Tuesday, February 22, 2011

वर्तमान
वर्तमान क्षण अगदी मूल्यवान का असतो? एक कारण म्हणजे तोच क्षण सत्य असतो.जे काही आहे ते वर्तमान क्षणातच आहे. अखंडित वर्तमान हाच एक घट्क शाश्वत आहे.जीवन जे काही आहे ते आता या क्षणी आहे वर्तमानात आहे.तुमचं वर्तमान जीवन अस्तित्वात नव्ह्तं असं कधीच पूर्वी झालेलं नाही.भविष्यात
तस होणारही नाही . दुसरं म्हणजे वर्तमान क्षणच तुम्हाला मनाच्या बंदिस्तीतुन मुक्त करतो. मनापलीकडे नेतो. तोच एक बिंदु आहे, जो तुम्हाला काळ विरहीत आणि निराकार अस्तित्वाच्या साम्राज्यात नेतो.
                                                  
                                                                एखार्ट टॉल.

Friday, February 18, 2011

अध्यात्म

अध्यात्म हे आपल्या हृदयातून जन्म घेतं .अध्यात्माचा अर्थ आहे पारदर्शक होणं ,खोलवर आत जाणं .अध्यात्म म्हणजे आपल्या भावना निरंतर विकसित होणं सुद्धा आहे .आपण स्वताशी सतत स्पर्धा करत असतो खरं तर ते वाईट आहे .स्वताहून मोठं  होण्यासाठी अध्यात्म आपल्याला खूप मदत करतं त्या साठी प्रार्थनेची गरज असते .आपली प्रार्थना जर सक्षम असेंल तर आपलं जीवनही अध्यात्मिक होईल ..पारदर्शी होईल .त्यासाठी   आपण स्वताशी आणि ईश्वराशी प्रामाणिक राहा,  आपल्या प्रत्येक विचाराला प्रार्थना बनवा .कारण आपले विचार आपली परिस्थिती कथन करतात .नियमित प्रार्थना करा .फक्त संकटाच्या वेळी अथवा विशेष  कारणानेच प्रार्थना नसावी त्यासाठी सकाळ संध्याकाळ प्रार्थनेचा नियम करा. समूहाने प्रार्थना करा ,ती परिणामकारक होते. कुठल्याही प्रसंगात ईश्वरावर विश्वास ठेऊन त्याला समर्पित व्हा .धन्यवाद द्या ..जेव्हा आपण प्रार्थना कराल तेव्हा ईश्वराप्रती कृतग्नता व्यक्त करा .कारण सर्वांगिण विकासासाठीच हे आयुष्य आपल्यला बहाल करण्यात आलेलं आहे .
           खरोखरच प्रार्थना दोन स्तरांवर काम करते एक म्हणजे प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला मनशांती मिळते आणि विश्वास निर्माण होतो कि समस्या सुटेल आणि खरोखरच समस्या सुटते .हा तुमच्या प्रार्थनेचा परिणाम असतो 'प्रार्थनेमुळे मनोवृत्तीत बदल होतो आणि तुम्ही योग्य विचार करू लागता . योग्य विचारामुळे योग्य कृती घडते आणि योग्य परिणाम घडून येतात .

Sunday, February 13, 2011


 हे नियंत्या....

वाणी माझी नित्य
      सांगे तुझे सत्य
मात्र तू अव्यक्त
        प्रेरणा माझी .

इवलेसे मन
         त्यात तुझे पण
सामावला तूच
          गात्रोगात्री.

सरावले भास
         त्यात तूच खास
अंथरले श्वास
 तुझिया साठी.....

Friday, February 4, 2011

Kavita

     मन
मन साय...   मन माय
मन जाणीवांचे पाय
मन गही-या अंधारी खोल बुड्त  जाय.
   तळ गाठला गाठला म्हणता,
मांडे अंतराली ठाण,
गेलं डोंगरी कपारी ,
ही-या-माणकांची   खाण.
मन हासरं वासरू ,
कधी चौखूर  उधले,
 देता क्षणी मीठी त्याला
होते लाजरे -बुजरे .

सर्व काही ठाउक त्याला
नसे क्षणाचा ही विसावा,
गोंजारीता मऊ हाते
मन आरसा दिसावा.

  मन कावरे- बावरे
मन चल बिचल,
मन करता एकाग्र
होते स्थिर अचल.

मन, घन -गंभीर डोह
त्याचा सापडे ना थांग,
मन माझा ज्ञानदेव
मन माझा पांडुरंग.

राजेंद्र भंडारी


                                                       
                                                                 

Thursday, February 3, 2011

 का ? कशासाठी ?


नमस्कार
आनंदतरंग हे माझ्या ब्लॉग चं नाव.. हे का? आणि कशासाठी?  असा प्रश्न मलाही पडला होता ,आणि मग सुरु झाली भ्रमंती मायाजालाच्या विश्वात...आणि बघता बघता हज्जारो माझ्यासारखे लेखन वीर सापडले .वेगवेगले विषय , रंगीबेरंगी कविता
मनाला चटका लाउन जाणारे अनुभव ,सुन्दर फोटोग्राफी असं काय आणि किती सांगू ... बस्स ..मन तिथच गुंतून पडलं .आणि
सुरु झाली ही साहित्य सफ़र . तसा मी अजुन ब्लॉग विश्वातल्या इयत्ता पहिलीतच आहे ..पण मला खात्री आहे माझ्या ब्लॉग मित्रांच्या सहकार्याने मी लवकरच पुढे जाईन. आपणा सर्वांचे मला आशीर्वाद हवेत ..