Wednesday, March 30, 2011

थरार

भारत पाकिस्तान  या दोन संघातला क्रिकेट सामना म्हणजे धर्मयुद्धच! त्याचा थरार प्रत्येक भारतीयाने काल अनुभवला. 'जबरदस्त' असच त्याच वर्णन कराव लागेल. प्रत्येक भारतीयाच्या मनातली इच्छा काल सुफळ संपूर्ण झाली . ज्यांना क्रिकेट मधल काहीच कळत नाही, ते सुद्धा एखाद्या जाणकारासारखे हा सामना बघत होते. विशेष करून महिलावर्ग! इतरवेळी टी.व्ही .वर सामना असताना घरातल्या बायकांचं डोक उठत. उगाच तणतणतच "अहो ते क्रिकेट बिकेट नको बर का,आम्हाला 'कुंकू 'बघायचीय ",असं म्हणत आपला हक्क गाजवतात परंतु कालचा सामना पाहताना महिलावर्ग ही तेवढाच उत्साही दिसत होता .आश्चर्याची गोष्ट म्हणजे सचिन सेहवाग सोडून कुठलाही क्रिकेटपटु माहीत  नसताना महिलावर्ग सामन्याचा थरार अनुभवत होता .असो .
    भारताचा विजय अपेक्षितच होता तो झालाच. आता टक्कर विश्वविजेता बनण्यासाठी . भारत विश्वविजेता होईलच  हे नक्की .....त्यासाठी भारतीय संघाला खूप खूप शुभेच्छा .आणि भारतीय संघाचं मनापासून अभिनंदन .






1 comment:

  1. he baki khare ahe jyana samjat nahi tyani pan match pahili...
    tydivashi SACHIN kay mast khelalela...

    ReplyDelete