Monday, December 30, 2013

हे बंध जीवनाचे... प्रशांत दिक्षीत.

हे बंध जीवनाचे..

हल्लीचा समाज व्यक्तिनिष्ठ आहे असं म्हणतात. पण मानवी गुणसूत्रांचे बंध मात्र पिंडी ते ब्रह्मांडी याचीच खात्री पटवून देत आहेत..

जगणे म्हणजे स्वत:ला सतत कशाशी तरी जोडत राहणे. माणूस एकटा असा कधी नसतोच. तो कुणाबरोबर नसला तरी स्वत:बरोबर असतो. स्वत:शी संवाद करीत असतो. हा संवादही खुंटला तर तो वेडापिसा होता. एकटा राहात असतानाही तो रोज कोणा ना कोणाशी जोडला जात असतो. जगाचा संसार हे परस्परसंबंधांचे अवाढव्य जाळे आहे. कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, व्यावहारिक अशा असंख्य संबंधांची नवी जोडणी सतत होत असते वा जुन्या जोडणीमध्ये परिवर्तन होत असते आणि या जोडण्या एकमेकांवर प्रभाव टाकीत असतात. नेटवर्कशिवाय माणूस जगूच शकत नाही. निसर्ग म्हणजे नेटवर्क आणि त्यात माणूस आलाच.

यात नवीन काय सांगितले असा प्रश्न पडेल. माणूस प्रतिक्षणी स्वत:ला कशा ना कशाशी जोडतो, त्याशिवाय तो विचारच करू शकत नाही यात नवीन काहीही नाही. नवीन बाब ही आहे की, माणसांच्या या असंख्य जोडण्या आता प्रत्यक्ष पाहता येतात. त्यांचा अभ्यास करता येतो. त्यांचे विश्लेषण करता येते. त्यावरून निष्कर्ष काढता येतात आणि पुन्हा ते निष्कर्ष तपासून पाहता येतात. माणूस कसा जगतो हे प्रत्यक्ष पाहताना त्याचा अभ्यास करता येणे हे तंत्रज्ञानामुळे साध्य झाले. यातूनच 'नेटवर्क रीसर्च' ही नवी शाखा उदयाला आली. या शाखेने सुरू केलेल्या अभ्यासातून माणूसच माणसाला अधिक समजून घेऊ लागला आहे.

मोबाइल, इंटरनेट, फेसबुक, गुगल अशी अनेक साधने आपण वापरतो. त्यांच्यामार्फत अनेक व्यवहार करतो. संदेश पाठवितो, बोलतो, माहिती विचारतो, माहिती सांगतो, सल्ला मागतो, सल्ला देतो, चौकशा करतो, अफवा पसरवितो, गॉसिप करतो. असंख्य उद्योग याच्यामार्फत होतात. माणूस पूर्वीही हे करीत होता, पण त्याची नोंद किंवा रेकॉर्डिग होत नव्हते. आता नोंद होते. या सर्व व्यवहारातून आपला स्वभाव प्रगट होत असतो. केवळ आपलाच नव्हे, तर आपल्या समाजाचा, आपल्या गटाचा, आपल्या व्यवसायाचा. आपल्या स्वभावाचे असे अनेक पैलू नोंदले जात असतात. माणूस समजून घेण्यासाठी याहून उत्तम सामग्री कुठली? माणूस जसा आहे तसा, त्यामध्ये काहीही फेरबदल न करता, त्याच्या हालचालीतून निरखता येतो, त्याचा अभ्यास करता येतो. अब्जावधी माणसांचा असा अद्ययावत डेटा आज जगात प्रतिक्षणी तयार होत आहे आणि अत्यल्प प्रमाणात त्याचा अभ्यासही सुरू झाला आहे.

या माहितीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ती प्रतिक्षणी तयार होत असते. म्हणजेच ती जिवंत असते. ताजी, टवटवीत असते. माणसाचा अभ्यास करण्यासाठी पूर्वी त्याच्या मुलाखती घेतल्या जात. आजही मानसोपचार करणारे रुग्णाच्या मुलाखती घेतात, परंतु मुलाखतीत माणूस पूर्ण उघडा होत नाही. अनेक गोष्टी तो झाकून ठेवू शकतो. मात्र दूरसंचार तंत्रज्ञानाचा वापर करताना तो जसा आहे तसाच दिसतो. मानसोपचारतज्ज्ञाला रुग्णाची मुलाखत घेऊन जितकी माहिती मिळेल, त्याच्या कैकपट अधिक माहिती त्याच्या मोबाइल संभाषणाच्या टेप्स ऐकल्या तर मिळेल.
माणसाकडून सतत प्रगट होत जाणारी ही माहिती सच्ची असते आणि म्हणूनच मौल्यवान असते. शास्त्रज्ञांना तिचे मोल कळते. कारण अशा सच्च्या माहितीच्या आधारे गृहीतक मांडता येते. एकदा गृहीतक हाती आले की संशोधनाला दिशा येते. मग हे गृहीतक अधिक माहिती मिळवून किंवा प्रयोग करून तपासता येते. अशा चोख तपासण्या झाल्या की गृहीतकातून निश्चित निष्कर्ष काढता येतो आणि आपल्या हातात वैश्विक नियम येतात. निसर्गातील असे अनेक नियम आपण शोधून काढले, पण ते मुख्यत: स्थूल सृष्टीतील होते. आता निसर्गातही अनेक चमत्कृती समोर आल्या आहेत, स्थूल सृष्टीपेक्षा सूक्ष्म सृष्टीचा पसारा अवाढव्य म्हणावा असा आहे व त्यात अधिकाधिक नवीन गोष्टी लक्षात येत आहेत. निसर्गातील या नव्या गोष्टींची माहिती अखंड जमा होते व संगणकात साठत राहते. त्यात भर पडत आहे ती माणसाच्या माहितीची. पण नुसती माहिती असून चालत नाही. केवळ माहितीवर आधारित निष्कर्ष चुकीचे ठरतात. निसर्गातील व माणसांमधील अनेक घटकांबद्दल खूप माहिती मिळू शकते व तशी ती जमा झालीही आहे. आता समस्या आहे ती या असंख्य घटकांमधील परस्परसंबंध शोधून काढण्याची. हे परस्परसंबंध पूर्ण चित्र समोर आणतात, नुसती माहिती तसे चित्र देत नाही. हे परस्परसंबंध म्हणजेच नेटवर्क. हे परस्परसंबंध जितेजागते असतात व ते जिवंतपणीच समजून घ्यायचे असतात. नुसते घटक माहीत झाले तर जंत्री तयार होते. जंत्रीतून बौद्धिक आनंदापलीकडे हाती काही लागत नाही. मात्र परस्परसंबंध जेव्हा कळून येतात तेव्हा ती माहिती आपल्याला कृतिशील करू शकते.

'ह्य़ूमन जेनोम प्रोजेक्ट'वरून ही बाब स्पष्ट होईल. माणसाच्या गुणसूत्रांची माहिती या प्रकल्पातून जगासमोर आली. त्यामुळे रोगांवर हमखास इलाज करणारी औषधे शोधता येतील असे सांगितले गेले. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. उलट औषधांची संख्या बरीच कमी झाली. याचे कारण अनेक औषधे कुचकामी आहेत हे नव्या माहितीतून समजले जरी असले, तरी खरे कारण म्हणजे गुणसूत्रांची माहिती झाली असली तरी त्यांच्या आपापसातील परस्परसंबंधांची तितकीशी माहिती आपल्याला अद्याप झालेली नाही. त्यांचे नेटवर्क कसे काम करते हे अद्याप कळलेले नाही. या प्रकल्पातून पुढे आलेली माहिती महत्त्वाची नक्कीच आहे, पण ती पुरेशी नाही. त्यातून रोगाचे डायनॅमिक्स अद्याप कळत नाही, कारण ते डायनॅमिक्स हे गुणसूत्रांच्या परस्परसंबंधांवर अवलंबून आहे. मोबाइल, गुगल वापरणाऱ्या माणसाकडून जशी जिवंत माहिती मिळते, तशी या गुणसूत्रांतून अद्याप मिळायची आहे. त्यासाठी गरज आहे ती नेटवर्किंगच्या विशेष अभ्यासाची.

अल्बर्ट लाझारो बाराबसी हे नॉर्थईस्टर्न विश्वविद्यालयातील 'सेंटर फॉर कॉम्प्लेक्स नेटवर्क रीसर्च'चे प्रमुख आहेत. त्याच्या प्रयोगशाळेतील एक शाखा ही वैद्यक व जीवशास्त्रातील नेटवर्किंगचा अभ्यास करते. बाराबसी यांचा प्रश्न साधा आहे. मोटारीमध्ये सुमारे पाच हजार पार्ट असतात. ती नादुरुस्त झाली की मॅकॅनिक ती दुरुस्त करतो, कारण त्याला सर्व पार्टची माहिती असते. मग शरीरातील सर्व पार्ट माहीत असताना गुंतागुंतीचा आजार झाला की डॉक्टरांना ते सहजतेने दुरुस्त का करता येत नाहीत? याचे उत्तर मॅकॅनिककडे असलेल्या मोटारीच्या ब्लूप्रिंटमध्ये आहे, असे बाराबसी यांचे म्हणणे. या ब्लूप्रिंटमध्ये असलेला 'वायरिंग डायग्राम' हा मोटारीची खरी माहिती देतो, पार्टस् नव्हेत. याचप्रमाणे शरीरातील असंख्य घटकांचे परस्परसंबंध तपासून पाहिले तरच रोग का होतो, कधी होतो व कसा होतो हे समजून घेता येईल. बाराबसींच्या प्रयोगशाळेत हेच केले जाते. अस्थमा, हृदयरोग, कर्करोग अशा आजारात पेशींमधील नेटवर्कमध्ये काय समस्या निर्माण होतात, कोणते नेटवर्क कुचकामी ठरते वा नवे तयार होते याचा अभ्यास तेथे सुरू आहे. रोगाचे पेशीतील मूळ व त्या पेशीचा अन्य पेशींचा येणारा संबंध यावर सर्व लक्ष केंद्रित केले आहे. यातूनच ब्रेकथ्रू मिळेल अशी खात्री त्यांना वाटते.

हेच मॉडेल आर्थिक क्षेत्राला लावले पाहिजे असा बाराबसी यांचा आग्रह आहे. मात्र तेथे सर्व माहिती उघड केली जात नाही. रुग्णांची खरी माहिती रुग्णालयांतून मिळते. प्रसंगी त्यांना प्रयोगशाळेत बोलावता येते. आर्थिक क्षेत्रातील सर्व घटकांची अशीच माहिती मिळाली व त्यातील परस्परसंबंध तपासून पाहता आले तर या समस्या सोडविण्यासाठी नवीन दृष्टी मिळेल, असे बाराबसी यांनी म्हटले आहे. त्यांच्या प्रयोगशाळेत आर्थिक विषयांचा अभ्यास होत नाही, पण सामाजिक विषयांचा होतो. वर म्हटल्याप्रमाणे माणसाचा स्वभाव प्रगट करणारी जास्तीत जास्त माहिती जमा करून त्यातील परस्परसंबंध प्रयोगशाळेत तपासून पाहिले जातात. मग लक्षात येते की माणसाला समजून घेण्यासाठी एकच शास्त्र उपयोगी पडत नाही. जीवशास्त्राबरोबर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अशा अन्य शास्त्रांमधील नेटवर्कही तपासून पाहावे लागते. किंबहुना, नेटवर्क कसे काम करते, या मुख्य प्रश्नाचाही वेध घ्यावा लागतो. आज बाराबसी यांच्यासाठी तोच मोठा प्रश्न आहे आणि पुढील काळात विज्ञानालाही याच प्रश्नावर काम करावे लागणार आहे.

या संशोधनातून दोन मुख्य बाबी पुढे आल्या आहेत. नेटवर्क, मग ते कोणतेही असो, ते नेटवर्क स्वत:चे नियम तयार करते व नियमाबरहुकूम काम करते. जगात अस्ताव्यस्त अशी कोणतीही गोष्ट नाही. घटना घडू लागली की पॅटर्न तयार होतातच आणि त्या साच्याबरहुकूम पुढच्या घटना घडत जातात. भरपूर माहिती जमा झाली व त्यांच्यातील परस्परसंबंध नीट समजला की हे साचे लक्षात येतात.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सर्व माणसांसाठी हे साचे किंवा वर्तणुकीचे पॅटर्न अगदी समान आहेत. ते मोजकेच आहेत, पण सारखेच आहेत. हल्लीचा समाज हा व्यक्तिनिष्ठ आहे. व्यक्तीच्या वैशिष्टय़ांना अधिक महत्त्व दिले जाते. या तत्त्वज्ञानाच्या प्रभावाखाली असल्याने जगातील माणसांचा अभ्यास करताना असंख्य वेगवेगळे साचे मिळतील असे बाराबसी यांना वाटले होते, पण तसे त्यांना आढळले नाही. उलट वर्तणुकीचे साचे सारखेच दिसले. मग जगातील पाच प्रमुख खंडातील माणसांची माहिती गोळा करण्यात आली. आफ्रिकेतील माणूस व अमेरिकेतील माणूस यांच्यात फरक दिसला पाहिजे होता. पण तेथेही तो दिसेना. तुलनात्मक अभ्यास करण्याचे प्रकल्प त्यामुळे बंद केले गेले, कारण तुलना करण्याजोगा फरकच आढळेना. जगात कुठेही जा, श्रीमंत असो, गरीब असो, झोपडीत असो, बंगल्यात असो, स्त्री असो पुरुष असो, माणसाचे वर्तन ठरविणारे साचे सारखेच आहेत. 'माणसांमधील फरक शोधणे हेच मोठे आव्हान झाले आहे, कारण जमा होत असलेली अवाढव्य माहिती माणसातील साम्यच ठळकपणे दाखविते,' असे बाराबसी यांनी प्रांजळपणे कबूल केले आहे. पिंडी ते ब्रह्मांडी या भारतीय तत्त्वविचाराची खात्री पटविणारा हा अस्सल पुरावा आहे.
अजून कित्येक डेटा शास्त्रज्ञांसमोर आलेला नाही. कंपन्या तो देत नाहीत. हा डेटा संशोधनासाठी मिळावा म्हणून काही शास्त्रज्ञांनी मोहीम सुरू केली आहे. माणसाला समजून घेण्यासाठी त्यांना ही माहिती हवी आहे, उत्पादन खपविण्यासाठी नव्हे. या संशोधनाचे महत्त्व आणखी एका गोष्टीसाठी आहे. जगातील जिवंत माहिती फक्त साचे निर्माण करीत नाही, तर ती स्वत:च स्वत:चे नियंत्रण करते, स्वत:ची व्यवस्था लावते. याबद्दलचा बाराबसी यांचा संशोधन निबंध जगात गाजतो आहे. एडवर्ड डी बोनो यांनी दोन दशकांपूर्वी 'सेल्फ ऑर्गनायझिंग सिस्टीम' अशी मनाची ओळख करून दिली होती. तो प्रकार प्रत्यक्षात कसा घडतो ते आता पाहता येते. माणूस गोंधळ घालतो आणि व्यवस्थाही निर्माण करतो. हे सर्व कळत-नकळत होत असते. परस्परसंबंधांचे जाळे कळले की माणसाला स्वत:चीच ओळख होईल. तो शहाणा होण्यासाठी याचीच गरज असते आणि भारतीय अध्यात्मही याचाच आग्रह धरते.

- प्रशांत दीक्षित

Friday, December 27, 2013

अंधश्रद्धा नकोच.....शिवराज गोर्ले.

