Thursday, March 3, 2011

निमीत्त

अविचल स्वामीनिष्ठा , अतुलनीय पराक्रम यांचे मुर्तीमंत रूप म्हणजे रामदूत हनुमान. मानवाच्या मनात धर्मनिष्ठा, त्वेष, जिद्द, अन्ययाची चीड, जोम, सत्कर्मासाठी अग्रेसर रहाण्याची प्रवृत्ती निर्माण होण्यासाठी प्रातःस्मरणीय समर्थ रामदासांनी महाबली हनुमंताची उपासना करण्याचा उपदेश लोकांना दिला. हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने जगभरात साजरा केला जातो. भक्तगण आपल्या अपेक्षांची लांबलचक यादी हनुमंताच्या श्रीचरणी सादर करतील. आपल्या मनात राष्टनिष्ठा निर्माण होण्यासाठी किती जण हनुमंताकडे प्रार्थना करतात हा आत्मपरिक्षणाचा विषय आहे. साधारणपणे साडेसाती सुरु झाल्यावर शनिवारी , मंगळवारी हनुमंताच्या मंदिरासमोर लांबचलांब रांग दिसते. आपण आपल्या दैनंदिन जीवनात सुख सुविधांचा अनुभव घेत असतो , त्यामागे भारतीय सैन्याचे , पोलिसांचे जीवनपणाला लागले आहे हे आपण विसरतो असेच म्हणावे लागेल. आपण सहजतेने घेत असलेला श्वास देखील भारतीय सैन्याच्या , पोलिसांच्या अथक परिश्रमाचा परिपाक आहे हे आपणास मान्य करावेच लागेल. हनुमंताची उपासना करताना आपण राष्ट रक्षणासाठी कधी प्रार्थना करतो का ? याचे उत्तर व्यस्त प्रमाणात आहे ही घोर निराशा आहे. भारतीय सैन्यास , पोलीसांना हनुमंताचे अभेद्य कवच प्राप्त करुन देणे आपण आद्य कर्तव्य समजणे नितांत गरजेचे आहे. आपल्या क्षण भराच्या प्रार्थनेने भारताच्या चतुःसिमा रक्षणासाठी सैन्यात पराकोटीचा आवेश निर्माण होईल यात तिळमात्र शंका नाही. मात्र त्यासाठी प्रत्येक भारतीयाच्या मनातील आवेश व त्वेष सतत धगधगता असणे अगत्याचे आहे. आवेश व त्वेष हा प्रतिक्षण मानवास अत्यावश्यक असणार मनोविकार आहे. समर्थ रामदासांनी लिहिलेले भीमरुपी महारुद्रा हे स्तोत्र घराघरात श्रद्धेने म्हटले जाते. समर्थरामदासांनी हिंदुधर्मस्थापनेसाठी सिद्ध हनुमंताचे अत्यंत प्रेरणादायी स्तोत्र केले आहे. या श्रद्धायुक्तमनाने स्तोत्राच्या नित्यपठणाने मनातील निराशा , भय , अगतिकता अशी अवस्था क्षणार्धात दूर होते. त्याच बरोबर आपल्या राष्टाच्या सर्वांगीण रक्षणासाठी हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे. विचार करा रोज प्रत्येकाने या स्तोत्राचे पठण केले तर भारतीय सैन्यास हनुमंत कृपेचे अभेद्य वज्रकवच प्राप्त होईल. स्तोत्र पुढील प्रमाणे-
श्रीगणेशाय नमः।
कोपला रुद्र जे काळी , ते काळा पाहावेचिना।
बोलणे चालणे कैचे , ब्रह्मकल्पांन्त मांडला॥१॥
ब्रह्मांडाहुनी जो मोठा , स्छुळ उंच भयानकु।
पुछ्य ते मुर्डले माथा , पावले सुन्यमंडळा॥२॥
त्याहुनी उंच वज्रांचा , स्छुळ उंच भयानकु।
त्यापुढे दुसरा कैचा , आद्भुत तुळणा नसे॥३॥
मार्तंडमंडळा ऐसे , दोनी पिंगाक्ष ताविले।
कर्करा घडिल्या दाढा , उभे रोमांच उठीले॥४॥
आद्भुत गर्जना केली , मेघचि चेवले भुमी।
फुटले गिरीचे गाभे , तुटले सींधु आटले॥५॥
आद्बुत वेश आवेशे , कोपला रण कर्कशु।
धर्म स्थापनेसाठी , दास तो उठीला बळे॥६॥
॥ श्रीसमर्थ रामदासकृतं मारुतीस्तोत्रं संपूर्णम्॥
अशा अद्भुत वेश धारण करणा-या हनुमंतास आपण भारतात होणारी घुसखोरी , अतिरेकि कारवाया रोखण्याचे आव्हान केले पाहिजे . आपल्या सैन्यदलास मनोबल , अतुलनिय पराक्रम करण्याचे सामर्थ्य देण्याची प्रार्थना करणे अगत्याचे आहे. या स्तोत्रपठणाने आपण हनुमंतास विनंती करत आहोत ती विश्वकल्याण्याची! हा उदात्त विचार मनात घेऊन आपणही हनुमान जयंतीपासून हे स्तोत्र नित्य म्हणावे ही नम्र विनंती. (सौजन्य -www.maiboli.com.}

No comments:

Post a Comment