Tuesday, September 24, 2013

मनातील अभंग..या फेसबुकपेज वरील एक सुंदर गोष्ट.

एक दिवसाचा पांडुरंग .....

नक्की वाचा !!
"पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात
गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे
झाडण्याची सेवा करत होता,
तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि,
"विटेवर उभा राहून रोज
हजारो लोकांना दर्शन देत
असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत
असतील, म्हणून एक दिवस त्याने
पांडुरंगाला विचारले, '" देवा तू
आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे
पाय दुखत असतील तेव्हा तू
आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे
राहण्याची सेवा करेन"
त्यावर पांडुरंग म्हणाला, " ठीक आहे ,
पण तू इथे उभा राहून
कोणालाही काही सांगू नकोस,
काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त
हसत उभा रहा"
पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळ ने मान्य केले व
दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडूरंगाच्या जागी उभा राहिला.
तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरु झाले,
श्रीमंत भक्त :-
"देवा मी लाखो रुपायांची देणगी दिली आहे,
माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊंदे"
(त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून
गेला, पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले
पाकीट तेथेच विसरला, पण देवाने
काहीच न करता फक्त उभे राहण्याचे
सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकीट
त्याला परत देऊ शकला नाही, त्यामुळे
तो फक्त हसत उभा राहिला .......... पुढे
तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले )
गरीब भक्त:- "पांडुरंगा, हा एक
रुपया मी तुला अर्पण करतो,
माझी हि धनाची सेवा स्वीकार कर.
तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव,
माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून
घे....... देवा माझी बायको व मुले २
दिवसांपासून उपाशी आहेत, घरात
अन्नाचा कण नाही, माझा सगळा भार
मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल
ते तुझ्या इच्छे प्रमाणे होईल
असा मला विश्वास आहे"
( असे म्हणून तो भक्त आपले डोळे
उघडतो तेव्हा त्याला तिथे
पैशांनी भरलेले पाकीट दिसते,
तेव्हा देवाचे आभार माणू तो ते पाकीट
घेऊन जातो व
आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व
इतर गरीब लोकांना अन्न देतो........
गोकुळ काहीच न बोलता हसत उभाच
असतो )
पुढे तिथे एक नावाडी येतो,
देवाला उद्देशून तो म्हणतो, " हे
पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप
लांबचा प्रवास करायचा आहे,
तेव्हा सर्व व्यवस्थित
होण्यासाठी आशीर्वाद दे "
(असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ
लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त
पोलीसांना घेऊन तिथे येतो, तिथे पाकीट
नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त
पोलिसांमार्फत पाकीट
चोरल्याच्या संशयावरून
नावाड्याला अटक
करतो........तेव्हा गोकुळला फार वाईट
वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने
तो फक्त उभा राहतो )
तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, "
पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस,
मी काहीच नाही केले
तरी मला हि शिक्षा"
(हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते,
तो विचार करतो कि स्वताहा पांडुरंग
जरी इथे असला असता तरी त्याने
काहीतरी केले असते, असे म्हणून न राहवून
तो पोलीसांना सांगतो कि, " पाकीट
नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने
चोरले आहे" ..... त्यावर पोलीस
नावाड्याला सोडून देतात,
तेव्हा नावाडी न श्रीमंत हे दोघे भक्त
देवाचे आभार मानून तेथून निघून जातात.)
रात्री पांडुरंग मंदिरात येतो व
गोकुळाला विचारतो "कसा होता दिवस?"
गोकुळ म्हणतो , " पांडुरंगा मला वाटले
होते कि इथे उभे राहणे फार सोपे काम
आहे, पण आज मला कळाले कि हे काम
किती अवघड आहे ते, ह्यावरून कळते
कि तुझे दिवस हे सोपे नसतात" ....... पण
देवा मी आज एक चांगले काम पण केले, असे
म्हणून तो सारी हकीकत
देवाला सांगतो.
तेव्हा पांडुरंग निराश होऊन
त्याला म्हणतो, " शेवटी तू
माझ्या आज्ञेचा भंग केलास,
तुला मी सांगितले होते कि तू
कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू
ऐकले नाहीस, तुझा माझ्यावर (देवावर)
विश्वासच नाही........ तुला काय वाटते
कि मी भक्तांच्या ह्रुदयातील
भावना ओळखू शकत नाही " .......
गोकुळ मान खाली घालून
उभा राहतो ..........
पांडुरंग पुढे म्हणतो .........
अरे त्या श्रीमंत माणसाने
दिलेल्या देणगीतील पैसे हे
चुकीच्या मार्गातील
आणि भ्रष्टाचारातील होते,
आणि त्या पैशांच्या बदल्यात
त्याला व्यवसाया मध्ये माझ्याकडून
भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट
हरवण्याचा खेळ
मला करावा लागला जेणेकरून ते पैसे
चांगल्या मार्गाला वापरून
त्याच्या पदरातील
पापाचा साठा कमी होणार होता.
त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच
रुपया राहिला होता, तरी देखील
श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण
केला. म्हणून पैशांचे पाकीट
मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त
गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने
तसेच केले आहे.
त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले
नव्हते पण तो समुद्रामध्ये
लांबच्या प्रवासाला जाणार होता,
तेथील वातावरण आज खूप खराब आहे,
मोठमोठ्या लाटा जोराने वहात आहेत,
ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू
शकला नसता व त्याचा प्राण
गेला असता, म्हणून मी त्याला अटक
करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात
बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल.
पण तुला वाटले कि आपण एक
दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे
समजू लागलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस..