अंधश्रद्धा नकोच ! ! 'परमेश्‍वराला रिटायर करा!' असं डॉ. श्रीराम लागू यांनी जाहीर आवाहन केलं होतं, तेव्हा त्यावर बरीच उलटसुलट चर्चा झाली होती. "लोकांनी देव या कल्पनेचा त्याग करावा' असाच त्यांचा आजही आग्रह असतो. याचं कारण सगळ्या अंधश्रद्धेचं मूळ "देव' या कल्पनेत आहे, असं त्यांना ठामपणे वाटतं. माणसानं तर्कानं, विवेकानं जगावं. भाबड्या, भ्रामक कल्पनांच्या आधारे नव्हे, तर स्वतःच्या बुद्धीच्या आधारानं; वैज्ञानिक दृष्टीनं जगावं, असं त्यांना सुचवायचं आहे आणि त्यात चुकीचं तर काहीच नाही. हे सगळं खरं असलं तरी लोक देवाला रियाटर करायलाच काय, थोडीबहुत रजा द्यायलाही तयार नाहीयेत. त्यातून आपल्याकडे तर तेहतीस कोटी देव. देवांची अगदी रेलचेल आहे. दिवसेंदिवस देवळेही वाढताहेत. देवांचे उत्सवही मोठ्या थाटामाटात केले जाताहेत. त्यांना "धर्माचं' पाठबळ असतं. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणारी मंडळी "आयटी'त करिअर करणारे तरुण-तरुणीही सिद्धिविनायकाच्या दर्शनाला तास न्‌ तास रांगेत उभे राहतात. त्यातून अमिताभ बच्चनसारखा सुपरस्टार पहाटे उठून घरापासून अनवाणी चालत, सिद्धिविनायकाला येतो तेव्हा लोकांच्या श्रद्धेतही "ग्लॅमर'ची भर पडते. एक तर मान्य करावं लागतं, "देव' ही संकल्पना युगानुयुगे चालत आली आहे. देवानं माणूस निर्माण केला की माणसानं देवाला जन्म दिला, यावर चर्चा होत राहतील; पण देव ही माणसाची एक "गरज' आहे असं दिसतंय. अत्यंत कडक नास्तिक मंडळीही आयुष्याच्या अखेरीस "देव असेल का हो?' असा विचार करीत असल्याचीही उदाहरणं आहेत. तात्पर्य काय, "देव आहे की नाही' याचं ठोस उत्तर देता येणार नाही. कुणी दिलं तर ते मान्य केलं जाणार नाही. "देव मानता का?' या प्रश्‍नातच त्याचं खरं उत्तर आहे. "जो मानावा' लागतो, त्याच्या अस्तित्वाचा पुरावा कसा देणार? आता पुढचा प्रश्‍न. देव संकटातून तारतो का? या प्रश्‍नाचं उत्तर असं देता येईल- संकटं दोन प्रकारची असतात. खरी आणि आभासी. भूकंप, त्सुनामी या खऱ्या संकटांतून देव तारू शकत नाही असंच दिसतं. भूकंपात फक्त अश्रद्ध माणसंच गाडली जातात असं होत नाही. मात्र "भुताची भीती' या आभासी संकटातून एखाद्याला "रामनाम' तारून नेऊ शकतं! त्या प्रसंगी आवश्‍यक ते "बळ' देऊ शकतं, अर्थात "भूत वगैरे काही नसतं!' हा विवेक दृढ असेल तर केव्हाही अधिक श्रेयस्कर. खऱ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नच करावे लागतात; पण श्रद्धेमुळे अशा प्रसंगीही मानसिक बळ व शांती मिळते, असा अनेकांचा अनुभव असतो. आता "योगशास्त्र' जगभर अभ्यासलं जातंय. "योग' म्हणजे देवाशी जोडलं जाणं असंच म्हटलं जातं.हा विषय गहन आहे. एका छोट्याशा लेखात "जळी स्थळी' असणाऱ्या "देवा'ला कसं बसवणार? "मजेत जगावं कसं?' या माझ्या पुस्तकात मी हा गहन प्रश्‍न माझ्या पद्धतीनं सोडवून टाकला आहे, कसा ते इथं थोडक्‍यात सांगतो. देव म्हणजे काय, याचं एक सर्वमान्य उत्तर असतं, देव म्हणजे अनादि, अनंत शक्ती. बरं, देवाचा अंश प्रत्येकात असतो असंही म्हटलं जातं. आता आपल्या प्रत्येकात हा अंश कुठल्या स्वरूपात असतो? आपल्या "अंतर्मनाची अमर्याद शक्ती' ही मानसशास्त्रानं स्वीकारलेली संकल्पना आहे. ही अमर्याद शक्ती म्हणजे त्या अनादि, अनंत शक्तीचा अंश असू शकेल, नाही का? आपण "स्वयंसूचना' देऊन अंतर्मनाची शक्ती जागी करू शकतो, वापरू शकतो हेही मानसशास्त्रीय सत्य आहे. देवाची आपण प्रार्थना करतो तेव्हा देव ऐकतो की नाही, माहिती नाही; अंतर्मन नक्की ऐकत असतं. थोडक्‍यात काय, प्रार्थना ही एक स्वयंसूचनाच असते. स्वतःसाठी प्रार्थना करतो तेव्हा आपण "इच्छाशक्ती' वापरतो. इतरांसाठी प्रार्थना करतो तेव्हा शुभेच्छांची शक्ती वापरतो! बस्‌, माझ्यापुरता हा तिढा मी असा सोडवला आहे. मग माझ्या घरात देवाचा फोटो नाही, मी देवळात जात नाही, याचा मला काही त्रास होत नाही. लोक पूजा, कर्मकांड करतात, ती त्यांचं मन गुंतण्यासाठी करतात असं मी मानतो. श्रद्धा आणि अंधश्रद्धा - श्रद्धेचे काही लाभ नक्कीच असतात. श्रद्धा ही एक शक्तिशाली भावना आहे. प्रत्येक भावनेत ताकद असतेच. प्रेम, देशभक्ती यात सकारात्मक ताकद असते, तर रागात नकारात्मक श्रद्धेमुळे बळ लाभू शकतं. श्रद्धा तुम्ही कशावरती ठेवता, हा मुद्दा दुय्यम ठरतो. ती दगडाच्या मूर्तीवर असू शकते, जिवंत व्यक्तीवर असू शकते, तत्त्वावर असू शकते. गांधीजी परमेश्‍वर मानी; पण "सत्य हाच परमेश्‍वर' असंही म्हणत. देवावर श्रद्धा ठेवणारे जर असत्य वागतअसतील तर ते देवाचा विश्‍वासघात करतात, असंच म्हणावं लागेल. देव म्हणजे सर्व सद्‌गुणांचं प्रतीक असेल तर तो सत्य, अहिंसा, प्रेम, सदाचार, चांगुलपणा याचंच प्रतीक असायला हवा. देवावर श्रद्धा ठेवणारे, सत्यावर, प्रेमावर, अहिंसेवर, चांगुलपणा व सदाचारावर श्रद्धा ठेवतात का, हा खरा मुद्दा आहे. वर्षभर भ्रष्टाचार करणारी मंडळी वर्षातून एकदा बालाजीला जाऊन मुंडन करतात आणि स्वतःच्या डोक्‍यावरचं पापाचं ओझं त्याच्या चरणी उतरवतात, हा एक गमतीदार विरोधाभासच आहे. देव काय पापं टांगण्याची खुंटी असतो? अमका देव नवसाला पावतो, ही अंधश्रद्धा असेल नसेल; ती देवादेवात भेदभाव करणारी नक्कीच आहे. बाकीचे देव काय कमी दर्जाचे, कमी पॉवरफुल्ल असतात का? मुळात नवस बोलून देव पावतो, हेही पटत नाही. देव काही शासकीय अधिकारी नसतो, त्याला नवसाची "लालूच' कशाला हवी? तो तर भावाचा भुकेला असतो! देवाकडं काही मागण्यासाठी भक्ती करणं, ही निरपेक्ष भक्तीच नव्हे. देवानं शरीर दिलंय, बुद्धी दिलीय, आणखी काही मागायचं कशाला? शेवटी हे तर खरंच ना, की "गॉड हेल्प्स देम हू हेल्प देम सेल्व्हज्‌!' सचिन तेंडुलकर देव मानत असला तरी तो प्रयत्नांत काहीच कसर ठेवत नाही, हे महत्त्वाचं. "यू डू युवर बेस्ट; गॉड विल डू द रेस्ट!' यातलं "डू युअर बेस्ट' हेच खरं. बाकीचं मग देव, नियती, परिस्थितीवर सोडून द्यावं. "श्रद्धावान लभते ज्ञानम्‌! असंही म्हणतात. गुरूवर श्रद्धा ठेवावी लागते कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी तपासून बघता येत नसते. पण मिळालेल्या ज्ञानाची वेळोवेळी चिकित्सा करावीच लागते. तशीच ती "धर्मा'चीही करावी लागते. प्रत्येक श्रद्धा ही खरं तर अंधश्रद्धाच असते असं म्हणतात. कारण श्रद्धेचा अर्थच "पुराव्या'शिवाय ठेवलेला विश्‍वास'. हे खरं असलं तरी कुणावर आणि कशावर श्रद्धा ठेवावी, हे आपण डोळसपणे ठरवू शकतो! श्रद्धेच्या मर्यादाही माहिती हव्यात. श्रद्धेमुळे मनःशांती मिळू शकते; नोकरी नाही मिळू शकत किंवा परीक्षेत सर्वोत्तम गुणही मिळत नाहीत! अलीकडे बाबा, बापूंचं प्रस्थ वाढतं आहे. काही तर विष्णूचे अवतार मानले जातात. मुळात "विष्णू' होता की नाही यावर वाद आहेत, तर त्याचा "अवतार' कसा मानायचा? ही "डोळस श्रद्धा' म्हणता येईल का? आणि हो आताशा टीव्हीवर "शिवशक्ती कवच', "महालक्ष्मी कवच' या जाहिराती झळकत आहेत. सोन्याचं ते कवच विकत घेतलं की घरात पूर्ण समृद्धी. संकटं सगळी म्हणे गायब! किती छान! सरकारनं ही कवच घेऊन घरटी वाटून टाकावीत म्हणजे दे शात समृद्धी नांदेल. संकटं येणारच नाहीत! आपण सश्रद्ध आहोत की मूर्ख? अभिनव कल्पनाच प्रभावी!

Tuesday, December 24, 2013

एक सुंदर लेख....श्री हेंमंत सहस्रबुद्धे.

दिनांक – २४/१२/२०१३ मंगळवार सकाळी ११.२७

ज्योतिषशास्त्र – भाग १

मित्रांनो अवश्य वाचा हा लेख आणि लाभ करून घ्या ....लेख मोठा आहे, वाचायचा कंटाळा करू नका.....नक्की आवडेल .... संग्रही ठेवाच ....माझे फोन नंबर्स आहेत – 9158510598 / 9890369845 .

आज पर्यंत अनेक विद्वान आणि सामान्य माणसांना ज्योतिष हे खरे की खोटे, ते शास्त्र की अशास्त्र या विषयाने भंडावून सोडले आहे. तरीही जगात अनेक लोकांनी याचा सकारात्मक उपयोग करून घेतला आहे. विदेशात यावर प्रचंड काम झाले आहे. मी काही ज्योतिषातील किंवा विज्ञानातील [ या दोन्ही गोष्टी शिकलो असलो तरीही] कोणी अधिकारी व्यक्ती नाही. किंवा माझा शब्द म्हणजे यातील अंतिम शब्द नव्हे. पण एका नव्या दृष्टीने अभ्यास करायला काय हरकत आहे. मी माझा विचार मांडतो आहे.

प्रेम हे सुद्धा शास्त्राच्या कसोटी वर उतरणार नाही कदाचित म्हणून ते त्याज्य कसे ठरू शकेल? ज्योतिष या विषयाचे असेच आहे. अभ्यास कमी पडत असेल.....संबंध मानवी मनाशी आणि आपल्या हातात नसलेल्या घटनांशी आहे ....त्यामुळे ज्योतिष खोटे ठरू शकते????...हवामान खाते रोज खोटे ठरतेय शास्त्र असून, इलेक्ट्रोन अजून कोणी पाहिला नाहीये कारण त्याला पहायला गेले की तो जागाच सोडतो त्यामुळे त्याचा अभ्यासच करता येत नाही ....एका क्वार्कने उजवा स्पिन घेतला की त्याचा समसंबंधी दुसरा क्वार्क प्रचंड दूर असला तरी उलटी फिरकी घेतो हे केवळ गणिता वरून शास्त्रज्ञ म्हणतात....प्रकाश कण आहे की लहर आहे हे अजून कळले नाहीये....अशा अनंत गोष्टी कळल्या नाहीत तरी आख्ख्या विज्ञानाला कोणी खोटे ठरवत नाही ना? मुळात हा अभ्यास खूप कठीण, गहन आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या मनाचा आहे.....आणि अशा किचकट मानवी घटनांचा आहे ..आणि आपल्या ज्या ऋषींनी आपल्या या महान धर्माची उभारणी केली, सण, उत्सव, परंपरा, अतिशय प्रगत असे आहार शास्त्र, आयुर्वेद ज्या ऋषीमुनींनी दिला त्यांनीच हे शास्त्र सांगितले आहे. आणि हे धर्मशास्त्र आहे हेच मुळी चूक आहे....फक्त धर्माने सांगितले की माणूस ऐकतो म्हणून केवळ धर्माशी ते जोडले आहे.

आकाशात जसे ९ ग्रह आहेत – सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू तशा आपल्या शरीरात थालामास. हायपोथालामास, पिच्युटरी, पिनिअल, थायरॉइड थायमस, Adrenal , सेक्स गोनाड्स, यकृत, स्वादुपिंडे अशा ग्रंथी आहेत.....सूर्य म्हणजे थालामास, चंद्र म्हणजे हायपोथालामास, गुरु म्हणजे पिच्युटरी, बुध म्हणजे पिनिअल ग्रंथी तसेच थायमस या बालपणातच कार्यरत असणाऱ्या ग्रंथीवर आणि मज्जातंतूंवर देखील बुधाचा प्रभाव, मंगळ म्हणजे थायरॉइड, Adrenal वर मंगळ आणि शनी दोन्हीचा प्रभाव, शुक्र ग्रहाचा लैंगिक ग्रंथी अथवा सेक्स गोनाड्स आणि मूत्रपिंडानवर प्रभाव असतो, स्वादुपिंडानवर सूर्याचा प्रभाव तर यकृतावर गुरुचा आणि शनिचा प्रभाव, शनिचा प्लीहेवर [स्प्लीन] प्रभाव असतो आणि एकूणच पचनावर नियंत्रण असते...... राहू आणि केतू हे शरीरातील ग्रंथींच्या कामात विघ्न, वितुष्ट आणणारे असेंडिंग आणि डीसेन्डींग नोड्स आहेत. उत्तर आणि दक्षिण ध्रुव असावे तसेच.

