Tuesday, January 13, 2015

एकदा वाचाच...

दिन दिन दिवाळी...dead body ओवाळी!!
दिवाळीला नरकासुराचा वध झाला. पण आता नरकासुराची जागा घेतली आहे सामान्य भारतीयांनी.. दिवाळी असो किंवा आणखी कोणताही सण अथवा खास प्रसंग. सामान्य भारतीयाला जिवंतपणी dead body बनवलं जातं. होय, आपल्यापैकी अनेकजण dead body आहेत... जिवंत असतानाच!! आणि दिवाळीत तर ह्या dead body ला लुटायचा plan तयार आहे.
दिवाळीच नाही तर दर सणाला, दररोज आम्हाला जिवंत असताना मारल जातं..मेलेल्यांच्या खिशातून पैसे काढायला सोपं असतं ना...आणि मारणारे स्वत आनंदाने मरण्यासाठी पैसे मोजतात. कोण बनवतं आम्हाला नरकासुर?
Department of Health and Human Services (DHHS) ने संपूर्ण जगातील आरोग्यसेवकांना कळवल आहे कि Formaldehyde हे रसायन cancer ला आमंत्रण देतं. Formaldehyde जीव जंतू ठार करतं. जर एखादं प्रेत जास्त वेळ ठेवायचं असेल, ते लवकर कुजू द्यायचं नसेल तर त्यावर Formaldehyde लावतात. जेणेकरून प्रेत लवकर सडत नाहीत. आता हे स्पष्ट आहे की, जिवंत असताना हे रसायन आपण लावणार नाही. पण आपण हे रसायन चेहऱ्यावर थोपतो. अंगावर फासतो. FDA (Food and Drug Administration) ने आणखी एका रसायनावर बंदी आणली आहे...त्याच नाव आहे...benzene. ह्या रसायनाची खासियत म्हणजे हे एकदा प्यायलं की पुन्हापुन्हा प्यायची इच्छा होते. आपण soft drink पुन्हा पुन्हा का पितो. कारण अनेक soft ड्रिंक मध्ये हे रसायन मिसळतात. आम्ही लहान मुलांना ते देतो, पाहुण्यांना देतो....सगळे addict बनतात. soft drink बनवणार्या कंपनीला कायमचे ग्राहक मिळत राहतात. आता तर दिवाळीच आहे. पिझ्झा-burger ची जोरात खरेदी होईल..दिवाळी साजरी करत नाहीत celebrate करतात. पिझ्झा, buger आणि soft ड्रिंक्स पिवून. पिझ्झा base सडू नये, त्यावरील मांस कुजू नये म्हणून त्यात काय मिसळतात?....ऑस्ट्रेलिया येथे KFC मध्ये chicken Twister wrap खाललेल्या मोनिका सामन ह्या तरुणीला salmonella encephalopathy ह्या मेंदू दुखापतीचा सामना करावा लागला. Justice Stephen Rothman ह्यांनी ह्यासाठी KFC ला जबाबदार धरलं. (ref : KFC guilty in Australia salmonella brain damage case ).
... आणि Formaldehyde तर रोजच्या जीवनाचा भाग झाला आहे...खासपणे महिला ह्याचा भरपूर वापर करतात. दिवाळी मध्ये तर दुप्पट वापर होणार आहे. हे रसायन पुढील product मध्ये असत:
Lotions
Shampoos
Sunblock
Soap Bars
Cosmetics
Body Wash
Toothpaste
Baby Wipes
Bubble Bath
वरील product तुमचा चेहरा, तुमचं शरीर फ्रेश ठेवतात. अगदी खरोखर फ्रेश ठेवतात. कारण त्यातील Formaldehyde तुमच्या त्वचेवर जंतू बसू देत नाही. बसले तर त्यांचा नाश करतात. सोबत तुमच्या पेशींचाही नाश करतात. तुम्ही सुंदर दिसता की नाही हे माहित नाही. पण dead body बनता. स्वताच्या पैशाने.