Thursday, September 19, 2013

श्री संजयजी सोनवणी यांनी इंग्रजीतुन केलेले पसायदानाचे भाषांतर..

UNIVERSAL ANTHEM BY DNYANESHVAR

And now the Lord
Breathing through His entire creation…
Be pleased
Of my
Sacred hymns
And shall bless me with thus:

Let the evilous thoughts
Be wiped out
Off every heart
To befriend with
The hearts genuine
Be all engaged
In good deeds…forever!

Shroud of dark befallen on
The deprived souls
May get to an permanent end
By the brilliance of
The Sun of the self-righteousness
And all the beings breathing should attain
They desire!

Be it a great gathering
The whole universe
Of devotees
Of the Lord
A scene so sacred
True hearts meeting
The pure hearts!

Be all among the
Dense divine trees
Those Fulfil every desire
And in the country of the
Enlightened souls
Each speaking oceans full
Of the nectar!

As if spotless moon
And the Sun pouring no heat
Such are all the souls as if
Eternal relations!

And so all be so contented
And fulfilled from all the quarters
Eternally devoted to the
Lord Creator!

And so all be happy
Reading this sacred text
Be able to conquer evil with good
With assured permanence!

So this be my blessing
O Lord
With which this humble Dnyandeva
Is delighted!

-Saint Dnyaneshvar
"Dnyaneshvari"

Monday, September 2, 2013

स्वप्नांचे अर्थ....

स्वप्नांचे अर्थ : प्रस्तुतकर्ता -Yogesh Joshi
भारतीय दर्शनशास्त्रानुसार भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्य यांचे सुक्ष्म स्वरुपात वायुमंडळा मध्ये उपस्थीत असतात. जेंव्हा एखादी व्यक्ती नीद्रावस्थे मध्ये असते तेव्हा ती सूक्ष्माकार होउन आपल्या भूत आणि भविष्य यांच्याशी संपर्क स्थापीत करते. हेच संपर्क स्वप्नांचे कारण आणि स्वप्नांचे माध्यम बनते.
॥ जे मनी नसे तेही स्वप्नी दीसे ॥
जी व्यक्ती सक्रीय असते ती स्वप्न बघते,आणि जी व्यक्ती स्वप्न बघत नाही ती व्यक्ती जीवंत असू शकत नाही. थोडक्यात प्रत्येक जीवंत व्यक्ती स्वप्न बघतेच. फक्त जन्माने अंध व्यक्ती स्वप्न बघू शकत नाहीत नहीं देख पण त्यांना स्वप्नात ध्वनी एकता येतो. म्हणजेच त्यांना देखिल स्वप्न पडते. आणि स्वप्न काय झोपतानाच पडतात असं नाही ती जागे पणी पण तर पडतात.
स्वप्नांचे पुढील दोन प्रकार पडतात,
१ जागृत अवस्थे मधील स्वप्न
जागृत अवस्थे मधील स्वप्न कवी, लेखक, प्रेमी-प्रेमीका, अविवाहित कीशोर, युवक-युवती यांना अधीक पडतात. हे स्वप्न कलात्मक असतात .

