style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;" /><span style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;">बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वा</span><span class="text_exposed_show" style="background-color: white; color: #37404e; display: inline; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;">टलं……<br /><br />जेवताना काऊ चिऊ शिवाय कधी घास पोटात गेला नाही,<br />आता तर चिऊ बघायला सुद्धा मिळत नाही,<br />काऊ चिऊ साठी पुन्हा एकदा रुसवासं वाटलं.<br />बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……<br /><br />लहानपणी तुमच्यासोबत पावसात भिजताना खूप मजा वाटायची,<br />फाटका रेनकोट , तुटकी छत्री असूनही ती दोघांना पुरायची,<br />आज , नवी कोरी छत्री असूनही पावसात थोडं भिजावस वाटलं.<br />बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……<br /><br />एकदा घरात एकटा असताना, सर्व घर रडून डोक्यावर घेतलं होत,<br />पण तुम्ही धावत पळत येउन ' मी आहे 'असं सांगितलं होत,<br />आज , स्टेशनच्या गर्दीत सुद्धा " एकट एकट " वाटलं .<br />बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……<br /><br />आठवतय… एकदा मी पडलो होतो,मला खूप लागलं होत ,<br />त्यादिवशी तर पूर्ण आभाळ तुमच्या डोळ्यात दाटलं होत,<br />आज , उगाचंच अडखळून पडावसं वाटलं…<br />बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……<br /><br />रात्री झोपताना तर तुमची मांडीच माझी " उशी " असायची ,<br />तुम्ही नसताना आईच्या कुशीतही झोप नसायची,<br />आज , पुन्हा एकदा तुमच्या जवळ झोपावं वाटलं….<br />बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……<br /><br />तुमचा हात सोडून शाळेत जाणे नकोसे वाटायचे,<br />पण तोच हात पकडून घरी जाताना मात्र कसलेच भान नसायचे,<br />आता मोठा झालो तरी " तो " हात पकडून शाळेत जावंसं वाटलं…<br />बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……<br /><br />"तुझे बाबा , देव बाप्पा कडे गेले " अस मला कुणीतरी सांगितलं होत,<br />मात्र देव बाप्पा कुठे राहतो हेच मला कोणी सांगितला नव्हतं,<br />लहानपणीच्या त्या प्रश्नावर आज थोडं हसावसं वाटलं ….<br />बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……<br /><br />जीवनातली तुमची कमी आईने कधीच भासू दिली नाही ,<br />पण तुमची आठवण मनातून कधीच जाऊ शकली नाही,<br />आज , भरलेल्या आभाळाबरोबर डोळ्यात पाणी दाटल्यासारखं वाटलं….<br />बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून थोडसं रडावसं वाटलं……<br /><br />बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून थोडसं रडावसं वाटलं……</span><br />
<span style="color: #37404e; font-family: Helvetica, Arial, lucida grande, tahoma, verdana, arial, sans-serif;"><span style="background-color: white; font-size: 14px; line-height: 20px;">(Advocate jayant Deshmukh यांच्या Timelineवरुन साभार)</span></span></div>
राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-326580629355588128.post-83976570911143385282014-06-17T23:18:00.002-07:002014-06-17T23:18:31.096-07:00नातेसंबंध...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.31999969482422px; margin-bottom: 6px;">
नातेसंबंध म्हणजे माणसाच्या अस्तित्वाचा पाया. नात्याची अंत:प्रेरणा ही माणसाला मिळालेली अद्भुत भेट आहे. जगातले सगळे जीव या सूत्रात बांधले गेले आहेत. जे कृष्णमूर्ती म्हणतात, 'टु बी इज टु बी रिलेटेड अँड टु बी रिलेटेड इज टु बी इन कॉन्फ्लीक्ट.' दोन माणसं एकत्र आली की त्यांच्यात विसंवादाचं का होईना, पण एक नातं निर्माण होतंच. मात्र माणसा-माणसामधलं नातं क्वचितच निकोप आणि सहज असतं; कारण ते निरपेक्ष नसतं.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.31999969482422px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
बहुतेक वेळा आपण समोरच्या व्यक्तीकडे सोयीच्या दृष्टिकोनातूनच पाहतो. नातं जुळलंच त<span class="text_exposed_show" style="display: inline;">री ते व्यक्तीसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष असतं. सगळं अनुकूल असेल तरच ते टिकून राहतं. अशा नात्याने व्यक्ती म्हणून आपण समृद्ध होऊ शकत नाही. ज्या नात्याने आपण झळाळून उठतो, जे नातं जोडणं किंवा तोडणं आपल्या हातात नसतं ते नातं एकच; माणसाचं आणि ईश्वरी तत्त्वाचं. 'त्वमेव माता च पिता त्वमेव... त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव.'</span></div>
<div class="text_exposed_show" style="background-color: white; color: #141823; display: inline; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.31999969482422px;">
<div style="margin-bottom: 6px;">
निरीश्वरवादीदेखील चराचराशी नातं जोडतात. ईश्वर मानणारे त्याची रूपं आयुष्यात आलेल्या प्रत्येक घटकाच्या माध्यमातून अनुभवतात. हे नातं निरपेक्ष असतं. कदाचित म्हणूनच या नात्याची असोशी टिकून राहते, मैत्रभाव उधळून दिला जातो. या नात्यात ऋजुता असते, अहंकार नसतो. या नात्याला अनेक पदर असू शकतात. जगाच्या पसाऱ्यात आपण कुठेही हरवलो, तरी ज्या भूमीशी आपली नाळ जुळलेली असते तिची ओढ तशीच राहते, त्याला आपण माझं गाव, माझा देश अशी नावं देतो.</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
