Monday, March 21, 2011

अंतर्मन


 ब-याच दिवसानंतर आज लिहण्याची उर्मी आलीय.असं खुपदा होतं.उर्मी आल्यानंतर काही क्षणातच उत्साह मावळतो.कारण उर्मी चित्तातुन येते आणि उत्साह शरीरातुन.शरीर-मनाची एकरुपता साधल्याशिवाय हे घडत नाही.आज दोन्हींचा समन्वय साधला गेलाय....आपल्या अंतर्यामी असलेल्या अंतर्मनाविषयी आज थोडं लिहीतो..
    आपल्या प्रत्येकाच्या प्राणमय कोषात खोलवर एकच आकांक्षा रुजलेली असते आणि ती म्हणजे आपण सुखी व्हावं,आनंदात जगावं,आपल्या जीवनात ऐश्वर्य ,वैभव,समृद्धी संपन्नता असावी,तेही इतकं अपरिमीत असावं की,त्यात इतरांना सुध्दा भागीदार करुन घ्यावं.या सुखासाठी ,आनंदासाठी आपण झटत राहतो,भट्कत राह्तो.मोठमोठया पदांवर विराजमान होण्याच्या आधीन होतो.पडेल ते कष्ट करतो.प्रयत्नांती हे सगळं प्राप्त देखिल होतं.पण त्यानंतर असं लक्षात येतं की आपण समाधानी नाही आहोत, आनंदी, तृप्त नाही आहोत. कशासाठी तरी मन अजुन सैरभैर आहे. याचा शोध आपल्याला बाहेरच्या दिशेने घेवुन जातो. काही प्रज्ञावंत प्रतिभावंतांच म्हणणं आहे की असं बाहेरच्या दिशेने शोधण्यामध्ये आनंद,ऐश्वर्य कधीच मिळत नाही. आपल्याला एवढच माहीत करुन घ्यायचंय की हे सर्व आपण आपल्यासोबत घेवुन जन्माला आलो आहोत. ही संपदा आपल्या अंतर्यामी आहे, आपल्यात विद्यमान आहे आणि ते म्हणजे आपलं अंतर्मन.....
     आपला एक समज असतो ,पैशांनी सारी सुखं विकत घेता येतात.पण तस नाहीये. ज्या काही सर्वोत्तम गोष्टी आहेत त्या मोफत आहेत. काहीही न देता त्या मिळतात आणि याच गोष्टींची जीवनात जास्त गरज असते जसं की प्रेम ,आस्था,शुध्द अंतःकरण,मानसिक शांती आणि अंतर्मनातील आनंद.
   आपलं अंतर्मन हे अफाट सामर्थ्याचं भांडार आहे.अद्भुत चमत्काराची शक्ती त्याच्याजवळ आहे.ही शक्ती  प्राप्त करण्यासाठी आपण डोळे उघडे ठेवायला हवेत. अफाट समृध्दिचा खजिना,बुध्दिमत्ता, संपन्नता जे काही  सर्वोत्तम जीवन जगण्यासाठी लागतं ते सगळ आपण मिळवू शकतो.त्या आधी त्याला जाणुन घ्यायला हवं.
     लौकीक अर्थाने मन हे एकच असलं तरी त्याच्या काम करण्याच्या पध्द्तीचे दोन भाग आहेत.त्या  दोन्ही भागाचं कार्य मुळातच परस्परांपासुन भिन्न आहे. दोन्हींमध्ये स्वतःचे विशिष्ट गुण व शक्ती आहेत. त्या दोघामध्ये फरक करण्यासाठी त्याना वेगळी नावं दिली गेली. अंतर्मन आणि बाहयमन. अथवा अचेतन  मन आणि सचेतन मन..किंवा जागृत मन आणि निद्रिस्त मन.
   बाहयमन आपल्या शरीराचे मालक असते.आपण काय विचार करतो, कशावर विश्वास ठेवतो .आपल्या मान्यता (समजुती) काय आहेत यावर आधारीत दिलेल्या आदेशांच पालन आपलं अंतर्मन निमुटपणे करत असतं.ते कधीही विचार करत नाही.फक्त तुमच्या आदेशाचं पालन करणे एवढच त्याला समजतं.सर्वप्रथम विचार येतो बाहयमनात.विचारातुन कृती जन्माला येते.आपले विचार जन्म घेतात ते आपापल्या जीवन मुल्यांमधुन,आणि ही मुल्य आधारलेली असतात आपल्या स्वतःच्या श्रध्दांवर आणि भावनांवर. आपलं आज पर्यंतचं जगणं म्हणजे आपल्या विचारांचा परीणाम. दिवसभरात आपल्या मनात अनेक विचार येतात ,अनेक दृष्य आपण पहातो. हे विचार, दृष्य,वस्तु आपण कधीच विसरत नाही.लहानपणी पाठ केलेली स्तोत्रं,कविता आपण केव्हाही म्हणु शकतो. अनेक वर्षानंतर भेट्लेला मित्र आपण लगेच ओळखतो. पोहणे ,सायकल चालवणे या कला आपण कधीच विसरु शकत नाही. हे सर्व ज्ञान ज्या ठिकाणी साठवले जाते वा रेकॉर्ड केले
जाते ते म्हणजे आपलं अंतर्मन. शरीरातील अंतर्गत कार्य प्रणाली संपुर्णपणे अंतर्मनाच्या स्वाधीन असते.
  याआधी सांगितल्याप्रमाणे अंतर्मनाला स्वतंत्र विचार करण्याची शक्ती नाही.ती दैवी शक्ती आहे (Devine Power) अंतर्मन व जागृत मन यांच्या मध्ये अविश्वासाचा व अश्रध्देचा पोलादी पडदा आहे.हज्जारो विचारामधील एखादाच प्रबळ श्रध्देने ओथंबलेला विचार वा इच्छाशक्ती हा पडदा फाडुन अंतर्मनात शिरतो आणि वास्तवात येतो. आपल्या विचारांवर असलेली नितांत श्रध्दा ,जागृत मनातील संकल्प अंतर्मनात गेल्यावर अंतर्मन ते अस्तित्वात आणण्यास कारणीभुत होते.आपण ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करतो त्याच गोष्टी आपल्या जीवनात मोठयाप्रमाणात असतात.


                                                    क्रमश:

3 comments:

  1. राज, लेख आवड्ला परंतु फारच त्रोटक लिहला आहे.अजुन सविस्तर
    लेखन हवे.वाचायला आवडेल.

    ReplyDelete
  2. सुरुवात झकासससससस..झाली 1noooooo.... विषय जो आहे तो खूप छान आहे.
    आणखी लिहिले तर खूप मजा येयील वाचायला....

    आपण सुखी व्हावं,.........आपण समाधानी नाही आहोत, आनंदी, तृप्त नाही आहोत.
    हा जो पार आहे ना तो तर खूपच छान आहे.

    ReplyDelete
  3. Chaan lihila aahe lekh....

    ReplyDelete