ह्याच कारणामुळे स्वीडन आणि जपान देशांनी अश्या products वर बंदी आणली आहे. कारण आपल्या नागरिकांना nasopharyngeal cancer आणि myeloid leukemia होऊ नये हा त्यामागचा हेतू आहे. आपले नागरिक गंभीर आजारी झाले, cancer ग्रस्त झाले तर देशाचं नुकसान आहे हे जपान आणि स्वीडन ला कळत. पण भारतात ह्या कंपन्या राजरोस धंदा करतात. कारण त्या globalization च्या नावाखाली भारतात घुसल्या आणि इथल्या लोकांचं आरोग्य बिघडलं तर त्यांना फायदा होणार आहे...कारण आरोग्य देणाऱ्या सेवा सुध्धा तेच चालवतात. म्हणजे जिवंत राहिला तरी ग्राहक आणि मारायला टेकलात तरी ग्राहक. भारत फार मोठी बाजारपेठ आहे...जगताना मारणाऱ्यांची, मरत-मरत जगणार्यांची.
noodles meats मधेही अशीच रसायन वापरली जातात. भारत फार मोठा आहे, आपल्या हवामानात खाद्य पदार्थ सामान्य तापमानात फार तर 48 तास टिकतात. त्यामुळे जे product भारताच्या कानाकोपर्यात न्यायचे त्यांना ताज्या स्वरुपात टिकवण्यासाठी रसायने लावतात. शिवाय ह्या product चं शेल्फ life वाढतं...रसायनांमुळे सहा महिने टिकून राहतात. लहान मुले चिप्स, वाफेर्स आणि असे आकर्षक दिसणारे पदार्थ खातात. आपण घरी मुलाला ६ दिवस आधीच दूध पाजत नाही. पण chocolate ....ते तर वाढदिवसाला असतंच. सणाला मिठाई बाजूला झाली, chocolate देतात-घेतात. त्यात दुध असल्याच सांगतात. कोणत्याही रस्त्यावरील दुकानात ४ ते ६ महिने दूध टिकवण्यासाठी त्यात काय मिसळतात?
साधारण २० वर्षांपूर्वी dentist शोधावा लागायचा. कारण तेव्हा chocalate फार मिळत नसत. कोणी खात नसत. आता एका गल्लीत चार dentist मिळतात आणि बाजूला chocolate विकणारी दहा दुकानं असतात. आणि soft ड्रिंक, पिझ्झाचा पाउस पडतो. एका दुकानात खा-प्या आणि बाजूच्या दवाखान्यात जा. पुन्हा त्या दवाखान्यात विदेशी कंपन्या बसल्याच आहेत...आरोग्य सेवक बनून. त्यांच्या गोळ्या महाग असतात. तरीही त्याच मिळतात. कारण त्या विकणार्याला चांगला मर्जीन मिळतो. शिवाय toothpaste जर खरच मजबूत दात देतात तर त्या भारतात आल्यापासून दातांचे रुग्ण वाढणे हा फक्त योगायोग आहे का?
असे product वापरून एक तर आपण dead body बनतो..आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायला भाग पाडतो. कारण नारळ पाणी, लिंबाचा रस, ताक, लस्सी, नीरा हे पेय न पिता विदेशी कंपन्यांचे ड्रिंक्स पितो. फायदा जातो विदेशी कंपनीच्या खिशात आणि आपले शेतकरी भरपूर पिक काढूनही कंगाल होतात. स्व-हस्ते मरण स्वीकारतात. जर साखर सम्राट होऊ शकतो तर लिंबू सम्राट, नारळ सम्राट का होऊ शकत नाही. साखरे इतकीच नारळ-लिंबाची गरज असते. पण लिंबू, नारळाचं पाणी, उसाचा रस hygenic नसतो असा प्रचार केला जातो. कोण करतं हा प्रचार? ज्यांना हे पदार्थ अडचण ठरतात ते. cola कंपन्या भारतात आल्या तेव्हा त्यांनी strategy आखली...लिंबू, नारळ, लस्सी ह्यांना बाजारातून हाकलायच. तरच भारतीय लोक आपले ड्रिंक्स पितील.... आणि अस भाषण jeorgia मध्ये झालं, गांधीजींच्या पुतळ्याखाली.