२ निद्रावस्थे मधील स्वप्न
भारतीय दर्शनशास्त्रानुसार भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांचा सुक्ष्म स्वरुपात वायुमंडळा मध्ये वावर असतो. जेंव्हा एखादी व्यक्ती नीद्रावस्थे मध्ये असते तेव्हा ती सूक्ष्माकार होउन आपल्या भूत आणि भविष्य यांच्याशी संपर्क स्थापीत करते. हेच संपर्क स्वप्नांचे कारण आणि स्वप्नांचे माध्यम बनते. एखाद्या वक्तीची साधाना खूपच प्रबल असते ती व्यक्ती जागे पणी देखील किंवा ध्यान अवस्थे मध्ये या भूतकाळ वा भविष्यकाळाशी संपर्क साधू शकतो. त्यालाव योगी अथवा द्रष्टा किंवा अंतरयामी बोलले जाते.
आपल्या अचेतन मानाची झेप खूपच मोठी असते. आपले अचेतन मनाचा वावर फक्त आपल्या शरीरा पर्यंतच नसतो, ते विश्वाच्या कोणत्याही कोपर्‍यात जेंव्ह पाहीजे तेंव्हा पोहचू शकते. या मनाच्या शक्तीच्या माध्यमातूनच तीनही लोकांच्या कोणत्याही भागात जेंव्हा पाहीजे तेंव्हा पोहचता येते, आणि उसके कोठे काय चालले आहे हे जाणून घेता येते.
नीरर्थक स्वप्न कोणती ?
स्वप्न जागेपणी बघीतले त्याचे फलीत आपण स्वतः घडवायचे असते, तोकाही संकेत नसतो. तसेच दिवसभर ज्या विषयाशी आपला संबध आलेला आहे ते विषय. किंवा जोविषय आपण गेले काही दिवस मनात त्याचा विचार करतोय त्या विषयाचे स्वप्न पडले तर त्याचा अर्थ शोधण्यात काहीच लाभ नाही. तसेच मध्य रात्री झोप लागल्या बरोबर, दूपारी झोपले असता, पडलेले स्वप्न कोणताही संकेत देत नसते अशीस्वप्न नीरर्थक समजावीत. रात्री जर अनेक स्वप्न पडली तर सुरवातीची स्वप्न नीरर्थक ठरतात शेवटचे स्वप्न फल देणारे ठरते.
स्वप्नांचे फल केंव्हा मिळते ?
स्वप्न रात्री तीन वाजल्या पासून ते पहाटे सुर्योदया पूर्वी पडलेल्या स्वप्नांचे फलीत लवकरच मिळते साधारणतः सात दिवसा मध्ये आपल्याला याची प्रचीती येते. मध्य रात्री पडलेले स्वप्न ( रात्री १२. ते पहाटे ०३ दरम्यान पडलेले स्वप्न ) साधारणतः एक महीन्यात आपले फल देते. व मध्य रात्री पुर्वी पडलेली स्वप्न एक वर्षाभरा मध्ये आपले फल देते.
पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात हा समज सर्वत्र आहे. पण त्यात काही प्रमाणात सत्य असले तरी जसे स्वप्न दीसले तसेच ते घडणार असे नसून विशीष्ट स्वप्न पडले असता त्याचे विशीष्ट अर्थ असतो.
शुभ स्वप्न फल विचार :