संतांना 'वृक्षवल्ली सोयरी' वाटू लागते. 'कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी' भासू लागते. कितीतरी माणसं निसर्गाशी नातं जोडतात. एखाद्या रोपाचं रूजणं, फुलणं, तारकांनी खच्चून भरलेलं आकाश, वाऱ्याची झुळूक, खळाळत वाहणारं पाणी, यात कित्येकजण रमतात. कुणी विज्ञानातल्या कुतूहलांची उकल करण्याच्या पाशात स्वेच्छेने अडकतात. 'नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही... साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही' असा तो अनोखा, अनामिक बंध असतो. या नात्यांतलं सौंदर्य कायम राहतं; कारण यामागे अपार श्रद्धा असते. या साऱ्या नात्यांत फक्त देणं असतं, घेणं नसतं.</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
माणसांचं आपसातलं नातं इतकं सहजसोपं व्हायला हवं असेल, तर एकमेकांचा गुण-दोषासकट स्वीकार करता यायला हवा. मानसशास्त्रज्ञ म्हणतात, एकमेकांना दिलेला वेळ, शब्द, एकमेकांवरील विश्वास, श्रद्धा आणि आश्वासक स्पर्श हे कोणत्याही यशस्वी नात्याचे आधारस्तंभ असतात. नातेसंबंधाच्या बाबतीत हे समजून घ्यायला हवं की आपल्याला जे हवं आहे ते आपण कधी दुसऱ्याला दिलं का? हे उमजलं तर तो खरा मैत्रभाव. तो जपला तर आपसूक माणूस निर्वैर होऊ लागतो. वात्सल्य, क्षमाशीलता, करुणा, कळकळ हा त्याचा स्वभावधर्म होतो. मनातला मैत्रभाव बाह्य व्यक्तिमत्त्वात दिसतो. अवघं जगणं सुंदर होतं. आरती प्रभूंच्या शब्दात दडलेला नात्याचा खरा अर्थ गवसतो. 'अशी पांखरून छाया, लावोनिया माया। आनंदाचे आसू लावी कोण ओघळाया.'</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
- मोहिनी मोडक</div>
</div>
</div>
राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-326580629355588128.post-79505973428698032002014-05-19T21:53:00.001-07:002014-05-19T22:00:42.506-07:00सुंदर दृष्टांत<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<span style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;">संत ज्ञानेश्वरांनी दिलेला एक दृष्टान्त, आपण</span><br />
<span style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;">नको त्या गोष्टीत का अडकून पडतो, याचा उत्कृष्ट</span><br />
<span style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;">उलगडा करणारा आहे. त्यांनी सांगितले आहे,</span><br />
<span style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;">की पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे.</span><br />
<span style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;">एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच</span><br />
<span style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;">नळ्या ओवलेल्या असतात. या प्रत्येक</span><br />
<span style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;">नळीला पोपटाला आकर्षित करेल असे</span><br />
<span style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;">काहीतरी खाद्य चिकटवलेले असते. जेव्हा पोपट</span><br />
<span style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;">नळीवर बसतो, तेव्हा त्याच्या वजनाने नळी गोल</span><br />
<span style="background-color: white; color: #37404e; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;">फिरते व पोपट उलटा लटकतो. उलटे लटकताच पोपट</span><span class="text_exposed_show" style="background-color: white; color: #37404e; display: inline; font-family: Helvetica, Arial, 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;"><br />स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो.<br />ही अवस्था पोपटाने कधीच अनुभवलेली नसते.<br />नळी सोडली की आपण पडू, असेच त्याला वाटत<br />राहते. खरे तर नळी सोडल्यानंतर पडू लागताच<br />पंखांचा वापर करून एक गिरकी घेऊन तो सहज उडू<br />शकणार असतो. पण हे "ज्ञान' त्याला होत नाही व<br />तो नळी अधिकच गच्च पकडून लटकलेला राहतो व<br />पकडणाऱ्याच्या हाती पडतो.<br />याला भयसापळा असे म्हणता येईल.<br />जेव्हा आपला पोपट झाला आहे असे वाटते व<br />तरीही आपण त्या परिस्थितीतून सुटूच शकत नाही,<br />तेव्हा आपण कशाला भीत आहोत ते नेमके पाहावे.<br />"हा आधार गेला तर,' अशी भीती असते तेव्हा. जर<br />काही काळ निराधार व्हायची तयारी दाखवली,<br />तर आपणही उडून जाऊ शकत असतो.<br />पडायची शक्यता ज्याला जराही नको वाटते,<br />तो उडू शकत नाही!<br />माकडे पकडायचीदेखील एक खास पद्धत आहे.<br />(हा दृष्टान्त ओशोंकडून ऐकला; पण मुळात<br />कोणाचा हे आठवत नाही) एक मडके मातीत पुरून<br />ठेवतात. मडक्यात एक फळ असते माकड ते फळ<br />काढण्यासाठी मडक्यात हात घालते. मडक्याचे<br />तोंड हे अगदी नेमक्या आकाराचे बनविलेले असते; असे<br />की फळ सोडून दिले तर माकडाचा हात बाहेर निघू<br />शकेल; पण फळासकट हात बाहेर काढायला जावे, तर<br />हाताचा आकार वाढल्याने हात अडकेल.<br />माकडाच्याने फळ सोडवतही नाही आणि त्यामुळे<br />हात बाहेर काढता येत नाही. निर्णय न<br />घेता येण्याच्या या "अवस्थे'त माकड मनाने अडकते व<br />शरीराने मडक्यापाशी.<br />या सापळ्याला मोहसापळा असे म्हणता येईल.<br />आपले ज्या परिस्थितीत "माकड' झाले असेल, तीत<br />असे काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्याने<br />सोडवत नाहीये, हे जर बघता आले तर कदाचित<br />ती गमावणूक वाटते तेवढी मोलाची नसेलसुद्धा!<br />थोडेसे सोडून देऊन संपूर्ण सुटता आले तर वाईट काय?<br />निदान या मर्यादित अर्थाने "फलत्याग' नक्कीच<br />मुक्तिदायक नाही काय?