साधारण ११९५ साली cola कंपन्यांनी मोहीम सुरु केली आणि आज २०१४ मध्ये ते यशस्वी झाले. शत प्रतिशत विजयी ठरले. आता ड्रिंक्स वर प्रचंड उलाढाल होते. विदेशी कंपन्या अमाप नफा कमवतात आणि शेतकरी मात्र आत्महत्या करतात. पाणी विकणारे तेजीत आहेत आणि अन्न पिकवणारे कर्जबाजारी. अन्न तयार करणाऱ्याच product कोणी घेत नाही. शेतकरी मेले. आता पाळी आहे दूध उत्पादकांची. कारण मिठाई मध्ये sugar , calories असतात म्हणे....पण chocolate , noodles आरोग्याला चांगले असतात. त्यामुळे सण, खास प्रसंग chocolate ने साजरा करतात. म्हणून मिठाईची दुकानं संपत चालली, लोक संख्या वाढली आणि मिठाई, किराणा दुकाने कमी झाली..कारण mall आले आहेत . मिठाई विकणारे भारतीय आहेत. त्यांची मिठाई पद्धतशीर पाने बदनाम केली जाते. mall मधील brands ला खपवण्यासाठी सिने-क्रिकेट स्टार तयार आहेत. त्यात काय मिसळतात ते नंतर उघडकीला येत. तोवर सदर कंपन्या रग्गड नफा कमावून मोकळ्या होतात. कित्येकांना रुग्ण बनवतात. इकडे मालाला मागणी न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो. सध्या केळ्यांची अशीच बदनामी चालू आहे. केळं खाल्ल्यामुळे १०० % cancer होतो. आणि पिझ्झा, बर्गर, noodle , snack आरोग्य देतात. म्हणजे तुम्ही केळी खावू नका. शेंगदाणे, फुटाणे, कुरमुरे, डाळी, काकडी, गाजर असे अनेक पदार्थ खावू नका. ते healthy नाहीत. शिवाय कुरमुरे खातो तो गरीब, backward समजला जातो. पिझ्झा खातो तो updated असतो. त्यामुळे पिझ्झा कंपन्या updated होत जातात आणि भारतीय शेतकरी out ऑफ date .
पिझ्झा कंपन्यांना AC दुकाने आणी रस्त्यावर भाजी विकणाऱ्या भारतीय महिलेला उन-पावसाचा मारा सहन करावा लागतो. शहरातील भरगच्च रस्त्यावर लघवी करायला जागा नसते, म्हणून ह्या महिला चहा-पाणी पीत नाहीत. किंवा चार-पाच तासात भाजी उचलून घरी जाव लागत.
जर भारतीयांनी ठरवल की मी फक्त माझ्या शेतकर्याने बनवलेलं product घेईन तर शेतकरी cola कंपन्या इतकी भरभराट पाहू शकतील. ते तुम्हाला dead body बनवणार नाहीत. घातक रसायन थोपणार नाहीत.
चला दिवाळी साजरी करू, जिवंत माणसांची...आनंदाने जगू शकणार्या भारतीय शेतकऱ्यांची...आणि त्या नरकासुराला दूर करूया जो भारतात घुसला आणि आम्हालाच मारायला निघाला आहे.
आमचा देश आधी सापांचा, गुलामांचा देश म्हणून ओळखला जायचा...आता तो dead body चा देश बनवायचा नाही!!
-निरेन आपटे

No comments:

Post a Comment