आकाशस्थ ग्रहांकडून येणारया किरणांचा यावर नक्की प्रभाव पडतो. आईच्या पोटातून बाळ जन्माला येण्यापूर्वी ते नाळेने आईशी जोडले गेलेले असते आणि पूर्णपणे आईवर अवलंबून असते. ज्या क्षणी ते पृथ्वीवर पहिले पाउल ठेवते त्या क्षणाला त्याच्या शरीरातील या सगळ्या ग्रंथी काम करणे सुरु करतात. आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध दाखवणारा तक्ता म्हणजे आपली कुंडली किंवा पत्रिका .... आईच्या पोटातून बाळ जन्माला येण्यापूर्वी ते नाळेने आईशी जोडले गेलेले असते आणि पूर्णपणे आईवर अवलंबून असते. ज्या क्षणी ते पृथ्वीवर पहिले पाउल ठेवते त्या क्षणाला त्याच्या शरीरातील या सगळ्या ग्रंथी काम करणे सुरु करतात. आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध दाखवणारा तक्ता म्हणजे आपली कुंडली किंवा पत्रिका ....या ग्रंथींमधून पाझरणारे हार्मोन्स किंवा संप्रेरके एकमेकांशी कसे, कुठे, किती, का, केव्हा व्यक्त होतात किंवा React होतात त्यावर आपले वागणे अवलंबून असते. आपली मानसिक स्थिती बदलेल तसे हे प्रत्येक निमिषार्धात बदलत असते. [ एक निमिष – पापणी लावण्याचा काल]. मग याचे प्रेडिक्शन किंवा भाकीत करणे किती अवघड असेल याचा तुम्हीच विचार करा. तुम्ही पत्रिकेचा तटस्थ राहून [ पत्रिका खरी नाहीच अशी ठाम समजूत काही काळ बाजूला ठेऊन] अभ्यास केलात तर तुमच्या लक्षात येईल की ....होय बऱ्याच गोष्टी जुळताहेत.....पुढचा त्रास वाचवायला त्याचा नक्की उपयोग होतोय.....पण काय आहे ना .....आपले एकदा मत झाले की झाले....मग त्याच दृष्टीने विचार करायचा....हे ठीक नाही .......आजच्या खगोल विज्ञानाची सगळी मांडणी ऋषींनी जे खगोल शास्त्र मांडले होते ना त्यावरूनच झाली आहे. प्रकाशाच्या वेगाने गेले तर आपले वस्तुमान नष्ट होते. त्यामुळे अनेक प्रकाश वर्षे दूर असलेल्या तारयांचा यंत्राने, याने वापरून कोणीही अभ्यास करू शकत नाही हे ऋषींनी जाणले होते म्हणून त्यांनी हे ध्यान प्रक्रियेतून हे सारे जाऊन घेतले....आजच्या खगोल विज्ञानाची सगळी मांडणी ऋषींनी जे खगोल शास्त्र मांडले होते ना त्यावरूनच झाली आहे. प्रकाशाच्या वेगाने गेले तर आपले वस्तुमान नष्ट होते. त्यामुळे अनेक प्रकाश वर्षे दूर असलेल्या तारयांचा यंत्राने, याने वापरून कोणीही अभ्यास करू शकत नाही हे ऋषींनी जाणले होते म्हणून त्यांनी हे ध्यान प्रक्रियेतून खगोल, अंतराळ जाणून घेतले....पाश्च्यात्यांनी या नक्षत्रे, ग्रहांना ठेवलेली नावेही बरीचशी आपल्या नावांशी साधर्म्य दाखवणारी आहेत. शनैश्चर म्हणजे शनीचा अपभ्रंश Satturn ...सूनु हा सूर्यासाठी असलेला संस्कृत शब्द आहे त्यावरून सन आले आहे. आपल्या ऋषींनी सांगून ठेवलेय की चंद्र हा पृथ्वीचा पुत्र नसून मंगल म्हणजे भौम [भूमीचा पुत्र, भूमी पासून निघालेला ] हा भूमीचा पुत्र आहे. आणि प्रशांत महासागर अर्थात Pacific महासागराचे जेव्हढे क्षेत्रफळ आहे तेव्हढेच मंगळाचे आहे. मंगळावर आता पाणी सापडल्याच्या बातम्या आणि फोटो आलेत.....चंद्र शुष्क आहे....त्याचे वय पृथ्वी पेक्षा जास्त आहे आणि चंद्र बाहेरून पृथ्वीच्या वातावरणात नंतर पकडला गेला आहे..... आपले धर्मशास्त्र हे “ओम ब्रुम फट” आणि भगवे कपडे घालून हरी हरी करा असे काहीतरी नुसते करायला शिकवते हे आधी डोक्यातून काढून टाका.....आणि त्याला ऋषींनी "शास्त्र" म्हंटले आहे इतकेच लक्षात घ्या म्हणजे पुरेल .....
ग्रहांच्या जाती म्हणजे ते कुठल्या वेळेस कसे वागतील हे सोपेपणाने कळावे म्हणून त्यावेळेस, त्या कालानुसार दिलेली उपमा.....आजही झाडांच्या प्रकारांना जाती आहेतच ... ज्योतिषशास्त्र चातुर्वर्ण्याचा पुरस्कार नाही करत ....ती त्या कालानुसार त्या त्या ग्रहांची वागण्याची पद्धत सांगण्याची संकल्पना होती. आणि राहू केतु हे ग्रह नाहीत. सूर्य चंद्र फिरत असताना जे संपात बिंदू तयार होतात ते म्हणजे राहू केतू आहेत हेही तिथे स्पष्ट सांगितले आहे. आपण त्याची उकल करायला कमी पडलो म्हणून ते खोटे ठरवणे हा अहंकार नाही का? एखादी गोष्ट खोटे ठरवायला फार अभ्यास नाही लागत....तुलनेने ते सोपे असते....खरे ठरवणेच अवघड असते.....आणि नेमके होते हे आहे की विज्ञान आणि ज्योतिष हे दोन्ही शिकलेले हे सांगायला पुढे येत नाहीयेत .....कारण खोटे ठरवणारे हे झाले की ते, ते झाले की ते ....असे कुठलेतरी सिद्ध न झालेले संदर्भच देऊन बोलत रहातात.....मग हा संवाद न होता वाद होतो.....त्यामुळे अभ्यासु व्यक्ती अशा ठिकाणी फिरकत नाहीत.....सारया जगात ज्योतिषाचा प्रचार, प्रसार आहे. ते देश त्याचा उपयोग करून घेत आहेत. किरोने सांगितलेली भविष्ये जागतिक स्तरावर खरी ठरली आहेत.....आपण ६० - ७० वर्षे आयुष्य असलेले काही वर्षांचे क्षणिक पथिक हा हजारो वर्षांचा ठेवा ४ बुके शिकलो म्हणून पुसू शकतो काय? आणि त्याही पेक्षा तो पुसावा काय?

आपण थोडक्यात या ग्रंथींचे कार्य कसे चालते हे पाहू. आणि आपले शरीर केवळ या ग्रंथींवर चालत नसून या ग्रंथी पाठीच्या कण्यात किंवा कण्याजवळ असलेल्या मज्जातंतूंच्या जुडग्याला Ganglion असे म्हणतात. [Anatomy - a concentrated mass of interconnected nerve cells. / Pathology - a cystic tumor formed on the sheath of a tendon. In neurological contexts, ganglia are composed mainly of somata and dendritic structures which are bundled or connected. Ganglia often interconnect with other ganglia to form a complex system of ganglia known as a plexus. Ganglia provide relay points and intermediary connections between different neurological structures in the body, such as the peripheral and central nervous systems. ]. चक्रांविषयी अधिक माहिती मी माझ्या चक्रे या लेखात देईन.

आलं लक्षात? हे गांग्लिया म्हणजेच Plexuses होत. भारतीय ऋषींनी यांना चक्रे, दले किंवा कमळे म्हंटले आहे. यांची रचना सुद्धा कमळांच्या दळांसारखीच म्हणजे पाकळ्यांसारखीच असते. या चक्रांमधून म्हणजे Ganglion च्या जुडग्यांच्या मधून त्या त्या अवयवात मज्जातंतू गेलेले असतात. तर या चक्रांच्या द्वारा मेंदू मणक्यातून शरीराशी संपर्क ठेवत असतो. आणि यातून जे संदेश येत जात असतात त्याला प्रतिसाद देत शरीरातील Glands म्हणजे ग्रंथी काम करत असतात. यांना बाहेर घडणारया गोष्टींचे ज्ञान डोळे, कान, स्पर्शेंद्रीये, कान हे देत असतात. जिभेला चव कळते. तर मग बघा हे काम किती गुंतागुंतीचे आहे. एखाद्या मुलीला तिच्या प्रियकराचे नाव घेऊन चिडवले तर तिचे गाल लाल होतात, सभेत भाषण करायची वेळ आली की पाय थरथरायला लागतात, सारखी लघवीला लागते. हे सारे व्यापार ग्रंथी आणि चक्रे यांनी घडवून आणलेले असतात.

Thamamus [ आपल्या भाषेत सूर्य] मेंदूत ही सर्वात वर असणारी ग्रंथी आहे. हा या सर्व ग्रंथींच्या कामावर दृष्टी ठेऊन असतो. सूर्य म्हणजे आत्मा.....आत्मविश्वास....तिचा खालचा भाग म्हणजे Hypo-Thalamus [ आपल्या भाषेत चंद्र]. “चंद्रमा मनसो जात:” चंद्र म्हणजे माणसाचे मन होय. या सारया ग्रंथींचा व्यवस्थापक म्हणजे ही हायपोथालामस ग्रंथी होय. आपले मनच सुख आणि दु:ख भोगत असते आणि जे आहे त्यापेक्षा ते मोठे करून बघत असते. उष्णता आणि थंडी याला दिला जाणारा प्रतिसाद, पाणी, इलेक्ट्रोलाईट्स, साखर, स्निग्ध पदार्थ यांची चयापचय क्रिया, भूक वाढ, पचन, झोप, घाम अशी बरीच कार्ये अवस्थली म्हणजे हायपोथालामस म्हणजे चंद्र या ग्रंथी कडून पोष ग्रंथी म्हणजे पिच्युटरी म्हणजे गुरु ग्रंथीला दिल्या गेलेल्या सुचनेनुसार होत असतात. पिच्युटरी म्हणजे पोष ग्रंथी किंवा गुरु ग्रंथीचे “Antiriar आणि postiriar म्हणजे पुढचा आणि मागचा असे २ भाग असतात. ही ग्रंथी पोषण देण्यास मदत करते. इतर ग्रंथींना स्त्रवण्यास उद्युक्त करते. म्हणून पोष ग्रंथी आणि हिच्या हार्मोन्सना Trophic हार्मोन्स किंवा पौष्टिक संप्रेरके म्हणतात. बुध म्हणजे पिनिअल ही ग्रंथी प्रकाश संवेदी ग्रंथी आहे. म्हणजे प्रकाशात ती कार्यरत होते. तिच्यातून Melatonin नावाचे हार्मोन स्त्रवते. या ग्रंथीतून जे सिराटोनीन नावाचे हार्मोन स्त्रवते त्यामुळे शांत झोप लागते. मनाची अवस्था चांगली रहाते. शरीरातील केसांच्या वाढीवर या ग्रंथीचे नियंत्रण असते. जास्त उन्हात हिंडल्यास ही ग्रंथी जास्त कार्यरत होऊन शरीरावर केस वाढतात. किंवा ते पिकतात. म्हणून स्त्रियांनी डोक्यावर पदर घेण्याची प्रथा आली असावी. म्हण आहे ना की “आत्याबाईला मिशा असत्या तर?” स्त्रियांना दाढी, मिशा चांगल्या दिसणार नाहीत. सध्याच्या मानवात त्याच्या चुकीच्या वागण्याने या ग्रंथीचे कार्य जवळपास लोप पावले आहे. शंकरांचा ३ रा डोळा दुसरा तिसरा कोणताही नसून ही ग्रंथीच होय. कारण ही फोटो-सेन्सेटिव्ह म्हणजे प्रकाशाने उत्तेजित, उद्दीपित होऊन कार्य करणारी आहे. पण अजूनही शास्त्रज्ञांना या ग्रंथीचे कार्य पूर्णपणे समजलेले नाहीये. मन शांत ठेऊन डोळ्यांद्वारा बाहेरचे ज्ञान करून देणे हे या ग्रंथीचे काम म्हणता येईल....ज्याला आपण Jet Lag म्हणतो ते झाले म्हणजे विमानाने प्रवास करून आपण वेगळ्या देशात जिथे दिवस रात्र वेगळ्या वेळेस आहेत तिथे आपला दिवसाचा दिनक्रम बदलून आपल्याला शारीरिक त्रास जाणवतो, आपले रोजचे चक्र ज्याला “Circadian Cycle” असे म्हणतात ते बिघडते. याला कारण हा बुध बिघडतो..... मंगळ जसा शक्ती, उर्जा, धाडस देणारा ग्रह आहे त्याप्रमाणेच Thyroid [ अवटू आणि परा- अवटू हे तिचे दोन भाग- गणपतीच्या भाषेत या त्याच्या २ कार्यकारी शक्ती ऋद्धी- सिद्धी होत. मंगळ ग्रहाच्या भाषेत हे त्याचे २ उपग्रह Dymo आणि Fobos होत.] किंवा ही ग्रंथी शरीराला उर्जा, शक्ती पुरवते. तसेच पराअवटू ही ग्रंथी शरीरातील Calcium चे संतुलन राखते. स्वादुपिंडातील अल्फा आणि बीटा या दोन प्रकारच्या पेशी वेगवेगळी कामे करतात. अल्फा Glucagon, तर बीटा इंश्युलीन निर्माण करून शरीरातील साखरेचे पचन करतात. मूत्रपिंडे म्हणजे किडनीज किंवा किडन्या या रक्त गाळून लघवीवाटे शरीरातील न पचलेली, दुषित द्रव्ये बाहेर काढतात. पण या किडन्यांवर असलेल्या अधिवृक्क ग्रंथी म्हणजे Adrenal Glands या आपण घाबरतो तेव्हा आपल्याला मदत करतात. जे म्हंटले जाते की आपण संकटात असताना आपण ३ पैकी १ कृती करतो.... Flee, Fright ओर Fight म्हणजे जर एखाद्या जंगलात आपल्या समोर सिंह आला तर आपण काय करू? पळून जाऊ, घाबरून तिथेच मटकन खाली बसू किंवा सिंहाशी लढू....हे सारे या Adrenal ग्रंथीतून जो हार्मोन स्त्रवेल त्यावर अवलंबून असते.... यकृत हा शरीरातील कामाचा एक कारखाना आहे. तिथे अनंत घडामोडी, अनंत कामे सतत चालू असतात. हृदय हे केवळ रक्त शुद्ध करून शरीराला पुरवणारा एक पंप नसून त्याचे वरचे कप्पे Atria मधून Atrial Natriuretic Factor नावाचे एक संप्रेरक स्त्रवते. हे संप्रेरक इतर स्त्रावांशी हातमिळवणी करून रक्तदाब आणि रक्ताचे आकारमान यांचे मियंत्रण अचूक होण्यास मदत करते. “हृदय” या शब्दाचा अर्थ आपण पाहू. “हर” म्हणजे हरणे, काढून घेणे [जसे रावणाने सीतेचे हरण केले. हरीण नव्हे.]. “द” म्हणजे देणे आणि “य” म्हणजे नियमन करणे. [ बघा यम आणि नियम यात य आहे.]. याचाच अर्थ हृदय हे रक्त आधी शरीरातून काढून घेते, ते परत देणे शरीराला आणि त्याचे शरीरात उत्तम नियमन करते. म्हणजे रक्तदाब योग्य ठेवते.

पुढे ज्या वेळा देतो आहे त्या वारा नुसार त्या त्या वेळा टाळून शुभ कार्य करावे. या काळाला राहू काल म्हणतात. या काळात अपयश येण्याची शक्यता असते. विश्वास असेल त्यांनी करावे, नसल्यास सोडून द्यावे. प्रयोग करून बघण्यास हरकत नाही. घरच्या कॅलेंडरवर या वारांना या वेळा लिहून ठेवा.

सोमवार- सकाळी साडेसात ते नऊ.
मंगळवार – दुपारी तीन ते साडेचार.
बुधवार – सकाळी बारा ते दीड.
गुरुवार – दुपारी दीड ते तीन.
शुक्रवार – सकाळी साडेदहा ते बारा.
शनिवार – सकाळी नऊ ते साडेदहा.
रविवार – संध्याकाळी साडेचार ते सहा.

Thursday, December 12, 2013

छान वाचावंसं वाटणारं....