<br />एक जण हौदात कमरेइतका उतरून बराच थयथयाट<br />करतोय, हातांनी पाणी खळबळवतोय. या हौदानं<br />माझी काहीतरी मूल्यवान वस्तू गिळलीय म्हणून<br />मी संतापलोय, असं त्याचं म्हणणं. "अरे तू शांत<br />हो म्हणजे पाणी स्थिर होईल आणि मग तुला तळ<br />दिसेल व वस्तूही सापडेल!' कोणीतरी समजावत आहे.<br />पण हा ऐकूनच घ्यायला तयार नाही. हौदाचा तळ<br />रिकामाच आहे आणि मी केलेला थयथयाट व्यर्थ<br />होता, हे स्वतःला कळू न देण्यासाठी तर<br />तो पाणी फेसाळलेलं ठेवत नसेल?<br />"दमलास? चल परत जाऊ. आज इतकं पुरे.<br />पुन्हा कधीतरी जाता येईलच.<br />""नाही गुरुजी. मी दमलोय; पण आपण इतके वर<br />आलोय, आज शिखरावर पोहोचायचंच!<br />कधी एकदा पोहोचतोय आणि मग तुम्ही ते सत्य<br />सांगताय, असं झालंय मला.''<br />""माझं वचन नीट आठव. ही मोहीम पुरी होईपर्यंत,<br />जर माझी आज्ञा तू निरपवादपणे पाळलीस, तर ते<br />सत्य सांगेन' असं म्हणालो होतो मी.''<br />""होय गुरुजी. पण आता शिखर जवळ आलं असेल. इतकं<br />वर आल्यावर सोडून द्यायचं म्हणजे..''<br />""कितीही वर आलो असू! तरी मी सांगतो म्हणून, हे<br />सगळे कष्ट वाया जाऊ द्यायला तू तयार आहेस<br />का नाही?''<br />""ठीक आहे गुरुजी. मी आजची सगळी धडपड<br />वाया जाऊ द्यायला तयार आहे. म्हणत असाल तर<br />परत जाऊ या.''<br />""शाबास! आता मी तुला ते सत्य सांगतो''.<br />""पण शिखर न येताच?''<br />""तसं नव्हे. तू परतीला तयार झालास म्हणून! ते सत्य हे<br />आहे, की शिखर असं नाहीच. ही अंतहीन चढण आहे<br />आणि ज्या तळापासून आपण निघालो ना, तेच खरं<br />पोचण्याचं स्थान होतं! तू उत्तीर्ण झालास. चल<br />आता तिथं जाऊ, जिथं आपण असतोच; फक्त<br />"पोहोचलो' असं वाटत नसतं इतकंच!<br />पोपटानं एकदा तरी आधार सोडून पाहावा.<br />माकडानं एकदा तरी फळ सोडून पाहावं, थयथयाट<br />करणाऱ्यानं एकदा तरी खळबळ थांबवून तळ पाहावा.<br />चढणाऱ्यानं एकदा तरी शिखराचा हट्ट सोडून<br />पाहावा. हे जमायला अवघड नसतं. पटायलाच अवघड<br />असतं.<br />भयसापळा, मोहसापळा हे माणसाच्या मनातूनच<br />तयार झालेले असतात. त्यामुळे त्यातून बाहेर पडणे<br />अवघड नसते; पण सुटकेचा हा मार्ग<br />सोपा असला तरी पटायला अवघड असतो.(श्री मुकुंदराज महाराज सोनगीर)</span></div>
राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-326580629355588128.post-57440419870642075792014-04-24T04:29:00.003-07:002014-04-24T04:29:49.025-07:00सुंदर विचार.<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
प्राजक्ताची झाडे भेटताना...<br />
आयुष्याच्या वाटेवर कधी
खाचखळग्यांतून जावे लागते. कधी काट्याकुट्यांची वाट तुडवावी लागते. कधी
अवघड वळणे पार करावी लागतात. कधी उंच कडे आणि खोल, धडकी भरवणारी दरी
यामधल्या अरूंद वाटांमधून प्रवास करावा लागतो. पण माय-पिता-शिक्षक-पती अथवा
पत्नी यांनी आपल्या मन-मनगट-मेंदूमध्ये ताकद पेरलेली असते. मानसिक,
भावनिक, शारीरिक, आत्मिक बळ वाढवलेले असते. ती ताकद-बळ काटे-कुटे, खाच-खळगे
तुडविताना हिंमत देते. <br />
जीवनमार्गावरच्या दुःसहतेचे हे केवळ वाङ्मयीन वर्णन नाही; तर अ<span class="text_exposed_show">से
अनुभव झोपडपट्टीमध्ये, बंगल्यामध्ये, आलिशान निवासांमध्ये राहणाऱ्यांनाही
येतात. प्रवास करताना कोट्यधीशांची विमाने कोसळतात. काश्मीरच्या सहलींमध्ये
सहकुटुंब स्वर्गीय सौंदर्यपान करताना हिमकडे कोसळून गतप्राण व्हावे लागते.
पण आयुष्याची राख होतानाही जगण्यासाठी उमेद देणारे सगे-सोयरे,
परिचित-अपरिचित भेटतात. पाठीवर हात ठेवीत 'लढ' म्हणत कढ आवरण्यास ते ताकद
पेरतात. 'अरे नेस्तनाबूत, मातीस मिळालेलेही उभारी धरतात. फिनिक्स
पक्ष्यांसारखे राखेतून भरारी घेतात,' सांगत आशेचे किरण दाखवितात. अपयशामुळे
मनाचा दाह असह्य झाल्यावर 'फायर ब्रिगेड' बनतात. थंडगार शब्दसरींसारख्या
बोलांनी शांतवतात. आपण आपली उंची वाढविण्यास जिवाचे रान करतो, पण काहीजण
टिंगल-टवाळी करतात. यश मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करीत नाहीत. </span><br />
<div class="text_exposed_show">
एका सद्गृृहस्थांनी बालसंकुलात हयात खर्च केली. आपल्या एकुलत्या मुलासाठी
अनाथाश्रमामध्ये वाढलेली कन्या वधू म्हणून घरी आणली. त्या संस्थेच्या
पदाधिकाऱ्यांनी निमंत्रणासाठी गेल्यावर शुभेच्छाही दिल्या नाहीत. नवविवाहित
जोडप्याला सकारात्मक निमंत्रण दिले नाही. रोटरी, महापौर,सेवाभावी ट्रस्ट,
आदींनी सत्कार केले. एका स्नेही महिलेने त्यांची आकाशवाणीवर मुलाखत घेतली.
पण अनाथाश्रमात वाढलेल्या, पदवीपर्यंतचे शिक्षण घेत उपअधीक्षक पदावरून
निवृत्त झालेल्या त्या सद्गृहस्थाला पदाधिकाऱ्यांचे वर्तन विंचवाचा डंख
वाटते. माणसे अशी निवडुंगाची फांदी का बनतात? का फटकारतात? पण काही माणसे
भेटतात तेव्हा म्हणावे वाटते, 'अशी जागा आहात तुम्ही आयुष्यातली, जिथे
हातात माझ्या नेहमी फुलेच आली.' <br />
काही वेळा आयुष्याची वाट मागे टाकत
जाताना सद्भाग्यामुळे काही माणसे 'माणूस' म्हणून भेटतात. आपल्यामधला
'माणूस'जागवतात. काही माणसे श्रावणातील प्राजक्त रूप घेऊन समोर येतात. ती
सहवासामध्ये येणाऱ्यांसाठी पानोपानी बहरलेली, फुलांनी डवरलेली असतात.
त्यांच्याखाली फक्त उभे राहायचे असते. फिकट पिवळ्या रंगाच्या पाकळ्यांची,
नारंगी-शेंदरी रंगाच्या देठांची, मृदुल, नाजूक फुलं अंगावर पडतात. मंद मंद
सुगंधाच्या हळुवार लाटांची बरसात करतात. <br />
कौटुंबिक, सामाजिक,
व्यावसायिक आयुष्याची वाट कितीही खडतर असली तरी प्राजक्ताची भेट व्हावी.