1 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला डोक्यावर घर जळताना दीसले, तर त्याला अधीकार प्राप्त होण्याचा योग बनतो. ( जास्त मोठा अधीकार. )
2 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला कानात कुंडल, डोक्या वर मुकुट व गळ्यात मोत्याची माळ गातलेली दीसेल त्याला निश्चितच उच्चाधीकार व त्यातून लाभ प्राप्त होतात.
स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला आपण आपल्या शत्रूंना पराजीत करताना दीसला तर त्याला बढती हमखास मिळते.
3 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला गाय, बैल, पक्षी, हत्ती यांच्यावर चढून स्वतः जर समुद्र पार करताना पाहील्यास त्याला जास्त मोठा अधीकार प्राप्त होण्याचा योग बनतो.
4 . एखाद्यास जर कमळाच्या पानावर बसून स्वतः खीर खाताना पाहीले तर त्याला राजकीय पद नवडणुक जिंकण्याचा योग वा मंत्री पद प्राप्त होते.
5 . एखाद्या स्त्रीला जर स्वप्नात आपल्या योनिचे क्षेत्र विकसित होतान दीसले तर तीला निश्चीतच कोणत्या तरी पुरुषाची संपत्ती प्राप्त होण्याचा योग असतो.
6 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतःचे सगळे केस गळून गेलेले व स्वतःला टक्कल पडलेले दीसेल तर त्याला अमुल्य धनप्राप्ती होते.
7 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला कुंभार मडके बनवताना दीसल्यास त्याचे स्वतःचे दूखः लवकरच दूर होणार व धनलाभ होणार असे समजावे.
8 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतः उंच भींतीवर बसलेले पाहील्यास सुख-संपत्ति प्राप्त होते.
9 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतःच्या वया पेक्षा मोठे झालेले दीसले तर त्याला मान-सम्मान प्राप्त होतो.
अशुभ स्वप्न फल विचार :
1 . एखाद्या स्त्रीला जर स्वप्नात स्वतःला टक्कल पडलेले दीसले तर गरीबीचा सामना करण्याचे योग संभवतात.
2 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वतःस दुर्घटना घडताना दीसली तर लवकरच आजार पण संभवते.
3 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वतः प्रवासा साठी वाहनद्वारे जाण्याची तयारी करताना दीसल्यास त्याला योजलेला प्रवास रद्द केलेलाच बरा कारण अपघात भय दीसते.
4 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वतः आरशे फोडत असल्याचे दीसते त्याच्या परीवारात कोणाचा तरी मृत्युसम संकट येते.
5 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर मुंग्याना स्वतः मारताना पाहील्यास व्यापार नाश संभवतो.
6 .एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वतःची नाव तूफानी वादळात फंसलेली दीसल्यास येणारा काळ पुर्ण असण्याची ही सूचना समजावी.
7 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वतः कडू औषध घेताना पाहील्यास जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येण्याचे संकेत आहेत.
8 . स्वप्नात रडणारे बालक दीसणे आजारपण व निराशा यांची सूचना देते.
प्रणय संबंधी स्वप्न फल विचार :
1 . एखाद्या स्त्रीला ( युवती ) जर स्वप्नात रत्नजड़ीत आंगठी अथवा नेकलेस बघते तीचे वैवाहीक जीवन सुखी होते.
2 . एखाद्या स्त्रीला ( युवती ) जर स्वप्नात स्वतःस कोण्या मित्राने दीलेल्या बांगड्या घालताना पाहील्यास शीघ्र विवाह होतो.
3 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला कोणतेही सुंदर वस्त्र दीसल्यास त्याला मधुर स्वभावाची विदुषी पत्नी प्राप्त होते.
4 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला औरत को घूंघट निकालते देखता है तो उसका दांपत्य जीवन सुखमय व्यतीत होता है।
5 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला अपली हरवलेली वस्तु पुन्हा मिळवल्यास त्याला आगामी जीवनात सुख मिळते .
6 . एखाद्या स्त्रीला ( युवती ) जर स्वप्नात स्वतःस मेळा , यात्रा, जत्रा, कार्नीवल, मॉल, अथवा फॅशन शोमध्ये स्वतः भाग घेतला असेल,
7 . अथवा त्यामध्ये लोक यांच्या कडे बघत असतील किंवा यांना बघण्यासाठी लोक येत असतील, किवा स्वतःस फीरताना पाहील्यास योग्य नोकरी व योग्य पती प्राप्त होतो.
8 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर इंद्रधनुष दिसल्यास वास्तविक जीवन सुखमय राहील.
9 . एखादी अविवाहित युवती अपल्या प्रेमीला कोण्या दुसर्‍याच युवतीशी विवाह करताना पाहीले तर तीचा विवाह शीघ्र होतो.
10 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला कोणत्याही सुंदर व स्वस्थ्य नवजात बालकाला ( शिशु ) बघीतल्यास संतान प्राप्त होणार.
11 . एखाद्या स्त्रीला जर स्वप्नात पुरुष आंगठी भेट देताना दीसेल तर पती हिच्यावर खुपच प्रेम करेल.
मिश्रीत स्वप्न फल विचार :
1. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला जीवंत गीधाड दीसता सौभाग्य वृद्धि ,जर गीधाड आकाशात उंच उडताना दीसल्यास जास्त लाभदायक.
2. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला साफ-सुथरी श्मशान भूमी दीसल्यास व्यापार वृद्धि होईल.
3. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतःस पुस्तक वाचताना पाहील्यास समाजात मान-सम्मान वाढतो.
4.स्वप्ना मध्ये जर मशीनने कोणासही गवत कापताना पाहील्यास सौभाग्य वृद्धी होते.
5. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला कोण्या युवतीला कानातले ( कर्णफूल ) घालताना पाहील तर लवकरच शुभवार्ता ऐकण्यास मिळेल.
6. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला धान्याची रास दीसेल तर स्वतःच्या परीश्रमाने सफलता प्राप्त होईल.
7. स्वप्ना मध्ये जर एखाद्या स्त्रीला धान्याची रास दीसेल तर सहज मार्गाने धनप्राप्त होईल.
8. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतः कॉफी अथवा चाहा पीताना पाहील्यास त्याला जीवनात हर्ष्-उल्हास व समृद्धी लाभेल.
9. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतःच्या हात व पायात दुखत असल्याचे दीसल्यास धन प्राप्ती होते.
10. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला कारागीर बनून घर बनवताना पाहील्यास जीवनात अपार सफलता मिळेल. क्रमशः