देव भूकेला श्रद्धेचा कि प्रसिद्धिचा ?
एकदा मच्छिंद्रनाथ एका गावात भीक्षा मागायला आले. एका घरासमोर उभे राहून "अल्लख निरंजन" असे म्हणताच घरातून एक बाई चिमूटभर पीठ घेऊन आली. हे पाहताच नाथ म्हणाले "बाई शेरभर तरी पीठ दे ग". त्यावर बाई रागावली व त्यांना निघून जायला सांगीतले. संपूर्ण गाव फिरले परंतु कुणीच त्यांच्याशी सन्मानाने बोलेना. काही मुले त्यांची टवाळी करु लागले. शेवटी वैतागून ते परतले. नाथ आलेत हे पाहून गोरक्षनाथ उभे राहिले. झोळी रिकामी होती. नाथ गोरक्षांना म्हणाले "गोरख आता जगाला आपली गरज राहीलेली नाही. भीक्षा तर मिळत नाही पण टवाळी मात्र होते." नाथांनी झालेला प्रकार सांगितला. त्यावर गोरक्षनाथ म्हणाले "गुरुदेव, जगाला काय हवे आहे हे मला चांगले ठाऊक आहे. उगाच लोकांना दोष देऊन अर्थ नाही. आपणच बदलायला हवे. मीच त्या गावात जातो. थोडया वेळाने तुम्ही तिथे या आणि मी तुम्हाला दाखवेन लोकांना नेमके काय हवे आहे ते?" ठरल्याप्रमाणे गोरक्षनाथ गावाच्या मोठया चौकापाशी आले. तिथे बरीच गर्दी होती. ते चौकाच्या मध्यभागी आले आणि आपल्या काखेतली काठी हवेत भिरकावली ती तशीच हवेत स्थिर राहीली आणि स्वतः काठीच्याही वर जाऊन हवेत मांडी घालून स्थिर झाले. हे पाहून लोकांनी गर्दी केली. हार, नारळ, फळे घेऊन लोकांनी त्यांना नमस्कार केला. थोडया वेळात मच्छिंद्रनाथ तिथे आले व गोरक्षांनी नाथांना सांगितले की लोकांना हेच हवे आहे. चमत्कार तिथे नमस्कार. सांगायचे तात्पर्य इतकेच की त्या काळी घडलेली ही घटना आजच्या काळातही तितकीच लागू पडते. चमत्कार तिथे नमस्कार. लोकांनी उगाच गैरसमज करुन घेतला आहे की साधू-संतांचा जन्म हा चमत्काराकरीता झाला आहे. साधू-संत चमत्कार करत नाही. त्यांचे असणे हाच सर्वात मोठा चमत्कार आहे. लोकांची काय विपरीत श्रद्धा असते ते पहा? ज्याचे मठ मोठे तो खरा संत, ज्याचे भक्तगण जास्त तो खरा संत. महर्षी व्यास, ज्ञानेश्वर यांसारख्या सत्पुरुषांच्या भारत राष्ट्रात असे अधर्म घडणे म्हणजे खेदकारकच आहे. संत हे चारित्र्यवान असले पाहिजे चमत्कारीक नव्हे. जसे संतांच्या बाबतीत घडले तसेच देवाच्या बाबतीतही घडले. "प्रतिमेची पूजा करीता करीता. तो स्वतः पाषाण झाला. मानवाचा छंद सारा. देवाचा बाजार झाला." अहो, गणपती दुध काय पीतो? केरळमध्ये मेरीच्या मूर्तीच्या नेत्रांतून अश्रुपात काय होतात? मुंबईच्या समुद्राचे पाणी गोड झाल्यामुळे माहीमच्या दर्ग्यातील गर्दी वाढते. दर्ग्यातील कबरीवरच्या चादरीचे लोक चुंबन काय घेतात? अरेरे... असल्या विपरीत श्रद्धेच्या माणसांपेक्षा नास्तिक माणूस परवडला. पुराणांत असे वर्णन आहे की कलियुगात भोंदूपणा वाढेल, ज्यांचा अधिकार शून्य त्यांचे महत्व वाढेल. त्यामुळेच प्रसिद्धिच्या नादात अनेक लोक (जे स्वतःला संत म्हणवून घेतात) त्यांनी श्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक सुरु केली. लोकांच्या श्रद्धेच्या बळावर पैसा कमवला. यात प्रामुख्याने दोष लोकांचाच आहे. हिंदु धर्मात इतके विशाल ग्रंथ असताना भोंदूंच्या नादी लागण्याचे कारणंच काय? याचा अर्थ गुरु करु नये असे नव्हे. पण गुरु हा परंपरेतला असावा लागतो. तेव्हाच त्याला अनुग्रह देण्याचा अधिकार प्राप्त होतो. आता कुणीही कुणाला अनुग्रह देत असतात. जणू गुरुंचा अनुग्रह म्हणजे निवडणूकीचे तिकीट वाटप आहे. कसला हा भोंदू कारभार आणि कुठे फेडणार ही पापं. आता मूर्तिपूजेचेच पहा ना. ईश्वराकडे जाण्यासाठी "मूर्तिपूजा" हा एक रामबाण उपाय आहे. निर्गुण निराकार ईश्वराच्या चरणी मनुष्य सहजासहजी एकरुप होत नाही. माणसाचे मन हे फ़ार चंचल असते. ते क्षणभरही स्थिर राहू शकत नाही. मानसपुजेने मन स्थिर होत नाही. मनाची एकाग्रता साधावयाची असेल तर समोर ईश्वराचे प्रतीक हवे म्हणून मूर्तिपूजा. मुर्तिपूजा हे अज्ञान नसून अप्रतिम विज्ञान आहे.
प्रतीके केवळ हिंदु धर्मातच नाही अन्य धर्मातही आहेत. ख्रिस्तांचा क्रूस असो, मुसलमानांचा पीर किंवा मंत्रयुक्त तसबीर असो (काही अल्पबुद्धि लोक उगाच हिंदुंना मूर्तिपूजक म्हणून हीणवतात). तात्पर्य मूर्तिपूजा हे साधन आहे साध्य नव्हे. परंतु या कलियुगात झाले काय? लोक मूर्तिलाच ईश्वर मानू लागले. उपायच अपाय ठरला आणि आपला "आधूनिक देव" प्रसिद्धिचा भूकेला झाला. अहो आज हिंदुंचे कितीतरी अनेक श्रीमंत देवस्थाने आहेत. पण उपयोग शुन्य. ईश्वर नि भक्ताचे पवित्र नाते नाही. केवळ पैशांची बाजार. काही लोक तर देवस्थानाला "पिकनिक पॉइंट" म्हणून भेट देतात. खरोखर ईश्वर पैशांचा, प्रसिद्धिचा भूकेला आहे का? नाही मुळीच नाही. ईश्वर अनंत अनादि आहे. हे सबंध विश्व त्यानेच निर्माण केले आहे. ही सगळी दौलत त्याचीच आहे. हा सगळा पसारा त्याचाच आहे.
ईश्वराचा पसारा फार मोठा आहे. कधी विचार करुन पहा. एवढं विशाल ब्रह्मांड. त्यात अनेक सुर्यमाला नि ग्रह आहेत. त्यापैकी पृथ्वी नावाचा एक ग्रह, ७०% पाण्याने व्यापलेल्या या ग्रहात केवळ ३०% भूभाग आहे. त्यात ५ खंड आहेत. त्यात आशिया नावाच्या खंडात भारत हे राष्ट्र. भारत राष्ट्राच्या कुठल्यातरी राज्याच्या एका जिल्ह्यांत छोट्याश्या शहराच्या एका अगदी लहान विभागात असलेल्या एका इमारतिच्या/चाळीच्या खोलीत आपण राहतो. पाहिलेत ना, ईश्वराच्या या विशाल पसार्‍यात आपले स्थान किती लहान आहे ते. मग हा ईश्वर प्रसिद्धिचा भूकेला कसा असेल? मग हा ईश्वर आपल्या नवसाला क्षणोक्षणी कसा काय पावेल? संतांनाही ज्याचे दर्शन दुर्लभ होते तो आपल्या सारख्या अति साधारण लोकांना कसा काय साक्षात्कार देईल? याचा अर्थ ईश्वर पावत नाही असे नाही. त्याचे ह्र्दय आईसारखे आहे. म्हणून तर आपण जगतोय ना? परंतु ईश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी योग्यता लागते. त्यासाठी साधना करावी लागते. तो आपल्याकडे येणार नाही. आपल्याला त्याच्याकडे जावे लागेल. जसे एखाद्दाला सावली हवी असेल तर तो झाडाखाली जातो. झाड स्वतःहून त्याच्याकडे येत नाही. विहीरीत प्रचंड पाणी आहे. परंतु तहान लागल्यावर आपल्याला विहीरीकडे जावे लागते. विहीर आपल्याकडे येत नाही. तसेच ईश्वर हा मायाळू आहे. त्याच्या मायेची उब हवी असेल तर आपल्याला त्याच्याकडे जावे लागेल. एकदा का आपली योग्यता वाढली तर तो स्वतःच आपल्या भेटीला येतो. जसा पुंडलीकेच्या भेटीला विठ्ठल आला. देव श्रद्धेचा भूकेला आहे. परंतु श्रद्धा डोळस हवी. नाहीतर वर म्हटल्याप्रमाणे विपरीत श्रद्धा घडली तर ईश्वर प्रसन्न तर होत नाही परंतु त्याचा नकळत अपमान मात्र आपण करीत राहतो. आपल्यावर भगवंताची कृपा होत नसेल तर आपले कुठेतरी काहीतरी चुकते, असे समजावे. आपल्यातले दोष, मत्सर काढून टाकावे. आपण नेहमी म्हणतो की देवावर माझी नितांत श्रद्धा आहे, मी त्याची मनोभावे पूजा करतो. तरीसुद्धा देवाची कृपा होत नाही. असे का? कारण आपल्या मनात कुठेतरी शंका असते. तांदूळ कितीही निवडले तरी खडा कुठेतरी राहतो व जेवताना कचकन चावला जातो. असेच काहीतरी आपल्या बद्धल होते. काही लोक ईश्वराचे अस्तित्व नाकारतात. हे लोक इतके विक्षीप्त असतात की तलवार म्यानात ठेऊन तर्क करतात आणि आपला तर्क खरा ठरविण्यासाठी म्यानातली तलवार बाहेर काढतात. म्हणे विज्ञानयुग आहे. खरा वैज्ञानिक ईश्वरावर कधीच शंका घेत नाही. एखादी गोष्ट नाकारणे सोपे असते कारण त्यात टाळकं खांजवावं लागत नाही. असो, ज्याचे त्याचे कर्म.
ईश्वराच्या साक्षात्कारासाठी संतांचा आधार मिळतो. संत हे ईश्वराचे दूत असतात. देवाचा संदेश ते आपल्यापर्यंत पोहोचवतात. मी वर म्हटले आहे की संत चमत्कार करीत नाही. परंतु ज्ञानेश्वरांपासून तुकाराम, साईबाबांपर्यंत संतांची चरीत्रं वाचली तर त्यात चमत्कार वाचावयास मिळतात. मग ते खोटे हे असे समजावे का? नाही मुळीच नाही. योगी अरविंद म्हणतात "परिपुर्ण माणसाच्या दृष्टीने जे तर्कशुद्ध असते, तेच अपूर्ण माणसाच्या दृष्टीने चमत्कारिक असते. ज्याने आयुष्यात कधीच विमान पाहिले नसेल, त्याला विमान दाखवल्यावर तो त्याच्यासाठी चमत्कारच ठरतो. तसेच आहे संत जे करतात ते त्यांनी अनुभवले आहे. पण आपण अनानुभवी आहोत. म्हणून आपल्याला ते चमत्कार वाटतात. चमत्कार चमत्कार म्हणजे काय हो? ईश्वराने निर्माण केलेले हे विश्व किती चत्कारिक आहे ते पहा. एवढूसं बीज परंतु ते पेरल्यावर केवढं अवाढव्य वृक्ष जन्माला येतं. सुर्य उगवतो मावळतो. हा वारा दिसत नाही परंतु जाणवतो. ही माणसं, झाडे, प्राणी, त्यांना जगण्यासाठीची केलेली सोय. प्रत्येक गोष्ट चमत्कारिक आहे. पण आपण त्याचा विचारही करत नाही. ईश्वराच्या व्यापकतेचा विचार आपण केला तर आपल्या लक्षात येईल की तो किती दयाळू आहे. आपण ईश्वरापुढे नम्र होऊन भक्तिभावाने उभे राहिले पाहिजे. आचारः परमो धर्म. आचार शुद्ध ठेवावे. त्याची भक्ती करावी पण बुद्धीने. बुद्धी गहाण टाकून भक्ती करु नये. देवाला बुद्धिवान आणि चारित्र्यवान भक्त आवडतात. देवाशी वागताना आपले स्थान देवाच्या चरणापाशी आहे असा भाव मनी ठेवावा. त्याच्यावर नितांत श्रद्धा ठेवावी. तर तो आपल्याला नक्कीच त्याच्या कुशीत घेईल. कारण देव श्रद्धेचा
भूकेला आहे, प्रसिद्धिचा नव्हे.
देव देव म्हणोनी I व्यर्थ का फिरसी I
निज देव नेणसी I मुळी कोण ? II
देवा नाही रुप I देवा नाही नांव I
देवा नाही गाव I कोठे काही II
ज्ञानदेव म्हणे I भजा आत्मदेवा I
अखंडित सेवा I करा त्याची II ( हा लेख श्री नितीन दौतखानी गुरुजी यांच्या फेसबुक पेज वरुन घेतला आहे)

Tuesday, December 10, 2013

Important shortforms

Company with Full Names ;

• ESPN→ Entertainment and Sports Programming
Network.
• HDFC→ Housing Development Finance
Corporation Limited
• HCL→ Hindustan Computer Limited
• HTC→ High Tech Computer Corporation
• HP→ Hewlett-Packard
• HMV→ His Master's Voice
• HSBC→ Hongkong and Shanghai Banking
Corporation
• H&M→ Hennes & Mauritz
• ICICI Bank→ Industrial Credit and Investment
Corporation of India Bank
• IBM→ International Business Machines
• Infosys→ Information Systems • Intel→
INTegrated ELectronics
• IKEA→ Ingvar Kamprad Elmtaryd Agunnaryd
• ING→ International Netherlands Group
• JVC→ Japan Victor Company
• JBL→ James Bullough Lansing
• KFC→ Kentucky Fried Chicken
• L&T→ Larsen & Toubro
• LG→ Lucky and Goldstar
• LEGO→ leg godt
• MRF→ Madras Rubber Factory
• NEC→ Nippon Electric Company
• Nikon→ Nippon Kogaku
• Nissan→ Nippon Sangyo
• P&G→ Procter & Gamble Company
• SAP→ System Analyse und Programmentwicklung
• TCL→ Today China Lion
• UPS→ United Parcel Service of America
• Wipro→ Western India Palm Refined Oil Ltd

Monday, December 2, 2013

बालाजी सुतार अंबाजागाई यांचा मला आवडलेला एक खुसखुशीत लेख.

अघळपघळ संमेलनात लैच प्रतिभावंत बेचाळीस कवी...

December 1, 2013 at 1:41pm
दिव्य मराठीच्या आजच्या 'रसिक' पुरवणीत प्रकाशित झालेल्या माझ्या लेखाची मूळ प्रत.