प्राजक्त फुले देहावर टपटपावित. तन-मन-चेतापेशी-अंतर्याम शीतल-रंगीन,
गंध-सुगंधाने भारून, भारावून जावे. आजच्या जगातील प्रदूषित वातावरणाचा
संसर्ग टळावा. 'सर्वेः सुखिना संतु' ओठी यावे. तुम्हाला भेटला का प्राजक्त
कधी? का तुम्हीच कोणासाठी प्राजक्त बनलात कधी? आठवा ना शांतपणे! <br />
प्रा. अनुराधा गुरव</div>
</div>
राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-326580629355588128.post-75650837337327495422014-04-09T03:35:00.001-07:002014-04-09T03:35:14.566-07:00संस्कार म्हणजे नेमकं काय?<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
‘संस्कार’ म्हणजे नेमकं काय?<br />
प्रत्येक व्यक्तीवर चार ठिकाणांहून
‘संस्कार’ होत असतात. एक- त्याच्या घरातून, तिथल्या वातावरणातून! दोन-
शाळा-कॉलेजमधून, तीन- आजूबाजूच्या समाजाकडून आणि चौथे त्याच्या
‘आंतरमनातून’. आणि या चौथ्या संस्कारावरच खरं जीवन अवलंबून असतं, असं मला
वाटतं.<br />
१९७२ साली आम्ही दोघं परदेश प्रवासाला गेलो होतो आणि त्या
वेळचे हे तीन ठिकाणचे अनुभव आहेत. अनुभव नव्हे स्वानुभव! आश्चर्य वाटावे
असे! विश्वास बसणार नाही असे! पण ते मनावर ‘संस्कार’ करून गेले आहेत,
म्हणून तुम्हाला सांगते.<br />
(१) जपानला टोकियो शहरात चालताना कोपऱ्यावर
कधीही न पाहिलेल्या फळांची चवड लावलेली होती. विकत घ्यायला म्हणून जवळ
गेलो तर तिथे कुणी विक्रेता नव्हता. १५-२० मिनिटं त्याची वाट पाहण्यात
घालवली. एवढय़ात इंग्रजी भाषा बोलता येणारा एक जपानी इसम आमच्याजवळ आला आणि
म्हणाला, ‘‘तुम्हाला ही फळं हवी असतील तर एक पिशवी उचला. डझनभर आहेत.
बाजूला त्याचा भाव लिहिलेला आहे. खाली पैशाची पेटीही ठेवलेली आहे. त्यात
पैसे टाका आणि पुढे चला.’’ ..त्याचं हे बोलणं ऐकून मी विचारलं- ‘‘अहो, पण
तो विक्रेता कुठे आहे? आणि ही पेटी कुणी उचलून नेली तर?’’ त्यानं जे उत्तर
दिलं, ते ऐकून मी अवाक् झाले. तो म्हणाला, ‘‘इथला विक्रेता दिवसभर एका
कारखान्यात काम करतो. संध्याकाळी त्याचं काम संपलं की इथे येऊन उरलेली फळं
आणि पैशाची पेटी घेऊन तो घरी जाईल. उद्या पुन्हा नवीन फळं आणून लावेल आणि
पैशाच्या पेटीबद्दल म्हणाल तर आमच्या देशात आम्ही दुसऱ्यांच्या वस्तूला हात
लावत नाही.’’ ..त्याचं उत्तर ऐकून मला दिसायला लागलं की ‘दादरला रानडे
रोडवर एक शंभरची नोट पडली आहे आणि ती आपली नाही’ म्हणून लोक तिला वळसा
घालून पुढे जात आहेत.<br />
(२) जर्मनीमध्ये एका स्टेशनवर एक चाळिशीची बाई
आपली दोन मुलं आणि तीन डाग सांभाळत गाडीची वाट पाहत उभी होती. तिची गाडी
आली, ती निघून गेली आणि माझ्या लक्षात आलं की, घाईमध्ये चढताना तिची एक बॅग
प्लॅटफॉर्मवरच राहून गेली आहे. आमच्या गाडीला अजून वेळ होता. म्हणून मी ती
बॅग उचलून शेजारच्या ऑफिसमध्ये नेऊन दिली आणि घडलेला प्रकार सांगितला.
त्या माणसानं चिडून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, ‘‘तुम्ही का हात लावलात
तिच्या बॅगेला? होती तिथे नेऊन ठेवा. त्या बाईच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात
येईल, तेव्हा ती परत येईल आणि आपली बॅग घेऊन जाईल. दोन दिवस तिच्या लक्षात
नाही आलं, तरी ती बॅग तिथेच असेल.’’<br />
(३) दुसऱ्या महायुद्धानंतर
ब्रिटनची सांपत्तिक स्थिती फार वाईट झाली होती. त्या काळात माझे यजमान तिथे
शिकत होते. एक दिवस रेडिओवरून एक बातमी प्रसृत करण्यात आली की- ‘‘या वेळी
चुकीने तुम्हाला रेशनच्या दुकानातून एक आठवडय़ाऐवजी दोन आठवडय़ांचे रेशन दिले
गेले आहे. तरी एक आठवडय़ाचं रेशन परत करावं. नाही तर आपत्ती ओढवेल.’’
..दुसऱ्या दिवशी सर्व दुकानांच्या बाहेर जास्तीचं रेशन परत करायला
लोकांच्या रांगा लागल्या.<br />
आज ४० वर्षांनंतर हे सारं आठवले की, मनात
येतं की आज त्या ठिकाणी काय परिस्थिती असेल? असेच असतील का अजून संस्कारी
लोक, संस्कारी समाज आणि संस्कारी देश? आज काय आहे माहीत नाही. एखादेवेळेस
तिथल्या लोकांनाही या ‘परिकथा’ वाटत असतील.<br />
आज हे अनुभव आठवले आणि
पुन्हा एकदा माझं मन ‘संस्कार’ या विषयाकडे वळलं. पाठोपाठ माझी आई
उच्चारायची ते एक वाक्य आठवलं- ‘वाण्याचा पसा, सोनाराचा मासा आणि शिंप्याचा
खिसा’ एवढे तरी स्वत:कडे राखून ठेवण्याचा प्रत्येकाचा कल असतोच.. कारण
प्रत्येकजण दरक्षणी ‘मी’चा विचार आधी करतो. मी- माझा परिवार- माझे विचार-
माझे यश- माझा पैसा- समाजातील माझे स्थान- माझा भविष्यकाळ आणि माझा
स्वार्थ- एवढे तरी तो प्रथम स्वत:साठी राखून ठेवतोच. कारण या ‘मी’वर त्याचं
पहिलं प्रेम असतं आणि तो या ‘मी’ला सोडून आयुष्य जगूच शकत नाही..
‘संस्कार’ हा तसा तीन अक्षरी लहानसा शब्द! पण त्याच्या अंतरंगात शिरलं की-
तो आपल्या संपूर्ण आयुष्याला कसा व्यापून राहिलेला असतो, हे लक्षात यायला
लागलं.<br />
मोबाइल, कॉम्प्युटर्स, लॅपटॉप्स यांच्या आगमनानंतर जीवन
उधळून गेलंय, पण करणार काय? असं जात जात हे जग कुठे जाणार आहे, याचा विचार
करायला वेळ तरी कुणाजवळ आहे आज? आमच्यासारख्या वयस्कर मंडळींच्या मनाला एक
प्रकारचं हताशपण आलंय.<br />
प्रत्येक व्यक्तीवर चार ठिकाणांहून ‘संस्कार’
होत असतात. एक- त्याच्या घरातून, तिथल्या वातावरणातून! दोन-
शाळा-कॉलेजमधून, तीन- आजूबाजूच्या समाजाकडून आणि चौथे त्याच्या
‘आंतरमनातून’. आणि या चौथ्या संस्कारावरच खरं जीवन अवलंबून असतं, असं मला
वाटतं. आपण कसं जीवन जगणार आहोत, हे ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं. या
संस्काराचा थोडा बारकाईनं विचार करू.<br />
विज्ञानाच्या कक्षा रुंदावायला
लागल्यापासून गेल्या २५ वर्षांत स्त्री-पुरुष- सारा समाजच आंतरबाह्य़ ढवळून
निघाला आहे आणि त्याचे परिणामही दिसायला लागले आहेत. चांगले-वाईट दोन्ही!
