अध्यात्म हे आपल्या हृदयातून जन्म घेतं .अध्यात्माचा अर्थ आहे पारदर्शक होणं ,खोलवर आत जाणं .अध्यात्म म्हणजे आपल्या भावना निरंतर विकसित होणं सुद्धा आहे .आपण स्वताशी सतत स्पर्धा करत असतो खरं तर ते वाईट आहे .स्वताहून मोठं होण्यासाठी अध्यात्म आपल्याला खूप मदत करतं त्या साठी प्रार्थनेची गरज असते .आपली प्रार्थना जर सक्षम असेंल तर आपलं जीवनही अध्यात्मिक होईल ..पारदर्शी होईल .त्यासाठी आपण स्वताशी आणि ईश्वराशी प्रामाणिक राहा, आपल्या प्रत्येक विचाराला प्रार्थना बनवा .कारण आपले विचार आपली परिस्थिती कथन करतात .नियमित प्रार्थना करा .फक्त संकटाच्या वेळी अथवा विशेष कारणानेच प्रार्थना नसावी त्यासाठी सकाळ संध्याकाळ प्रार्थनेचा नियम करा. समूहाने प्रार्थना करा ,ती परिणामकारक होते. कुठल्याही प्रसंगात ईश्वरावर विश्वास ठेऊन त्याला समर्पित व्हा .धन्यवाद द्या ..जेव्हा आपण प्रार्थना कराल तेव्हा ईश्वराप्रती कृतग्नता व्यक्त करा .कारण सर्वांगिण विकासासाठीच हे आयुष्य आपल्यला बहाल करण्यात आलेलं आहे .
खरोखरच प्रार्थना दोन स्तरांवर काम करते एक म्हणजे प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला मनशांती मिळते आणि विश्वास निर्माण होतो कि समस्या सुटेल आणि खरोखरच समस्या सुटते .हा तुमच्या प्रार्थनेचा परिणाम असतो 'प्रार्थनेमुळे मनोवृत्तीत बदल होतो आणि तुम्ही योग्य विचार करू लागता . योग्य विचारामुळे योग्य कृती घडते आणि योग्य परिणाम घडून येतात .
खरोखरच प्रार्थना दोन स्तरांवर काम करते एक म्हणजे प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला मनशांती मिळते आणि विश्वास निर्माण होतो कि समस्या सुटेल आणि खरोखरच समस्या सुटते .हा तुमच्या प्रार्थनेचा परिणाम असतो 'प्रार्थनेमुळे मनोवृत्तीत बदल होतो आणि तुम्ही योग्य विचार करू लागता . योग्य विचारामुळे योग्य कृती घडते आणि योग्य परिणाम घडून येतात .
Raj.
ReplyDeletetumach Adhyatma aavadale.kharokharach prarthane mule mansachya vruttit badal hoto.