कलाप्रिय महाराष्ट्राच्या महन्मंगल भूमीत सिनेमा-नाटकांच्याखालोखाल लोकप्रिय असलेला प्रकार म्हणजे कविसंमेलने. पैकी नाटके आणि सिनेमे हल्ली डायरेक्ट टू होम शैलीत घरपोच होत असल्याने औटडोअर मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी जायचे म्हणजे कविसंमेलनाला जायचे अशीच महाराष्ट्रभर रसिकांची कल्पना झालेली असते. खरंतर औटडोअर मनोरंजनाच्या क्षेत्रात सगळ्यांत पहिला नंबर निवडणुकीतल्या भाषणांचा असतो, मात्र हल्ली एकमेकांची सरकारे ‘पाडणे’ वगैरे दहाबारा वर्षांपूर्वी लोकप्रिय असलेले खेळ कॉंग्रेस सरकारच्या - नवी पिढी ज्या चिवटपणाने फेसबुकला अष्टौप्रहर चिकटून बसते तसल्या- सत्तेला घनदाट चिकटपणे चिटकून राहण्याच्या गुणधर्मामुळे फारसे घडताना दिसत नाहीत. त्यामुळे लोकसभा किंवा विधानसभांच्या गंमतीदार निवडणुका लैच लै तर चार-पाच वर्षांत एखाद-दुस-याच वेळी ‘लागतात’. स्थानिक नगरपालिकांच्या किंवा ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही विनोदी असतातच पण तिथल्या विनोदाला उघडपणे हसायचे म्हणजे हसणा-यावर दणकावून मार खायचीच पाळी असते. सबब सर्वाधिक निरुपद्रवी औटडोअर मनोरंजनासाठी लोकांना कविसंमेलनावरच अवलंबून राहावे लागते.
सांप्रत सर्व प्रकारच्या कलावंतांच्या तुलनेत ‘कवी’ हा इसम संख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रभर सर्वाधिक मोठ्या प्रमाणात आढळतो, त्यामुळे गावोगावी घाऊक कवींचे संमेलन भरवणे हा खेळ अत्यंत तेजीत चालतो. घरटी किमान एक कवी असे सामान्यपणे महाराष्ट्रात कवींचे होलसेल प्रमाण असल्याचे कुणीतरी प्राध्यापकाने 'पीयेचडी'च्या अतोनात अभ्यासपूर्ण प्रबंधात लिहून सिद्धच केल्याचे आपल्याला माहीतच असेल. त्यामुळे ‘काही घडले की घ्या कविसंमेलन' असाच खाक्या गावोगावी चालत असलेला दिसून येतो. इंग्रजी-मराठी नवं वर्ष लागणं, शिमगा म्हणजे होळी, रंगपंचमी, दिवाळी, पाडवा, कोजागिरी असल्या दिवशी गावोगावी कवींचे जत्थेच्या जत्थे कविसंमेलनासाठी हिंडताना आढळतात. काही पुढा-यांना आपल्या रसिकतेवर मोहर उठवून हवी असते. अशांचे स्वत:चे वाढदिवसही असे पुढारी लोक कविसंमेलने भरवून साजरे करताना दिसतात. कविसंमेलने भरवणे सर्वांनाच सर्व दृष्टीने सोयीचे असते कारण ज्यादा नामचिन कवी सोडले तर बाकी कवी केवळ ‘कविता वाचू दिली जातेय’ एवढ्यावरच खुश होऊन स्वखर्चाने ‘फुकट्यात’ संमेलनाला हजर राहतात.               
काही दिवसांपूर्वी एका आमदारांनी आयोजित केलेल्या साहित्यसंमेलनातल्या कविसंमेलनात मी स्वत:च निमंत्रित होतो. कार्यक्रमपत्रिकेमध्ये एकूण बेचाळीस कवींची नावे छापलेली होती. एवढ्या बेचाळीस कवींचा सहभाग असलेल्या कविसंमेलनासाठी संध्याकाळी साडेचार ते सहा असा ऐसपैस आणि अघळपघळ तब्बल ( ! ) दीड तासांचा वेळ उपलब्ध करून दिलेला होता. सहा ते सात या वेळेत संमेलनाच्या अध्यक्षा आणि एक मंत्रीमहोदय, दोनेक आमदारमहोदय, एक झेडपीअध्यक्षमहोदय आणि इतर अनेक स्थानिक महोदयांच्या महनीय उपस्थितीत समारोपाचे सत्र होणार होते. आणि त्यानंतर गावातल्या शाळेतल्या मुलांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उर्फ सांस्कृतिक कार्यक्रम होता.
तर गंमत अशी झाली की कविसंमेलनापूर्वीचे कथाकथनाचे सत्रच मुळात सहा वाजता संपले. मग घाई करून समस्त कवींचा जथ्था हाक-हाकून स्टेजवर नेण्यात आला. जागा सापडेल तिथे दाटीवाटीने आम्ही लैच प्रतिभावंत बेचाळीस कवी स्टेजवर स्थानापन्न वगैरे झालो. मग आधीच उशीर झाल्यामुळे कावलेल्या सूत्रसंचालकांनी अत्यंत घाई-घाईने "अमुक कवीचे स्वागतआमच्या संस्थेतील प्राध्यापक अमुकसर करतील.." असा दरेक कविसोबत एकेका प्राध्यापकाचे नाव घेऊन स्वागतसमारंभ चालू केला. काही क्षण स्टेजवर एकाचवेळी उठबस करणारे चारचार-पाचपाच कवी आणि त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यासाठी स्टेजवर चढ-उतर करणारे चारचार-पाचपाच प्राध्यापक असे अत्यंत हातघाईवर आलेले दृश्य दिसू लागले. शिवाय दरेक कवी-प्राध्यापकाची जोडी फोटोसाठी पोझ देऊन कॅमे-याला पक्की नजर भिडवून स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यासारखी निश्चल उभी राहून फोटोचा फ्लॅश चमकेपर्यंत अजिबात हलत नव्हती.हा सगळा ‘पानपता’सदृश्य गोंधळपाहून दिवसभर साहित्यिकांसारख्या असंगांशी संग करावा लागल्याने अतोनात कावलेले आयोजक आमदारमहोदय ज्यास्तीच कावून गेले आणि त्यांनी सूत्रसंचालकाला बोलावून 'मार्गदर्शन' केल्यानंतर सूत्रसंचालकमहोदयांनी "झाले तेव्हढ्या कवींचे स्वागत पुरे झाले. उरलेल्या सन्माननीय कवींचे स्वागत कार्यक्रमाच्या मध्यंतरात लैच सन्मानाने करण्यात येईल." असे जाहीर करून "आता कवींनी कविसंमेलन 'च्यालू'करावे." असा संयोजकीय हुकुम देऊन माईक स्टेजवरच्या सूत्रसंचालकाकडे सुपूर्द केला. दुस-या किंवा तिस-याच कवीने "आमचे आमदार"नावाची कविता खड्या आवाजीत सादर करून तिच्यात आमदारसाह्यबांच्या आजवरच्या कार्यकर्तृत्वाचा समग्रपणे आढावा घेतला. सदर कवितेत एक ओळ "अशोकरावाला शिकविला धडा हो.." अशी होती.  एकूण कविसंमेलनाचा रोख त्यानंतर अनेक कवींच्या लक्षात आला असावा कारण नंतरही "आमदार" या विषयावर आणखी दोन कविता सादर केल्या गेल्या. मग काही प्रेमकविता, काही "कापसाला भाव मिळत नसल्याने शेतक-यांनी गांजाची शेती का करू नये?" असा "आजचा सवाल" विचारणा-या कविता, (या कवीचे ऐकून कुणी गांजाची शेती केलीच आणि त्याला पोलिसांनी धरलेच तर त्यात या कवीच्या काकाचे काय जाणार होते?). तासाभरात दहा की बारा कवींच्या कविता
गाऊन किंवा वाचून झाल्यानंतर समारोपाच्या कार्यक्रमासाठी मंत्रीमहोदय स-लवाजमा आल्याची वार्ता आली आणि आयोजक आमदारमहोदयांनी पुन्हा एकदा सूत्रसंचालकांना मार्गदर्शन केल्यानुसार "उर्वरित कविसंमेलन "आफ्टर द ब्रेक" म्हणजे समारोपाचा 'कारेक्रम' झाल्यानंतर पुन्यांदा घेतले जाईल, तस्मात् , समस्त लैच प्रतिभावंत कवींनी स्टेजवरून उतरावे आणि कुठेही लांब न जाता तिथेच डाव्या बाजूस थांबून किंवा बसून राहावे." अशी उद्घोषणा करण्यात आली तेव्हा आम्ही सगळे चाळीस-बेचाळीस कवी जड पावलांनी गडबड करून खाली उतरलो आणि डाव्या बाजूस बसायला काही सापडते काय याचा निष्फळ शोध घेऊन दाटीवाटीने उभे राहिलो. समारोपाच्या कार्यक्रमात खास ‘मंत्री’शैलीत मंत्रीमहोदयांची आणि इतर तीन-चार बिनमंत्रीमहोदयांची सविस्तर भाषणे दीडेक तास चालली तेव्हा नऊ वाजून गेल्यानंतर सदर समारोपाचा कार्यक्रम संपला आणि "उरलेल्या कवींनी अजिब्बात वेळ न लावता तातडीने स्टेजवर दाखल होऊन एकेक बारकीशी कविता म्हणून मोकळे व्हावे आणि रसिक श्रोत्यांनाही मोकळे करावे कारण नंतरच्या शाळेतल्या पोरांच्या सांस्कृतिक कारेक्रमाला आधीच लै उशीर झालेला असून पोरे पेंगुळली आहेत, तर ती झोपी जाण्याआधी तोही कारेक्रम उरकणे आवश्यक आहे." असं सूत्रसंचालकरावांनी जाहीर केले तेव्हा पुनश्च सरसावून पंचवीस-तीस कवी झुंडीने स्टेजवर गेले आणि कविसंमेलन पुन्यापुन्यांदा 'च्यालू' जाहले ! इतका वेळ इथे तिथे थांबून अनेक कवी ओशाळलेले, संतापलेले, शरमिंदे झालेले असले तरी अनेकजण तरीही फॉर्मात होते. या "आफ्टर द ब्रेक"सत्रातल्या पहिल्या कवीच्या कवितेचे बोल होते - "कव्हा व्हईन, यंकटण्णा, आपली सुदारना, न् कव्हा व्हईन, यंकटण्णा, आपली सुदारना ?". कवींच्या किंवा कवितेच्या अधोगतीबद्दल काहीएक वाटून न घेता सदर कविबंधू यंकटण्णाच्या ‘सुदारनेची’ वाट पाहत होते हे एकूणच कवींच्या तळागाळातल्या जनतेप्रती असलेल्या आस्थेचेच निदर्शक मानता आले असते.
कवितेची अब्रू घालवणा-या या सगळ्या प्रकारास एक कविता वाचून आपणही यथाशक्ती हातभार लावला याची लाज वाटून घ्यावी की शरमून जाऊन एखाद्या कोरड्या विहिरीत (यंदा पाऊस बराच बरा झालेला असला तरीही अशा कोरड्या विहिरी आमच्या भागात अतोनात मुबलक संख्येने उपलब्ध आहेत याची इतर भागांतल्या गरजूंनी नोंद घ्यावी.) उडी ठोकून जीव द्यावा या संभ्रमात कानकोंडा होऊन अजूनपर्यंत नवी कविता लिहायला पेन उचलावासे वाटेनासे झालेले आहे. कविसंमेलन हा एकंदरीतच 'च्यामारी गुणिले अतोनात वेळा' असा लैच यंग्राट प्रकार असतो आणि या अस्ल्या चळवळीत आपल्यासारख्या भल्या माणसाने भाग घेऊ नये एवढे आपण शिकलो हे मला कबूल असले तरी, उद्या आणखी कुणी ‘प्रत्यक्षाहुनि होर्डिंगव्यापी प्रतिमा उत्कट’ स्वरूपाच्या दादा, भाई किंवा अण्णांनी त्यांच्या त्यांच्या वाढदिवसानिमित, कुणाच्या पोराच्या बारशानिमित्त किंवा असल्याच कसल्यातरी एकदम महत्वाच्या प्रसंगी कविसंमेलन आयोजित केले आणि त्यात मला बोलावलेच तर मी जाईनच की काय अशी मलाच स्वत:ला शंका वाटत राहते. कदाचित जाईनसुद्धा. कवींना एवढ्यातरी मानाने दुसरा कोण बोलवतो हो ?

--------------------------------------------------------------------------

-         बालाजी सुतार, अंबाजोगाई.

Friday, November 22, 2013

आज्जीचं घड्याळ..

आजीचे घड्याळ

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते

"अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,"
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
"बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की !"

ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनियां सकाळ न मुळी पत्त कधी लागता !
"आली ओटिवरी उन्हे बघ!" म्हणे आजी, "दहा वाजले !
जा जा लौकर !" कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.

खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी
हो केव्हा तिनिसांज ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले, "खेळ पुरे, घरांत परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !"

आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता !
"अर्धी रात्र कि रे" म्हणे उलटली, "गोष्टी पुरे ! जा पडा !'
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा

सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो ! तरी ना मिळे !

(कवीचं नाव कळविल्यास आभारी राहीन)

Thursday, October 3, 2013



(भय इथले संपत नाही...पुढील भाग..)

मृत्यूचे महानाट्य......(भाग2)

सातत्याने नवोन्मेषशाली असणारी सृष्टी सृजनशील सर्जनशीलतेची मोठी प्रतिभा आहे.परंतू नैसर्गिक प्रलयाचा महासागर जेव्हा तिला आपल्या कवेत घेतो तेव्हा ती बिनबोभाटपणे त्याला सर्वस्वाचं दान देवून टाकते आणि रिती होते पुन्हा नवीन काहीतरी जन्माला घालण्यासाठी....
       उगम आणि विनाश...जन्म आणि मृत्यु...या दोन टोकामध्येच पृथ्वीवरील जीवसृष्टीचा प्रपंच सुरु आहे.मृत्युचा हा सामुहिक उच्छाद पाहाताना ही जाणीन प्रकर्षाने होते..आणि आपण स्तब्ध होउन जातो. त्याने कुणालाच सुटकेची संधी दिली नाही एखाद्या लहरी   ,बेछूट दरोडेखोरासारखा येउन कठोर होउन निरपराधांना मरण देउन गेला..क्षणात होत्याचं नव्हतं करुन गेला..आणि मागे ठेवून गेला हळहळत्या निश्वाःसांसह फाटलेल्या आभाळाखाली गोठून गेलेली माणसं....व्याकुळतेच्या खोल डोहात बुडालेली माणसं...मृत्यूच्या महानाट्याचा जिताजागता प्रपात पाहणारी माणसं...किल्लारीसह बावन्न खेडी उध्वस्त झाली. हजारो संसार बेचिराख झाले. अनेक निष्पाप जीव उमलण्यापूर्वीच खुडले गेले, मागे राहीले फक्त मन हेलावून सोडणारे..आर्त विव्हळणारे स्वर...माझा बाबा गेला sss…..माझं तान्हुलं कुटं हाय...sss…इवल्या इवल्या चिल्यापिल्यांच्या मृतदेहाला कवटाळून,,आयाबायांचा...नातेवाईकांचा अनावर शोक...सगळीकडे हे मन छिन्नविछिन्न करणारे दृष्य काळजाला पीळ पाडत होते..मृत्यूने आपल्या  अक्राळविक्राळ जबड्यात गुलाबाच्या कळ्यांसारख्या...फुलपाखरासारख्या गोजिरवाण्या..निष्पाप..गोंडस जिवांसहीत.....तरण्याताठ्या लेकी-सुनांसहीत...म्हाता-या कोता-या कष्टक-यांना गिळून टाकलं होतं...रात्री झोपेच्या आधीन होण्यापूर्वी आपलं सर्वस्व असलेली आपल्या कुटुंबातली माणसं सकाळी सुर्योदयापूर्वी आपलं आता कुणीच नाही या भावनेने वेडीपिशी झाली होती.......
                                                                      