सगळ्यांचीच वावटळ उठलीय.<br />
(१) शहरी जीवनात आजकाल अनेक ‘घरांतून’
जगण्याच्या अनेक तऱ्हा पाहायला मिळतात.. काही ठिकाणी संध्याकाळ झाली की,
वडिलांची मद्याची आचमनं सुरू होतात. त्याचा अमल चढायला लागला की, स्वभावाची
अवस्थाही बदलायला लागते. कभी खुशी- कभी गम अशी स्थिती होते. हळूहळू त्याच
माळेतले आजूबाजूचे मणी गोळा व्हायला लागतात. गप्पांचा, हसण्याचा,
खिदळण्याचा आवाज चढायला लागतो. शनिवार संध्याकाळ असेल तर या साऱ्याला ऊतच
येतो; फड रंगायला लागतो.. स्नॅक्सच्या बशा आत-बाहेर करताना बायको वैतागते.
मुलंही सैरभैर होतात, पण इलाज नसतो. हळूहळू सारेजण या परिस्थितीला सरावले
जातात. आजकाल अनेक विवाहित स्त्रियाही तिच्या नवऱ्याच्या किंवा त्याच्या
मित्रांच्या ग्लासला ग्लास भिडवत ‘चीअर्स’ करतात आणि पार्टीत सामील होतात.
पी.जे.- पाचकळ विनोद सांगून होतात- हशा पिकतो.. रात्रीचे ११ वाजून गेले तरी
कुणालाच जेवणाचं भान नसतं. थोडय़ा वेळाने ठिकाणावर आले की, गरम-गार जसं
असेल तसं जेवून घेतात आणि घरोघरी पांगतात.. या साऱ्यांत मुलं केव्हा तरी
स्वयंपाकघरात जाऊन असेल ते पोटात ढकलतात किंवा कोपऱ्यावरची पावभाजी खाऊन
येतात आणि झोपून जातात.<br />
दुसऱ्या काही घरांतून अगदी वेगळं वातावरण
असतं. घरं लहान असतात. दोन-तीन पिढय़ा एकत्र राहत असतात. तिथे मग विचारांतले
मतभेद, स्वभावांचे प्रकार, आवडीनिवडी, त्यातच वृद्धांच्या शारीरिक
तक्रारी, डॉक्टरांकडच्या फेऱ्या, औषधांच्या याद्या, वाढती महागाई, मुलांचं
भवितव्य, मुलीचं लग्न या आणि अशाच अनेक कारणांमुळे जो तो त्रस्त असतो.
प्रत्येकालाच एक विचित्र ताण जाणवतो.. हळूहळू मग तो मुखावाटे बाहेर पडतो.
वाद होत राहतात. रंगाचा बेरंग होतो. याच वातावरणातून मुलं मोठी होत असतात.
त्यांच्या मनावर या साऱ्याचे पडसाद उमटत राहतात. त्यातून काही वाहवत जातात
तर काही या साऱ्याकडे सजगतेनं पाहत वाढत राहतात.. तसं पाहिलं तर प्रत्येक
‘घर’ म्हणजे एक कादंबरी असते. या साऱ्यांतून मुलांवर संस्कार होतील ते
होतील. आजकाल कुणालाच त्याबाबत विचार करायला वेळ नाही.<br />
‘शाळा-कॉलेजच्या’ म्हणजे शिक्षणाच्या वयात जे संस्कार मनावर होतात, ते
बऱ्याचदा गुरुशिष्यांतल्या नात्यांवर आणि त्यांच्याविषयी वाटणाऱ्या आदरांवर
अवलंबून असतात. निवडलेला अभ्यासक्रम, त्यावर केलेली मनाची एकाग्रता,
भविष्याविषयी ठरविलेल्या निश्चित अशा दिशा, उत्तम वाचन, जगात नित्य-नव्यानं
घडणाऱ्या घटना- त्यांच्याकडे पाहण्याचा डोळसपणा यातून व्यक्तीची जडणघडण
होत जाते.. याउलट निवडलेला मित्रवर्ग जर व्यसनांच्या आहारी गेलेला असेल,
त्यांच्या तोंडची भाषा ओंगळ असेल, तर जीवनाला भलतेच वळण लागते. ते भरकटले
जाते. चांगले संस्कार होण्याचे बाजूलाच राहते.<br />
‘आजूबाजूच्या
समाजाकडून’ होणाऱ्या संस्काराबाबत बोलावं तेवढं थोडंच आहे.. वर्तमानपत्र
उघडलं की ८०% बातम्या भ्रष्टाचार, काळाबाजार, गुंडगिरी, बलात्कार, खून,
मारामाऱ्या, दरोडे, आंदोलनं, उपोषणं आणि आत्महत्या यांच्याचबद्दल असतात.
त्यामुळे ‘कधी एकदा पेपर येतो’ असं आजकाल होत नाही.. दूरदर्शनच्या
पडद्यावरून लांबलचक फरपटत जाणाऱ्या मालिका, अवास्तव विषय, स्पर्धा, ओंगळ-
पाचकळ विनोद, लहान लहान मुलींकडून डोळा मारत- ओठ दुमडत सादर केल्या
जाणाऱ्या लावण्या, तरुण मुलं-मुली कमीत कमी कपडय़ांतून करत असलेली नृत्यं-
या सगळ्या गोष्टी घरातले सर्व वयांचे लोक आवर्जून बघत असतात. ‘एकमेकांना
मिठय़ा मारणं’ हे तर आजकाल सर्रास झालंय. एकमेकांना स्पर्श केल्याखेरीज
कुणाला भावना व्यक्तच करता येत नाहीत. नवररसांचा राजा ‘शृंगार’- जो एकेकाळी
शय्यागृहापुरता मर्यादित होता, तिथला अधिपती होता, तो आज रस्त्यावर आलाय,
स्वस्त झालाय. मोबाइल, कॉम्प्युटर्स, लॅपटॉप्स यांच्या आगमनानंतर जीवन
उधळून गेलंय, पण करणार काय? असं जात जात हे जग कुठे जाणार आहे, याचा विचार
करायला वेळ तरी कुणाजवळ आहे आज? आमच्यासारख्या वयस्कर मंडळींच्या मनाला एक
प्रकारचं हताशपण आलंय. नव्या युगात सामावून जाता येत नाही आणि लहानपणचं
निरागस- निर्मळ- शांत आयुष्य फक्त वाकुल्या दाखवत राहतं, चिडवत राहतं.
