एका गर्दीच्या ठिकाणी मोठ्या इमारतीच्या पाय-यांवर एक अंध मुलगा हातात फलक घेउन बसला होता.
त्याच्यासमोर डोक्यावरची हॅट ठेवलेली होती.त्यात काही नाणी होती आणि हातातील फलकावर लिहले होते
‘’मी अंध आहे मला मदत करा’’
एक व्यक्ती आली तीने आपल्या खिशातुन नाणं काढुन त्या हॅट मध्ये टाकल फलकावर मागच्या बाजुने काहीतरी लिहलं आणि सर्वांना दिसेल असा फलक ठेवला.
काही वेळानंतर खुपशा नाण्यांनी आणि नोटांनी त्याची हॅट पुर्ण पणे भरुन गेली. दुपार नंतर ज्या व्यक्तीने
फलकावर काही लिहले होते ती व्यक्ती मुद्दामहुन काय घडले हे पाहण्यासाठी आली. त्या अंध मुलाने त्याच्या
पावलांचा आवाज ओळखला, आणि म्हणाला,’सकाळी तुम्हीच आला होता आणि या फलकावर काहीतरी लिहुन गेलात, काय लिहलं होतं त्यावरयावर ती व्यक्ती म्हणाली ‘’मी फक्त एक खरं सत्य लिहलं जे तु तुझ्या शब्दात लिहलं होतस.’’ त्याने लिहलंहोतं...’’आजचा दिवस खुप सुंदर आहे,पण मी त्याचा आनंद घेउ शकत नाही.’’
मित्रांनो, तसं पहायला गेलं तर दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे की मुलगा अंध आहे. पहि्ल्या वाक्यातुनफक्त मदतीची अपेक्षा आहे, दुस-या वाक्याचा अर्थ असा निघतो की आपण सर्व जण या सुंदर दिवसाचाआनंद घेउ शकतो त्याला सोडुन कारण तो अंध आहे. मग आपण किती भाग्यवान आहोत.
अशा लहान सहान गोष्टींनी आपण सृजनशील होउ शकतो, फक्त ती दृष्टी हवी. आपल्याजवळ जे आहे त्या साठी आभार माना,अनेकांकडे तेही नाही.ज्यांना मदतीची गरज आहे त्याना मदत करा आणि मोठे व्हा.
khup chan vichar ahe.blog avdala tumacha.
ReplyDeletekeep writing .