                                                                       क्रमशः

Wednesday, October 2, 2013



भय इथले संपत नाही..... (भाग1)
दिनांक 30 सप्टेंबर 1993 ची पहाट लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या किल्लारी सास्तुर आणि या सारख्या बावन्न खेड्यासाठी काळपहाट ठरली. गणरायाच्या सहवासातले आनंददायी दहा दिवस काळजाच्या कप्प्यात साठवून शांतपणे झोपी गेलेल्यांना त्याची पाठ फिरताच एका अघटीत संकटाला सामोरे जावे लागेल अशी साधी कुणकुण देखिल लागली नाही. सगळे निर्धास्त झोपलेले असतांनाच पहाटे चार च्या सुमारास हा जीवघेणा धरणीकंप झाला.नेमकं काय घडतय हे कळायच्या आत प्रचंड गडगडाटासह पाळण्यात बसल्यासारखा सारा आसमंत हलु लागला..काहीतरी भयानक घडतय हे जाणवताच हल्लकल्लोळ माजला.लोक जीवानिशी धडपडत घराबाहेर.आले याला भूकंप म्हणतात हे कळायच्या आत ,कुणालाही आवरायला सावरायला सवड न देता पहाटेच्या अंधारात त्रेपन्न गावांना त्या भूकंपाने आपल्या उदरात सामावून घेतले...आज वीस वर्षानंतरही भयावह भूकंपाची आठवण अंगावर शहारे आणते....
अंधाराचं आणि मृत्यूचं अतुट नातं आहे अनेक जीवघेण्या आपत्तींना ,नैसर्गिक संकटांना बहुधा रात्र पहाटेच्या अंधाराची साथ मिळालेली आहे. काळ्याकुट्ट अंधाराच्या साथीने निष्पापांच्या जगण्यावर आघात करणार्या ह्या नैसर्गिक आपत्तीने सकाळी उजाडताना बघणा-यांच्या काळजाचा थरकाप उडवला.निसर्गाच्या रौद्र रुपाने निशःब्द झाले सगळे...अतिशय भेसूर चित्र समोर दिसत होते...मानव आणि निसर्ग यांच्यामध्ये घडलेल्या युद्धाचं...ते युद्धही एकतर्फीच....प्रतिकाराला देखिल उसंत नाही..आक्रंदनाला वेळ नाही..कुणी कुणाला वाचवायला वेळ नाही...उठायची देखिल संधी न देता अंगावर अजस्र चिरांच ओझं टाकुन अवघं भावविश्व मातीत दडपून निसर्गाने हजारोंचा बळी घेतला.... अवघ्या त्रेचाळीस सेकंदाच्या अवधीत हे सारं घडलं...कोसळुन पडलं होतं सारं ..भावनांच  अन् जाणीवांच जग...प्रत्येकजण अनभिज्ञतेच्या बुरख्याआड आपल्याच मस्तीत जगत होता पण नियतीच्या एकाचं फटका-याने होत्याचं नव्हतं करुन टाकलं....
तांत्रिक विश्लेषणानंतर कळलं हा भूकंप अतिशय तीव्र होता.जबरदस्त हाद-याने अंगावर दगड माती पडु लागली...वीजही गेली...काळ्याकुट्ट अंधारात आक्रोश ..किंकाळ्या टाहोंनी आसमंत चिरला गेला.. नुकतच विसर्जना मुळे लातुर नियंत्रण कक्षात थोडीफार जाग होती.भराभर संपर्क झाले.आपत्तीचा अदमास नव्हता पण भयानक संहाराची कल्पना आली होती.थोडसं उजाडलं..शेतात,गोठ्यात झोपायला गेलेले आपल्या गावाकडे..घराकडे कुठल्यातरी अनामिक ओढीने धावत सुटले...गावात पोहोचल्यावर त्यांना दिसले ते दगड-मातीचे ढिगारे...त्या ढिगा-यांखाली अडकलेली मदतीसाठी,मूकआक्रोश  करणारी ..रक्तबंबाळ झालेली माणसं...नशीब बलवत्तर असलेले जे वाचले त्यांच्या डोळयात मुर्तीमंत भीती दाटलेली..हजारोंच्या नशीबात ढिगा-याखाली दबून जीव सोडणे एवढेच होते...भूकंपाची माहिती मिळाल्यावर त्वरीत पोहोचलेले पत्रकार श्री भारतदादा गजेंद्रगडकर यांना एका ढिगा-यात गाडल्या गेलेल्या महिलेचा फक्त एक हात वर दिसत होता..मदतीसाठी आकांत करताना कदाचित जगण्याच्या तीव्र इच्छेने वर आला असेल.पण फक्त बघण्यापलिकडे ते काहीच करु शकले नाहीत..त्यांच्या डोळयात पाणी तरळले..सास्तुरच्या वाटेवर सन्नाटा...सगळीकडे प्रचंड भीती...काय घडले हे न कळल्याने जाणवणारी अस्वस्थता याचे नेमक्या शब्दात वर्णन करणे अशक्य होते..जिवंत माणसांना घराच्या दगडमातीच्या ढिगा-यातुन बाहेर काढण्याच्या प्रयत्नात मृतदेह काढायचे सुचणार तरी कसे आणि कुणाला?..तशात ढिगा-यामधून बाहेर आलेला हा हात...कोणाचा असेल तो.?....आयुष्याची सुखद स्वप्नं पाहाणा-या मुलीचा......विवाहाची चित्र रंगवणा-या तरुणीचा...कि अर्ध्या संसारातुन अचानक सर्वस्व सोडुन जावे लागलेल्या विवाहितेचा कि आपल्या चिल्यापिल्यांना वाचवण्याची संधीसुध्दा न मिळालेल्या असहाय्य मातेचा? सुन्न मनस्थितीत हा फोटो त्यानी काढला खरा. पण तो पाहतांना मन अजुनही अस्वस्थ होतं...त्या अबलेला आपण गाडले गेलो आहोत हे लक्षात तरी आले असेल का? समजा तिने आरडाओरड केली असली तरी ती ऐकू कोणाला येणार आणि त्या अंधारात मदत तरी कोण करणार..कशी करणार ? सारं गावच उध्वस्त झालेल...
                                                            क्रमशः 
                                                           राजेंद्र भंडारी 
                                                            9730248735

Tuesday, September 24, 2013

मनातील अभंग..या फेसबुकपेज वरील एक सुंदर गोष्ट.

एक दिवसाचा पांडुरंग .....

नक्की वाचा !!
"पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात
गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे
झाडण्याची सेवा करत होता,
तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि,
"विटेवर उभा राहून रोज
हजारो लोकांना दर्शन देत
असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत
असतील, म्हणून एक दिवस त्याने
पांडुरंगाला विचारले, '" देवा तू
आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे
पाय दुखत असतील तेव्हा तू
आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे
राहण्याची सेवा करेन"
त्यावर पांडुरंग म्हणाला, " ठीक आहे ,
पण तू इथे उभा राहून
कोणालाही काही सांगू नकोस,
काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त
हसत उभा रहा"
पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळ ने मान्य केले व
दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडूरंगाच्या जागी उभा राहिला.
तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरु झाले,
श्रीमंत भक्त :-
"देवा मी लाखो रुपायांची देणगी दिली आहे,
माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊंदे"
(त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून
गेला, पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले
पाकीट तेथेच विसरला, पण देवाने
काहीच न करता फक्त उभे राहण्याचे
सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकीट
त्याला परत देऊ शकला नाही, त्यामुळे
तो फक्त हसत उभा राहिला .......... पुढे
तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले )
गरीब भक्त:- "पांडुरंगा, हा एक
रुपया मी तुला अर्पण करतो,
माझी हि धनाची सेवा स्वीकार कर.
तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव,
माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून
घे....... देवा माझी बायको व मुले २
दिवसांपासून उपाशी आहेत, घरात
अन्नाचा कण नाही, माझा सगळा भार
मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल
ते तुझ्या इच्छे प्रमाणे होईल
असा मला विश्वास आहे"
( असे म्हणून तो भक्त आपले डोळे
उघडतो तेव्हा त्याला तिथे
पैशांनी भरलेले पाकीट दिसते,
तेव्हा देवाचे आभार माणू तो ते पाकीट
घेऊन जातो व
आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व
इतर गरीब लोकांना अन्न देतो........
गोकुळ काहीच न बोलता हसत उभाच
असतो )
पुढे तिथे एक नावाडी येतो,
देवाला उद्देशून तो म्हणतो, " हे
पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप
लांबचा प्रवास करायचा आहे,
तेव्हा सर्व व्यवस्थित
होण्यासाठी आशीर्वाद दे "
(असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ
लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त
पोलीसांना घेऊन तिथे येतो, तिथे पाकीट
नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त
पोलिसांमार्फत पाकीट
चोरल्याच्या संशयावरून
नावाड्याला अटक
करतो........तेव्हा गोकुळला फार वाईट
वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने
तो फक्त उभा राहतो )
तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, "
पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस,
मी काहीच नाही केले
तरी मला हि शिक्षा"
(हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते,
तो विचार करतो कि स्वताहा पांडुरंग
जरी इथे असला असता तरी त्याने
काहीतरी केले असते, असे म्हणून न राहवून
तो पोलीसांना सांगतो कि, " पाकीट
नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने
चोरले आहे" ..... त्यावर पोलीस
नावाड्याला सोडून देतात,
तेव्हा नावाडी न श्रीमंत हे दोघे भक्त
देवाचे आभार मानून तेथून निघून जातात.)
रात्री पांडुरंग मंदिरात येतो व
गोकुळाला विचारतो "कसा होता दिवस?"
गोकुळ म्हणतो , " पांडुरंगा मला वाटले
होते कि इथे उभे राहणे फार सोपे काम
आहे, पण आज मला कळाले कि हे काम
किती अवघड आहे ते, ह्यावरून कळते
कि तुझे दिवस हे सोपे नसतात" ....... पण
देवा मी आज एक चांगले काम पण केले, असे
म्हणून तो सारी हकीकत
देवाला सांगतो.
तेव्हा पांडुरंग निराश होऊन
त्याला म्हणतो, " शेवटी तू
माझ्या आज्ञेचा भंग केलास,
तुला मी सांगितले होते कि तू
कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू
ऐकले नाहीस, तुझा माझ्यावर (देवावर)
विश्वासच नाही........ तुला काय वाटते
कि मी भक्तांच्या ह्रुदयातील
भावना ओळखू शकत नाही " .......
गोकुळ मान खाली घालून
उभा राहतो ..........
पांडुरंग पुढे म्हणतो .........
अरे त्या श्रीमंत माणसाने
दिलेल्या देणगीतील पैसे हे
चुकीच्या मार्गातील
आणि भ्रष्टाचारातील होते,
आणि त्या पैशांच्या बदल्यात
त्याला व्यवसाया मध्ये माझ्याकडून
भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट
हरवण्याचा खेळ
मला करावा लागला जेणेकरून ते पैसे
चांगल्या मार्गाला वापरून
त्याच्या पदरातील
पापाचा साठा कमी होणार होता.
त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच
रुपया राहिला होता, तरी देखील
श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण
केला. म्हणून पैशांचे पाकीट
मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त
गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने
तसेच केले आहे.
त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले
नव्हते पण तो समुद्रामध्ये
लांबच्या प्रवासाला जाणार होता,
तेथील वातावरण आज खूप खराब आहे,
मोठमोठ्या लाटा जोराने वहात आहेत,
ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू
शकला नसता व त्याचा प्राण
गेला असता, म्हणून मी त्याला अटक
करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात
बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल.
पण तुला वाटले कि आपण एक
दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे
समजू लागलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस..

Thursday, September 19, 2013

श्री संजयजी सोनवणी यांनी इंग्रजीतुन केलेले पसायदानाचे भाषांतर..

UNIVERSAL ANTHEM BY DNYANESHVAR

And now the Lord
Breathing through His entire creation…
Be pleased
Of my
Sacred hymns
And shall bless me with thus:

Let the evilous thoughts
Be wiped out
Off every heart
To befriend with
The hearts genuine
Be all engaged
In good deeds…forever!

Shroud of dark befallen on
The deprived souls
May get to an permanent end
By the brilliance of
The Sun of the self-righteousness
And all the beings breathing should attain
They desire!

Be it a great gathering
The whole universe
Of devotees
Of the Lord
A scene so sacred
True hearts meeting
The pure hearts!

Be all among the
Dense divine trees
Those Fulfil every desire
And in the country of the
Enlightened souls
Each speaking oceans full
Of the nectar!

As if spotless moon
And the Sun pouring no heat
Such are all the souls as if
Eternal relations!

And so all be so contented
And fulfilled from all the quarters
Eternally devoted to the
Lord Creator!

And so all be happy
Reading this sacred text
Be able to conquer evil with good
With assured permanence!

So this be my blessing
O Lord
With which this humble Dnyandeva
Is delighted!

-Saint Dnyaneshvar
"Dnyaneshvari"

Monday, September 2, 2013

स्वप्नांचे अर्थ....

स्वप्नांचे अर्थ : प्रस्तुतकर्ता -Yogesh Joshi
भारतीय दर्शनशास्त्रानुसार भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्य यांचे सुक्ष्म स्वरुपात वायुमंडळा मध्ये उपस्थीत असतात. जेंव्हा एखादी व्यक्ती नीद्रावस्थे मध्ये असते तेव्हा ती सूक्ष्माकार होउन आपल्या भूत आणि भविष्य यांच्याशी संपर्क स्थापीत करते. हेच संपर्क स्वप्नांचे कारण आणि स्वप्नांचे माध्यम बनते.
॥ जे मनी नसे तेही स्वप्नी दीसे ॥
जी व्यक्ती सक्रीय असते ती स्वप्न बघते,आणि जी व्यक्ती स्वप्न बघत नाही ती व्यक्ती जीवंत असू शकत नाही. थोडक्यात प्रत्येक जीवंत व्यक्ती स्वप्न बघतेच. फक्त जन्माने अंध व्यक्ती स्वप्न बघू शकत नाहीत नहीं देख पण त्यांना स्वप्नात ध्वनी एकता येतो. म्हणजेच त्यांना देखिल स्वप्न पडते. आणि स्वप्न काय झोपतानाच पडतात असं नाही ती जागे पणी पण तर पडतात.
स्वप्नांचे पुढील दोन प्रकार पडतात,
१ जागृत अवस्थे मधील स्वप्न
जागृत अवस्थे मधील स्वप्न कवी, लेखक, प्रेमी-प्रेमीका, अविवाहित कीशोर, युवक-युवती यांना अधीक पडतात. हे स्वप्न कलात्मक असतात .

२ निद्रावस्थे मधील स्वप्न
भारतीय दर्शनशास्त्रानुसार भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांचा सुक्ष्म स्वरुपात वायुमंडळा मध्ये वावर असतो. जेंव्हा एखादी व्यक्ती नीद्रावस्थे मध्ये असते तेव्हा ती सूक्ष्माकार होउन आपल्या भूत आणि भविष्य यांच्याशी संपर्क स्थापीत करते. हेच संपर्क स्वप्नांचे कारण आणि स्वप्नांचे माध्यम बनते. एखाद्या वक्तीची साधाना खूपच प्रबल असते ती व्यक्ती जागे पणी देखील किंवा ध्यान अवस्थे मध्ये या भूतकाळ वा भविष्यकाळाशी संपर्क साधू शकतो. त्यालाव योगी अथवा द्रष्टा किंवा अंतरयामी बोलले जाते.
आपल्या अचेतन मानाची झेप खूपच मोठी असते. आपले अचेतन मनाचा वावर फक्त आपल्या शरीरा पर्यंतच नसतो, ते विश्वाच्या कोणत्याही कोपर्‍यात जेंव्ह पाहीजे तेंव्हा पोहचू शकते. या मनाच्या शक्तीच्या माध्यमातूनच तीनही लोकांच्या कोणत्याही भागात जेंव्हा पाहीजे तेंव्हा पोहचता येते, आणि उसके कोठे काय चालले आहे हे जाणून घेता येते.
नीरर्थक स्वप्न कोणती ?
स्वप्न जागेपणी बघीतले त्याचे फलीत आपण स्वतः घडवायचे असते, तोकाही संकेत नसतो. तसेच दिवसभर ज्या विषयाशी आपला संबध आलेला आहे ते विषय. किंवा जोविषय आपण गेले काही दिवस मनात त्याचा विचार करतोय त्या विषयाचे स्वप्न पडले तर त्याचा अर्थ शोधण्यात काहीच लाभ नाही. तसेच मध्य रात्री झोप लागल्या बरोबर, दूपारी झोपले असता, पडलेले स्वप्न कोणताही संकेत देत नसते अशीस्वप्न नीरर्थक समजावीत. रात्री जर अनेक स्वप्न पडली तर सुरवातीची स्वप्न नीरर्थक ठरतात शेवटचे स्वप्न फल देणारे ठरते.
स्वप्नांचे फल केंव्हा मिळते ?
स्वप्न रात्री तीन वाजल्या पासून ते पहाटे सुर्योदया पूर्वी पडलेल्या स्वप्नांचे फलीत लवकरच मिळते साधारणतः सात दिवसा मध्ये आपल्याला याची प्रचीती येते. मध्य रात्री पडलेले स्वप्न ( रात्री १२. ते पहाटे ०३ दरम्यान पडलेले स्वप्न ) साधारणतः एक महीन्यात आपले फल देते. व मध्य रात्री पुर्वी पडलेली स्वप्न एक वर्षाभरा मध्ये आपले फल देते.
पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात हा समज सर्वत्र आहे. पण त्यात काही प्रमाणात सत्य असले तरी जसे स्वप्न दीसले तसेच ते घडणार असे नसून विशीष्ट स्वप्न पडले असता त्याचे विशीष्ट अर्थ असतो.
शुभ स्वप्न फल विचार :