त्याचा कितीही मोह झाला तरी परत फिरता येत नाही.<br /> मनात उलटसुलट
विचारांचा गोंधळ उडतो आणि मग मनात येतं, शेवटी ‘अंतर्मनातले’ संस्कारच
आयुष्याला योग्य वळण देतात. या लेखाच्या सुरुवातीला सांगितलेले विविध
देशांतले अनुभव आठवले तरी आपण त्या संस्कारांपासून किती अंतरावर आहोत हे
लक्षात येईल. तसं यायला पाहिजे. वाण्याचा पसा- शिंप्याचा खिसा आणि सोनाराचा
मासा हे सारं आज गरजेचं असलं, तरी त्याचं प्रमाण किती ठेवायचं हे
प्रत्येकानं ठरवायला हवं. तरच ‘चारित्र्य’ नावाची चीज टिकून राहील,
संस्कारी जीवन वाटय़ाला येईल.<br /> परवा दूरदर्शनवरून एक स्वामीजी प्रवचन करत होते. बोलता बोलता त्यांनी एक छान वाक्य उच्चारलं-<br />
‘‘जो आज ‘बच्चा’ आहे त्याला ‘अच्छा’ व्हायचं असेल तर प्रथम ‘सच्चा’ बनायला पाहिजे.’’<br /> एकदम पटलं. मनाचं हताशपण काही काळ तरी दूर झालं. त्या जागी प्रसन्नता आली. जग संस्कारी वाटायला लागलं.<br />
मोहिनी निमकर</div>
राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-326580629355588128.post-70856273873016553152014-02-21T20:10:00.000-08:002014-02-21T20:12:27.348-08:00खमंग..<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<span data-ft="{"tn":"K"}">लग्नाला बारा वर्ष
झाल्यावर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ... तुला माझ्याबद्दल काय
वाटतं ? तो बावचळला ... गोंधळला ... आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हती नं
... ! प्रेम नवं नवं होतं तेव्हा ठीक होतं हो ... तिच्याकडून दिवसातनं
एकदा तरी हा प्रश्न यायचा आणि त्याच्याकडे ही एकदम भारी भारी उत्तरं तयार
असायची ... पण मग लग्न झालं ... संसार नावाची प्रश्नपत्रिका सोडवता सोडवता
ही असली तोंडी परीक्षा पार विस्<span class="text_exposed_show">मरणात गेली
... आणि काल परवा अचानक हा गुगली पडला ... त्यातून तिनं प्रश्न विचारला
तेव्हा ती पोळ्या करत होती .. हातात लाटणं ... समोर तापलेला तवा ... त्यानं
संभाव्य धोका ओळखला .. आणि 'सांगण्यासारखं प्रचंड आहे .. संध्याकाळी
सावकाशीनं सांगतो ...' असं म्हणून तो कामावर सटकला ... ! तो घरातून बाहेर
पडला खरा ... पण घर काही डोक्यातून बाहेर पडलं नव्हतं .. ! अख्खा दिवस
शब्दांची जुळवाजुळव करण्यात गेला ... कठीण असतं हो ... नात्याचं गणित एकदा
भावनेत अडकलं की ते शब्दांतून सोडवणं कठीण असतं .. तो विचार करत होता ..
काय सांगावं .. ? मी राजा .. तू माझी राणी वगैरे काही म्हणावं का ... नको
.. फार फिल्मी वाटतं .. तू खूप छान आहेस ... असं म्हणावं ... नको ... तिला
ते फारच रुक्ष वाटण्याची शक्यता आहे .. समजूतदार सहनशील वगैरे म्हणावं ...
तर ती नक्की म्हणेल ... राजकारण्यांसारखी उत्तरं देऊ नकोस ... त्याला
काहीच सुचेना ... बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं ... हे
दोन्ही शिकवणारे क्लासेस असायला हवे ... लाईन लागेल नवऱ्यांची ... त्याच्या
मनात असले भलभलते विचार येत होते .. सूर्य मावळला ... घरी जायची वेळ झाली
.. आपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या उजव्या डोळ्याची भुवई वर जाणार ...
याची त्याला खात्री होती ... घरचा अभ्यास न करता शाळेत गेलेल्या
विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता ... त्यानं बेल वाजवली ..
अपेक्षेप्रमाणे तिनं दार उघडलंच नाही .. त्याच्या मुलानं दार उघडलं ... आणि
पुढच्याच क्षणी कांद्याच्या भजीचा घमघमाट नाकात शिरला ... मुलगा जवळ जवळ
उडी मारत म्हणाला ... भजी केलीत आईनं ... पटकन हातपाय धुवून या ... तो मान
डोलावून आत गेला ... आणि पुढच्याच क्षणी टेबलवर हजर झाला ... बायकोनं
भज्यांची प्लेट समोर मांडली ... त्यानं विलक्षण अपराधी चेहऱ्यानं तिच्याकडे
पाहिलं ... तिनं तोंडभर हसून विचारलं .. काही सुचलं ... ? त्यानं
नकारार्थी मान हलवली ... तशी ती पटकन टाळी वाजवून आनंदानं म्हणाली ...
मलाही नाही सुचलं ... ! तो पुन्हा गोंधळला ... इतकी अनपेक्षित प्रतिक्रिया
... ? आणि ती बोलतच होती ... काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीनं मला
विचारलं ... तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटतं ... ? सात दिवस विचार केला
.. पण मला काही सांगताच येईना ... मग भीति वाटली ... माझं तुझ्यावरचं प्रेम
आटलं की काय .. ? अपराधी वाटायला लागलं - काय करावं कळेना ... मला
स्वतःविषयी शंका होती पण बारा वर्षानंतर ही तुझं प्रेम कणभर ही आटलेलं नाही
याची खात्री होती. म्हणून मग हा प्रश्न तुला विचारला ... वाटलं .. तुला
उत्तर देता आलं तर आपण 'Fault' मध्ये आहोत .. पण नाही ... तुलाही उत्तर
देता आलं नाही ... म्हणजे आपण आता अशा वळणावर आहोत ... जिथे फक्त 'वाटणं'
संपून 'वाटून घेणं' सुरु झालंय ... आता शब्द सापडत नाहीत ... आणि त्याची
गरजही वाटत नाही ... कारण आता एकमेकांसमोर स्वतःला सिध्द करण्याची धडपड
संपलीय ... असं म्हणून तिनं एक कांदा भजी त्याला भरवली ... शपथ सांगतो ...