1 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला डोक्यावर घर जळताना दीसले, तर त्याला अधीकार प्राप्त होण्याचा योग बनतो. ( जास्त मोठा अधीकार. )
2 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला कानात कुंडल, डोक्या वर मुकुट व गळ्यात मोत्याची माळ गातलेली दीसेल त्याला निश्चितच उच्चाधीकार व त्यातून लाभ प्राप्त होतात.
स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला आपण आपल्या शत्रूंना पराजीत करताना दीसला तर त्याला बढती हमखास मिळते.
3 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला गाय, बैल, पक्षी, हत्ती यांच्यावर चढून स्वतः जर समुद्र पार करताना पाहील्यास त्याला जास्त मोठा अधीकार प्राप्त होण्याचा योग बनतो.
4 . एखाद्यास जर कमळाच्या पानावर बसून स्वतः खीर खाताना पाहीले तर त्याला राजकीय पद नवडणुक जिंकण्याचा योग वा मंत्री पद प्राप्त होते.
5 . एखाद्या स्त्रीला जर स्वप्नात आपल्या योनिचे क्षेत्र विकसित होतान दीसले तर तीला निश्चीतच कोणत्या तरी पुरुषाची संपत्ती प्राप्त होण्याचा योग असतो.
6 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतःचे सगळे केस गळून गेलेले व स्वतःला टक्कल पडलेले दीसेल तर त्याला अमुल्य धनप्राप्ती होते.
7 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला कुंभार मडके बनवताना दीसल्यास त्याचे स्वतःचे दूखः लवकरच दूर होणार व धनलाभ होणार असे समजावे.
8 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतः उंच भींतीवर बसलेले पाहील्यास सुख-संपत्ति प्राप्त होते.
9 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतःच्या वया पेक्षा मोठे झालेले दीसले तर त्याला मान-सम्मान प्राप्त होतो.
अशुभ स्वप्न फल विचार :
1 . एखाद्या स्त्रीला जर स्वप्नात स्वतःला टक्कल पडलेले दीसले तर गरीबीचा सामना करण्याचे योग संभवतात.
2 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वतःस दुर्घटना घडताना दीसली तर लवकरच आजार पण संभवते.
3 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वतः प्रवासा साठी वाहनद्वारे जाण्याची तयारी करताना दीसल्यास त्याला योजलेला प्रवास रद्द केलेलाच बरा कारण अपघात भय दीसते.
4 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वतः आरशे फोडत असल्याचे दीसते त्याच्या परीवारात कोणाचा तरी मृत्युसम संकट येते.
5 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर मुंग्याना स्वतः मारताना पाहील्यास व्यापार नाश संभवतो.
6 .एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वतःची नाव तूफानी वादळात फंसलेली दीसल्यास येणारा काळ पुर्ण असण्याची ही सूचना समजावी.
7 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वतः कडू औषध घेताना पाहील्यास जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येण्याचे संकेत आहेत.
8 . स्वप्नात रडणारे बालक दीसणे आजारपण व निराशा यांची सूचना देते.
प्रणय संबंधी स्वप्न फल विचार :
1 . एखाद्या स्त्रीला ( युवती ) जर स्वप्नात रत्नजड़ीत आंगठी अथवा नेकलेस बघते तीचे वैवाहीक जीवन सुखी होते.
2 . एखाद्या स्त्रीला ( युवती ) जर स्वप्नात स्वतःस कोण्या मित्राने दीलेल्या बांगड्या घालताना पाहील्यास शीघ्र विवाह होतो.
3 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला कोणतेही सुंदर वस्त्र दीसल्यास त्याला मधुर स्वभावाची विदुषी पत्नी प्राप्त होते.
4 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला औरत को घूंघट निकालते देखता है तो उसका दांपत्य जीवन सुखमय व्यतीत होता है।
5 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला अपली हरवलेली वस्तु पुन्हा मिळवल्यास त्याला आगामी जीवनात सुख मिळते .
6 . एखाद्या स्त्रीला ( युवती ) जर स्वप्नात स्वतःस मेळा , यात्रा, जत्रा, कार्नीवल, मॉल, अथवा फॅशन शोमध्ये स्वतः भाग घेतला असेल,
7 . अथवा त्यामध्ये लोक यांच्या कडे बघत असतील किंवा यांना बघण्यासाठी लोक येत असतील, किवा स्वतःस फीरताना पाहील्यास योग्य नोकरी व योग्य पती प्राप्त होतो.
8 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर इंद्रधनुष दिसल्यास वास्तविक जीवन सुखमय राहील.
9 . एखादी अविवाहित युवती अपल्या प्रेमीला कोण्या दुसर्‍याच युवतीशी विवाह करताना पाहीले तर तीचा विवाह शीघ्र होतो.
10 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला कोणत्याही सुंदर व स्वस्थ्य नवजात बालकाला ( शिशु ) बघीतल्यास संतान प्राप्त होणार.
11 . एखाद्या स्त्रीला जर स्वप्नात पुरुष आंगठी भेट देताना दीसेल तर पती हिच्यावर खुपच प्रेम करेल.
मिश्रीत स्वप्न फल विचार :
1. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला जीवंत गीधाड दीसता सौभाग्य वृद्धि ,जर गीधाड आकाशात उंच उडताना दीसल्यास जास्त लाभदायक.
2. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला साफ-सुथरी श्मशान भूमी दीसल्यास व्यापार वृद्धि होईल.
3. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतःस पुस्तक वाचताना पाहील्यास समाजात मान-सम्मान वाढतो.
4.स्वप्ना मध्ये जर मशीनने कोणासही गवत कापताना पाहील्यास सौभाग्य वृद्धी होते.
5. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला कोण्या युवतीला कानातले ( कर्णफूल ) घालताना पाहील तर लवकरच शुभवार्ता ऐकण्यास मिळेल.
6. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला धान्याची रास दीसेल तर स्वतःच्या परीश्रमाने सफलता प्राप्त होईल.
7. स्वप्ना मध्ये जर एखाद्या स्त्रीला धान्याची रास दीसेल तर सहज मार्गाने धनप्राप्त होईल.
8. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतः कॉफी अथवा चाहा पीताना पाहील्यास त्याला जीवनात हर्ष्-उल्हास व समृद्धी लाभेल.
9. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतःच्या हात व पायात दुखत असल्याचे दीसल्यास धन प्राप्ती होते.
10. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला कारागीर बनून घर बनवताना पाहील्यास जीवनात अपार सफलता मिळेल. क्रमशः

Thursday, August 22, 2013

नव-यासाठी अन बायकोसाठी..

नवरा-बायकोच्या नात्यांची अलगद गुंफण करणारी सुंदर कविता काल वाचनात आली. दुर्दैवाने कवीचे नाव कळू शकले नाही पण त्याने कवितेची गोडी कमी होत नाही.

तो तिला म्हणाला “डोळ्यात तुझ्या पाहू दे”
ती म्हणाली “पोळि करपेल, थाम्...ब जरा राहू दे”

तो म्हणाला “काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर?”
ती म्हणाली ” आई रागावतील, दूध उतू गेल तर?”

“ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ”
“पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ”

“बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू”
“नको आज काकू यायच्यात, सगळेजण घरीच जेवू”

“तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट”
“बघ तुझ्या नादामधे भाजी झाली तिखट”

आता मात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस
एइकू आली त्याला सुद्धा माजघरातून मुसमुस

सिगरेट पेटवत, एकटाच तो निघून गेला चिडून
डोळे भरून बघत राहिली, ती त्याला खिड़की आडून

दमला भागला दिवस संपला तरी अबोला संपेना
सुरवात नक्की करावी कुठून दोघांनाही कळेना

नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली
अमृतांजन ची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली।

तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला
“रागावलास न माझ्यावर?” आणि तो विरघळला।

“थोडासा…” त्याने सुद्धा कबूल केला आपला राग
ती म्हणाली “बाहेर जावून किती सिगरेट्स ओढल्यास सांग”

“माझी सिगरेट जळताना तुझ जळणं आठवल
छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव जाळण आठवल

अपेक्षांच ओझ तू किती सहज पेललस
सगळ्यांच सुख दुःख तळहातावर झेललस…

तुला नाही का वाटत कधी मोकळ मोकळ व्हावसं
झटकून सगळी ओझी पुन्हा तुझ्या जगात जावस?”

“बोललास हेच पुरे झाल…एकच फ़क्त विसरलास…
माप ओलांडून आले होते, मी-तू पण तेव्हाच गळलं
माझ जग तुझ्या जगात तेव्हाच नाही का विरघळलं?”

-कवी अज्ञात

Sunday, August 11, 2013

ईतिहास..

इतिहास ...(अक्षरदीप दिवाळी अंक २००३ मधून साभार)

May 25, 2013 at 6:35pm
इतिहास कधीच इतिहासजमा होत नाही
इतिहास विसरतात त्यांना क्षमा होत नाही
इतिहास म्हणजे भूतकाळ जागा करणे
आणि भविष्यकाळाला भव्य जागा देणे
इतिहास म्हणजे पुरलेली मढी उकरणे नाही
आणि आजची उरलेली मढी पुन्हा पुरणे नाही
इतिहास विसरला कि भूगोल बदलतो
भूगोल बदलला कि फक्त नकाशा बदलतो
इतिहास भूगोलाची तमा कधी करत नाही
इतिहास पुन्हा घडतो कामा कधी येत नाही
माकडाचा मानव झाला हा इतिहास आहे
मानवाचा माकड होणे हा उपहास आहे
सम्राटांच्या सनावळ्यात इतिहास नसतो
पायांखाली पिचलेल्या हाडात इतिहास असतो
माणूस हा आधी पशु आहे हा इतिहास आहे
माणूस हा गांधी येशू आहे हाही इतिहास आहे
इतिहास म्हणजे चंद्रावर पाऊल ठेवणे
इतिहास म्हणजे परग्रहांची चाहूल घेणे
पृथ्वी नष्ट झाल्यावर इतिहास भूगोलाचे काय
चंद्रावरती असतील मानवाचे घट्ट पाय.....

Sunday, July 21, 2013

विं.दा. करंदीकर.

चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे
मी चालतो अखंड चालायाचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे
डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे!
मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे
चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे
आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे? कवी --विंदा करंदीकर

ललीत...माधव गवाणकरांचा एक सुंदर लेख.

हाय, हॅलो'च्या मनोऱ्यावर बसलेला भिंगऱ्या पाखरांचा थवा तर नावानंच "दुर्बळ' आहे, त्याला अधिक दुबळं बनवण्याची शक्ती टॉवरमध्ये आहे का, .....हे मला ठाऊक नाही; पण पक्ष्यांचं एकूण जगात कोण आहे? ज्यांचा बाजार भरतो, सौदे होतात, वापर होतो त्या साऱ्यांचंच दुनियेत कुणी नाही !

आकाश हाती लागत नाही. जितकं वर जावं, तितकं ते अधिक उंचावर जातं. माणसाची माती झाली, तरी "वर गेला' असंच कल्पनेनं म्हटलं जातं. आभाळाला गाठणं सोपं नव्हेच! गगन ठेंगणं होतं ते गर्वामुळे; पण त्या फुग्याला काळच टाचणी लावतो. छाती फुगवून चालणारे अंथरुणाला खिळून त्यांची दैना होते. आकाश असं खरोखर काही असतं का? मला वाटतं, असत नाही ! आभासी आभाळ चकवत राहतं. समूहातसुद्धा त्याचं निळं-जांभळं रूप स्वतःला बघत असतं. अगदी विमानाशी स्पर्धा करत घिरट्या घालणाऱ्या शिकारी घारीलाही आकाशाला स्पर्श करता येत नाही. ढग ढढ्‌ढम पण दंगेखोर मुलांच्या वर्गासारखे एकमेकांना ढकलत-बुकलत असतात. कधी "फुटलेल्या' आवाजात कोकलत असतात. ढगफुटी ती हीच! तरीही, मस्ती करणारं आभाळ निसटतं. आपल्या पकडीत, मुठीत ते कधीच येत नाही. वाट चुकलेले ढग फार उंचावर बांधलेल्या माऊ माऊच्या घरात येऊन जायचं; पण हात लावावा तर केवळ हवा अन्‌ धुकट ! आपलं अस्तित्वही अखेरीस राख व धूर इतकंच आहे. आपण साहित्याच्या, संमेलनांच्या केवढ्या बढाया मारतो; जणू काही लढायाच... पण छे ! आपट्याच्या पानांना सोनं म्हणावं, तसं "मानलं तर धन' इतकंच द्रव्य मराठी लेखनातून सुटतं.

"हाय, हॅलो'च्या मनोऱ्यावर बसलेला भिंगऱ्या पाखरांचा थवा तर नावानंच "दुर्बळ' आहे, त्याला अधिक दुबळं बनवण्याची शक्ती टॉवरमध्ये आहे का, ...हे मला ठाऊक नाही; पण पक्ष्यांचं एकूण जगात कोण आहे? ज्यांचा बाजार भरतो, सौदे होतात, वापर होतो त्या साऱ्यांचंच दुनियेत कुणी नाही !

उद्या एखादं अस्त्र असा "अतिरेक' करेल, की पाताळ, पृथ्वी अन्‌ आभाळ, अवघा आसमंतच जहरी बनेल. जे अखेरचा श्‍वास घेणार नाहीत, त्यांना मोठ्या नगरात, राजधानीत जगण्याचा पश्‍चात्ताप होईल, कारण दहशत दाखवणाऱ्यांना आभाळच नसतं. आपण निदान स्वप्नात नक्षत्रसुंदर आकाश सखीला दाखवतो; पण जगण्याचं ओसाड वाळवंट झाल्यावर लपून-छपून राहिल्यावर वाट चुकलेला फरार, परागंदा तरुण कुठं अन्‌ कसं आकाश शोधणार? माझ्या काळजातलं वात्सल्य त्याचीही काळजी करतं. हा दोष आहे की गुण, ते माझे प्रिय वाचक सांगतील; पण तसं आहे खरं. कदाचित, हे काळजातलं आभाळ माझ्यापुरतं अस्सल असेल, दुसऱ्यासाठी डोळ्यांत पाणी भरणारं जग तुमचं नसेल, माझं आहे ! "माधवा, दुसऱ्याला धीर देण्याइतकं मोलाचं बाकी काही नाही' असं "आकाश'वाणीतच मला ज्येष्ठ सन्मित्र रवींद्र पिंगे म्हणाले होते. खरं आहे पिंगे ! आपलं तेव्हाचं जग सत्त्व, तत्त्व जपणारं होतं. आकाशात वाणी उमटवणाऱ्यांचा परिवार होता.

आम्ही तर तारेवरचे टिटवे. करारी कलाकार. तुम्ही पटावर होता; पण आकाशाच्या छोट्या छोट्या तुकड्यांवर एकमेकांना स्नेहानं आपण किती रसाळ, मधाळ पत्रं लिहायचो नै? "नवा प्रोड्युसर तुला दाद देत नाही? मी सांगतो त्याला' अशी फुंकर मारल्यावर माझं कोवळं वय पुन्हा उमेदीनं कामाला लागायचं. नशेबाज जमान्यात आज इतकी चंगळ आहे; टंगळमंगळही आहे. भोगाचे झुले आहेत. स्वस्त मस्त "भंकसपऱ्या' आहेत, बुवाबाजीची दुकानं आहेत. "जादूगार' महाराज झाले आहेत. अंधविश्‍वासांचं मार्केटिंग आहे. बुडाशी बाइक अन्‌ हाताशी "सेल' आहे. चार वर्षांची आमची सावरी लॅपटॉपशी खेळते. सुविधा आणि आश्वासनांच्या या नंदनवनात श्‍वास दुखरे का? द्वेषाच्या इतक्‍या खुपऱ्या का? कारस्थानांचे कारखाने कशासाठी? लॉबी आणि गॅंग्ज शेवटी कुठे चालल्या आहेत? इतकी पारध करून, इतकं मृगजळ ओलांडून एवढे सोन्याचे रांजण कलंडून, इतकं अत्तर रुमालावर शिंपडून अखेरीस काय गवसतं? किती काय उरतं? शून्य नजरेनं झोपाळ्यावर बसून राहिलेली डोकरी माणसं किंवा डिप्रेशननं ओंडका झालेला हुशार तरुण या दोन्ही टोकांच्या माणसांना आकाश काही लाभत नाही. तुम्हीच सांगा, काय करावं? कसं करावं? बोलाल काही...?

Thursday, July 18, 2013

गणपती अथर्वशीर्ष मराठी अर्थ

श्री गणेश अथर्वशीर्ष हे गणपतीचे एक स्तोत्र आहे.
शान्तिमंत्र

ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा: भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूर्भिर्व्यशेम देवहितं (देवहितैं) यदायु: ||१|| ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा: स्वस्ति न: पूषा विश्ववेदाः | स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ||२|| ॐ तन्मा अवतु। तद् वक्तारमवतु। अवतु माम्। अवतु वक्तारम् ॐ शांति : शांतिः शांति : |

गणपतीचे आधिदैविक स्वरूप
ॐ नमस्ते गणपतये || त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि || त्वमेव केवलं कर्तासि || त्वमेव केवलं धर्तासि || त्वमेव केवलं हर्तासि ||त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि || त्वं ( त्वौं ) साक्षादात्मासि नित्यम् ||१||

सत्य कथन
ऋतम् वच्मि || सत्यं ( सत्यौं ) वच्मि || २||

रक्षणासाठी प्रार्थना
अव त्वं माम्‌ || अव वक्तारम् || अव श्रोतारम् || अव दातारम् || अव धातारम् || अवानूचानमव शिष्यम् || अव पश्चात्तात्‌ || अव पुरस्तात् || अवोत्तरात्तात् || अव दक्षिणात्तात् || अव चोर्ध्वात्तात् || अवाधरात्तात् || सर्वतो मां पाही पाहि समंतात् ||३||
==गणपतीचे आध्यात्मिक स्वरूप==
त्वं वाङ्‌मयस्त्वं चिन्मय: || त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममय: || त्वं ( त्वौं ) सच्चिदानंदाद्वितीयोऽसि | त्वं ( त्वौं ) प्रत्यक्षं ब्रह्मासि | त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ||४||
गणपतीचे स्वरूप

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते || सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति || सर्वंन् जगदिदं त्वयि लयमेष्यति || सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति ||
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ: || त्वं चत्वारि वाक्पदानि ||५|| त्वं गुणत्रयातीत: | त्वं देहत्रयातीत: | त्वं कालत्रयातीत: | त्वं अवस्थात्रयातीतः । त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् || त्वं ( त्वौं ) शक्तित्रयात्मक: | त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् || त्वम् ब्रहमा त्वम् विष्णुस् त्वम् रुद्रस् त्वम् इन्द्रस् त्वम् अग्निस् त्वं ( त्वौं ) वायुस् त्वम् सूर्यस् त्वम्‌ चंद्रमास् त्वम् ब्रह्मभूर्‌भुव: स्वरोम् ||६||

गणेशविद्या
गणादिम् पूर्वमुच्चार्य वर्णादिस्‌ तदनंतरम् | अनुस्वार: परतर: | अर्धेन्दुलसितम् | तारेण ऋद्धम् | एतत्तव मनुस्वरूपम् | गकार: पूर्वरूपम् | अकारो मध्यमरूपम् | अनुस्वारश्चान्त्यरूपम् | बिंदुरुत्तररूपम् | नादः संधानम् || संहिता (सौंहिता ) संधिः | सैषा गणेशविद्या | गणक ऋषि: | निचृद्‌गायत्रीछंदः गणपतिर्देवता | ॐ गं गणपतये नम: ||७||
एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि | तन्नो दंती प्रचोदयात् || ८ ||
एकदंतं चतुर्हस्तम् पाशमंकुशधारिणम् || रदं च वरदं ( वरदौं ) हस्तैर्‌बिभ्राणं मूषकध्वजम् | रक्तम् लंबोदरम् शूर्पकर्णकम् रक्तवाससम् || रक्तगंधानुलिप्तांगम् रक्तपुष्पै: सुपूजितम् | भक्तानुकंपिनम् देवं जगत्कारणमच्युतम् | आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते: पुरुषात्परम् || एवम् ध्यायति यो नित्यम् स योगी योगिनां(उं) वर: ||९||

==नमन==
नमो व्रातपतये नमो गणपतये नम: प्रमथपतये नमस्तेऽस्तु लंबोदरायैकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय वरदमूर्तये नम: || १० ||

==फलश्रुति==
एतदथर्वशीर्षम्‌ योऽधीते || स ब्रह्मभूयाय कल्पते || स् सर्वविघ्नैर्न बाध्यते || स सर्वत: सुखमेधते || स पञ्चमहापापात्प्रमुच्यते || सायमधीयानो दिवसकृतम्‌ पापन्‌ नाशयति || प्रातरधीयानो रात्रिकृतम्‌ पापन्‌ नाशयति || सायं प्रात: प्रयुंजानो अपापो भवति || सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति | धर्मार्थकाममोक्षं च विंदति || इदम्‌अथर्वशीर्षम्‌ अशिष्याय न देयम्‌|| यो यदि मोहाद्दास्यति || स पापीयान्‌ भवति || सहस्रावर्तनात्‌ यं (यैं) यं काममधीते तं तमनेन साधयेत्‌||११||
अनेन गणपतिम्‌ अभिषिंचति || स वाग्मी भवति || चतुर्थ्यामनश्नञ्जपति || स विद्यावान्भवति || इत्यथर्वणवाक्यम्‌|| ब्रह्माद्यावरणं (णौं) विद्यात्‌|| न बिभेति कदाचनेति || १२ ||
यो दूर्वांकुरैर्यजति || स वैश्रवणोपमो भवति || यो लाजैर्यजति || स यशोवान्भवति || स मेधावान्भवति || यो मोदकसहस्रेण यजति || स वांछितफलमवाप्नोति || यः साज्यसमिदभिर्यजति || स सर्वम् लभते स सर्वम् लभते || अष्टौ ब्राह्मणान्‌सम्यग्राहयित्वा || सूर्यवर्चस्वी भवति || सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्‌त्वा सिद्धमंत्रो भवति || महाविघ्नात्प्रमुच्यते | महादोषात्प्रमुच्यते || महापापात्प्रमुच्यते || स सर्वविद्भवति स सर्वविद्‍भवति || य एवं वेद इत्युपनिषत्‌ ||१३||

शान्तिमंत्र
ॐ सह नाववतु | सह नौ भुनक्तु | सह वीर्यं करवावहै | तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै || ॐ शांति : शांतिः शांति : |
ॐ भद्रंकर्‌णेर्भिः शृणुयाम देवा: भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभिर् व्यशेम देवहितं यदायु: ||१||
ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा: स्वस्ति न: पूषा विश्ववेदाः | स्वस्ति नस्तार्‌क्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्‌दधातु ||२||
ॐ शांति : शांतिः शांति : । इति श्री गणपती अथर्वशीर्ष: समाप्तः ।

अर्थ
भगवान श्रीगणेशांना नमस्कार असो.
ॐ हे देवांनो, आम्ही कानांनी शुभ ऎकावे. यजन करणाऱ्या आम्हांस डोळ्यांनी कल्याणच दिसावे. सुदृढ अवयवांनी व शरीरांनी युक्त असलेल्या आम्ही स्तवन करीत करीत देवांनी दिलेलें जे आयुष्य असेल तें घालवावे. ॥१॥
ॐ ज्याची किर्ती वृद्धांपासून (परंपरेने) ऎकिवांत आहे तो इंद्र आमचें कल्याण करो. सर्वद्न्य व सर्वसंपन्न असा पूषा (सूर्य) आमचे कल्याण करो. ज्याची गती अकुंठित आहे असा तार्क्ष्य (गरूड) आमचे कल्याण करो. बृहस्पती आमचे कल्याण वृद्धिंगत करो. ॥२॥
ॐ तें (श्रीगजाननरूपी तेज) माझें रक्षण करो. पठण करणाराचे रक्षण करो. (पुनश्च सांगतों) तें माझें रक्षण करो व पठण करणाराचे रक्षण करो. ॥३॥
ॐ त्रिवार शांति असो.
श्रीगणेश अथर्वशीर्षाचा अर्थ:
ॐ गणांचा नायक असलेल्या तुला नमस्कार असो. तूंच प्रत्यक्ष आदितत्व आहेस. तूंच केवळ (सर्व जगाचा) निर्माता आहेस. तूंच केवळ (विश्वाचे) धारण करणारा आहेस. तूंच केवळ संहार करणारा आहेस. तूंच खरोखर हें सर्व ब्रम्ह आहेस. तूं प्रत्यक्ष शाश्वत आत्मतत्व आहेस. ॥१॥
मी ऋत आणि सत्य (या परमत्म्याच्या दोन्ही अंगांना अनुलक्षून वरील सर्व) म्हणत आहें. ॥२॥
तूं माझें रक्षण कर. वक्त्याचे (तुझें गुणवर्णन करणार्यारचें) रक्षण कर. श्रोत्याचें रक्षण कर. (शिष्यास उपासना) देणार्यासचे (गुरूचें) रक्षण कर. (ती उपासना) धारण करणार्यायचे (शिष्याचे) रक्षण कर. ज्ञानदात्या (गुरूंचें) रक्षण कर. शिष्याचें रक्षण कर. मागच्या बाजूनें रक्षण कर. समोरून रक्षण कर. डावीकडून रक्षण कर. उजवीकडून रक्षण कर. आणि ऊर्ध्व दिशेकडून रक्षण कर. अधर दिशेकडून रक्षण कर. सर्व बाजूंनी सर्व ठिकाणी माझें रक्षण कर. रक्षण कर. ॥३॥
तूं ब्रम्ह आहेस. तूं चैतन्यमय आहेस. तूं आनन्दरूप आहेस. ज्याहून दुसरें कांहींच तत्व नाहीं असें सत्, चित् व आनंद (या रूपांनी प्रतीत होणारें एकच) तत्व तूं आहेंस. तूं प्रत्यक्ष ब्रम्ह आहेस. तूं (नाना प्रकारें नटलेल्या विश्वाचें ज्ञान आहेस. तू (सर्वसाक्षीभूत एकत्वाचें) विशिष्ट असें ज्ञान आहेस. ॥४॥ हें सर्व जग तुझ्यापासून उत्पन्न होतें. हें सर्व जग तुझ्यामुळें स्थिर राहतें. हें सर्व जग तुझ्या ठिकाणींच परत येऊन मिळतें. तूं पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश आहेस. तूं (परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी ही) वाणीची चार रूपें आहेस. ॥५॥
तूं (सत्व, रजस् व तमस्) या त्रिगुणांच्या पलीकडे आहेस. तूं (स्थूलदेह, सूक्ष्मदेह व कारणदेह) या देहत्रयांच्या पलीकडचा (महाकारण) आहेस. तूं (जाग्रद्वस्था, स्वप्नावस्था व सुषुप्तावस्था) या तीन अवस्थांच्या पलीकडचा (तुर्यावस्थारूप) आहेस. तूं (भूत, वर्तमान व भविष्यत्) या तिन्ही कालांच्या पलीकडचा आहेस. (मनुष्यशरीरांतील) मूलाधारचक्रांत तूं नेहमी स्थित आहेस. तूं (इच्छाशक्ति, ज्ञानशक्ति व क्रियाशक्ति या) तिन्ही शक्तींचा आत्मा आहेस. योगी तुझें नित्य ध्यान करितात. तूं ब्रम्हदेव, तूंच विष्णु, तूंच रूद्र, तूंच इंद्र, तूंच अग्नि, तूंच वायु, तूंच सुर्य, तूंच चंद्र, तूंच ब्रह्म, तूंच भू:, तूंच भुव:, तूंच स्व: व तूंच ॐकार आहेस. ॥६॥
’गण’ शब्दाचा आदिवर्ण ‘ग्’ याचा प्रथम उच्चार करून वर्णांतील प्रथमवर्ण ‘अ’ याचा उच्चार केला. त्याचे समोर अनुस्वार अर्ध्चंद्राकार शोभणार्याा ॐकारानें युक्त (असा उच्चार केला कीं) हें तुझ्या बीजमन्त्राचे (ग्ँ) रूप होय. गकार हें पुर्वरूप, अकार मध्यरूप, अनुस्वार अन्त्यरूप व (प्रणवरूप) बिंदु (हें पुर्वीच्या तिन्हींना व्यापणारें) उत्तररूप होय. या (सर्वां) चे एकीकरण करणारा नाद होय. सर्वांचें एकत्रोच्चारण म्हणजेच सन्धि. (अशा रीतीनें बीजमन्त्र सिद्ध होणें) हीच ती गणेशविद्या. (या मंत्राचा) गणक ऋषी आहे. (या मंत्राचा) निच्ऋद्गायत्री हा छन्द (म्हणण्याचा प्रकार) आहे. गणपति देवता आहे. ‘ॐ गं गणपतये नम:।‘ (हा तो अष्टाक्षरी मन्त्र होय.) ॥७॥
आम्ही एकदन्ताला जाणतों. आम्ही वक्रतुंडाचे ध्यान करतों. त्यासाठी एकदन्त आम्हांस प्रेरणा करो. ॥8॥ (या भागास गणेशगायत्री असे म्हणतात.) ॥८॥
एक दांत असलेला, चार हात असलेला, (उजव्या बाजूच्या वरच्या हातापासून प्रदक्षिणाक्रमानें त्याच बाजूच्या खालच्या हातापर्यंत) अनुक्रमें पाश, अंकुश, दांत व वरदमुद्रा धारण करणारा, ध्वजावर मूषकाचें चिन्ह असणारा, तांबड्या रंगाचा, लांबट उदर असलेला, सुपासारखे कान असलेला, रक्तवस्त्र धारण करणारा, तांबड्या (रक्तचंदनाच्या) गन्धानें ज्याचे अंग विलेपित आहे असा, तांबड्या पुष्पांनी ज्याचें उत्तम पूजन केले आहे असा, भक्तांवर दया करणारा, सर्व जगाचें कारण असणारा, अविनाशी, सृष्टीच्या आधींच प्रगट झालेला, प्रकृतिपुरूषापलीकडचा देव, असें जो नित्य ध्यान करतो तो योगी, (किंबहुना) योग्यांत श्रेष्ठ होय. ॥९॥
व्रतांचा समूह म्हणजेच तपश्चर्या. तिच्या अधिपतीस नमस्कार असो. गणांच्या नायकार नमस्कार असो. सर्व अधिपतींतील प्रथम अधिपतीस नमस्कार असो. लंबोदर, एकदन्त, विघ्ननाशी, शिवसुत अशा श्रीवरदमुर्तीला नमस्कार असो. ॥१०॥
या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करतो तो ब्रम्हरूप होतो. त्याला कोणत्याच विघ्नांची बाधा होत नाहीं. तो सर्व बाजूंनी सुखांत वाढतो. (हिंसा, अभक्ष्यभक्षण, परदारागमन, चौर्य व पापसंसर्ग) या पांचही महापापांपासून मुक्त होतो. संध्याकाळी पठण करणारा दिवसा (अज़ाणपणे) केलेल्या पापाचा नाश करतो. सकाळीं पठण करणारा रात्रीं (नकळत) केलेल्या पापांचा नाश करतो. संध्याकाळीं व सकाळीं पठण करणारा पाप (प्रवृत्ती) रहित होतो. सर्व ठिकाणी (याचे) अध्ययन करणारा विघ्नमुक्त होतो. धर्म, अर्थ, काम व मोक्ष मिळवितो. हें अथर्वशीर्ष (अनधिकारी) शिष्य-भाव नसलेल्या माणसाला सांगूं नये. जर कोणी अशा अनधिकार्याीस मोहाने देईल तर तो मोठाच पापी होतो. या अथर्वशीर्षाच्या सहस्त्र आवर्तनांनी जी जी कामना मनुष्य करील ती ती या योगें सिद्ध होईल. ॥११॥
या अथर्वशीर्षानें जो गणपतीला अभिषेक करतो, तो उत्त्म वक्ता होतो, चतुर्थीच्या दिवशी कांहीं न खातां जो याचा जप करतो तो विद्यासंपन्न होतो, असें अथर्वण ऋषींचें वाक्य आहे. (याचा जप करणार्याीला) ब्रह्म व आद्या (म्हणजे माया) यांचा विलास कळेल. तो कधींच भीत नाहीं. ॥१२॥ जो दुर्वांकुरांनी हवन करतो तो कुबेरासम होतो. जो साळीच्या लाह्यांनी हवन करतो, तो यशस्वी सर्वंकष बुद्धिमान् होतो. जो सहस्त्र मोदकांनी हवन करतो, त्याला इष्ट्फल प्राप्त होते. जो घृतयुक्त समिधांनीं हवन करतो त्याला सर्व मिळते, अगदी सर्व काही प्राप्त होतें. ॥१३॥
आठ ब्राम्हणांना योग्य प्रकारें (याचा) उपदेश केल्यास, करणारा सूर्यासारखा तेजस्वी होतो. सूर्यग्रहणांत, महानदीतीरीं किंवा गणपति प्रतिमेसंनिध जप केल्यास हा मंत्र सिद्ध होतो. (असा मंत्र सिद्ध करणारा) महाविघ्नापासून मुक्त होतो. महादोषापासून मुक्त होतो. महापापापासून मुक्त होतो. तो सर्वज्ञ होतो. तो सर्वसंपन्न होतो, जो हें असें जाणतो. असें हें उपनिषद् आहे. ॥१४            हेमंत सहस्रबुदधे