त्याच्या बारा वर्षाच्या संसारामधला सगळा खमंगपणा त्या भजीत उतरला होता ...( श्री शिरीष लाटकरयांच्या टाईमलाइन वरुन साभार)</span></span></div>
राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-326580629355588128.post-61032589442579363942014-02-20T21:34:00.002-08:002014-02-20T21:34:36.868-08:00तुलसी महात्म्य<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="aboveUnitContent">
<div class="userContentWrapper">
<div class="_wk">
<span class="translationEligibleUserMessage"><span class="userContent"><div class="text_exposed_root text_exposed" id="id_5306de6ba88a94391658299">
तुलसी <br /> <br />
तुलसी में गजब की रोगनाशक शक्ति है। विशेषकर सर्दी, खांसी व बुखार में यह
अचूक दवा का काम करती है। इसीलिए भारतीय आयुर्वेद के सबसे प्रमुख ग्रंथ चरक
संहिता में कहा गया है। <br /> <br /> - तुलसी हिचकी, खांसी,जहर का प्रभाव व पसली का दर्द मिटाने वाली ह<span class="text_exposed_show">ै। इससे पित्त की वृद्धि और दूषित वायु खत्म होती है। यह दूर्गंध भी दूर करती है। <br /> <br />
- तुलसी कड़वे व तीखे स्वाद वाली दिल के लिए लाभकारी, त्वचा रोगों में
फायदेमंद, पाचन शक्ति बढ़ाने वाली और मूत्र से संबंधित बीमारियों को मिटाने
वाली है। यह कफ और वात से संबंधित बीमारियों को भी ठीक करती है। <br /> <br /> -
तुलसी कड़वे व तीखे स्वाद वाली कफ, खांसी, हिचकी, उल्टी, कृमि, दुर्गंध,
हर तरह के दर्द, कोढ़ और आंखों की बीमारी में लाभकारी है। तुलसी को भगवान
के प्रसाद में रखकर ग्रहण करने की भी परंपरा है, ताकि यह अपने प्राकृतिक
स्वरूप में ही शरीर के अंदर पहुंचे और शरीर में किसी तरह की आंतरिक समस्या
पैदा हो रही हो तो उसे खत्म कर दे। शरीर में किसी भी तरह के दूषित तत्व के
एकत्र हो जाने पर तुलसी सबसे बेहतरीन दवा के रूप में काम करती है। सबसे बड़ा
फायदा ये कि इसे खाने से कोई रिएक्शन नहीं होता है। <br /> <br /> तुलसी की मुख्य जातियां- तुलसी की मुख्यत: दो प्रजातियां अधिकांश घरों में लगाई जाती हैं। इन्हें रामा और श्यामा कहा जाता है। <br /> <br /> - रामा के पत्तों का रंग हल्का होता है। इसलिए इसे गौरी कहा जाता है। <br /> <br />
- श्यामा तुलसी के पत्तों का रंग काला होता है। इसमें कफनाशक गुण होते
हैं। यही कारण है कि इसे दवा के रूप में अधिक उपयोग में लाया जाता है। <br /> <br />
- तुलसी की एक जाति वन तुलसी भी होती है। इसमें जबरदस्त जहरनाशक प्रभाव
पाया जाता है, लेकिन इसे घरों में बहुत कम लगाया जाता है। आंखों के रोग,
कोढ़ और प्रसव में परेशानी जैसी समस्याओं में यह रामबाण दवा है। <br /> <br /> -
एक अन्य जाति मरूवक है, जो कम ही पाई जाती है। राजमार्तण्ड ग्रंथ के
अनुसार किसी भी तरह का घाव हो जाने पर इसका रस बेहतरीन दवा की तरह काम करता
है। <br /> <br /> मच्छरों के काटने से होने वाली बीमारी - मच्छरों के काटने
से होने वाली बीमारी, जैसे मलेरिया में तुलसी एक कारगर औषधि है। तुलसी और
काली मिर्च का काढ़ा बनाकर पीने से मलेरिया जल्दी ठीक हो जाता है। जुकाम के
कारण आने वाले बुखार में भी तुलसी के पत्तों के रस का सेवन करना चाहिए।
इससे बुखार में आराम मिलता है। शरीर टूट रहा हो या जब लग रहा हो कि बुखार
आने वाला है तो पुदीने का रस और तुलसी का रस बराबर मात्रा में मिलाकर थोड़ा
गुड़ डालकर सेवन करें, आराम मिलेगा। <br /> <br /> - साधारण खांसी में तुलसी के पत्तों और अडूसा के पत्तों को बराबर मात्रा में मिलाकर सेवन करने से बहुत जल्दी लाभ होता है। <br /> <br /> - तुलसी व अदरक का रस बराबर मात्रा में मिलाकर लेने से खांसी में बहुत जल्दी आराम मिलता है। <br /> <br /> - तुलसी के रस में मुलहटी व थोड़ा-सा शहद मिलाकर लेने से खांसी की परेशानी दूर हो जाती है। <br /> <br /> - चार-पांच लौंग भूनकर तुलसी के पत्तों के रस में मिलाकर लेने से खांसी में तुरंत लाभ होता है। <br /> <br /> - शिवलिंगी के बीजों को तुलसी और गुड़ के साथ पीसकर नि:संतान महिला को खिलाया जाए तो जल्द ही संतान सुख की प्राप्ति होती है। <br /> <br />
- किडनी की पथरी में तुलसी की पत्तियों को उबालकर बनाया गया काढ़ा शहद के
साथ नियमित 6 माह सेवन करने से पथरी मूत्र मार्ग से बाहर निकल जाती है। <br /> - फ्लू रोग में तुलसी के पत्तों का काढ़ा, सेंधा नमक मिलाकर पीने से लाभ होता है। <br /> <br /> - तुलसी थकान मिटाने वाली एक औषधि है। बहुत थकान होने पर तुलसी की पत्तियों और मंजरी के सेवन से थकान दूर हो जाती है। <br /> <br /> - प्रतिदिन 4- 5 बार तुलसी की 6-8 पत्तियों को चबाने से कुछ ही दिनों में माइग्रेन की समस्या में आराम मिलने लगता है। <br /> <br /> - तुलसी के रस में थाइमोल तत्व पाया जाता है। इससे त्वचा के रोगों में लाभ होता है। <br /> <br /> - तुलसी के पत्तों को त्वचा पर रगड़ दिया जाए तो त्वचा पर किसी भी तरह के संक्रमण में आराम मिलता है। <br /> <br />
- तुलसी के पत्तों को तांबे के पानी से भरे बर्तन में डालें। कम से कम
एक-सवा घंटे पत्तों को पानी में रखा रहने दें। यह पानी पीने से कई
बीमारियां पास नहीं आतीं। <br /> <br /> - दिल की बीमारी में यह अमृत है। यह
खून में कोलेस्ट्रॉल को नियंत्रित करती है। दिल की बीमारी से ग्रस्त लोगों
को तुलसी के रस का सेवन नियमित रूप से करना चाहिए।</span></div>
</span> </span><span class="fsm"><div class="_5yn1" id="u_jsonp_29_u">
<a data-hover="tooltip" href="https://www.facebook.com/anuradha.tadme#" id="js_51" role="button"> </a></div>
</span></div>
</div>
</div>
<div class="photoUnit clearfix">
<a class="photo photoWidth1" data-ft="{"tn":"E"}" data-gt="{"fbid":"659375577433875"}" href="https://www.facebook.com/photo.php?fbid=659375577433875&set=a.173549016016536.31664.100000843150915&type=1&relevant_count=1" rel="theater"><div class="letterboxedImage photoWrap" style="height: 164px; width: 504px;">
<div class="uiScaledImageContainer scaledImage" style="height: 164px; width: 219px;">
<img alt="Photo: तुलसी
तुलसी में गजब की रोगनाशक शक्ति है। विशेषकर सर्दी, खांसी व बुखार में यह अचूक दवा का काम करती है। इसीलिए भारतीय आयुर्वेद के सबसे प्रमुख ग्रंथ चरक संहिता में कहा गया है।
- तुलसी हिचकी, खांसी,जहर का प्रभाव व पसली का दर्द मिटाने वाली है। इससे पित्त की वृद्धि और दूषित वायु खत्म होती है। यह दूर्गंध भी दूर करती है।
- तुलसी कड़वे व तीखे स्वाद वाली दिल के लिए लाभकारी, त्वचा रोगों में फायदेमंद, पाचन शक्ति बढ़ाने वाली और मूत्र से संबंधित बीमारियों को मिटाने वाली है। यह कफ और वात से संबंधित बीमारियों को भी ठीक करती है।
- तुलसी कड़वे व तीखे स्वाद वाली कफ, खांसी, हिचकी, उल्टी, कृमि, दुर्गंध, हर तरह के दर्द, कोढ़ और आंखों की बीमारी में लाभकारी है। तुलसी को भगवान के प्रसाद में रखकर ग्रहण करने की भी परंपरा है, ताकि यह अपने प्राकृतिक स्वरूप में ही शरीर के अंदर पहुंचे और शरीर में किसी तरह की आंतरिक समस्या पैदा हो रही हो तो उसे खत्म कर दे। शरीर में किसी भी तरह के दूषित तत्व के एकत्र हो जाने पर तुलसी सबसे बेहतरीन दवा के रूप में काम करती है। सबसे बड़ा फायदा ये कि इसे खाने से कोई रिएक्शन नहीं होता है।
तुलसी की मुख्य जातियां- तुलसी की मुख्यत: दो प्रजातियां अधिकांश घरों में लगाई जाती हैं। इन्हें रामा और श्यामा कहा जाता है।
- रामा के पत्तों का रंग हल्का होता है। इसलिए इसे गौरी कहा जाता है।
- श्यामा तुलसी के पत्तों का रंग काला होता है। इसमें कफनाशक गुण होते हैं। यही कारण है कि इसे दवा के रूप में अधिक उपयोग में लाया जाता है।
- तुलसी की एक जाति वन तुलसी भी होती है। इसमें जबरदस्त जहरनाशक प्रभाव पाया जाता है, लेकिन इसे घरों में बहुत कम लगाया जाता है। आंखों के रोग, कोढ़ और प्रसव में परेशानी जैसी समस्याओं में यह रामबाण दवा है।
- एक अन्य जाति मरूवक है, जो कम ही पाई जाती है। राजमार्तण्ड ग्रंथ के अनुसार किसी भी तरह का घाव हो जाने पर इसका रस बेहतरीन दवा की तरह काम करता है।
मच्छरों के काटने से होने वाली बीमारी - मच्छरों के काटने से होने वाली बीमारी, जैसे मलेरिया में तुलसी एक कारगर औषधि है। तुलसी और काली मिर्च का काढ़ा बनाकर पीने से मलेरिया जल्दी ठीक हो जाता है। जुकाम के कारण आने वाले बुखार में भी तुलसी के पत्तों के रस का सेवन करना चाहिए। इससे बुखार में आराम मिलता है। शरीर टूट रहा हो या जब लग रहा हो कि बुखार आने वाला है तो पुदीने का रस और तुलसी का रस बराबर मात्रा में मिलाकर थोड़ा गुड़ डालकर सेवन करें, आराम मिलेगा।
- साधारण खांसी में तुलसी के पत्तों और अडूसा के पत्तों को बराबर मात्रा में मिलाकर सेवन करने से बहुत जल्दी लाभ होता है।
- तुलसी व अदरक का रस बराबर मात्रा में मिलाकर लेने से खांसी में बहुत जल्दी आराम मिलता है।
- तुलसी के रस में मुलहटी व थोड़ा-सा शहद मिलाकर लेने से खांसी की परेशानी दूर हो जाती है।
- चार-पांच लौंग भूनकर तुलसी के पत्तों के रस में मिलाकर लेने से खांसी में तुरंत लाभ होता है।
- शिवलिंगी के बीजों को तुलसी और गुड़ के साथ पीसकर नि:संतान महिला को खिलाया जाए तो जल्द ही संतान सुख की प्राप्ति होती है।
- किडनी की पथरी में तुलसी की पत्तियों को उबालकर बनाया गया काढ़ा शहद के साथ नियमित 6 माह सेवन करने से पथरी मूत्र मार्ग से बाहर निकल जाती है।
- फ्लू रोग में तुलसी के पत्तों का काढ़ा, सेंधा नमक मिलाकर पीने से लाभ होता है।
- तुलसी थकान मिटाने वाली एक औषधि है। बहुत थकान होने पर तुलसी की पत्तियों और मंजरी के सेवन से थकान दूर हो जाती है।
- प्रतिदिन 4- 5 बार तुलसी की 6-8 पत्तियों को चबाने से कुछ ही दिनों में माइग्रेन की समस्या में आराम मिलने लगता है।
- तुलसी के रस में थाइमोल तत्व पाया जाता है। इससे त्वचा के रोगों में लाभ होता है।
- तुलसी के पत्तों को त्वचा पर रगड़ दिया जाए तो त्वचा पर किसी भी तरह के संक्रमण में आराम मिलता है।
- तुलसी के पत्तों को तांबे के पानी से भरे बर्तन में डालें। कम से कम एक-सवा घंटे पत्तों को पानी में रखा रहने दें। यह पानी पीने से कई बीमारियां पास नहीं आतीं।
- दिल की बीमारी में यह अमृत है। यह खून में कोलेस्ट्रॉल को नियंत्रित करती है। दिल की बीमारी से ग्रस्त लोगों को तुलसी के रस का सेवन नियमित रूप से करना चाहिए।" class="scaledImageFitWidth img" height="164" src="https://fbcdn-sphotos-d-a.akamaihd.net/hphotos-ak-ash4/t1/1656087_659375577433875_121874114_n.jpg" width="219" /></div>
</div>
</a></div>
<div class="fbTimelineFeedbackHeader">
<div class="fbTimelineFeedbackActions clearfix">
<span class="UFIBlingBoxTimeline"><span data-reactid=".e4"></span></span><span class="UIActionLinks UIActionLinks_bottom" data-ft="{"tn":"=","type":20}"><span><br /></span> </span></div>
</div>
</div>
राजेन्द्र भंडारीhttp://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.com0